महत्वाच्या बातम्या
-
संशोधनाचे अजब दाखले! आइन्स्टाइनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला: पियुष गोयल
ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी ओला, उबरला जबाबदार धरल्यानं दोनच दिवसांपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारमन सोशल मीडियावर ट्रोल झाल्या. यानंतर आता रेल्वे मंत्री पीयूष गोयल नेटकऱ्यांच्या रडारवर आले आहेत. गुरुत्वाकर्षणाचा शोध लावताना आईनस्टाईनला गणिताची मदत झाली नव्हती, असं अजब विधान गोयल यांनी केलं. यानंतर सोशल मीडियानं गोयल यांची चांगलीच खिल्ली उडवली.
5 वर्षांपूर्वी -
पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यास केव्हाही तयार: लष्करप्रमुख
काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर मोदी सरकारमधील अनेक मंत्र्यांनी पाकव्याप्त काश्मीर मिळवण्याबाबत पाकिस्तानला अनेकदा इशारा दिला आहे. मंत्र्यांच्या या विधानावर लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, पीओकेबाबत सरकारने निर्णय घ्यावा आपले सैन्य प्रत्येक गोष्टीला तोंड द्यायला तयार आहे.
5 वर्षांपूर्वी -
'ॐ' आणि 'गाय' शब्द ऐकताच अनेकांना त्रास होतो: पंतप्रधान
‘ओम’ हा शब्द कानावर पडताच काही लोकांचे कान उभे राहतात, काही लोकांनी ‘गाय’ हा शब्द ऐकला तर त्यांच्या अंगावरील केस उभे राहतात, त्यांना करंट लागतो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. देश १६व्या, १७ व्या शतकात गेला आहे असेच या लोकांना वाटते असे सांगताना, याच लोकांनी देशाचे वाटोळे केल्याचा घणाघात पंतप्रधान मोदी यांनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
पनामा पेपर्सच्या यादीतील भ्रष्ट ‘अल्फा डिझाईन्स लिमिटेड’ला इस्त्रोने सॅटेलाईट कंत्राट कसं दिलं? सविस्तर
मागील काही दिवसांपासून चांद्रयान २ अयशस्वी ठरल्यानंतर देशातील वातावरण शास्त्रज्ञांच्या बाबतीत पहिल्यांदाच भावुक झाल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे विक्रम लँडरशी संपर्क तुटलेला असताना आणि चंद्राच्या पृष्ठभागावरील फोटो मिळणार नसल्याचं स्पष्ट झालेलं असताना देखील मागील काही दिवसांपासून प्रसार माध्यमांमध्ये वातावरण तापत ठेवण्यात आलं आहे. त्यात थेट तामिळनाडूमध्ये इस्रोचे अध्यक्ष डॉ.सिवन यांचे विशेष मुलाखतीचे कार्यक्रम आखून त्यातून देखील भावनिक बातम्या पेरल्या जात असून, त्यात सिवन यांच्या बाजूने वातावरण निर्मिती करण्याची वेगळीच व्यूहरचना आखली गेल्याच सध्या समोर येताना दिसत आहे. त्यातही काही ठराविक माध्यम सोडल्यास सर्वच सरकारी रणनीतीत सामील झाल्याचे पाहायला मिळत आहे.
5 वर्षांपूर्वी -
‘इस्त्रो’ने अल्फा डिझाईन्सला २७ सॅटेलाईटच कंत्राट दिलं; २०१९ला अदानींनी ती कंपनी विकत घेतली
मागील काही दिवसांपासून चांद्रयान २ अयशस्वी ठरल्यानंतर देशातील वातावरण शास्त्रज्ञांच्या बाबतीत पहिल्यांदाच भावुक झाल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे विक्रम लँडरशी संपर्क तुटलेला असताना आणि चंद्राच्या पृष्ठभागावरील फोटो मिळणार नसल्याचं स्पष्ट झालेलं असताना देखील मागील काही दिवसांपासून प्रसार माध्यमांमध्ये वातावरण तापत ठेवण्यात आलं आहे. त्यात थेट तामिळनाडूमध्ये इस्रोचे अध्यक्ष डॉ.सिवन यांचे विशेष मुलाखतीचे कार्यक्रम आखून त्यातून देखील भावनिक बातम्या पेरल्या जात असून, त्यात सिवन यांच्या बाजूने वातावरण निर्मिती करण्याची वेगळीच व्यूहरचना आखली गेल्याच सध्या समोर येताना दिसत आहे. त्यातही काही ठराविक माध्यम सोडल्यास सर्वच सरकारी रणनीतीत सामील झाल्याचे पाहायला मिळत आहे.
5 वर्षांपूर्वी -
ती मिठी इस्रोने 'अदानी डिफेन्स’ला २७ सॅटेलाईटचं कंत्राट दिल्यामुळे होती: सविस्तर
मागील काही दिवसांपासून चांद्रयान २ अयशस्वी ठरल्यानंतर देशातील वातावरण शास्त्रज्ञांच्या बाबतीत पहिल्यांदाच भावुक झाल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे विक्रम लँडरशी संपर्क तुटलेला असताना आणि चंद्राच्या पृष्ठभागावरील फोटो मिळणार नसल्याचं स्पष्ट झालेलं असताना देखील मागील काही दिवसांपासून प्रसार माध्यमांमध्ये वातावरण तापत ठेवण्यात आलं आहे. त्यात थेट तामिळनाडूमध्ये इस्रोचे अध्यक्ष डॉ.सिवन यांचे विशेष मुलाखतीचे कार्यक्रम आखून त्यातून देखील भावनिक बातम्या पेरल्या जात असून, त्यात सिवन यांच्या बाजूने वातावरण निर्मिती करण्याची वेगळीच व्यूहरचना आखली गेल्याच सध्या समोर येताना दिसत आहे. त्यातही काही ठराविक माध्यम सोडल्यास सर्वच सरकारी रणनीतीत सामील झाल्याचे पाहायला मिळत आहे.
5 वर्षांपूर्वी -
आंध्रा: ‘चलो आत्मकूर’ आंदोलनामुळे चंद्राबाबू नजरकैदेत; तर TDP कार्यकर्त्यांची धरपकड
‘चलो आत्मकुरू’ रॅलीचे आयोजन करणारे आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि त्यांचे पुत्र लोकेश यांना आंध्र प्रदेश पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरी नजरकैदेत ठेवले आहे. नायडू यांनी पक्ष कार्यकर्ते आणि नेत्यांसोबत गुंटूर जिल्ह्यात सरकारच्या विरोधात चलो ‘आत्मकुरू’ रॅलीचे आयोजन केले होते. सरकारने या रॅलीला परवानगी नाकारण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर चंद्राबाबू यांनी सरकारच्या या निर्णयाच्या निषेधार्थ उपोषणाचे हत्यार उपसण्याची घोषणा करणाऱ्या चंद्राबाबूंना सरकारने नजरकैदेत ठेवण्याचा निर्णय घेतला.
5 वर्षांपूर्वी -
संतापजनक! ज्या इस्रो शास्त्रज्ञांचं कौतुक मोदींनी केलं त्यांच्या पगारवाढीत कपात
सध्या देशभर चांद्रयान-२ मोहिमेवरून भारतीय शास्त्रज्ञावर कौतुकाचा आणि त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं देशात आणि जगभरातून कौतुक होत असलं तरी मोदी सरकारच्या निर्णयानंतर मात्र सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येतो आहे. चांगल्या कामाची पोचपावती केवळ शब्दात देऊन सरकारने स्वतःची पाठ थोपटून घेतली, मात्र दुसरीकडून एक धक्कादायक निर्णय घेतल्याने त्याचा थेट आर्थिक फटका भारतीय शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांना बसणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री कमलनाथ यांना धक्का, शीखविरोधी दंगलीची फाइल केंद्रीय गृह मंत्रालय उघडणार
माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम, काँग्रेसचे संकटमोचक डी.के. शिवकुमार यांच्यापाठोपाठ काँग्रेसचे आणखी एक बडे नेते आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ अडचणीत येण्याची शक्यता आहे. १९८४मध्ये झालेल्या शीख विरोधी दंगलीची फाइल पुन्हा उघडण्याची तयारी केंद्रीय गृहमंत्रालयाने सुरू केली आहे. ही केस पुन्हा उघड झाल्यास कमलनाथ यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
5 वर्षांपूर्वी -
नोटबंदी आणि जीएसटीमुळेच देशात आर्थिक मंदी: केंद्रीय राज्यमंत्री प्रतापचंद्र सारंगी
सध्या देशभरात मंदीवरून वातावरण ढवळून निघालेलं असताना त्यात सत्तेतील मंत्री देखील मोदी सरकारला अडचणीत टाकत आहेत. देशभरात अनेक उद्योग एकामागे एक बंद पडत चालले आहेत. आता पर्यंत लाखो लोकांनी त्यांचा रोजगार गमावला असून रोजच्या उपजीविकेचं साधन देखील हिरावलं गेलं आहे. वाहन उद्योग आणि वस्त्रोद्योग उद्योगाचे तर तीन तेरा वाजल्याचं चित्र आहे आणि दुसरीकडे बांधकाम क्षेत्र देखील खप नसल्याने डबघाईला आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
ओदिशात ट्रकचालकास ८६, ५०० रुपये दंड; तर बिहारला केंद्रीय मंत्री दंड न भरताच निघून गेल्या
सरकारे नवीन वाहतूक नियम आणि त्यासोबत वारेमाप दंड जरी आणले असले तरी ते केवळ सामान्य लोकांसाठीच असल्याचं देशभर निदर्शनास येते आहे. कारण सत्ताधारी पक्षांचे मंत्री, आमदार आणि खासदार आणि त्यांचे कुटुंबीय नवे वाहतूक नियम पायदळी तुडवून उलट पोलिसांवरच कारवाई करत असल्याचं समोर आलं आहे. कारण ओडिशा आणि बिहारमधील हे दोन प्रसंग याचं वास्तव स्पष्ट करत आहेत असंच म्हणावं लागेल.
5 वर्षांपूर्वी -
कलम ३७१ ला धक्का लावणार नाही: अमित शहा
आसाममधील वैध नागरिकांची नॅशनल रजिस्टर फॉर सिटिझनशिपची (एनआरसी) प्रक्रिया ठरल्या वेळेनुसार पूर्ण झाल्याचे अमित शाह यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘एनआरसीवर अनेक लोकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. पण, मी स्पष्ट शब्दांत सांगतो की एकाही अवैध नागरिकाला सरकार देशात राहून देणार नाही. हे आमचे वचन आहे.’
5 वर्षांपूर्वी -
सरकारवरील टीकेला देशद्रोह ठरवल्यास परिस्थिती कठीण होईल: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश
मागील अनेक वर्षांपासून देशभरात कोणत्याही सरकारी टिकेवरून विरोधक आणि सामान्य लोकांवर देखील थेट देशद्रोहसारखे गंभीर लेबल लावण्याचे प्रकार सुरु आहेत. त्यात ना सामान्य नागरिक, कलाकार, साहित्यिक आणि राजकीय विरोधक असे सगळेच भरडले गेले आहेत. देशद्रोह सारखे लेबल लावल्याने अनेक तरुणांची आयुष्य उध्वस्थ झाली आहेत. समाज माध्यमांचा त्यासाठी मोठ्या ताकदीने वापर केला गेल्याचे अनेकांनी पाहिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांचं निधन
ज्येष्ठ वकील आणि माजी कायदामंत्री राम जेठमलानी यांचं रविवारी सकाळी दीर्घ आजाराने निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते. देशातील नामवंत वकील म्हणून जेठमलानी यांची ओळख होती. मागील दोन आठवड्यांपासून ते आजारी होते. नवी दिल्लीतील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जेठमलानी यांच्या पश्चात मुलगा वकील महेश जेठमलानी आणि मुलगी असा परिवार असून, मुलगी अमेरिकेत राहते. त्यांची दुसरी मुलगी राणी जेठमलानी यांचे यापूर्वीच निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने ज्येष्ठ विधिज्ज्ञ आणि कायद्याचा अभ्यासक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
5 वर्षांपूर्वी -
कुठल्याही गोष्टीचं श्रेय घेणे 'मिठी संप्रदायातील' राजकारण्यांना शोभते: विश्वंभर चौधरी
‘चांद्रयान 2’ मोहीमेत आलेल्या अडचणीमुळे इस्रोचे प्रमुख के सिवन अतिशय भावुक झाले. इस्रोच्या कंट्रोल रुममधील संबोधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी बाहेर आले आणि भावुक झालेले इस्रो प्रमुख रडू लागले. मोदींनी गळाभेट घेतल्यानंतर के सिवन यांनी अश्रूंना मोकळी वाट करुन दिली. यावेळी मोदींनीही भारतीय तुमच्या पाठीशी आहेत, असं म्हणत के सिवन यांना धीर दिला.
5 वर्षांपूर्वी -
ओंजळीने पाणी प्या; दात घासण्यासाठी ब्रश ऐवजी 'दातून' वापरा: भाजप खासदाराचा सल्ला
एखाद्या सामाजिक विषयावर भारतीय जनता पक्षाचे मंत्री, आमदार आणि खासदार काय सल्ला देतील याचा नेम नाही. देशभरात सध्या प्लास्टिकचा वापर प्लास्टिक बंदीवरून मोठं राजकारण याआधीच पेटल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र भारतीय जनता पक्षाच्या महिला खासदार मीनाक्षी लेखी यांनी सामान्यांना अजब सल्ला दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
आठवण! चांद्रयान-१ मोहिमेच्या दशकपूर्ती वेळी मोदींनी देशाला सर्जिकल स्ट्राइकमध्ये गुंतवलं होतं: सविस्तर
सध्या चांद्रयान २ या मोहिमेवरून देशातील वातावरण भावुक करून सोडण्यात आले आहे. चांद्रयान २ मोहिमेतील विक्रम लॅण्डरचा इस्रोशी अखेरच्या क्षणी संपर्क तुटला आणि सर्वत्र शांतता पसरली. त्यात मोदी आधीच इस्रोच्या कार्यालयात देशाला संबोधित करण्यासाठी दबा धरून बसले होते. वास्तविक हे तेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत ज्यांच्या सरकारने चांद्रयान २ चं यशस्वी उड्डाण झाल्यानंतर इस्रोतील वैज्ञानिकांचे वेतन कमी केले होते आणि यावर इस्रोतील वैज्ञानिकांनी नाराजी व्यक्त करत पंतप्रधान कार्यालयाकडे स्वतःच्या भावना पत्राद्वारे पोहोचवल्या होत्या.
5 वर्षांपूर्वी -
मंदीवरून लक्ष हटवण्यासाठी गाजावाजा; मोदी सत्तेत येण्यापूर्वी इस्रोच्या मोहीम झाल्या नाहीत का?
चा विक्रम लँडरशी असलेला संपर्क तुटल्यानं चांद्रयान मोहिमेला धक्का बसला. जवळपास संपूर्ण मोहीम अगदी सुरळीत सुरू असताना अखेरच्या दोन मिनिटांमध्ये इस्रोच्या हाती निराशा आली. यानंतर भावूक झालेल्या इस्रो प्रमुख के. सिवन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धीर दिला.
5 वर्षांपूर्वी -
विकसित रशियाला विकसनशील भारताने ७,१८५ कोटी का दिले असावेत? सविस्तर
रशियाच्या अतिपूर्वेकडील प्रदेशाच्या विकासासाठी भारताकडून एक अब्ज अमेरिकी डॉलर कर्ज स्वरूपात देण्यात येतील, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केली. रशियाचा अतिपूर्व प्रदेश हा नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध असा आहे. त्या प्रदेशाच्या विकासासाठी भारत रशियाच्या खांद्याला खांदा लावून उभा असेल, असे मोदी यांनी स्पष्ट केले. ‘इस्टर्न इकॉनॉमिक फोरम’ने (इइएफ) आयोजित केलेल्या पाचव्या परिषदेमध्ये ते बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
वाहूतक नियमभंग : दोन राज्यातून ४ दिवसांत तब्बल १.४१ कोटींची दंडवसुली
भारतात १ सप्टेंबरपासून नवीन मोटार वाहन कायदा लागू झाला आहे. नवीन कायद्यातंर्गत वाहतुकीचे नियम मोडल्यास जवळपास ३० पटीने अधिक दंड वाढविण्यात आला आहे. त्यामुळे कार, बाईक चालविताना खूप काळजी घ्यावी लागणार आहे. वाहतुकीचे नियम मोडल्यास वाहनधारकांना दंड भरावा लागतो. या नवीन तरतुदीनंतर आता तब्बल १ कोटी ४१ लाख २२ हजार रुपयांची दंडवसुली करण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल
- Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स शेअर्समध्ये घसरण वाढतेय, स्टॉक Hold करावा की Sell?
- Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर मजबूत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हलसहित टार्गेट प्राईस जाहीर
- RVNL Share Price | PSU स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सुसाट धावणार
- Numerology Horoscope | 10 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Numerology Horoscope | 13 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे टॉप 5 शेअर्स मालामाल करणार, अल्पावधीत तगडा परतावा मिळेल
- Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल
- Infosys Share Price | हलक्यात घेऊ नका! Infosys, TCS, Wipro सहित हे 7 शेअर्स मालामाल करणार, हाय ट्रेडिंग व्हॉल्यूम
- Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर्समध्ये मजबूत तेजी येणार, नवीन अपडेट येताच शेअर्सची खरेदी वाढली