महत्वाच्या बातम्या
-
त्या १०० टक्के नालेसफाईतील 'टक्केवारी' नक्की गेली कुठे? सविस्तर
मुंबई आणि शिवसेनेची सत्ता असलेल्या आजूबाजूच्या शहरांमध्ये पावसाळा सुरु होऊन १-२ दिवस उलटले नाहीत तरी जागोजागी पाण्याची गटारं तुंबल्याने लोकांच्या घरात पाणी शिरल्याचे पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी तर पाणी तुंबल्याने प्रवास करणे कठीण झाले असून वाहन देखील अडकून पडली आहेत. विशेष म्हणजे पावसाळा सुरु होऊन १-२ दिवस झाले आहेत आणि म्हणावा तास पाऊस देखील पडलेला नाही, मात्र शहरात अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु पावसाळा सुरु होण्यापूर्वी सामना वृत्तपत्रात शिवसेनेकडून १००% नालेसफाईची कामं झाल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे पावसाच्या पहिल्याच झटक्यात मुंबईतील नालेसफाईच्या कामातील टक्केवारी नक्की गेली कुठे असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.
6 वर्षांपूर्वी -
मुंबई: अनेक भागात पाणी साचल्याने वाहतूक अत्यंत धीम्या गतीने
शहरात रात्रीपासून धोधो कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईतील अनेक भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे. दरम्यान सायन-पनवेल महामार्गावर नेरुळ येथे उड्डाणपुलाखाली पाणी भरल्याने पुण्याकडे जाणारी वाहतूक अत्यंत धिम्यागतीने सुरु आहे. नेरुळ ते सानपाडापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा आहेत, जोरदार पावसाने वाशी ,बेलापूर आणि ऐरोली भागतील बस डेपोमध्ये पाणी भरल्याने प्रवाशांची गैरसोय होताना पाहायला मिळत आहे.
6 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकावे म्हणून आ. नितेश राणे यांच्याकडून कॅव्हेट दाखल
मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला कायदेशीर मान्यता मिळाल्यानंतर त्याच्या विरोधात काहींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचे भाष्य केले होते. दरम्यान आमदार नितेश राणे यांनी देखील मराठा आरक्षणावरून पहिल्यापासूनच आक्रमक भूमिका घेतली होती. स्वतः नारायण राणे यांनी आघाडी सरकार सत्तेत असताना त्याचा मसुदा तयार केला होता. दरम्यान मराठा आरक्षणाच्या निर्णयाच्या विरोधात एकतर्फी स्थगिती मिळू नये यासाठी आमदार नितेश राणे यांनी खबरदारीचा उपाय म्हणून सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल केले आहे. मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकावे यासाठी आमदार नितेश राणे सज्ज झाले असून शनिवारी त्यांनी कॅव्हेट दाखल केले.
6 वर्षांपूर्वी -
मराठी माणसाला मुंबईतून हुसकावून बदलापूरच्या हद्दीत शिवसेनेने ढकललं
राज्याची राजधानी असलेल्या मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्यांची कित्येक वर्ष सत्ता आहे, त्यांनीच मराठी माणसाला मुंबईतून हुसकावून लावून बदलापूरच्या हद्दीत ढकललं आहे, अशी घणाघाती आणि बोचरी टीका आमदार कपील पाटील यांनी शिवसेनेवर केली आहे. शिवसेनेच्या हाती मुंबईची सत्ता आहे, मात्र मुंबई महापालिका स्वतः मराठीत बोलत नाही. मराठीत व्यवहार देखील करत नाही. मराठी भाषेचं आणि मराठी माणसाचं सर्वात जास्त नुकसान मराठी भाषेच्या नावाने सत्तेवर आलेल्यांनीच केल्याचे आरोप यावेळी कपिल पाटील विधान परिषदेत केला.
