27 April 2024 12:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

तर औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्याच्या मनसे खेळीने सेना-राष्ट्रवादीतच जुंपेल? सविस्तर

MNS Chief Raj Thackeray, Aurangabad city, Sambhajinagar

औरंगाबाद: मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून त्यात औरंगाबाद शहर दौरा केंद्रस्थानी आहे. राज ठाकरे उद्या औरंगाबादला पोहोचणार असले तरी मनसेचे आमदार राजू पाटील आणि नेते अभिजित पानसे स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यासाठी एकदिवस आधीच औरंगाबादला दाखल झाले आहेत.

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना मनसेचे आमदार राजू पाटील यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावे अशी जाहीर मागणी केली आहे. शिवसेनेची मागील दोन दशकांहून ही मागणी सरकार असताना देखील पूर्ण झालेली नाही. याच मुद्द्यावरुन शिवसेनेने अनेकदा औरंगाबादमधील राजकारण केलं आहे. मात्र राजू पाटील यांनी याच मुद्द्यावरुन शिवसेनेवर जोरदार निशाणा साधत जिल्ह्याच्या नामांतरणाची मागणी केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत अभिजित पानसेही उपस्थित होते.

बऱ्याच काळापासून केंद्रात आणि राज्यातही शिवसेना सत्तेत होती. मात्र या नामांतरणावरुन केवळ राजकारण करण्यात आलं. कुठलाही आवाज उठवला नाही किंवा ठोस भूमिका घेतली नाही. जिल्ह्याचं नाव बदलायला केंद्राकडून मंजूरी लागते. मात्र तशी मागणी राज्य शासनाने केली पाहिजे. यावेळेस शिवसेनेकडून लोकांना काहीच अपेक्षा नाहीत. मात्र मनसे राज्य सरकारला जिल्ह्याचे नामकरण संभाजीनगर असं करण्यास भाग पाडणार आहे,” असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे.

एकाबाजूला मनसेने यावर आक्रमक पावित्रा घेतलेला असताना शिवसेना मात्र कात्रीत सापडण्याची चिन्हं आहेत. कारण एक वास्तव आहे की केंद्रात (युती असताना) आणि राज्यात सत्तेत असताना, तसेच औरंगाबाद महानगरपालिका, स्थानिक आमदार तसेच खासदार शिवसेनेचेच असताना उद्धव ठाकरे यांनी केवळ राजकारण केलं अशी धारणा शहरात निर्माण झाली आहे. त्यात आता शिवसेनेने भाजपशी युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्याने, केंद्रातून या विषयाचा मार्ग अवघड झाला आहे. त्यात काँग्रेस-राष्ट्रवादी पक्ष अल्पसंख्यांकांचा रोष ओढावू नये म्हणून राज्यातून देखील तसा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यासाठी विरोध करतील अशीच शक्यता आहे. विशेष म्हणजे मनसेचे नेते जयप्रकाश बाविस्कर यांनी २०१३ मधील राष्टवादी पक्षाच्या अल्पसंख्यांक सेलने औरंगजेब चित्रपटावरून केलेल्या आंदोलनाची आठवण करून दिली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आंदोलक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या बॅनरवरील मजकुरात औरंगजेबाचा उल्लेख ‘सूफी संत’ असा केल्याची आठवण करून दिली आहे. त्यावरील मजकुरात ‘आम्ही सूफी संत आलमगीर बादशाह औरंगजेबचा अपमान किंवा प्रयत्न सहन करणार नाही’. ‘आगामी हिंदी चित्रपट’ औरंगजेब ‘चे शीर्षक बदलले पाहिजे आणि चित्रपटातील वादग्रस्त विधानेही हटविण्यात यावीत’, अशीही बॅनरवर मजकूर लिहून आंदोलन केल्याची आठवण जयप्रकाश बाविस्कर यांनी करून दिली आहे.

त्यामुळे औरंगाबाद महापालिका निवडणुकीत शिवसेना मोठ्या राजकीय कचाट्यात अडकण्याची चिन्हं आहेत. तसेच मनसेने आगामी औरंगाबाद निवडणुकीच्या अनुषंगाने चांगलेच सूतोवाच केले आहेत. त्यात काँग्रेस-राष्ट्रवादी’सोबत असल्याने शिवसेनेनेला एमआयएम’च्या मुस्लिम नेत्यांवर देखील धर्मावरून विखारी टीका करता येणार नाही. त्यात तिथेही आघाडी झाल्यास शिवसेनेसाठी सर्वच कठीण होण्याची शक्यता आहे. कारण एमआयएम आणि माणसे एकमेकांना टोकाच्या भूमिका घेऊन लक्ष करतील आणि त्यातून संपूर्ण निवडणूक मनसे-एमआयएम केंद्रित होऊन मनसेला मोठं यश मिळण्याची शक्यता आहे. तसेच शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी आघाडी केल्यास मोठ्या प्रमाणावर हिंदू मतदार मनसेकडे वर्ग होईल अशी शक्यता आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत हा मुद्दा तापणार हे निश्चित आहे.

 

 

News English Summery: While the MNS has taken aggressive stance on it, Shiv Sena is a sign of scandal. It is a fact that in the city (in the alliance) and in the state, while the Aurangabad Municipal Corporation, local MLAs and MPs belong to the Shiv Sena, it is believed that Uddhav Thackeray has done politics only in the city. Now, with the Shiv Sena breaking the alliance with the BJP and taking the lead with the Congress-NCP, the path to this issue has become difficult from the center. It is likely that the Congress-NCP will oppose sending such proposal from the state to the Center so as not to incite the minority. Notably, MNS leader Jayaprakash Baviskar has recalled the agitation made by Aurangzeb movie by a minority cell of the NCP in 2013.

 

Web Title:  MNS over changing name of Aurangabad city to Sambhajinagar.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x