महत्वाच्या बातम्या
-
अंधेरी पूल दुर्घटना: जीवन ज्योत प्रतिष्ठाणचा रेल्वेसेवा सुरळीत करण्यासाठी राबणाऱ्या 'त्या' कामगारांना मदतीचा हात
अंधेरी पूल दुर्घटना घडल्यानंतर अनेक कामगार रेल्वेसेवा सुरळीत करण्यासाठी भर पावसात राबताना दिसत आहेत. परंतु त्यात आता माणुसकीच दर्शन घडविणाऱ्या घटना सुद्धा दिसू लागल्या आहेत. भर पावसात रेल्वेसेवा सुरळीत करण्यासाठी राबणाऱ्या कामगारांसाठी मुरजी पटेल यांच्या जीवन ज्योत प्रतिष्ठाण या समाजसेवी संस्थेने मदतीचा हात पुढे केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
अंधेरी पूल दुर्घटना: बेजवाबदार! दिल्ली ते गल्ली एकत्र सत्तेत असल्याचा शिवसेना व भाजपला विसर?
एल्फिन्स्टन ब्रिज सारख्या दुर्घटना घडून सुद्धा सरकारने काहीच बोध घेतलेला नाही. अंधेरी पूल दुर्घटनेवरून जवाबदारी झटकण्याचा केविलवाणा प्रयत्न सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेकडून होताना दिसत आहे. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी अंधेरी पूल दुर्घटनेबाबत जवाबदारी झटकत त्या पुलाच्या देखभालीची जवाबदारी रेल्वे प्रशासनावर म्हणजे रेल्वे खात सांभाळणाऱ्या भाजपवर ढकलली आहे. तर भाजपचे खासदार किरीट सोमैया यांनी मला महापौर काय बोलले यात जायचे नाही, पण समस्यांचं निराकरण करण्यात जास्त रस आहे असं मत व्यक्त केलं आणि सेनेला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
7 वर्षांपूर्वी -
VIDEO VIRAL: उद्धव ठाकरेंच्या २०१३ मधील 'त्या' गुजरात दौऱ्याच राजकीय कारण काय होत? सविस्तर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा २०११ मधील गुजरात दौरा राजकीय चर्चेचा विषय बनला होता. तसा राज ठाकरेंचा दौरा हा गुजरात सरकारच्या खास निमंत्रणावरून ठरला होता आणि तो दौरा सर्वांसाठी सार्वजनिक विषय होता. परंतु प्रसारमाध्यांपासून लांब राहून आणि ठीक २०१४ मधील लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, सुभाष देसाई आणि मिलिंद नार्वेकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींची गुजरातमध्ये जाऊन भेट घेतली होती, त्या भेटीमागचं मूळ राजकीय कारण प्रसारमाध्यांच्या नजरेतून का सुटलं होत?
7 वर्षांपूर्वी -
अंधेरीदरम्यान पुलाचा काही भाग कोसळताच संधीसाधू रिक्षावाले मस्त!
अंधेरीदरम्यान पुलाचा काही भाग कोसळतच मुंबई शहरातील रिक्षावाल्यांनी नेहमीप्रमाणे संधी साधली आहे. वेस्टर्न रेल्वे ठप्प झाल्याने चाकरमान्यांनी कसे ही करून ऑफिस गाठण्याची धावपळ केल्याने रिक्षावाल्यांनी सुद्धा हात धुवायला सुरुवात केल्याचे चित्र होते. प्रति प्रवाशामागे ऑटो रिक्षाने अंधेरी ते वांद्रा हे अंतर केवळ १५० रुपयात सहज गाठता येत, पण प्रवाशांची अडचण लक्षात येताच रिक्षावाल्यांनी शेअरिंग स्वरूपात प्रत्येक प्रवाशांकडून १०० रुपये घेतले. त्यामुळे जो प्रवास १५० रुपयांपर्यंत होतो त्याचसाठी आज रिक्षावाल्यांनी ३०० रुपयांची मागणी करत प्रवाशांची लूट केली.
7 वर्षांपूर्वी -
भाजप-शिवसेना सरकारकडून सामान्यांना लवकरच वीज दरवाढीचा झटका?