6 वर्षांपूर्वी -
प्लॅस्टिक बंदीमध्ये फ्लेक्सचा समावेश करावा, नेटकऱ्यांची मागणी - सोशल व्हायरल
प्लॅस्टिकबंदीवर मात्र नेटकऱ्यांनी पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि महाराष्ट्र सरकारला ट्रोल केलं आहे. नेटकऱ्यांच्या मते प्लॅस्टिकबंदीमध्ये फ्लेक्स बॅनरचा देखील समावेश करावा. आज गल्लोगल्ली आणि रस्त्याच्या दुतर्फा आपल्याला फ्लेक्सच – फ्लेक्स दिसतात. कुठे भाऊंचा वाढदिवस, कुठे राजकीय अभिनंदन तर कुठे राजकीय श्रेयाच्या नावाने लागलेले फ्लेक्स. इतकंच काय तर आजकाल लोकांनी लहानग्यांच्या वाढदिवसाचे फ्लेक्स देखील लावायला सुरुवात केली आहे. हे इतरत्र लावलेले फ्लेक्स शहरांच्या सौंदर्यात डाग होताना दिसत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
मुंबई, ठाण्यावर भीषण पाणीसंकट; केवळ २० दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक
मुंबई आणि ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या महत्वाच्या जलाशयांमध्ये केवळ वीस दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असून पाऊस झाला नाही, तर भीषण पाणीसंकट ओढवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. संपूर्ण जून महिना संपला तरी मुंबई आणि ठाण्यात पावसाचं आगमन झालेलं नसून, अजून देखील उन्हाच्या झळा पोहोचत असून उकडाच कायम आहे. परिणामी उरलेल्या पाण्याची बाष्पीभवनाने अजूनच घट होत आहे. ठाण्यात आधीच ३० टक्के पाणीकपात लागू असल्याने नागरिक या पाणीबाणीने चिंतित आहेत.
6 वर्षांपूर्वी -
९१ हजार कोटींच्या घोटाळ्यातील कंपनीवर फडणवीस सरकार मेहेरबान का? धनंजय मुंडेंचा सवाल
महाराष्ट्र राज्यातील सर्व तालुका, जिल्हा आणि ग्रामपंचायत हे “महानेट” प्रकल्पाअंतर्गत इंटरनेट शिवाय वायफायने जोडणे हा प्रकल्प नुकताच महाराष्ट्र सरकारने हाती घेतला आहे. ह्या प्रकल्पातील सर्व तांत्रिक बाबींचं ऑडिट करण्यासाठी ५ सल्लागार समित्या नेमण्यात आल्या आहेत. याच ५ कंपन्यांपैकी १ आहे “डेलॉइट”.
6 वर्षांपूर्वी -
विधानसभा: धडाकेजबाज पोलीस अधिकारी प्रदीप शर्मांना स्वतःकडे खेचण्यासाठी सर्वच पक्षात चढाओढ
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षात निवडून येणाऱ्या आणि समाजातील विविध घटकांशी जोडल्या गेलेल्या व्यक्तिमत्त्वांचा शोध सुरु आहे. दरम्यान मुंबई पोलीस दलातील धडाकेबाज अधिकारी प्रदीप शर्मा यांना स्वतःच्या पक्षात ओढण्यासाठी जवळपास सर्वच पक्षात जोरदार स्पर्धा लागण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे पोलीस दलात कार्यरत असले तरी प्रदीप शर्मा यांच्या पी. एस. फाउंडेशनने मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्रात मोठी समाज कार्य केली आहेत. अंधेरी पूर्वेतील गरजूंसाठी स्वस्त धान्य भंडार, शैक्षणिक मदत आणि स्वास्थ संबंधित मदत करून प्रदीप शर्मा यांची पी. एस. फाउंडेशन सामान्यांच्या परिचयाची झाली आहे.
6 वर्षांपूर्वी -
सेनेचा मुख्यमंत्र्यांना शह? जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार झाल्याची जलसंधारण मंत्र्यांची कबुली
सध्या राज्य सरकारचं पावसाळी अधिवेशन सुरु असल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना फैलावर घेतल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र आजच्या एका धक्कादायक कबुलीने शिवसेनेने अप्रत्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शह दिल्याचं म्हटलं जात आहे. कारण राज्यातील महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजना ही मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असून देखील शिवसेनेने म्हणजे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी सभागृहाला दिलेल्या कबुलीने खळबळ माजली आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: बिल्डरकडून फसवणूक; गुजराती कुटुंबसुद्धा मनसेच्या आश्रयाला; दणका मिळताच २१ लाख मिळाले
मुंबईमध्ये बांधकाम व्यावसायिकांकडून सामान्य लोकांना लुबाडण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत. तसाच एक प्रकार मुंबईतील मालाड येथे राहणाऱ्या गुजराती कुटंबासोबत घडला आहे. संबंधित बिल्डरने या गुजराती कुटंबाला तब्बल २१ लाखांचा चुना लावला होता. प्रकल्पात पैसे गुंतवून देखील मागील ५ वर्ष ना घरचा ताबा मिळत होता, ना पैसे परत दिले जात होते. संबधित कुटुंबाचे पैसे जवळपास बुडाल्यातच जमा होते.
6 वर्षांपूर्वी -
५ वर्ष पिकविमा कंपन्यांची कार्यालये मुंबईत, शिवसेनेला फसवणूक-लूट विधानसभा आल्यावर दिसली
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काल औरंगाबाद आणि नाशिकच्या दुष्काळी दौऱ्यावर होते. दरम्यान शनिवारी औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेनेकडून पीकविमा निवारण केंद्राची उभारणी करण्यात आली. यावेळी आयोजित छोटेखानी सभेत शेतकऱ्यांना नडाल तर तुमची मुंबईतील कार्यालये बंद करू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी पीक विमा कंपन्यांना दिला होता.
6 वर्षांपूर्वी -
रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीची शक्यता
मुंबईकरांसाठी एक क्लेशदायक बातमी येण्याची शक्यता आहे. कारण लवकरच सामान्य माणसाच्या दैनंदिन वापरातील रिक्षा आणि टॅक्सीच्या भांडयात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. विशेष म्हणजे बेस्टकडून भाडेकपातीचा निर्णय घेतला जात असतानाच रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ मात्र होण्याची शक्यता आहे. सदर विषयाला अनुसरून शुक्रवारी परिवहन विभाग, टॅक्सी संघटना आणि मुंबई ग्राहक पंचायतीची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. यात टॅक्सी संघटनांनी पंचवीस रुपये भाडेवाढीची मागणी केली. येत्या मंगळवारी भाडेवाढीवर पुन्हा चर्चा होणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
फडणवीसांची रथयात्रा हे आंध्र प्रदेशातील 'वायएसआर' तंत्र महाराष्ट्रात? सेने विरुद्ध मोठं षडयंत्र?
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांत रथयात्रा काढणार आहेत. या रथयात्रेसाठी “फिर एक बार शिवशाही सरकार” आणि ”अब कि बार २२० पार” अशी घोषवाक्ये तयार करण्यात आली आहेत. ऑगस्ट महिन्यात ही रथयात्रा निघणार आहे. मात्र हेच तंत्र आंध्र प्रदेशात ऐतिहासिक विजय मिळवत सत्तेत आलेल्या वायएसआर काँग्रेसने तेथिल विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने २-३ महिन्यापूर्वी राबविले होते. यावेळी भाजपने शिवसेनेच्या मतदारसंघातून देखील ही रथयात्रा काढण्याची रणनीती आखली आहे असे वृत्त आहे. त्यामुळे शेवटच्या शनी स्वतःच्या बाजूने वातावरण निर्मिती करून शिवसेनेला शह दिला जाऊ शकतो असं राजकीय विश्लेषकांना वाटत आहे.
6 वर्षांपूर्वी -
विधानसभेसाठी आता शरद पवारचं मैदानात, मुंबईत महत्वाची बैठक
लोकसभा निवडणुकीत पराभव सहन करावा लागल्याने एनसीपीने विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे, लोकसभेतील पराभव झटकून टाकत नव्या दमाने कामाला सुरुवात करण्यासाठी एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार हे स्वतः राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.
6 वर्षांपूर्वी -
शाळांमध्ये मराठी शिकवणं अनिवार्य; मनसेने मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
महाराष्ट्रात मराठी सक्तीचीच आहे हे महाराष्ट्राला सांगितल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन आणि आभार, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अनिल शिदोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले आहेत. राज्यातील एसएससी, आयसीएसई आणि सीबीएसई अशा सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी शिकवणं अनिवार्य आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केली. यावरच अनिल शिदोरे यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया देत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
गृहनिर्माण मंत्र्यांची गिरणी कामगारांना मुंबईबाहेर धाडण्याची भाषा, सत्ताधारी सेना मूग गिळून शांत
मुंबईचे पूर्वीचे मालक आणि राबणारे हात म्हणजे तत्कालीन गिरणी कामगार, मात्र सध्या राज्याचे नवनियुक्त गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हाडाच्या बैठकीत केल्याने विधानाने गिरणी कामगारांमध्ये संतापाची भावना आहे. बैठकी दरम्यान राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की म्हाडाने मुंबईबाहेर घरे बांधावीत, अशी सूचना करणाऱ्या गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट गिरणी कामगारांच्या घरांबाबत देखील धक्कादायक सल्ला दिला आहे. गिरणी कामगारांना सुद्धा बेलापूर, उरणमध्ये घरे द्यावीत, असे म्हाडाच्या बैठकीत विखे कोणताही मागचा पुढचा विचार न करता म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
कोण काय छापतं? मुख्यमंत्रिपदाची जागा पुढील ५ वर्षांसाठी रिकामी नाही: अवधूत वाघ
लोकसभा संपून भाजप सरकार बहुमताने सत्तेत आले आणि मंत्रिमंडळ वाटप पूर्ण झाल्यानंतर शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सातत्याने मुख्यमंत्री पदावर दावा करण्यात येतो आहे. एका बाजूला विधानसभेत दोन्ही बाजूचे वरिष्ठ नेते युतीसाठी प्रयत्न करत असताना काही नेत्यांकडून आग लावण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत असंच म्हणावं लागेल. त्यामुळे आगामी काळात या विषयावरून भाजप सेनेमध्ये पुन्हा कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
जागावाटपात स्वबळावर बार्गेनिंगसाठी? पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच : उद्धव ठाकरे
आगामी विधानसभा निवडणुकीत आपला मुख्यमंत्री करायचाच असा ठाम निर्धार शिवसेनेने केला असून भारतीय जनता पक्षाशी जरी युती असली तरी शिवसेना ही स्वतंत्र बाण्याची संघटना असून आगामी विधानसभा भगवी करुन टाकू, त्यासाठी शिवसैनिकांनी सर्व शक्तीनिशी कामाला लागावे अशा शब्दांत शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लवकरच येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा स्वबळावर लढण्याचा सूचक इशारा दिला आहे. आज शिवसेनेचा ५४वा वर्धापन दिन असून त्यानिमित्त उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातील अग्रलेखातून आपली भुमिका स्पष्ट केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
आज फडणवीस सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प
महाराष्ट्र राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला आहे. सदर अहवालात राज्याची अर्थव्यवस्था देशाच्या ६.८ टक्के विकास दरापेक्षा अधिक वेगाने म्हणजे ७.५ टक्के दराने विकसित होत असून राज्याने आधीच्या ४ वर्षात सरासरीपेक्षा कमी पाऊस होऊनही प्रगतीची घोडदौड निरंतर राखण्यात यश प्राप्त झाले असल्याचे वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. त्यामुळे मुनगंटीवार आज दुपारी १.४५ वाजता राज्य सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील.
6 वर्षांपूर्वी -
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात; दुष्काळावर विशेष चर्चा
महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. यापार्श्वभूमीवर काल रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या कामकाजाच्या रुपरेषेची माहिती देण्यासाठी जाहीर पत्रकार परिषद घेतली. यामध्ये नवी आणि प्रलंबित अशी एकूण २८ विधेयकं मांडली जाणार असल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
TCS Share Price | टाटा ग्रुपचा शेअर मालामाल करणार, केव्हाही बिनधास्त करावा असा शेअर - NSE: TCS
-
Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Infosys Share Price | आयटी शेअरबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा जाणून घ्या - NSE: INFY
-
Vedanta Share Price | मायनिंग कंपनी शेअर्समध्ये तेजीचे संकेत, अपसाईड टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: VEDL
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL
-
IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB