महत्वाच्या बातम्या
-
फडणवीस समर्थकांमध्ये अमित शाहांबद्दल खदखद वाढली | फलकांवरून अमित शाहांचे फोटो हटवले
देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचे अत्यंत जवळचे मित्र आणि नागपूर शहराचे माजी महापौर संदीप जोशी यांनी लावलेले होर्डिंग नागपुरात सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या होर्डिंग मधून देशाचे गृहमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते अमित शहा यांचा फोटो गायब आहे.
3 वर्षांपूर्वी -
केंद्राला फडणवीसांचा अपमान करायचा होता म्हणून उपमुख्यमंत्री पद दिलं | प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया
महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून काल एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. राज्यातील लोकांबरोबरच राजकीय मंडळींनाही हा धक्का होता. देवेंद्र फडणवीस यांचा दिल्लीतील लोकांनी गेम केला अशी चर्चा कालपासून राज्यामध्ये आहे. यासंपूर्ण प्रकरणावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय हा पूर्णपणे दिल्लीतून | फडणवीसांचा पत्ता अमित शाहांनी कापल्याची चर्चा
महाराष्ट्राच्या राजकारणात २१ जूनला सर्वात मोठा राजकीय भूकंप झाला. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या विरोधात बंड पुकारून आम्हीच बाळासाहेबांची शिवसेना असल्याचा दावा केला. सगळ्या नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्यानंतर उत्सुकता होती ती शिंदे गटाच्या साथीने भाजप सत्तेत येणार याची. एवढंच नाही तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील ही चर्चाही रंगली होती. ३० जूनच्या दुपारपर्यंत हीच चर्चा सगळीकडे रंगली होती. अगदी भाजप महाराष्ट्रच्या ट्विटर हँडलनेही मी पुन्हा येईन ही देवेंद्र फडणवीस यांची कविता ट्विट करून या सगळ्या घडामोडींना एक अर्थ दिला.
3 वर्षांपूर्वी -
फडणवीस यांचं दिल्लीतील भाजप वरिष्ठांकडून खच्चीकरण सुरु | ब्राम्हण महासंघाचा भाजपवर धक्कादायक आरोप
महाराष्ट्राचे राजकारण सतत नवनवे राजकीय वळण घेत आहे. सुरुवातीला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री होण्याची घोषणा केल्याने सर्वांनाच धक्का बसला, मग देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये भाग घेतला नाही. पण फडणवीस सरकारमध्ये सहभागी न होण्याबाबतची चर्चा शांत झाली का, भाजपाध्यक्ष जेपी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीतून आदेश जारी केले.
3 वर्षांपूर्वी -
कालच महाराष्ट्रनामाने सांगितलं ते आजच झालं | मेट्रो कारशेड आरेतच | मुंबईच्या पर्यावरणाच्या ऱ्हासाची सुरुवात
महाराष्ट्रात नवे सरकार सत्तेवर आल्यानंतर जुन्या सरकारने घेतलेले निर्णय बदलण्याची कसरत सुरू झाली आहे. गुरुवारी नव्या सरकारची स्थापना झाल्यानंतर राज्य सरकारने मुंबईच्या आरे कॉलनीत मेट्रो कारशेड बांधण्याचे आदेश महाधिवक्त्यांना दिले आहेत. रिपोर्ट्सनुसार, आरे कॉलनीतील मेट्रो कारशेड बांधकाम प्रकरणी नव्या सरकारने महाराष्ट्र सरकारला आपली बाजू न्यायालयासमोर मांडण्याचे निर्देश दिले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
शिंदेंच्या मंत्रिमंडळात मनसेच्या आ. राजू पाटील यांना राज्यमंत्रीपद मिळणार? | अनेक नवे चेहरे मंत्रिमंडळात
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आज शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना वंदन करुन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे हे राज्याचे 20 वे मुख्यमंत्री ठरले आहेत. मुंबईतील राजभवनात दरबार हॉलमध्ये हा शपथविधी कार्यक्रम अतिशय साध्या पद्धतीने पार पडला. एकनाथ शिंदे यंच्यासह देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीच्या कार्यक्रमाला भाजपचे काही नेते, पत्रकार उपस्थित होते.
3 वर्षांपूर्वी -
भाजप आणि फडणवीसांचा दिलदारपणा? | थांबा! राजकीय गेम पुढे आहे | शिंदेंच्या खांद्यावर बंदूक का? | काय आहे संपूर्ण योजना
महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट आलाय. कारण एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होतील असं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं. तसंच मी सरकारच्या बाहेर असणार आहे असंही त्यांनी सांगितलं तोच हा ट्विस्ट समोर आला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये सहभागी व्हावं तसंच उपमुख्यमंत्री व्हावं याकरिता आम्ही आग्रही आहोत असं जे. पी. नड्डा यांनी म्हटलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
Eknath Shinde | एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार | फडणवीस बाहेरून नियंत्रण ठेवतील
विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेविरोधात बंडाचा झेंडा फडकवणारे एकनाथ शिंदे दहा दिवसांनंतर मुंबईत दाखल झाले. विमानतळावर उतरल्यानंतर शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि आता हे दोन्ही नेते राजभवनात पोहोचले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Eknath Shinde | देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे राजभवनात आजच शपथ घेणार
विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेविरोधात बंडाचा झेंडा फडकवणारे एकनाथ शिंदे दहा दिवसांनंतर मुंबईत दाखल झाले. एकनाथ शिंदे मुंबईत येऊन पळून गेले. विमानतळावर उतरल्यानंतर शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि आता हे दोन्ही नेते राजभवनात पोहोचले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
नाव ने घेता राज ठाकरेंची प्रथमच टीका | त्यावर अनेक मराठी नेटिझन्सचे प्रतिप्रश्न | तर अमराठी घेत आहेत मजा
उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राज यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांना टोला लगावलाय.एखादा माणूस ज्या दिवशी आपल्या नशिबालाच स्वत:चं कर्तुत्व समजू लागतो त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरू होतो, अशी पहिली प्रतिक्रिया राज यांनी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाण्यापूर्वीच त्यांनी मुख्यमंत्रीपद सोडले.
3 वर्षांपूर्वी -
शिंदे गटाला सत्ता मिळणार | पण ती प्राप्त करण्याच्या प्रकारामुळे शिंदेंविरोधात लोकांच्या मनात प्रचंड खदखद
महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार बुधवारी कोसळलं. उद्धव ठाकरे यांनी जनसंवाद करतानाच राजीनामा देत असल्याची घोषणा केली. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर भाजपच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. विशेष म्हणजे उतावळ्या भाजपने लगेच ‘ये तो सिर्फ झांकी है, मुंबई महापालिका अभी बाकी है’ असं ट्विट केल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. मात्र भविष्यात महाराष्ट्र आणि मुंबई विरोधी जे काही होईल त्याला शिंदे पिता-पुत्रच कारणीभूत असतील अशी जहरी टीका समाज माध्यमांवर सुरु झाली आहे. शिंदे हे आत्मसन्मान गुजरातच्या चरणी ठेऊन आल्याने ती पूर्णपणे भाजपकडून ऑपरेट केले जातील असं नेटिझन्स ठामपणे सांगत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
बहुमत चाचणी उद्याच घ्या, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश | तत्पूर्वी मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार
सर्वोच्च न्यायालयाने आज सर्वात मोठा निकाल दिला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिलेल्या बहुमत चाचणीच्या आदेशाविरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर सुमारे चार तास चर्चा झाली. अखेर चार तासांच्या तीव्र चर्चेनंतर सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला. उद्या बहुमताने सुनावणी होईल, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
फ्लोअर टेस्टवेळी भाजपला पाठिंबा देण्याच्या फडणवीसांच्या मागणीला राज ठाकरेंचा होकार
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी आदेश दिले आहे. राष्ट्रवादीसोबत बैठकीला गैरहजर राहिल्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर बैठक सुरू आहे. मातोश्रीवर शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची बैठक सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटायला संजय राऊत, विनायक राऊत, अरविंद सावंत हे 3 खासदार आले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
जर यांनी फ्लोअर टेस्टचं म्हटलं तर काय? | यावर न्यायालयाने स्पष्ट केलंय की, आमचे दरवाजे खुले आहेत - अरविंद सावंत
एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील अनेक आमदारांनी बंडखोरी केल्यानं सरकारच्या स्थैर्यावरच प्रश्नचिन्हं निर्माण झाले होते. गेल्या आठवडाभरापासून राज्यातील राजकारण याच भोवती फिरत असून, सरकारच्या भवितव्याबद्दलची महत्त्वाची घडामोड घडली आहे.
3 वर्षांपूर्वी -
BREAKING | राज्यपालांचा अधिवेशन बालविण्याचा निर्णय घटनाबाह्य | सुप्रीम कोर्टाचा निर्णय विरोधात गेल्यास आम्हालाही...
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ३० जून रोजी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर शिवसेनेनं याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, याचिकेवर थोड्याच वेळात सुनावणी होण्याची शक्यता आहे. अभिषेक मनू सिंघवी शिवसेनेची बाजू मांडणार आहेत. मात्र आता घटनातज्ञ जो दावा करत आहेत त्यानुसार राज्यपालांवर संशयाचे ढग अधिक गडद झाले आहेत. विशेष म्हणजे घटना तज्ज्ञांनी दिलेली माहिती लोकशाहीसाठी अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक असल्याची जोरदार टीका समाज माध्यमांवर आणि सामान्य लोकांकडून केली जाऊ लागली आहे.
3 वर्षांपूर्वी -
अजब! स्वतःच राज्य सोडून गुवाहटीला पळाले | आता म्हणतात उद्धव ठाकरेंनी आम्हाला सोडलं
शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना अपात्रता ठरवण्याची मागणी विधानसभा उपाध्यक्षांकडे केली आहे. विधानसभा उपाध्यक्षांनी या प्रकरणी नोटीसही बजावली आहे. या नोटिशीविरोधात शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. त्यावर सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी 11 जुलै रोजी आहे. तर, दुसरीकडे विधानसभा उपाध्यक्षांनी बजावलेल्याा नोटिशीविरोधात आपलं म्हणणं मांडण्यासाठी 12 जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. शिंदे गटाने दाखल केलेल्या याचिकेत अपात्रतेला आव्हान देण्यासह पक्ष विधीमंडळ गटनेता आणि प्रतोदाला मान्यता देण्याचा मुद्दा आहे. तत्पूर्वी दोन्ही बाजूने राजकीय टीकास्त्र सोडलं जातं आहे.
3 वर्षांपूर्वी -
बहुमत सिद्ध करण्याचे आदेश | शिवसेनेच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात संध्याकाळी ५ वाजता सुनावणी
राज्यपाल याच दिवसाचा विचार करत होते. ही कायदेशीर कारवाई आहे. १६ आमदारांच्या निलंबनाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात . ११ तारखेपर्यंत पेंडिंग असल्याने कोणताही निर्णय होऊ शकत नाही. या काळात काही बेकायदेशीर काम झालं तर आमच्याकडे या, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. राज्यपाल भवन आणि भाजप संविधानाची खिल्ली उडवत आहेत. आमचे लोक सर्वोच्च न्यायालयात जाऊन न्याय मागतील, आजही आमचा सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे, असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.
3 वर्षांपूर्वी -
बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर शिवसेनेकडून याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल
राज्यपाल याच दिवसाचा विचार करत होते. ही कायदेशीर कारवाई आहे. १६ आमदारांच्या निलंबनाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात . ११ तारखेपर्यंत पेंडिंग असल्याने कोणताही निर्णय होऊ शकत नाही. या काळात काही बेकायदेशीर काम झालं तर आमच्याकडे या, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. राज्यपाल भवन आणि भाजप संविधानाची खिल्ली उडवत आहेत. आमचे लोक सर्वोच्च न्यायालयात जाऊन न्याय मागतील, आजही आमचा सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे, असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.
3 वर्षांपूर्वी -
उद्या विधानसभेत बहुमत सिद्ध करा | राज्यपालांचा मुख्यमंत्र्यांना आदेश जारी | आता पुढे काय?
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत मोठी बातमी आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे सकार यांनी बहुमत गमावले, असे मानले जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. उद्या (गुरुवारी) बहुमत सिद्ध करा, असे निर्देश राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारला दिले आहेत. त्यामुळे गुरुवारचा दिवस ठाकरे सरकारसाठी निर्णायक ठरणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
कायदेतज्ञांचा सल्ला आणि अनेकांच्या आमदारकी जाण्याची भीती | लवकर फ्लोअर टेस्टच्या मागणीसाठी फडणवीस राजभवनावर
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे काही वेळापूर्वीच राजभवनावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला पोहचले आहेत. उद्धव ठाकरे सरकारविरोधात त्यांच्याच पक्षातल्या आमदारांनी बंड पुकारलं आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या ५१ आमदारांनी बंड पुकारलं आहे तसंच आम्ही पाठिंबा काढणार आहोत असं त्यांनी म्हटलं आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO
-
AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN