26 April 2024 4:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Gold Rate Today Pune | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Hot Stocks | असा शेअर निवडा, कुबेर पावेल! अवघ्या 6 दिवसात दिला 80 टक्के परतावा, खरेदी करणार का? Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले?
x

पहले सरकार, फिर मंदिर...उद्धव ठाकरे १६ जूनला अयोध्येला जाणार

Shivsena, uddhav thackeray, sanjay raut, bjp maharashtra, bjp, ayodhya, pehle mandir fir sarkar

लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेनेत फार काही अलबेल नव्हतं. उद्धव ठाकरे लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी सतत भाजप आणि नरेंद्र मोदींवर टीका करताना दिसले, परंतु पुन्हा दिलजमाई करत दोघेही सोबतच निवडणूक लढले. २०१९ लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदींना कोंडीत पकडण्यासाठी उद्धव ठाकरेंनी अयोध्येचा दौरा केला होता आणि त्यावेळी “पेहले मंदिर फिर सरकार” असा नारा देत भाजप विरुद्ध उघड-उघड रणशिंगच फुंकलं होतं.

उद्धव ठाकरेंची हि घोषणा संपूर्ण देशभर गाजली, तसेच या आशयाचे होर्डिंग्स संपूर्ण महाराष्ट्रभर लावून शिवसेनेने चांगलीच वातावरण निर्मिती केली होती. परंतु आपणच दिलेली घोषणा विसरून आणि शिवसैनिकांना युती न करण्याचे वचन मोडून सत्तेसाठी भाजपसोबत हातमिळवणी केली. मंदिराआधीच केंद्रात सरकार बनले आणि शिवसेना १८ खासदारांसह त्यात सहभागी देखील झाली. नव्या सरकारमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेच्या वाट्याला दुय्यम खाते आले.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील अयोध्या दौऱ्याची तारीख ठरली आहे. त्यानुसार, येत्या १६ जूनला विजयी खासदारांसह उद्धव ठाकरे अयोध्येत दाखल होणार आहेत. महाराष्ट्रात होऊ ठाकलेल्या २०१९ च्या विधानसभेची ही पूर्वतयारीच असावी. उत्तर भारतीय मतदाराला खुश करून महाराष्ट्रातील उत्तर भारतीय मतदानाचा टक्का स्वतः कडे वळवण्याचं राजकारण शिवसेना करताना दिसत आहे. तसेच शिवसेना-भाजपचा विधानसभेचा ५०-५० चा फॉर्मुला ठरला आहे. भाजप आपल्या वाटेच्या १८ जागा मित्रपक्षांसाठी सोडणार असले तरी स्वतःच्या जागा कमी होणार नाहीत याची ते योग्य काळजी घेतील हे नक्की.

विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपला मुख्यमंत्रीपदासाठी जागा कमी पडल्यास मित्रपक्षांची भूमिका निर्णायक ठरणार असून मित्रपक्षांचा कौल भाजपच्या बाजूनेच राहणार असल्याने शिवसेनेची कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेसमोर धर्मसंकट उभं राहिल्यानेच उद्धव यांनी पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा पुढे करून भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचं सांगण्यात येतं. त्याचाच एक भाग म्हणून उद्धव यांचा हा अयोध्या दौरा असल्याचंही राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x