सर्वसामान्यांना महागाई आधीच डोईजड झाली असताना त्यात आता भाजप-शिवसेनेच्या सरकारकडे महानिर्मिती व महापारेषण या २ वीज कंपन्यांनी महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे वीज दरवाढ व वीजवहनासाठी २,५३२ कोटी रुपये इतकी प्रचंड दरवाढ मागितली आहे. लवकरच आयोगाच्या मंजुरीनंतर याबाबत अधिकृत निर्णय घेऊन अंमलबजावणी होईल. त्यामुळे भाजप शिवसेनेचं युती सरकार लवकरच तुम्हाला वीज दरवाढीचा झटका देणार आहे.
7 वर्षांपूर्वी -
सामान्य मराठी गुंतवणूकदार फसले? शालिनी कॅब्स'चे मालक व 'ते' राजकीय हितचिंतक कोण?
मुंबई, ठाणे व पुण्यासारख्या शहरात खासगी कॅब सेवा पुरविण्यासाठी शालिनी कॅब्स या टॅक्सी सेवेची सुरुवात २०१५ मध्ये करण्यात आली होती. परिवहन खात्याकडून नवं ट्रान्सपोर्ट लायसन्स काढण्यात आलं होत, त्याचवेळी नेमक्या या हालचाली सुरु झाल्या होत्या असं समजतं. विशेष म्हणजे नेमकी त्याच वेळी ओला – उबेर सारख्या बड्या कंपन्यांविरोधात फास का आवळला जात होता हे गुंतवणूकदारांना आज २-३ वर्षानंतर समजतं आहे. यात अनेक छोट्या गरीब ड्रायव्हर्स आणि मराठी लोकांनी मोठ्या आशेने दहा हजार ते दीड लाख रुपये गुंतविले होते. सर्वात महत्वाचं म्हणजे ‘शालिनी कॅब्स’च्या टीम सोबत शिवसेनेच्या परिवहन मंत्र्यांपासून ते खासदार सुद्धा दिसत आहेत. शिवसेना प्रणित महाराष्ट्र फ्लीट टैक्सी चालक-मालक सेना संघटनेचे खजिनदार दत्तानन पालनकर हे शालिनी कॅब्स’चे संचालक असल्याचे वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंनंतर आता 'मेट्रोमॅन' ई श्रीधरन यांची सुद्धा बुलेट-ट्रेन बाबत नकारात्मक टीका
देशात मुंबई अहमदाबाद बुलेट-ट्रेन’बद्दल मोठा आभास निर्माण केला जात असल्याचे चित्र असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली होती. तसेच मुंबई अहमदाबाद बुलेट-ट्रेन ही मुंबई’ला महाराष्ट्रापासून तोडण्याच्या दूरदृष्टिकोनातून लादली जात असून त्याचा प्रत्यक्ष मुंबई आणि महाराष्ट्राला काहीच फायदा होणार नसून, त्यासाठी घेतल्या जाणाऱ्या कर्जाचा बोजा मात्र महाराष्ट्रावर लादला जाणार आहे. विशेष म्हणजे अहमदाबाद बुलेट-ट्रेन ही केवळ श्रीमंतांसाठी असून त्याचा राज्यातील सामान्यांना काहीच फायदा होणार नसल्याचे त्यांनी अनेकदा अधोरेखित केले आहे.
7 वर्षांपूर्वी -
ऐनवेळी राष्ट्रवादीने दगा दिल्यास स्वबळावर लढायच्या विचारामध्ये काँग्रेस?
