28 April 2024 12:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Credit Card | तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे? मग या 5 चुका टाळा, अन्यथा आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल Property Knowledge | फ्लॅट किंवा घर विकत घेण्याचा विचार आहे? या 4 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पैसे-प्रॉपर्टी हातचं जाईल EDLI Calculation | नोकरदार EPFO सदस्यांना मिळतो 7 लाखांपर्यंत मोफत इन्शुरन्स, महत्त्वाचे फायदे लक्षात ठेवा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार? SBI CIBIL Score | पगारदारांनो! 'या' चुकांमुळे तुमचा सिबिल स्कोअर खराब होतो, अशा प्रकारे वाढवा क्रेडिट स्कोअर Personal Loan | पर्सनल लोन फेडता येत नसेल तर काळजी करू नका, करा हे काम, टेन्शन संपेल IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या
x

अर्णब यांची जामीनावर सुटका | पण वृत्त दोषमुक्त झाल्यासारखं

Supreme court of India, Granted bail, Arnab Goswami

मुंबई, ११ नोव्हेंबर: अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात Republic TV’चे संपादक अर्णब गोस्वामी यांना सुप्रीम कोर्टाकडून (Supreme Court of India) मोठा दिलासा मिळाला आहे. गोस्वामी यांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे लवकरच त्यांची लवकरच तळोजा कारागृहातून सुटका होईल.

विशेष म्हणजे अर्णब गोस्वामी यांच्यासोबतच प्रकरणातल्या इतर दोन आरोपींना सुद्धा जामीन मंजूर झाला आहे. गोस्वामी यांनी दिलासा नाकारणं ही मुंबई हायकोर्टाची चूक होती, असं महत्त्वपूर्ण विधान सुप्रीम कोर्टाने सुनावणीदरम्यान केलं.

सुप्रिम कोर्टाने महाराष्ट्र पोलिसांना विचारलं की, अर्णब गोस्वामी प्रकरणात त्यांना पोलीस कोठडीच घेऊन चौकशी करणं गरजेचं आहे का? चंद्रचूड यांनी विचारलं की, गोस्वामीवर पैसे थकवल्याचा आरोप आहे. तसेच कुणी आत्महत्या केलीय तर तो अपहरणाचा गुन्हा आहे का?

“तुम्हाला त्यांची विचारधारा आवडत नाही असं होऊ शकतं. माझ्यावर सोडा. मी त्यांची वाहिनी पाहत नाही. परंतु जर उच्च न्यायालय जामीन देत नाही तर त्या नागरिकाला तुरूंगात टाकलं जातं. आम्हाला एक कठोर संदेश द्यायला हवा. पीडित व्यक्तीला एका निष्पक्ष चौकशीचा अधिकार आहे. तपास सुरू राहू द्या. परंतु राज्य सरकारं या आधारावर व्यक्तींना लक्ष्य करत राहिली तर एक कठोर संदेश बाहेर जायला हवा,” असंही न्यायमूर्ती चंद्रचूड या म्हणाले.

 

News English Summary: Republic TV editor Arnab Goswami has received great relief from the Supreme Court of India in the Naik suicide case. Goswami has been granted bail by the Supreme Court. So he will be released from Taloja Jail soon. Apart from Arnab Goswami, two other accused in the case have also been granted bail. Goswami’s refusal to grant relief was a mistake of the Mumbai High Court, an important statement made by the Supreme Court during the hearing.

News English Title: Supreme court of India has granted bail to Arnab Goswami News updates.

हॅशटॅग्स

#Supreme Court(138)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x