25 April 2024 5:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार? Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्स खरेदीला गर्दी, अवघ्या 4 वर्षात 1 लाख रुपयांवर दिला 21 लाख रुपये परतावा
x

फिल्मी भाजपला पद्म पुरस्कार श्रीदेवी लक्षात, पण पद्म पुरस्कार विजेते रमाकांत आचरेकर सरांचा विसर

मुंबई : भारताला ‘क्रिकेटचा देव’ देणारे आणि जो भविष्यात भारतरत्न झाला, अशा महान सचिन तेंडुलकरचे गुरु आणि पद्म पुरस्कार विजेते द्रोणाचार्य रमांकात आचरेकर सर यांचे बुधवारी वयाच्या ८७ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. शिवाजी पार्क येथील भागोजी कीर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेत मुंबईतील अनेक महान क्रिकेटपटू, जाणकार आणि राजकीय नेते मंडळी उपस्थित होती. भारतरत्न सचिन तेंडुलकरने आपले गुरु आचरेकर सरांच्या पार्थिवाला खांदा दिला. दरम्यान, यावेळी सचिन आणि सरांचे सर्वच शिष्य अत्यंत भावुक झाले होते.

मात्र फडणविस सरकारला आचरेकर सरांच्या कर्तृत्वाचा विसर पडलेला पहायला मिळाला. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी सामान्य प्रशासन विभागाकडे असते. विशेष म्हणजे हा विभाग मुख्यमंत्र्यांच्या अख्त्यारित येतो. मात्र फडणवीस सरकारने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे क्रिकेट प्रेमी नाराजी व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे याच फिल्मी भारतीय जनता पक्षाने बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवी जेव्हा मद्यपान केल्याने दुबईतील एका हॉटेलमध्ये अपघाताने मृत्युमुखी पडली होती. तेव्हा ती पद्म पुरस्कार विजेती असल्याने भारतीय तिरंग्यात तिला लपेटून माध्यमांना मोठा कव्हरेज करण्याचे जणू आदेशच दिले होते.

श्रीदेवीच्या मृत्यूवेळी काही मुद्यांवरून भाजप विरोधात देशभर रान पेटले होते आणि त्यावरून सामान्य लोकांचे मन विचलित करण्यासाठी श्रीदेवीच्या शासकीय इतमामात अंत्यसंस्काराचा मोठा देखावाच केला होता. परंतु, आज जेव्हा इतके महान गुरु, ज्यांना पद्म पुरस्काराने गौरविण्यात आले होते, त्यांचा मात्र भाजपच्या फिल्मी सरकारला विसर पडला आहे, असंच म्हणावं लागेल. रोजच्या प्रमाणे सरकारने केवळ दिलगिरी व्यक्त करून वेळ मारून घेतली आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x