20 April 2024 8:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 21 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Godawari Power Share Price | अवघ्या 3 वर्षात 339% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, वेळीच फायदा घ्या Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार?
x

ग्राम परिवर्तन; यवतमाळ जिल्हा राज्यात अव्वल, कार्यक्षम जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुखांची कामगिरी: सविस्तर

यवतमाळ : ग्रामीण भागात विकास साध्य करायचा म्हटलं की आधी तिथल्या सामान्य लोकांप्रती प्रामाणिक आस्था आणि तिथे भेडसावणाऱ्या मूळ समस्यांचा अभ्यास करणे सुद्धा तितकेच गरजेचे असते. परंतु, लोकाभिमुख विकास साधायचा म्हटल्यावर विषय जिल्ह्यातील प्रशासकीय सेवेवर येऊन थांबतो, असा साहजिकच विचार प्रत्येकाच्या मनात येतो. मात्र, देशभरात मोजकेच प्रामाणिक वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आहेत जे प्रशासनातील अधिकारांचा अभ्यासपूर्ण वापर करतात आणि ग्रामीण भागातील लोकाभिमुख विकास तसेच विविध योजना सत्यात उतरवताना दिसतात. त्यातीलच एक नाव म्हणजे यवतमाळ जिल्ह्याचे विद्यमान जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख ज्यांच्यामुळे ग्राम परिवर्तनात यवतमाळ जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे.

यवतमाळ जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वीच त्यांनी इथल्या विविध समस्यांचा अभ्यास केला होता. तसेच पदभार स्वीकारल्याच्या पहिल्याच दिवशी शेतकरी आत्महत्या, पीककर्ज, कर्जमाफी आणि पाणीटंचाई सारख्या गंभीर विषयांवर स्वतंत्र बैठका आयोजित करून स्थानिक नागरिकांना कसा दिलासा देता येईल यावर लक्ष केंद्रित केलं. दरम्यान, राज्य सरकारच्या ५ महत्वाच्या योजनांची काटेकोर अंमलबजावणी करून त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्याला राज्यात अव्वल क्रमवारीत पोहोचवले. पाण्याची समस्या भीषण असल्याने त्यासंबंधित विषयांवर गंभीरपणे लक्ष केंद्रित आणि काही शिस्तबद्ध नियोजनातून पाण्याची पातळी ७ मित्राने वाढवण्यात यश मिळवलं.

दरम्यान, राज्य शासन, टाटा ट्रस्ट, रिलायन्स फाउंडेशन, ऍक्सिस बँक फाउंडेशन आणि बायएफ’च्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन राबवून यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल ३६ ग्रामपंचायतीच्या ७२ गावांमध्ये स्वतःच्या प्रशासकीय कुशलतेतून विकासाचं उत्तम उदाहरण निर्माण केलं. टाटा ट्रस्टने यवतमाळ आणि नेर तालुक्यात मत्स्यपालन, सौरऊर्जेवरील अंगणवाडी तसेच डिजिटल शाळा निर्मितीच्या कामांना बळ दिले. विशेष म्हणजे इथे पिण्याचे पाणी, किचन गार्डन आणि शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन केल्या. बायफ’ने ग्रामस्थांचे जीवनमान उंचावणे, तसेच व्यवसाय कसा करावा आणि त्या संबंधित प्रस्ताव कसा बनवायचा याचे ग्रामस्थांना मागदर्शन केलं आणि त्यांच्यातला उद्योजक जागृत करण्यावर भर दिला.

इतकंच नव्हे तर लोकशाही आणि सामान्य जनता हेच आपल्या देशाचा मूळ गाभा असल्याने निवडणूक प्रक्रियेतील संभ्रम लोकांच्या मनातून दूर करण्यासाठी गावोगावी आधुनिक ईव्हीएम मशिन्स मागवल्या आणि लोकांना त्याविषयी मार्गदर्शन करून मोठ्याप्रमाणावर जनजागृती सुद्धा केली. प्रसार माध्यमांनी त्यांच्याशी संपर्क साधून जिल्ह्याच्या विकासाची माहिती करून घेतली तेव्हा जिल्ह्याला मिळालेल्या बहुमानाचे श्रेय म्हणजे ग्रामस्थांच्या श्रमाचे फलित असल्याचे सांगितले आणि त्यातून त्यांच्यातला जिल्हाधिकारी नव्हे, तर स्वतःच्या टीम’ला सोबत घेऊन ‘टीमवर्क’ने स्वप्न सत्यात उतरवणारा कुशल ‘प्रशासकीय लीडर’ समोर आला. कारण कोणत्याही गावात कोणतीही योजना ग्रामस्थांच्या प्रत्यक्ष सहभागाशिवाय सत्यात उतरूच शकत नाहीत, असा त्यांचा ठाम विश्वास आहे.

असे कर्तव्यदक्ष व उत्तम प्रशासक तसेच लोकाभिमुख सेवा करणारे यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख [IAS- जिल्हाधिकारी यवतमाळ] यांची ह्या वर्षीच्या ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर – २०१९’ पुरस्कारासाठी प्रशासन आय.ए.एस या प्राॅमिसिंग या कॅटेगरी मध्ये नामांकन झाले आहे. दरम्यान, प्रशासनातील अशा अधिकाऱ्यांना सामान्यांकडून सुद्धा प्रोत्साहन मिळाले गरजेचे आहे. त्यासाठी डॉ. राजेश देशमुख यांना या लिंक वर Click करून त्यांना ऑनलाईन मतदान करा आणि लोकशाही अजून सुदृढ करा.

 

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x