23 April 2024 11:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Salary Account | SBI बँक सॅलरी अकाउंटचा घ्या फायदा, अनेक चार्जेस पासून होईल सुटका Quant Mutual Fund | शेअर्स नको? या 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, जलद पैसा वाढवा Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची विशेष योजना, दरमहा बचतीवर खात्रीने मिळेल 80,000 रुपयांचा परतावा EPF Money Withdrawal | पगारदारांनो! EPF खात्यातून पैसे काढल्यावरही टॅक्स भरावा लागणार, कधी आणि किती ते लक्षात ठेवा Numerology Horoscope | 23 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 23 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

मतदान आणि मतमोजणीत ३ दिवसांचं अंतर गडबड करण्यासाठी का? भुजबळ

Former Deputy CM chhagan bhujbal, EVM, Ballet paper

मुंबई : शनिवारी निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र आणि हरियाणा राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. एकिकडे निवडणूक आयोगाच्या वतीने या महत्त्वाच्या घोषणा केल्या जात असतानाच देशातील राजकीय पटलावर मोठ्या हालचाली आणि प्रतिक्रियांची लाट उसळल्याचं पाहायला मिळालं.

निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केल्यानंतर छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हे सवाल केले. राज्यात २१ ऑक्टोबरला मतदान होत असून २४ ऑक्टोबरला मतमोजणी होत आहे. त्यावर भुजबळ यांनी आक्षेप घेतला आहे. ईव्हीएमबाबत सुरुवातीपासूनच लोकांचा आक्षेप आहे. असं असतााना मतमोजणी आणि मतदानामध्ये तीन दिवसाचे अंतर का ठेवण्यात आले? दुसऱ्या दिवशी मतमोजणी का ठेवली नाही. आम्ही सत्तेत असतानाही निवडणुका व्हायच्या. तेव्हा दुसऱ्या दिवशी किंवा फारफार तर त्यानंतर मतमोजणी व्हायची. यावेळी मात्र मतमोजणीत तीन दिवसाचं अंतर ठेवण्यात आलं आहे, असं सांगतानाच सरकारला ईव्हीएममध्ये गडबड करायची तर नाही ना? अशी शंका कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

काही दिवसांपूर्वी ईव्हीएमबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोधकांना एकत्र आणत पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये ईव्हीएमवर आक्षेप घेत मुंबईत निवडणूक प्रक्रियेविरोधात मोर्चा काढला जाणार होता. मात्र दरम्यानच्या काळात राज ठाकरेंना कोहिनूर प्रकरणी ईडीची नोटीस बजाविण्यात आली. २२ ऑगस्ट रोजी राज ठाकरेंनी तब्बल साडेआठ तास चौकशी करण्यात आली. त्यामुळे ईव्हीएमबाबत विरोधकांच्या आंदोलनाचे पुढे काही झाले याबाबत विचारणा केली असताना भुजबळांनी आपल्याला याबाबत काही माहिती नसल्याचं सांगितलं.

हॅशटॅग्स

#ChhaganBhujbal(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x