महत्वाच्या बातम्या
-
आलू पॉलिटिक्स'चा दुसरा अंक सुरु? पराभूत झाल्याने भाजप चा पराक्रम
आलू पॉलिटिक्स’चा दुसरा अंक सुरु? पराभूत झाल्याने भाजप चा पराक्रम
5 वर्षांपूर्वी -
मनसेवर मतं फोडाफोडीचे आरोप करणारी शिवसेना देशभर भाजपची मत फोडण्यात व्यस्त?
पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव आणि ३ हिंदी भाषिक राज्यांमध्ये भाजपाला सत्ता गमवावी लागली आहे. विशेष म्हणजे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार शिवसेना उमेदवारांचे या हिंदी भाषिक राज्यांमध्ये डिपॉझिट जरी जप्त झाले असले तरी, याच तीन राज्यांमधील भाजपचे ५ आमदार शिवसेनेने घेतलेल्या मतांमुळे पराभूत झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
आसाम NRC त्रुटी; अनेक परदेशी नागरिक भारतीय झाले, तर जे भारतीय आहेत त्यांना यादीत स्थानच नाही
आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक अर्थात NRC नोंदणी प्रक्रियेत अनेक त्रुटी असल्याचे निरीक्षण नोंदवताना, कोणीही भारताला इस्लामिक देश करण्याचा प्रयत्न करु नये असे मत मेघालय उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुदीप रंजन सेन यांनी याचिकेच्या सुनावणी दरम्यान व्यक्त केले आहे. देशाला मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर धर्माच्या आधारे भारताला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित केले पाहिजे होते, परंतु भारताने धर्म निरपेक्ष भूमिका स्वीकारली, असे सुद्धा त्यांनी स्पष्ट केले.
5 वर्षांपूर्वी -
राजस्थान-एमपी'त काँग्रेस शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या शक्यतेने मोदी सुद्धा घाईघाईत घोषणा करणार?
राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसह ५ राज्यातील विधानसभा निवडणुकीतील अपयशामुळे मोदी सरकार धास्तावले आहे. त्याचे मोठे दुष्परिणाम २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत सुद्धा भिगावे लागतील याची चुणूक नरेंद्र मोदींना लागली आहे. त्यात ३ हिंदी भाषिक राज्यांमध्ये मोठे धक्के बसून थेट सत्ता गमावण्याची वेळ आल्याने मोदी सरकारने चांगलीच धास्ती घेतली आहे.
5 वर्षांपूर्वी -
जुमलेबाज मोदी हटाओ, योगी लाओ : लखनौमध्ये पोस्टर
५ राज्यांमध्ये दारुण पराभव झाल्याने सध्या नरेंद्र मोदींच्या नैतृत्वाला विरोध होण्यास सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पक्षाच्या पराभवानंतर लखनौमध्ये युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधान बनवा अशी पोस्टरबाजी सुरु झाली आहे. उत्तर प्रदेश नवनिर्माण सेना नावाच्या एका हिंदुत्ववादी संघटनेने युपीच्या राजधानीत हे पोस्टर लावल्याचे समजते.
5 वर्षांपूर्वी -
संसद अधिवेशन: राज्यातील दुष्काळापेक्षा, शिवसेना खासदारांना राम मंदिरावर चर्चा महत्वाची?
कालच ५ राज्यांमधील निवडणुकीच्या निकालावरून शिवसेनेने बोध घेतला आहे असं अजिबात वाटत नाही. कारण, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर शिवसेनेचे खासदार राम मंदिराच्या मुद्द्यावरुन पुन्हा आक्रमक झाले आहेत. आज शिवसेना खासदारांनी संसदेबाहेर राम मंदिराच्या समर्थनार्थ घोषणा देत पोश्टरबाजी केली.
5 वर्षांपूर्वी -
मध्य प्रदेशात मायावतींचं काँग्रेसला समर्थन
मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीची अंतिम आकडेवारी जाहीर झाली असून मतदारांनी काँग्रेस आणि भाजप अशा कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत दिलेलं नाही. एकूण २३० जागांपैकी काँग्रेसच्या वाट्याला ११४ जागांवर विजय मिळाला असला तरी बहुमताचा एकदा ११६ आहे. तर दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाला १०९ जागांवर विजय प्राप्त झाला आहे. तर दुसरीकडे सपा १, बसपा २ आणि अपक्ष उमेदवारांचा एकूण ४ जागांवर विजय झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
कॉंग्रेस पक्षाचे नेतृत्व जनतेने स्वीकारले : शरद पवार
५ राज्यांमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे जाहीर अभिनंदन केले. जनतेने कॉंग्रेस पक्षाचे नेतृत्व स्वीकारले असे सुद्धा ते म्हणाले, तसेच नरेंद्र मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
5 वर्षांपूर्वी -
हिंदी भाषिक राज्यांतील निकालाने भाजप-सेनेच्या मुंबई व आसपासच्या उत्तर-भारतीय राजकारणाला सुरुंग?
कालच ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. त्यात तेलंगणात तिथला स्थानिक पक्ष टीआरएस’ने बाजी मारली, तर मिझोरामची सत्ता काँग्रेसने गमावली असली तरी तिथे सत्ता ‘मिझो नॅशनल फ्रंट’ या स्थानिक पक्षाकडे गेली आहे. तेलंगणा आणि मिझोराम या दोन राज्यामध्ये भाजपच्या पुरता फज्जा उडाला असून भाजपचं या दोन राज्यांमधील अस्तित्व नगण्य झाले आहे. परंतु, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान या तीन हिंदी भाषिक राज्यांमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. या तिन्ही राज्यांमध्ये काँग्रेस सत्ता स्थापन करेल हे निश्चित आहे.
5 वर्षांपूर्वी -
शक्तिकांत दास यांची आरबीआयच्या गव्हर्नरपदी निवड
आरबीआयच्या गव्हर्नरपदी शक्तिकांत दास यांची नियुक्ती झाली आहे. शक्तिकांत दास हे माजी केंद्रीय अर्थ सचिव आहेत. सध्या ते अर्थ आयोगाचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. कालच उर्जित पटेल यांनी तडकाफडकी गव्हर्नरपदाचा राजीनामा दिल्याने अर्थव्यवस्थेत खळबळ माजली होती.
5 वर्षांपूर्वी -
नेटकऱ्यांचे प्रश्न: 'मतदारांनी खरे धाडस दाखवले', पण तुम्ही सत्तेला लाथ मारण्याचं धाडस कधी दाखवणार?
४ राज्यांमधील मतदारांनी आगामी निवडणुकीत पर्याय कोण? याचा जराही विचार न करता जे नकोत त्यांना थेट नाकारले आहे. आणि त्यांना उखडून फेकले आहे. त्यामुळे असे धाडस दाखवल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मतदारांचे मनापासून अभिनंदन केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
आजपासून भाजपसाठी 'पप्पू'चा परमपूज्य झाला' : राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत विधानसभा निकाल आणि भाजपच्या पीछेहाट होण्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ५ राज्यांमधील निकालांवर मत व्यक्त करताना राज ठाकरे म्हणाले की, ‘अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या जुलमी राजवटीला ही मतदाराने दिलेली चपराक आहे, अशा तिखट शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
चाणक्यांनी छत्तीसगड'मधील पराभवाची जवाबदारी रमणसिंग यांच्यावर ढकलली
आजच्या विधानसभा निवडणुकीत छत्तीसगडमध्ये भाजपचा धुव्वा उडाला आहे. आजचा निकाल मान्य करताना माजी मुख्यमंत्री रमणसिंग यांनी काँग्रेसला सुद्धा शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु विजय झाल्यावर आतुरतेने पत्रकार परिषदा घेणारे अमित शहा यांनी सर्व जवाबदारी रमणसिंग यांच्यावर ढकलण्याचे बोलले जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
राहुल गांधींच्या प्रचंड मेहनतीमुळे काँग्रेसला यश मिळाले : सोनिया गांधी
आज राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर एक वर्ष पूर्ण होतं आहे. दरम्यान, आजच्या ५ राज्यांमधील काँग्रेसच्या निकालावरून सोनिया गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींची स्तुती करताना म्हटलं की, पक्षाला नवी उभारी देण्यासाठी राहुलने प्रचंड मेहनत घेतली आणि त्यामुळेच आजचं यश मिळत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे यांची संध्याकाळी ५ वाजता पत्रकार परिषद
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज संध्याकाळी ५ वाजता पत्रकार परिषद आयोजित केली आहे. आजच ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून त्यात भाजपाला सर्व राज्यांमध्ये अपयश आल्याचे चित्र आहे. प्रसिद्ध होत असलेल्या निकालांनंतर भाजपच्या सर्व कार्यालयांमध्ये शुकशुकाट पसरला आहे.
5 वर्षांपूर्वी -
नेटकरी अभियान; म्हणतात ‘पप्पू पास पण मोदी नापास’; पाहा ट्रोल्स मालिका
५ राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सध्या मतदाराने मोदी, अमित शहा आणि एकूणच भाजपाला स्पष्ट नाकारल्याचं चित्र आहे. परंतु. एरवी प्रसार माध्यमांवर संधी मिळताच विरोधकांवर शेलक्या भाषेत टीका करण्यासाठी तयार असणाऱ्या भाजप नेत्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले आहेत. सर्व भाजप कार्यालयात शुशुकाट पसरलेला दिसतो आहे. त्यात ज्या राहुल गांधींना पप्पू म्हणून चिडवण्याची एकही संधी वाया न घालवणारे भाजप नेते सध्या राहुल गांधींच्या यशानंतर आणि मोदींच्या अपयशानंतर चांगलेच तोंडघशी पडले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
विधानसभा: राजस्थानमध्ये आदित्य ठाकरेंकडे मतदारांचं दुर्लक्ष, प्रचार वाया गेला
शिवसेनेनं राष्ट्रीय पक्ष बनण्याचा ध्यास घेतला खरा, परंतु सर्वच ठिकाणी अपयशाची मालिका थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. कारण राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीत प्रचारात उतरलेले आदित्य ठाकरे यांना पूर्णतः अपयश आले आहे. इथल्या मतदारांनी मतदान करताना शिवसेनेला साधं विचारात सुद्धा घेतले नसल्याचं दिसतं आहे.
5 वर्षांपूर्वी -
ते म्हटले होते मोदी पंतप्रधान व्हावे 'ते' झाले, काल म्हणाले मोदींची उलटी गिनती सुरु होणार 'ती' झाली?
सध्या ५ राज्यांमध्ये सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून देशात मोदी जादू संपल्यात जमा आहे. त्याचा प्रत्यय तेलंगणात आणि छत्तीसगडमध्ये स्पष्ट दिसत आहे. विशेष म्हणजे मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या हिंदी भाषिक राज्यांमध्ये धार्मिक राजकारण मोठ्या प्रमाणावर केलं गेलं असलं तरी ते मतदाराने स्पष्टपणे नाकारलं आहे हे निवडणुकीच्या निकालांवरून दिसत आहे.
5 वर्षांपूर्वी -
राजस्थानमध्ये काँग्रेसची बहुमताच्या दिशेने वेगाने वाटचाल
सध्या ५ राज्यांमध्ये सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून देशात मोदी जादू संपल्यात जमा आहे. त्याचा प्रत्यय तेलंगणात आणि छत्तीसगडमध्ये स्पष्ट दिसत आहे. विशेष म्हणजे मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या हिंदी भाषिक राज्यांमध्ये धार्मिक राजकारण मोठ्या प्रमाणावर केलं गेलं असलं तरी ते मतदाराने स्पष्टपणे नाकारलं आहे हे निवडणुकीच्या निकालांवरून दिसत आहे.
5 वर्षांपूर्वी -
हिंदी भाषिक राज्यांनी मंदिरांचं धार्मिक राजकारण झिडकारलं, शिवसेना बोध घेईल? सविस्तर
सध्या ५ राज्यांमध्ये सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून देशात मोदी जादू संपल्यात जमा आहे. त्याचा प्रत्यय तेलंगणात आणि छत्तीसगडमध्ये स्पष्ट दिसत आहे. विशेष म्हणजे मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या हिंदी भाषिक राज्यांमध्ये धार्मिक राजकारण मोठ्या प्रमाणावर केलं गेलं असलं तरी ते मतदाराने स्पष्टपणे नाकारलं आहे हे निवडणुकीच्या निकालांवरून दिसत आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल
- Bank Account Alert | महाराष्ट्रातील या बँकेत तुमचं खातं आहे? आता पैसे काढू शकणार नाही, RBI ने बंदी घातली
- Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Penny Stocks | गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे 10 पेनी शेअर्स, अप्पर सर्किट हीट गतीने पैसा वाढतोय
- Mastek Share Price | 40 रुपयाच्या शेअरची कमाल! तब्बल 4000 टक्के परतावा दिला, आता एका दिवसात 20% वाढला
- Bonus Shares | फ्री शेअर्स मिळवा! मल्टिबॅगर शेअरवर मिळतील फ्री बोनस शेअर्स, 1 वर्षात 462 टक्के परतावा दिला
- Amara Raja Share Price | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर खरेदी करा, अवघ्या 5 दिवसात दिला 33 टक्के परतावा
- Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती?
- Bank FD Interest Rates | सुरक्षित भरघोस कमाई! 1 वर्षापर्यंतच्या FD वर मिळेल 8.5 टक्के परतावा, पाहा बँकांची यादी
- Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल