महत्वाच्या बातम्या
-
भाजपच्या चक्काजामवर सुमित राघवन भडकला | म्हणाला, हा काय मूर्खपणा आहे?
भारतीय जनता पक्षानं राज्यभरात ओबीसी आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन सुरु केलं आहे. मुंबईतील दहिसर-मीरारोड या भागातही प्रदर्शनं केली गेली. या आंदोलनादरम्यान कोरोनाचे सर्व नियम मोडल्याचं दिसून आलं. अनेकांच्या तोंडावर मास्क नव्हते. सोशल डिस्टंसिंग असण्याचा तर प्रश्नच नव्हता. या प्रकारावर प्रसिद्ध मराठी अभिनेता सुमित राघवन संतापला आहे. अशी आंदोलनं करुन नेमकं तुम्ही काय साध्य करताय? असा थेट सवाल त्यानं भाजपाला केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
एकनाथ शिंदेंविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट | मराठी कलाकार मयुरेश कोटकरला अटक
शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध समाज माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी मराठी कलाकाराला अटक करण्यात आली आहे. मराठी कलाकार मयुरेश कोटकर यांना ठाण्यातील श्रीनगर पोलिसांनी अटक केली. कोटकर यांना आता कोर्ट कोठडी सुनावण्यात आलेली आहे. मयुरेश कोटकर यांनी अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
3 वर्षांपूर्वी -
सुशांतसिंहच्या मृत्यूचं सत्य सीबीआयकडूनही गुलदस्त्यात | राज्याला बदनाम करणारे विरोधकही मूग गिळून शांत
मागील वर्षी म्हणजेच २०२० मध्ये बॉलिवू़ अभिनेता सुशांतसिंग राजपूतयाचा मृतहेह वांद्रा येथील त्याच्या राहत्या घरी गळफास लावलेल्या अवस्थेत मिळाला. त्याच्या मृत्यूनंतर सिनेसृष्टीसह राजकारणीही हळहळले. यानंतर त्याचा मृत्यू कसा झाला याचा तपास सुरु झाला. ही हत्या होती की आत्महत्या यावरुन राजाकराण सुरु झालं. अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूच्या तपासावरून ‘बिहार विरुद्ध महाराष्ट्र’ पोलीस असा सामना रंगला. दुसरीकडे सोशल मीडियावर मुंबई पोलिसांविरुद्ध बदनामीचे षड्यंत्र राबविल्याचे समोर येताच, आरोप- प्रत्यारोपांचे राजकारण तापले. मात्र, वर्षभरानंतरही सुशांतच्या मृत्यूचे गूढ कायम आहे.
3 वर्षांपूर्वी -
राहुल गांधींना ‘पंतप्रधानपदी’ पाहणं म्हणजे मोदींना ‘पंतप्रधान’ म्हणून कायम करणं - जावेद अख्तर
देशात सध्या कोरोना आपत्तीमुळे पंतप्रधान मोदी आणि भाजपाची प्रतिमा मलिन झाली आहे. तसेच नुकत्याच पार पडलेल्या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाची ३ प्रमुख राज्यांत बिकट अवस्था झाली आहे. त्यात देशातील संपूर्ण भाजपाला एकट्या ममता बॅनर्जींनी दिलेली मात ही विरोधकांचा आत्मविश्वास वाढविण्यात कारणीभूत ठरली आहे. तसेच उत्तर प्रदेशात देखील पंचायत निवणुकीत भाजपाची चिंता वाढली आहे. मात्र यामध्ये काँग्रेसने कोणतीही विशेष कामगिरी केलेली नाही.
