महत्वाच्या बातम्या
-
आम्ही तुमच्या मार्गावर चाललो असतो तर शिवसेनाच उरली नसती | अमित शहांचा संताप
नारायण राणे यांच्या छवीचं अनेक प्रकारे लोक वर्णन करतात. मात्र, मी म्हणेल, जिथे अन्याय होतो तिथे निडरपणे ते संघर्ष करतात. जो स्वत:वरील अन्यायविरोधात लढू शकत नाही. ते जनतेविराधात लढू शकत नाही. नारायण राणे यांना त्यांच्या राजकीय आयुष्यात अनेकवेळा अन्यायाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांनी अन्यायाला वाचा फोडत आपल्या भविष्याचा विचार करत पावलं टाकली. त्यामुळे त्यांची राजकीय कारकिर्द फार हिरतीफिरती आहे. मला काही पत्रकार प्रश्न विचारतात, तुमच्याकडे त्यांच्यावर अन्याय झाला तर? मी सांगितलं, आम्ही अन्याय करणार नाही. आम्ही त्यांचा सन्मानच करु. तुम्ही चिंता करु नका. नारायण राणे यांना कसं साभाळावं आणि सन्मान करावं, ते भाजपला माहिती आहे”, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.
3 वर्षांपूर्वी -
नारायण राणेंना कसं साभाळावं आणि सन्मान करावा, ते भाजपला माहिती - अमित शहा
नारायण राणे यांच्या छवीचं अनेक प्रकारे लोक वर्णन करतात. मात्र, मी म्हणेल, जिथे अन्याय होतो तिथे निडरपणे ते संघर्ष करतात. जो स्वत:वरील अन्यायविरोधात लढू शकत नाही. ते जनतेविराधात लढू शकत नाही. नारायण राणे यांना त्यांच्या राजकीय आयुष्यात अनेकवेळा अन्यायाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांनी अन्यायाला वाचा फोडत आपल्या भविष्याचा विचार करत पावलं टाकली. त्यामुळे त्यांची राजकीय कारकिर्द फार हिरतीफिरती आहे. मला काही पत्रकार प्रश्न विचारतात, तुमच्याकडे त्यांच्यावर अन्याय झाला तर? मी सांगितलं, आम्ही अन्याय करणार नाही. आम्ही त्यांचा सन्मानच करु. तुम्ही चिंता करु नका. नारायण राणे यांना कसं साभाळावं आणि सन्मान करावं, ते भाजपला माहिती आहे”, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले
3 वर्षांपूर्वी -
नारायण राणेंचं वक्तव्य म्हणजे निव्वळ विनोद | पवारांकडून राणेंची खिल्ली
अमित शाह यांच्या पायगुणामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार जाईल, असे वक्तव्य करणारे भाजप खासदार नारायण राणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मिश्किल शैलीत समाचार घेतला.
3 वर्षांपूर्वी -
जनतेचे खिसे कसे कापतो | हे कुणाच्या लक्षात येऊ नये म्हणून केंद्राची ही चाल....
देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकल्या आहेत. पेट्रोल नव्वदीपार गेलं असून, सर्वसामान्यांच्या खिशावरील भार वाढत चालला आहे. त्यामुळे राज्यात पेट्रोल-डिझेलच्या किंमती करण्यासाठी राजकीय पक्ष रस्त्यावर उतरताना दिसत आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामागील गणित मांडत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी फेसबुक लिहिली आहे. रोहित पवार यांनी केंद्र सरकार चलाखी करत असल्याचा आरोप करताना राज्यातील भाजप नेत्यांना ‘जनाची नाही, तरी मनाची ठेवावी’ असा टोला लगावला आहे. रोहित पवारांनी २०१४च्या लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या जाहिरातीचाही फोटो शेअर केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
महाविकास आघाडीकडून लोटसचं ऑपरेशन सुरु असल्याने भाजप नेत्यांकडून पुन्हा पुड्या - सविस्तर वृत्त
आम्ही कोणतीही शिडी न वापरता फासे पलटू शकतो’ असे विधान एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने विधानसभाध्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने ‘ऑपरेशन कमळ’ होणार का, याची चर्चा सुरू झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे खासदार नारायण राणे यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी रविवारी सिंधुदुर्गात आहेत.
3 वर्षांपूर्वी -
भाजप-शिवसेना सरकार असताना संभाजीनगर का केलं नाही? - राज ठाकरे
औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करण्याच्या मुद्द्यावरुन सध्या जोरदार राजकारण सुरु आहे. भाजप आणि मनसेनं आक्रमक पवित्रा घेत औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरु केलं आहे. अशावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. जेव्हा केंद्रात आणि राज्यात भाजप-शिवसेनेचं सरकार होतं, तेव्हा का नामकरण केलं नाही? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे.
