28 April 2024 8:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

'प्रिय अमित शाह', काश्मीर समस्या सोडवली तशी साकीनाक्याची ट्रॅफिक समस्याही सोडवा

Article 370, jammu Kashmir, Home Minister Amit Shah, Mumbai Traffic

मुंबई : सध्या जम्मू काश्मीरमधील कलम ३७० नंतर सर्वबाजूनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. सरकार देखील ढासळत्या अर्थव्यवस्थेपेक्षा आणि वाढत्या बेरोजगारीपेक्षा भावनिक मुद्यांकडे दुर्लक्ष करून, नागरिकांना देखील त्यावरच केंद्रित करण्याची रणनीती खेळत आहेत. मुळात शहरात राहणाऱ्या लोकांच्या या विषयाला अनुसरून प्रतिक्रिया समजून घेतल्या तेव्हा तिकडे काय सुरु आहे त्यापेक्षा आम्ही राहतो त्या समस्येवर सरकारने बोलावं अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत. त्यात चित्रपट आणि सामाजिक क्षेत्रातील मोठी मंडळी देखील वेग वेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. त्यात प्रसिद्ध लेखिका शोभा डे म्हटल्यावर त्या नेहमीच सरकारमधील लोकांना खोचक टोले लगावत असतात.

त्यामुळे काळाचा घटनाक्रम जरी जम्मू काश्मीरमधील असला तरी मुंबई शहरातील रोजच्या प्रवासाला आणि ट्रॅफिकला कंटाळलेल्या शोभा डे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना खोचक टोला लगावला आहे. देशभरात केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरबाबत घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाची चर्चा सुरु असताना, वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणाऱ्या शोभा डे यांनी काश्मीरच्याच पार्श्वभूमीवर पण एक वेगळंच विधान करत मुंबईतील ट्राफिक समस्येला हात घातला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे, तुम्ही काश्मीर समस्या सोडवलीत आता साकीनाक्याच्या वाहतूक कोंडीची समस्याही सोडवा अशी उपरोधिक मागणी शोभा डे यांनी केलीये.

“प्रिय अमित शाह, तुम्ही काश्मीर समस्या सोडवली आहे…त्यामुळे आता कृपया वेळ काढून साकीनाक्याच्या वाहतूक कोंडीची समस्याही सोडवा. ही समस्याही 1947 पासून अद्याप सुटलेली नाही”, अशा आशयाचं ट्विट शोभा डे यांनी केलं आहे. समस्त मुंबईकडून ही मागणी करत असल्याचं शोभा डे यांनी ट्विटच्या अखेरीस लिहिलंय.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x