3 वर्षांपूर्वी -
राजे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भेटू पाहत होते, या अभिनेत्री कोणते प्रश्न घेऊन भेटल्या होत्या? - सचिन सावंत
मराठा आरक्षण हा राज्याचा विषय आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटते. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांची आजपर्यंत संभाजीराजे छत्रपतींशी भेट होऊ शकली नाही, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी यावेळी मांडलेल्या भूमिकेतील एका मुद्द्यावर बोट ठेवत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करत सवाल केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | राकेश-दक्षिणाच्या लग्नासाठी संपूर्ण विमान बूक केलं | विमानात १६१ नातेवाईकांची उपस्थिती
जेव्हा देशात कोरोनाच्या संकटामुळे सामान्य जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अशा काळात सरकारने लॉकडाऊनसारखे कठोर निर्बंध लागू केले आहेत. लग्नाच्या या मौसमात अनेक लोकांना यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर काही लोक या सोहळ्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | अँड ऑस्कर गोज टू | मोदींची चित्रपट क्षेत्रातूनही फिरकी
पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना व्हायरस प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभरातील जिल्हाधिकारी, डॉक्टर्स, पॅरामेडीकल स्टाफ आणि फ्रंटलाईन वर्कर्सं यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगच्या माध्यमाने संवाद साधत आहेत. याच एक भाग म्हणून मोदींनी शुक्रवारी वाराणसीतील जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागातील फ्रंटलाईन वर्कर्संशी संवाद साधला. यावेळी, कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांबद्दल बोलताना मोदी भावूक झाले होते.
3 वर्षांपूर्वी -
आपल्याला मृत्यूच्या 8-12 आठवड्यांनंतर लसचा दुसरा डोस मिळू शकेल का?
कोरोनाचा देशात शिरकाव होऊन आता वर्ष लोटलं आहे. पहिल्या लाटेनंतर देशात दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला. यात दिलासा देणारी बाब होती ती म्हणजे करोनावरील लस. करोनावरील लशींच्या आपतकालीन वापराला केंद्र सरकारने परवानगी दिली. त्यामुळे आता सगळ्याचं लशीकरण होईल आणि करोना संपेल, अशीच जवळपास सगळ्याचा समज होता. मात्र, हे सगळं अंदाज चुकले. एकीकडे देशात करोनाचे नवनवे म्युटंट आढळून येत असताना लसीकरणाच्या कार्यक्रमाला खिळ बसली आहे.
3 वर्षांपूर्वी -
बापरे! | हे अमृता फडणवीसांचे मंगळवारचे प्रेरणादायी विचार?, 'जब कुत्ते पीछे भौंक रहे हो तो'...
कोणत्याही विषयात ट्विट करून कायम प्रकाशझोतात राहण्याचा अमृता फडणवीस यांचा प्रयत्न काही नवा विषय राहिलेला नाही. त्यांना देखील कोणत्याही विषयात सत्ता बदलाची स्वप्न कायम पडत असतात. अनेकदा त्यांच्या ट्विटचा अर्थ त्यांना स्वतःला तरी समजतो का असा देखील प्रश्न उपस्थित होताना दिसला आहे.
3 वर्षांपूर्वी -
देशात वादळ आणि कोरोना आपत्ती | त्यात अमृता फडणवीस यांचं सूचक नव्हे तर 'निरर्थक ट्विट'
कोणत्याही विषयात ट्विट करून कायम प्रकाशझोतात राहण्याचा अमृता फडणवीस यांचा प्रयत्न काही नवा विषय राहिलेला नाही. त्यांना देखील कोणत्याही विषयात सत्ता बदलाची स्वप्न कायम पडत असतात. अनेकदा त्यांच्या ट्विटचा अर्थ त्यांना स्वतःला तरी समजतो का असा देखील प्रश्न उपस्थित होताना दिसला आहे.
3 वर्षांपूर्वी -
कोणत्या फेक न्यूज फॉलो करते ही? | म्हणाली, समजलं की ते गंगा नदीतील नाही तर नाजयेरियातील फोटो
देशातील उत्तरेकडील राज्यांमध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. त्यात बिहार आणि उत्तर प्रदेशात स्मशान भूमीत २-३ दिवसांचा वेटिंग लागत असल्याने कोरोना प्रेतातून दुर्गंधी पसरत असल्याचं देखील समोर आलं आहे. परिणामी बिहार आणि उत्तर प्रदेशातील कोरोना रुग्णांचे नातेवाईक धक्कादायक मार्ग स्वीकारून स्वतःला मोकळे करत असल्याचं पाहायला मिळतंय. बिहार मधील गंगा नदीत जवळपास १०० मृत कोरोना बॉडी फेकल्याचं आढळून आलं आहे आणि अगदी तसाच प्रकार उत्तर प्रदेशातील गंगा नदीत देखील पाहायला मिळाला होता. त्यामुळे स्थानिक प्रशासनाला घाम फुटला आहे.
3 वर्षांपूर्वी -
केंद्र सरकार नक्कीच कमी पडतंय, स्वत:ची प्रतिमा निर्मिती करण्यापेक्षा लोकांचा जीव वाचवा, अनुपम खेर यांनी झापलं
बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर हे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचे कट्टर समर्थक आणि मोदी भक्त समजले जातात. मात्र आता देशातील कोरोनाच्या भीषण परिस्थितीवरुन त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. सरकार कुठे न कुठे कमी पडलं असून स्वत:ची प्रतिमा निर्मिती करण्यापेक्षा लोकांचा जीव वाचवणं हे महत्वाचं आहे अशा प्रकारची टीका अभिनेते अनुपम खेर यांनी केली आहे. अभिनेता अनुपम खेर यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हे मत व्यक्त केलंय.
3 वर्षांपूर्वी -
नको तिथे विवादित वक्तव्य | कंगना स्वतःच ठरतेय स्वतःची ब्रँड व्हॅल्यू कमी होण्यामागील कारण
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकींच्या निकालानंतर कंगना रानौत ट्विटरवर नको ते बरळली आणि यानंतर ट्विटरने तिचे अकाऊंट सस्पेंड केले. ट्विटरच्या या कारवाईनंतर कंगनाची सटकलीये, पण बॉलिवूडच्या एका गटात मात्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. रिचा चड्ढा, स्वरा भास्कर, गुलशन देवैया आणि हंसल मेहता यांनी कंगनाचे ट्विटर अकाऊंट सस्पेन्ड होताच प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे आनंद साजरा केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
मला चांगले उपचार मिळाले असते तर मी वाचलो असतो | मोदींना मेन्शन करत कलाकाराने प्राण सोडले
प्रसिद्ध अभिनेता आणि नाट्यकर्मी राहुल व्होरा याचे कोरोना संसर्गानंतर रविवारी निधन झाले. पुन्हा जन्म घेऊन चांगलं काम करेन, आता हिंमत हरलो आहे, अशा आशयाची पोस्ट राहुलने शनिवारीच फेसबुकवर केली होती. दुसऱ्याच दिवशी तो आयुष्याशी झुंजही हरला. दिग्दर्शक आणि थिएटर गुरु अरविंद गौड यांनी समाज माध्यमांवरून राहुलच्या निधनाचं वृत्त दिलं.
3 वर्षांपूर्वी -
कंगणाचा कोरोना रिपोर्ट पॅाझिटिव्ह | म्हणाली 'हर हर महादेव', मी त्याचा नाश करणार!
देशामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असेल्या प्रत्येक विषयावर स्वत:चं मतं मांडण्यात आघाडीवर असणाऱ्या कंगणा राणावतला अखेर कोरोनाची लागण झालेली आहे.कंगणाने गेल्या वर्षभरात अनेक मुद्दयांवक महाराष्ट्र सरकार,उद्धव ठाकरे,संजय राऊत यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.कंगणा भाजपशी निगडीत असल्याचा आरोप तिच्यावर सातत्याने होत असतो.
3 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती | भारताला नव्या पंतप्रधानांची गरज - स्वरा भास्कर
सध्या देशाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. करोनामुळे दररोज कित्येकांना आपला जीव गमवावा लागत आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढतच आहे. आरोग्य यंत्रणा अपुऱ्या पडत आहेत. कित्येक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा आहे. अनेक ठिकाणी रुग्णांना बेड मिळत नाहीयेत. या सर्व परिस्थितीसाठी बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिने केंद्र सरकारला जबाबदार धरलं आहे. सरकारच्या नियोजनशून्य कारभारावर ताशेरे ओढत स्वराने चक्क पंतप्रधान बदलण्याची मागणी केली.
3 वर्षांपूर्वी -
BREAKING | बंगाल हिंसाचारावरील संतापजनक ट्विट्स | कंगना रनौतचे ट्विटर हँडल सस्पेंड
अभिनेत्री कंगना रनौतचे ट्विटर हँडल सस्पेंड करण्यात आले आहे. ट्विटरच्या नियमांचं उल्लंघन करणारी पोस्ट शेअर केल्यामुळे तिच्यावर कारवाई करण्यात आली. बंगाल हिंसाचारावरील ट्वीट्सनंतर कारवाई करण्यात आली. नुकत्याच झालेल्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या कथित हिंसाचाराबद्दल अभिनेत्रींनी ट्वीटच्या करत आक्षेपार्ह भाष्य केले होते.
3 वर्षांपूर्वी -
प. बंगाल निकालानंतर कंगना पिसाळली? | गुजरात दंगलीचं अप्रत्यक्ष उदाहरण देत मोदींना रुद्रावतार घेण्यासाठी ट्विट
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर तृणमूल काँग्रेसकडून हिंसाचार करण्यात आल्याचा आरोप होत आहे. ट्विटरला भारतीय जनता पक्षाचे नेते आणि समर्थकांकडून पश्चिम बंगालमधील व्हिडीओ शेअर करत राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणीदेखील केली जात आहे. पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु असून भाजपासहित इतर पक्षांनाही तृणमूल काँग्रेसवर आरोप केले आहेत. हिंसाचारात ११ जणांचा मृत्य झाला असून केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंबंधी सविस्तर अहवाल मागवला आहे.
3 वर्षांपूर्वी -
कंगनाचं अज्ञान | म्हणाली.. केंद्र सरकार मोफत लस देतंय आणि महाराष्ट्र सरकार स्वतःचा प्रचार करतंय
देशात कोरोना लसीकरणाचा चौथा टप्पा १ मे पासून सुरु होणार आहे. राज्यांकडे १८ ते ४४ वयोगटातील लोकांना देण्यासाठी लसच उपलब्ध नाहीय. कालच महाराष्ट्र सरकारने ६००० कोटीची तरतूद करून १८ ते ४४ वयोगटातील सर्वाना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान काल कोविन अॅपवर नोंदणी केल्यानंतरही लसीकरणाचा स्लॉट केवळ ४५+ असाच दाखवत होता.
3 वर्षांपूर्वी -
देशाचे भलेही स्मशानभूमीत रुपांतर झालं तरी चालेल, पण आपल्या 'मालकाची' प्रतिमा मलिन होता कामा नये - स्वरा भास्कर
देशात कोरोना रुग्ण बरे होणाच्या वेगामध्ये एका दिवसाच्या आत 111.20% ची वाढ झाली आहे. शुक्रवारी 24 तासांच्या आत विक्रमी 2 लाख 20 हजार 382 लोक रिकव्हर झाले आहेत. आतापर्यंत जगात एका दिवसाच्या आत बरे होणाऱ्या रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी गुरुवारी एका दिवसात विक्रमी 1 लाख 98 हजार 180 लोक बरे झाले. बुधवारी 192 लाख लोक रिकव्हर झाले होते. मात्र चिंतेची बाब म्हणजे कोरोनाचे नवीन रुग्ण आढळण्याची संख्या सातत्याने वाढत आहे. शुक्रवारी देशात विक्रमी 3 लाख 44 हजार 949 नवीन रुग्ण आढळले. गेल्यावर्षीपासून आतापर्यंत एखाद्या देशात एका दिवसात नवीन रुग्ण मिळण्याचा हा सर्वात मोठा आकडा आहे. शुक्रवारी 2,620 लोकांचा संक्रमणामुळे मृत्यू झाला.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल
- Mastek Share Price | 40 रुपयाच्या शेअरची कमाल! तब्बल 4000 टक्के परतावा दिला, आता एका दिवसात 20% वाढला
- Gold Rate Today | बापरे! लग्नासराईच्या दिवसातही सोनं खरेदी करणं परवडणार नाही, लवकरच 1 लाख रुपये तोळा होणार
- Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार?
- Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा
- Infosys Share Price | भरवशाचा इन्फोसिस शेअर उसळी घेणार, दिग्गज ब्रोकिंग तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर
- Numerology Horoscope | 17 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
- Stocks in Focus | मार्ग श्रीमंतीचा! हे टॉप 5 बँकिंग शेअर्स तुम्हाला अल्पावधीत 38 टक्केपर्यंत परतावा देतील, संधी सोडू नका
- Reliance Power Share Price | अवघ्या 4 वर्षात 2325 टक्के परतावा दिला, शेअर प्राईस 26 रुपये, पुढे तेजी येणार का?