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सध्याच्या एकूणच प्रतिक्रिया पाहिल्यास, ऐनवेळी राष्ट्रवादीने दगा दिल्यास काँग्रेस स्वबळावर लढणार असं सांगत महाराष्ट्र काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी मल्लिकार्जून खरगे यांनी राष्ट्रवादीच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. दिल्लीत भरलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अनेकांनी राष्ट्रवादीच्या भूमिकेविषयी शंका उपस्थित केली आणि जर राष्ट्रवादी महाराष्ट्रात सोबत आली नाही तर काय निर्णय घ्यायचा असा प्रश्न उपस्थित केला असता मल्लिकार्जून खरगे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
तुम्ही व तुमच्या पुढच्या पिढ्या वांद्रयातच राहणार हा माझा शब्द: राज ठाकरे
मुंबई : मुंबईमधील मराठी माणसाचं अस्तित्वच धोक्यात आल्याचं अधोरेखित करत, सरकार येथील जमिनी इंच इंच विकू याच उद्देशाने धोरण राबवत असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. मुंबईमधील वांद्रा येथील शासकीय वसाहतीला भेट देऊन त्यांनी इथल्या समस्या समजून घेतल्या तसेच नंतर स्थानिकांना संबोधित सुद्धा केले. पुनर्विकासाच्या नावाने वांद्रा येथील शासकीय वसाहतीमधील लोकांना विस्थापित करण्याचा घाट घातला जात असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. सरकारच्या एकूणच हालचाली या मुंबईमधून मराठी माणसाचं अस्तित्वच संपविण्यासाठी आहेत असा थेट आरोप सुद्धा राज ठाकरे यांनी केला. पुनर्विकासाच्या नावाखाली इथल्या स्थानिक लोकांना घरं खाली करायला सांगितली जात आहेत. परंतु इथल्या नागरिकांचा त्याला ठाम विरोध आहे. त्याच […]
7 वर्षांपूर्वी -
अमित ठाकरेंच्या प्रयत्नांना यश, राष्ट्रीय बॅडमिंटनपटू प्राजक्ता सावंतची नायब तहसीलदार पदी नियुक्ती
राष्ट्रीय बॅडमिंटनपटू प्राजक्ता सावंतचे मागील दोन वर्षांपासून खेळाडू कोट्यातून नायब तहसीलदार पदी नियुक्तीसाठी सरकार दरबारी प्रयत्नं सुरु होते. सरकार दरबारी हा विषय दीर्घ काळापासून प्रलंबित असल्याने तिने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्याकडे या विषयासंदर्भात पाठपुरावा करण्याची विनंती केली होती.
7 वर्षांपूर्वी -
वांद्रे शासकीय वसाहतील रहिवाशी 'हक्काच्या घरासाठी' राजसाहेब ठाकरेंच्या भेटीला
मुंबई वांद्रे येथील शासकीय वसाहतीतील रहिवाशांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची त्याच्या निवासस्थानी भेट घेतली. अनेक वर्षांपासून इथे राहणाऱ्या हजारो कुटुंबांना हक्काच्या घरांसाठी झगडावं लागत आहे. वांद्रे येथील शासकीय वसाहत ही मुंबई शहरातील मोक्याचे ठिकाणी असल्याने येथे अनेक राजकारणी डोळा ठेऊन आहेत आणि या रहिवाशांना त्याच ठिकाणी घर मिळतील की नाही याची हमी नाही.
7 वर्षांपूर्वी -
ते 'गुंड' की? कायदा पायदळी तुडविणाऱ्यांच्या मनमान्या सहन करणारे आपण षंड?
कालची पुण्यातील पीव्हीआर सिनेमात घडलेली घटना ही जर कायद्याच्याच नजरेतून बघायची तर तो ‘MRP’ कायदा पायदळी तुडवला गेला नसता तर अशी घटना आणि किव्हा आंदोलनं का होतील? अगदी दगदगलेल्या रोजच्या दैनंदिन आयष्यातून वेळ काढून अनेक कुटुंब किव्हा जोडपी या मल्टिप्लेक्स मध्ये सिनेमे बघण्यासाठी जात असतात. अगदी दोघे जण गेले असं जरी गृहीत धरलं तरी तिकीट असतं १००-२०० रुपये आणि पोपकोर्न २५० आणि समोसे – वडापाव १०० रुपये. बाहेरून खिशाला परवडतील असे खाण्याचे पदार्थ घेऊन जाण्याला बंदी असते.
7 वर्षांपूर्वी -
भाजपने कोकणात शिवसेनेला धूळ चारली, तर सेनेने मुंबईची जागा पुन्हा राखली
मुंबई पदवीधर मतदारसंघाची जागा राखण्यात शिवसेनेला यश आलं आहे. पण दुसरीकडे कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे निकाल आज सकाळी जाहीर करण्यात आले, त्यात भाजपने शिवसेनेवर मात केली आहे. त्यामुळे भाजपने कोकणात आयत्यावेळी आखलेले ‘डाव’ खरे ठरले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेनेने नाणार'ला जाऊन अध्यादेश रद्द केल्याचे सांगितले, मग करार कसा झाला? राष्ट्रवादी
आधीच नाणार प्रश्नी अडचणीत असलेल्या शिवसेनेला राष्ट्रवादीने काही प्रश्न उपस्थित करून कोंडीत पकडले आहे. शिवसेनेने नाणार प्रकल्पाच्या स्थळी जाऊन नाणार’संबंधित अध्यादेश रद्द केल्याची घोषणा केली होती. मग नाणार प्रकल्पाचा करार कसा झाला असा थेट सवाल करत पत्रकार परिषदेत केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचं मुंबईत नक्की काय चाललंय? मराठी शाळा घटत आहेत, तर हिंदी शाळांसाठी भव्य इमारती
मुंबई महानगर पालिकेवर १९९७ पासून शिवसेना सतत २१ वर्ष सत्तेत आहे. परंतु मुंबईमधला केवळ मराठी माणसाचा टक्काच नाही तर शहरातील शिक्षण व्यवस्थेचा सर्वात महत्वाचा घटक असलेल्या मराठी शाळांचा टक्का सुद्धा झपाट्याने घटत चालला आहे. परंतु याच मुंबईमध्ये हिंदी भाषिकांसाठी हिंदी भाषेच्या शाळांचे अनेक माजली इमारती महापालिका उभ्या करत आहेत आणि थाट त्याची उदघाटन सुद्धा केली जात आहे.
7 वर्षांपूर्वी -
सेनेचा वचक हरवला? स्थायी समितीचे अध्यक्ष व सभागृह नेत्यांना अवमानकारकरित्या व्यासपीठावरून खाली उतरवल
मुंबई महानगर पालिकेने आयोजित केलेल्या प्लास्टिकबंदीच्या प्रदर्शना दरम्यान मुंबई स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव व सभागृह नेत्या विशाखा राऊत यांना पालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अपमानजनक वागणूक देत व्यासपीठावरून खाली उतरविण्यात आलं. विशेष म्हणजे महापालिकेत प्राबल्य असून सुद्धा इतर विरोधी पक्षांना सुद्धा सेनेच्या सन्मानासाठी मैदानात उतरावं लागलं.
7 वर्षांपूर्वी -
‘प्लास्टिकच्या पिशवीतून खाऊ पोहोचला का? मनसेची कदमांवर खोचक टीका
प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर पर्यावरण मंत्र्यांनी चारच दिवसात प्लास्टिक बंदीतून किराणा दुकानदारांना दिलासा दिल्याने मनसेने रामदास कदमांवर ‘प्लास्टिकच्या पिशवीतून खाऊ पोहोचला का? असा खोचक सवाल करत प्रश्न विचारला आहे आणि प्लास्टिकमधून खाऊ पोहोचल्यानेच रामदासाचा ‘कदम’ लगेचच घसरला, असा सणसणीत खोचक टोलाही मनसेचे प्रवक्ते अविनाश अभ्यंकर यांनी लगावला आहे.
7 वर्षांपूर्वी -
अमित ठाकरेंना सक्रिय राजकारणात आणा; नेते व पदाधिकाऱ्यांची जोरदार मागणी
आज मुंबईतील एम.आय.जी क्लबवर पार पडलेल्या नेते, सरचिटणीस आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरेंना सक्रिय राजकरणात आणण्यासाठी जोरदार मागणी करण्यात आली.
7 वर्षांपूर्वी -
प्लास्टिक बंदीबाबत राज ठाकरेंचं भाष्य खरं ठरलं, पर्यावरण मंत्र्यांचा ४ दिवसात पहिला यू-टर्न
किराणा दुकानावरच्या आणि छोट्या दुकानदारांना लागणाऱ्या पॅकेजिंगवरची बंदी उठविण्याचा निर्णय पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी घेतल्याने हा निर्णय राज्यातील प्लास्टिक बंदी संबंधित पहिला यू-टर्न ठरला आहे. कालच राज ठाकरेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत असं भाष्य केलं होत की, कोणतीही पूर्व तयारी न करताच अंमलात आणलेल्या प्लास्टिक बंदीच नोटबंदीसारखंच होणार आणि एक एक निर्णय फिरवले जाणार.
7 वर्षांपूर्वी -
हतबल शिक्षक अखेर न्यायासाठी राज ठाकरेंच्या दरबारी, घराबाहेर आत्महत्येचा प्रयत्न
रहेजा कॉलेजमधील कला विषयाचा शिक्षक असलेल्या हा तरुण, रहेजा कॉलेज प्रशासनाने बंद केलेला कला विभाग पुन्हा सुरु करण्यासाठी मागील ४ वर्षांपासून एकाकी लढा देत होता. कॉलेज प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा तक्रार करुन सुद्धा ढिम्म प्रशासन काहीच हालचाल करत नसल्याची या तरुणाचं तक्रार आहे.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये, मिळेल 28 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATATECH
-
Suzlon Share Price | अरे वा! हा शेअर देईल 36 टक्के परतावा, सुवर्ण संधी सोडू नका, काय आहे बातमी? - NSE: SUZLON
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS