महत्वाच्या बातम्या
-
आठवा महिना लागला, पाळणा कधी हालणार? | १२ आमदार नियुक्तीवरून शिवसेनेचा खोचक सवाल
राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांचा प्रश्नावरून सध्या चांगलेच राजकारण तापू लागले आहे. नुकतेच न्यायालयाने कान टोचल्यानंतर राज्यपालांनी सरकारकडून आग्रह धरला जात नसल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या आमदारांच्या नियुक्तीवरून राज्यपालांचे वय झाले असल्याचा टोला लगावला होता. या प्रकरणात आता शिवसेनेनेही राज्यपालांवर बोचरा आणि उपरोधिक निशाणा साधला आहे. सरकारने 12 नावांची शिफारस करून आता आठवा महिना लागला. मात्र राज्यपालांच्या निर्णयाचा पाळणा नक्की कितव्या महिन्यात हलणार आहे? हे राजभवनातील सुईणीने एकदा स्पष्ट करावे, असा टोला शिवसेनेने पक्षाचे मुखपत्र सामनाच्या संपादकीयमधून लगावला आहे.
3 वर्षांपूर्वी -
राज्यातील सामाजिक सांस्कृतिक स्वास्थ्य बिघडवण्यासाठी नागपूर-गुजरातमधून राज ठाकरेंना पुढे केले जातंय - संभाजी ब्रिगेड
महाराष्ट्रामध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून केला जात असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते हर्षल बागल यांनी केला आहे. महाराष्ट्राचे सामाजिक सांस्कृतिक स्वास्थ्य बिघडवण्यासाठी नागपूर आणि गुजरातमधून राज ठाकरे यांना पुढे केले जात आहे.
3 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे नक्की नातू कोणाचे, प्रबोधनकारांचे की पुरंदरेंचे? | संभाजी ब्रिगेडच्या प्रवक्त्याचा धक्कादायक सवाल
महाराष्ट्रामध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून केला जात असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते हर्षल बागल यांनी केला आहे. आगामी निवडणुकीत भाजपशी युती करण्यासाठी राज ठाकरे यांच्याकडून हा प्रयत्न केला जात आहे. पण राज ठाकरे यांनी ठरवलं पाहिजे की इतिहासावर बोलत असताना आपण अभ्यास करून बोललं पाहिजे. त्यामुळे ते बाबासाहेब पुरंदरे यांचे नातू आहेत की प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचे नातू आहेत? असा सवाल देखील संभाजी ब्रिगेड प्रवक्ते हर्षल बागल यांनी केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
राज्यातील बार, मॉल सुरू मग मंदिरे का बंद ? । देवेंद्र फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका
राज्य सरकारकडून मंदिरे का बंद ठेवली जातात, हा प्रश्न आहे. राज्यातील बारमध्ये तसेच मॉलमध्ये जितकी गर्दी होते. त्यापेक्षा कमी गर्दी मंदिरात होते. सुरक्षित अंतर ठेवून मंदिर खुले होऊ शकतात, असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
3 वर्षांपूर्वी -
आक्रमक?। संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते राज ठाकरेंना प्रबोधनकार ठाकरेंची पुस्तकं 'कुरिअर' करणार। थेट जाऊन देणार नाहीत
राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच महाराष्ट्रात जातीय अस्मितेचा मुद्दा मोठा झाल्याचा आरोप केला होता. राज्यात आधीपासूनच जाती होत्या. पण जाती अभिमान बाळगण्यापुरत्याच होत्या. पण गेल्या 20 वर्षापासून चित्रं बदललं. लोक जातीचा अभिमान बाळगण्याबरोबरच इतर जातींचा तिरस्कार करू लागले आहेत. हे सर्व राजकीय स्वार्थातून होत आहे. जातीचा मुद्दा हा तर नेत्यांची आयडेंटीटी होत आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीचा मुद्दा सर्वार्थाने मोठा झाला, असं राज म्हणाले होते.
3 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | पर्यावरण व हवामान बदल विभागात (मुंबई) 20 जागांसाठी भरती | ऑनलाइन अर्ज
पर्यावरण आणि हवामान बदल विभाग भरती 2021. पर्यावरण आणि हवामान बदल विभागाने भरतीची अधिसूचना जारी केली आहे आणि 20 इंटर्नशिप प्रोग्राम पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक अर्जदार ईसीसीडी भरती 2021 साठी 31 ऑगस्ट 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
3 वर्षांपूर्वी -
तेव्हा त्यांच्या कुटुंबात असा कुठलाही वाद दिसला नाही | पण पोलीस आपली कारवाई करतील - शर्मिला ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. तसेच थेट पत्नीने आरोप केल्याने मनसेची मोठी राजकीय अडचण झाली आहे. त्यात गजानन काळे यांच्या अटकेच्या मागणीसाठी पोलीस आयुक्तालयाबाहेर विविध पक्षातील महिला जमा झाल्या आहेत. गजानन काळे यांच्या पत्नी देखील उपस्थित आहेत. काळेंच्या विरोधात त्यांच्याच पत्नीने केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झालेला आहे. मात्र ४ दिवस उलटून देखील अटक झालेली नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
3 वर्षांपूर्वी -
ओबीसींच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा होण्यासाठी पवारांनी या 'तीन' महत्वाच्या गोष्टी स्पष्ट केल्या
नरेंद्र मोदी सरकारने 102वी घटना दुरुस्ती करून राज्यांना ओबीसींची यादी तयार करण्याचे अधिकार दिले. त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. यावेळी ओबीसी आरक्षणावरून पवारांनी भाजपला जोरदार झापतानाच ओबीसींना आरक्षण कसे मिळेल याबाबत मत व्यक्त केलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
१२ आमदारांच्या नियुक्त्या | राज्य सरकारचं पत्र गेलंय, वाढत्या वयामुळे त्यांच्या लक्षात आलं नसेल - शरद पवार
राज्यपालांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व अन्य सदस्यांनी भेटून १२ आमदारांची यादी दिली आहे. त्यांच्या नियुक्त्या लवकरात लवकर व्हाव्यात याबाबत अनेकदा विनंती केली आहे. मात्र सरकार आग्रही नाही असे म्हणणे आश्चर्याचे असल्याचे आमदार रोहित पवार यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या दीर्घकाळ रखडलेल्या नियुक्त्या तत्काळ करा, अशी विनंती काँग्रेस नेते शरद रणपिसे यांनी पुणे दौऱ्यावर आलेल्या राज्यपालांकडे केली.
3 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे यांच्यावर न बोललेलंच बरं | त्यांनी प्रबोधनकारांचे लिखाण वाचावे - शरद पवार
महाराष्ट्रात आधीपासूनच जात ही गोष्ट होती. मात्र स्वजातीचा अभिमान इतपतच ती मर्यादित होती. मात्र मागील २० वर्षांपासून लोक स्वत:च्या जातीच्या अभिमानासोबतच इतरांचा तिरस्कार करण्यापर्यंत पोहोचले आहेत आणि राजकीय स्वार्थातून हे सगळं केलं गेलं आहे. जातीचा मुद्दा हा त्यांच्या त्यांच्या नेत्यांच्या आयडेंटीटीचा भाग झाला आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतरच जातीचा मुद्दा हा सर्वार्थाने मोठा झाला आहे,’ असं राज ठाकरे म्हणले होते.
3 वर्षांपूर्वी -
छोटा शकीलचा भाऊ अन्वरविरोधात गुन्हा दाखल | परमबीरवर एका बिल्डरकडून वसुली केल्याचा आरोप | SIT तपास सुरु
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या खंडणी वसुली प्रकरणात गुन्हे शाखेने तपास सुरू केला आहे. या तपासात अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याचे उघड होत आहे. याच प्रकरणात मुंबई पोलिसांनी कुख्यात गुंड छोटा शकील याचा भाऊ अन्वर याच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. यासोबतच इतर दोन जणांवर वसुलीच्या वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
3 वर्षांपूर्वी -
मिशन महाराष्ट्र | भाजपच्या 'जन आशीर्वाद यात्रे'ला आजपासून सुरुवात | मुंबई-कोंकण ते मराठवाडा
भाजपकडून आजपासून देशभरात ‘जन आशीर्वाद’ यात्रा सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्यांनीही आपल्या ‘जन आशीर्वाद’ यात्रेची सुरुवात केली आहे. पंतप्रधान मोदींनी आतापर्यंत केलेल्या कामांना सामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ही यात्रा भाजपने काढली आहे.
3 वर्षांपूर्वी -
मुंबई आणि कुडाळमध्ये पराभूत झालेल्या नारायण राणेंवर मुंबई महापालिका निवडणुकीची जवाबदारी? | भाजपचं मिशन 114
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन पोहोचल्या आहेत. त्यात मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाकडे कोणताही चेहरा नसल्याचं पाहायला मिळतंय. कारण गुजराती, मारवाडी आणि जैन या पारंपरिक मतदारांपलीकडे मुंबईतील शिवसेनेचा मतदार असलेल्या मराठी, भंडारी ते मालवणी मतदारांपुढे कोणता चेहराच नाही हे स्पष्ट झालं आहे. तसेच फडणवीसांना मुंबईत तास कोणीही चाहता वर्ग नाही. तसेच मुंबईतील भाजपचे बरेच विद्यमान आमदार हे मोदी लाटेवर निवडून आले आहेत आणि ते देखील ट्विटरवर वारंवार ट्विट करत स्वतःच्या बातम्या कशा झळकतील यावर केंद्रित असल्याने जमिनीवर त्यांची कोणतीही ओळख झालेली नाही.
3 वर्षांपूर्वी -
राजकारणात सपशेल अपयशी ठरलेला हा माणूस स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी आता राज्यात संघर्ष उभा करतोय - प्रवीण गायकवाड
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना बाबासाहेब पुरंदरे यांच्यापलीकडे इतिहासाचे आकलन नाही, अशी टीका संभाजी ब्रिगेकडून करण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात अलीकडच्या काळात जातींमधील संघर्ष वाढायला लागल्याचे वक्तव्य केले होते. विशेषत: राष्ट्रवादी काँग्रसेच्या उदयानंतर जातीचा मुद्दा मोठा होत गेला, असा थेट आरोप राज ठाकरे यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून राज ठाकरे यांचा समाचार घेतला.
3 वर्षांपूर्वी -
मंगळवारपासून लोकलच्या ट्रेन धावणार पूर्ण क्षमतेने | कालपासून लसवंतांना लोकल प्रवास सुरु
कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना कालपासून लोकल सेवा सुरू केली आहे. आता लोकलमधून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांमध्ये कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेकडून पूर्ण क्षमतेने लोकल सुरू करण्याचे नियोजन केले आहे.
3 वर्षांपूर्वी -
काही लोक काहीतरी विधान करून लोकांचे लक्ष वेधण्याचे काम करतात, त्यांच्याकडे लोक दुर्लक्ष करतील - जयंत पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासूनच राज्यात जातीयवादी राजकारण वाढल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केली होती. या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले असून, काही लोक काहीतरी बोलून केवळ लोकांचे लक्ष वेधण्याचे काम करीत असतात. त्याकडे राज्यातील लोक दुर्लक्ष करतील, असे मत त्यांनी व्यक्त केले. सांगली येथे ध्वजारोहण कार्यक्रमानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
3 वर्षांपूर्वी -
संजय राठोड प्रकरणात चौकशीअंती वस्तुस्थिती समोर येईल, अनेकदा बिनबुडाचे आरोप होत असतात - अजित पवार
पुण्यात एका तरुणीने आत्महत्या केल्यानंतर मंत्रिपद गमावलेल्या संजय राठोड यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. माजी मंत्री संजय राठोड यांनी शरीरसुखाची मागणी केल्याची तक्रार यवतमाळ पोलिसांकडे दाखल करण्यात आली आहे. इतकच नाही, तर अजूनही तीच मागणी करून छळत असल्याचा आरोपही त्या पीडित ३० वर्षीय महिलेने केला होता.
3 वर्षांपूर्वी -
75 वा स्वातंत्र्यदिन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते ध्वजारोहण | आरोग्य सुविधांसंबंधित माहिती दिली
75 व्या स्वातंत्र्यदिनी आठव्यांदा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राला संबोधित करत आहेत. लाल किल्ल्यावरून मोदी म्हणाले, ’75 व्या स्वातंत्र्यदिनी तुम्हाला आणि भारतावर प्रेम करणाऱ्या आणि जगातील लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या सर्वांना अनेक शुभेच्छा. आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पवित्र पर्वावर देश सर्व स्वातंत्र्य सैनिक आणि राष्ट्राच्या रक्षणासाठी स्वतःचे बलिदान देणाऱ्या शूर वीरांना श्रद्धांजली अर्पण करत आहे.’
3 वर्षांपूर्वी -
१२ आमदारांच्या नियुक्तींसदर्भात राज्यपालांवर अदृश्य दबाव - छगन भुजबळ
आमदारांच्या रखडलेल्या नियुक्तीवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारीवर दबाव असल्याचा आरोप केला आहे. याबाबत राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना पत्रकारांनी विचारले असता, राज्यपालांचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. त्यामुळे ते सकारात्मक निर्णय घेतील. परंतू त्यांच्यावर अदृश्य दबाव असल्याचा टोला लगावत भुजबळांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
3 वर्षांपूर्वी -
मुंबई महानगरपालिका निवडणुक २०२२ | भाजपची जोरदार तयारी | 'समर्थ बूथ अभियाना'साठी विशेष रणनीती
शिवसेनेला कोंडीत पकडायचे असेल तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला धक्का देणे गरजेचे आहे. हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे येणारी महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला भाजप लागलेली आहे. याबाबत विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज एक महत्वाची बैठक आपल्या शासकीय निवासस्थानी बोलावली होती.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल
- Old Vs New Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीतून नव्या टॅक्स प्रणालीकडे कोणी जावे? डिक्लेरेशन पूर्वीच समजून घ्या
- Bank Account Alert | महाराष्ट्रातील या बँकेत तुमचं खातं आहे? आता पैसे काढू शकणार नाही, RBI ने बंदी घातली
- Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल
- Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल
- Penny Stocks | गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे 10 पेनी शेअर्स, अप्पर सर्किट हीट गतीने पैसा वाढतोय
- 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचं टेन्शन वाढवणारी अपडेट, थेट महागाई भत्ता आणि HRA होणार परिणाम
- Bonus Shares | फ्री शेअर्स मिळवा! मल्टिबॅगर शेअरवर मिळतील फ्री बोनस शेअर्स, 1 वर्षात 462 टक्के परतावा दिला
- Amara Raja Share Price | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर खरेदी करा, अवघ्या 5 दिवसात दिला 33 टक्के परतावा