4 May 2024 3:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

आसाम'मध्ये घुसखोरांना दणका मिळणार? तब्बल ४० लाख नागरिक बेकायदा घोषित

नवी दिल्ली : राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा मसुदा जाहीर करताच आसाममध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून प्रचंड वाढ करण्यात आली आहे. राज्यभर सशस्त्र पोलिसांच्या तब्बल २२० कंपन्या तैनात करण्यात आल्या असून बारपेटा, दारंग, दिमा हासौ, सोनितपूर, करीमगंज, गोलघाट, धुबरी या जिल्ह्यात खबरदारीचा उपाय म्ह्णून पोलीस प्रशासनाने कलम १४४ लागू केलं आहे.

आज आसाममध्ये एनआरसी म्हणजे राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा मसुदा जाहीर करण्यात आला असून, त्यानुसार आसाममध्ये २ कोटी ८९ लाख ८३ हजार ६७७ लोक कायदेशीर तर तब्बल ४० लाख ७ हजार ७०७ लोकांना थेट बेकायदा घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे आसाममध्ये घुसखोरी केलेल्या आणि नागरिकता सिद्ध करू न शकलेल्या त्या ४० लाख लोकांना बेघर व्हावे लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने नजीकच्या काळात आसाम धुमसणार अस म्हटलं जात आहे.

दरम्यान हा मसुदा अंतिम नसून आक्षेप असणाऱ्यांना तक्रार करण्याची संधी देण्यात आली आहे. तसेच त्यांना पुराव्यासहित नागरिकत्व सिध्द करण्याची संधी देण्यात आली आहे, असं एनआरसीच्या राज्य समन्वयकाने स्पष्ट केलं.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x