3 वर्षांपूर्वी -
पवार म्हणाले वीज कंपन्यांच्या नावानं मला पत्र लिहा | नंतर कळलं की अदानी पवारांच्या घरी येऊन गेले
त्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अदानी यांच्यात झालेल्या बैठकीचा संदर्भ देत गौप्यस्फोट केला आहे. “वीज बिलाबद्दल पहिलं आंदोलन आमच्या पक्षानं केलं. भाजपा काय पुढे येतंय. या सगळ्या ठिकाणी आमच्या पोरांवर गुन्हे दाखल झाले आहेत. खास करून नागरिकांनी याचा विचार केला पाहिजे की, त्यांच्यासाठी रस्त्यावर कोण उतरलं. वीज कंपन्यांकडून जी बिलं येताहेत, ती प्रत्येकाला येत आहे. लॉकडाउनमध्ये तुम्हाला त्रास झाला. तुमच्या वीज कंपन्यांना नफा झाला नाही म्हणून नागरिकांना पिळणार असाल, तर कसं होईल. सरकारमधील मंत्री म्हणाले होते, कपात करून. नंतर एकदम घुमजाव झालं,” असं राज ठाकरे म्हणाले.
3 वर्षांपूर्वी -
कोण कुठली रिहाना | तिच्यामुळे भारतरत्नांना सरकारनं ट्विट करायला लावणं योग्य नाही
राजधानी दिल्लीत शेतकरी आंदोलनाला आता जवळपास अडीच महिन्याचा कालावधी होत आहे. सरकारसोबत झालेल्या अनेक बैठकांनतरही नवीन कृषी कायदा मागे घेण्याच्या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. या आंदोलनात ६० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच केंद्र सरकारसोबत अनेक बैठक देखील पार पडल्या आहेत, ज्यामार्गे कोणताही तोडगा निघालेला नाही.
3 वर्षांपूर्वी -
कायदा चुकीचा नाही | कायद्यातील त्रुटी चुकीच्या | त्याचा फायदा २-३ जणांना होऊ नये
राजधानी दिल्लीत शेतकरी आंदोलनाला आता जवळपास अडीच महिन्याचा कालावधी होत आहे. सरकारसोबत झालेल्या अनेक बैठकांनतरही नवीन कृषी कायदा मागे घेण्याच्या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. या आंदोलनात ६० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच केंद्र सरकारसोबत अनेक बैठक देखील पार पडल्या आहेत, ज्यामार्गे कोणताही तोडगा निघालेला नाही.
3 वर्षांपूर्वी -
मी भाषण केले | मात्र मला गुन्हा मान्य नाही | न्यायालयाकडून जामीन मंजूर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी वाशी न्यायालयानं सशर्त जामीन मंजूर केला आहे. राज ठाकरे यांच्यासोबत मनसेच्या वकिलांची फौज सोबत होती. नवी मुंबईतील वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात बेलापूर न्यायालयाने वॉरंट जारी केलं होतं.
3 वर्षांपूर्वी -
KDMC'नंतर मनसेच्या अजून एका विधानसभेतील उमेदवारांचा पक्षाला रामराम
कल्याण डोंबवली महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेनेने मनसेला काल मोठा धक्का दिला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांच्यासह डोंबिवलीतील असंख्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. राजेश कदम हे पदाधिकारी असताना देखील त्यांना थेट मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षावर राजेश कदम यांचा पक्षप्रवेश देऊन राजेश कदम यांचं कल्याण डोंबिवलीत राजकीय वजन वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. साहजिकच राजेश कदम यांच्या शिवसेना प्रवेशाने मनसेला मोठा फटका बसणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
शेकडो गुन्हे दाखल करा | पण बुलंद आवाज रयतेच्या न्याय हक्कांसाठी घुमणारच - मनसे
नवी मुंबईतील वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात बेलापूर न्यायालयाने वॉरंट जारी केलं आहे. त्यामुळे राज ठाकरे आज (शनिवार) वाशी न्यायालयात हजर राहणार आहेत. विशेष म्हणजे, राज ठाकरेंच्या स्वागतासाठी मनसैनिकांनी टोलनाक्यावरच पोस्टरबाजी केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
फासे पलटण्यासाठी फडणवीसांना माझ्या मनापासून शुभेच्छा | राऊतांच्या टोला
काँग्रेसनं महाराष्ट्रात खांदेपालट करत प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रं नाना पटोले यांच्या हाती दिली आहेत. त्याचबरोबर सहा कार्य अध्यक्षही नियुक्त करण्यात आले आहेत. मात्र, नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आल्यानं विधानसभेचं अध्यक्षपद रिक्त झालं आहे. पुन्हा निवडणूक होणार असून, यावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. त्याला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दुजोरा दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
स्वाभिमानीचे आमदार लवकरच राष्ट्रवादीत? | थेट राष्ट्रवादीच्या मंचावर उपस्थिती
राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून राष्ट्रवादीला सुगीचे दिवस आले आहे. राष्ट्रवादीत दररोज इन्कमिंग होत असल्याचे दिसून येत आहे. भाजपमधील अनेक आमदार आणि नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात आहे. तर दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार मोर्शी मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार सुद्धा राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
3 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र काँग्रेसचा कारभार नाना पटोले यांच्या हाती | सोबतीला 6 कार्यकारी अध्यक्ष
काँग्रेसनं नाना पटोलेंसारख्या आक्रमक नेत्याला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. नाना पटोलेंच्या साथीला 6 कार्यकारी अध्यक्ष आणि 10 उपाध्यक्षांची तगडी टीम असणार आहे. काँग्रेस हायकमांडच्या या निर्णयानंतर काँग्रेस महाराष्ट्रात बळकट कशी होणार ते पाहावे लागणार आहे. महाराष्ट्र काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये एकूण 37 सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील प्रमुख काँग्रेस नेत्यांचा समावेश आहे
3 वर्षांपूर्वी -
Maratha Reservation | सुप्रीम कोर्टात 8 मार्चपासून प्रत्यक्ष अंतिम सुनावणीला
महाराष्ट्रातील महत्वाचा प्रश्न म्हणजे मराठा आरक्षणाचा. या मराठा आरक्षणाची सुनावणी आज (५ फेब्रुवारी) सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे पार पडली. त्यामुळे मराठा आरक्षणावर स्थगिती उठवणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार होते. दरम्यान, या मधल्या काळात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतली होती. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी देखील वारंवार करण्यात आली होती.
3 वर्षांपूर्वी -
नाना पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. या राजीनाम्यानंतर नाना पटोले यांनी मंत्रिपद दिलं जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. याबाबत नाना पटोले यांना प्रश्न विचारला असता त्यांनी पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारु, असं उत्तर त्यांनी दिलं. पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
3 वर्षांपूर्वी -
ती संघटना आहे की पक्ष तेच मला कळत नाही | ही तर टाइमपास टोळी - आदित्य ठाकरे
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची खिल्ली उडवली आहे. आदित्य ठाकरेंनी मनसेचा टाईमपास टोळी म्हणून उल्लेख केला आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसेनेचा वीरप्पन टोळी असा उल्लेख केला होता. आता शिवसेनेकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा टाईमपास टोळी असा उल्लेख केल्याने सेना-मनसे वाद रंगला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी चेंबूरमधील भक्ती पार्क परिसरात मियावाकी बागेची पाहणी केली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना विविध प्रश्नांना उत्तरं दिली.
3 वर्षांपूर्वी -
१५ फेब्रुवारीपासून राज्यातील महाविद्यालय सुरु - उदय सामंत
राज्यातील महाविद्यालय सुरू कधी होणार याची उत्सुकता लागली होती. याबाबत काही बैठका देखील झाल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे येत्या १५ फेब्रुवारी पासून महाविद्यालय सुरू होणार आहे. सध्या पन्नास टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये महाविद्यालय सुरू होणार, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
3 वर्षांपूर्वी -
भाजपला निराशेने ग्रासले आहे | त्यांना शिवसेनेशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही - जयंत पाटील
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनपेक्षितपणे शिवसेनेच्या नैत्रुत्वात राष्ट्रवादी आणि काँग्रेसने महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं आणि महाराष्ट्र सारखं मोठं राज्य भाजपने गमावलं. पण शिवसेना जर भाजपसोबत नसेल तर भाजपची सत्ता येणं शक्य नसल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे शिवसेनेवर तुटून पडणारे भाजपचे मध्येच शिवसेनेबाबत सौम्य भूमिका देखील घेताना दिसत आहेत.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स शेअर्समध्ये घसरण वाढतेय, स्टॉक Hold करावा की Sell?
- Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल
- Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर मजबूत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हलसहित टार्गेट प्राईस जाहीर
- RVNL Share Price | PSU स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सुसाट धावणार
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे टॉप 5 शेअर्स मालामाल करणार, अल्पावधीत तगडा परतावा मिळेल
- Numerology Horoscope | 10 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Infosys Share Price | हलक्यात घेऊ नका! Infosys, TCS, Wipro सहित हे 7 शेअर्स मालामाल करणार, हाय ट्रेडिंग व्हॉल्यूम
- Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल
- HAL Share Vs BEL Share Price | PSU HAL आणि BEL शेअर्स दणादण परतावा देणार, अल्पावधीत 30% कमाई करा
- Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर्समध्ये मजबूत तेजी येणार, नवीन अपडेट येताच शेअर्सची खरेदी वाढली