29 March 2024 11:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IFCI Share Price | शेअरची किंमत 39 रुपये! IFCI शेअर चार्ट पॅटर्नमध्ये सकारात्मक वाढीचे संकेत, यापूर्वी 350% परतावा दिला Infosys Share Price | इन्फोसिस शेअरला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, या पातळीवर टिकल्यास अल्पावधीत उच्चांक किंमत स्पर्श करणार Mutual Fund SIP | मार्ग श्रीमंतीचा! या 10 म्युच्युअल फंड SIP दरवर्षी 40% ते 71% परतावा देतं आहेत, सेव्ह करा यादी Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, ही योजना देईल मोठा व्याज दर Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल
x

भाजपची डोकेदुखी वाढणार; या ७ राज्यांमध्ये काँग्रेस करणार प्रादेशिक पक्षांशी आघाडी

नवी दिल्ली : यूपी आणि पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसशी येथील अनुक्रमे बहुजन समाज पार्टी – समाजवादी पार्टी आणि ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसशी आघाडी होण्याची काहीही चिन्हे नसली तरी इतर राज्यांतील प्रादेशिक पक्ष मात्र राष्ट्रीय काँग्रेसशी आघाडी करण्यास तयार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्याविरोधात लढण्यासाठी काँग्रेसने ७ राज्यांत तिथल्या प्रादेशिक पक्षांशी आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रमुख राज्यांमध्ये दक्षिणेतील ४ राज्य ज्यामध्ये तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि केरळ या प्रमुख राज्यांचा समावेश आहे. तर उत्तरेकडून बिहार आणि झारखंडचा समावेश आहे. तर भाजपसाठी महत्वाचा असलेल्या जम्मू-काश्मीरचा समावेश आहे.

या राज्यांतील प्रबळ पक्ष काँग्रेसशी आघाडी करायला पूर्ण तयार असल्याचे समजते. तामिळनाडूतील द्रमुक, आंध्र प्रदेशातील चंद्राबाबू नायडूंचा सत्ताधारी तेलगू देसम, कर्नाटकात जनता दल (सेक्युलर), केरळमधील काही स्थानिक प्रादेशिक पक्ष, बिहारमध्ये लालू यादवांचा आरजेडी तसेच जीतनराम मांझी यांचा हिंदुस्थानी अवाम मोर्चा आणि उपेंद्र कुशवाह यांचा राष्ट्रीय लोक समता पक्ष आणि जम्मू-काश्मीरमध्ये फारुख अब्दुल्ला यांचा नॅशनल कॉन्फरन्स यांची काँग्रेसशी आघाडी झाल्यात जमा आहे.

केवळ त्यांच्यात जागावाटपाची महत्वपूर्ण बोलणी होणे शिल्लक आहे. परंतु, त्यात अडचणी येणार नाहीत, असे राष्ट्रीय काँग्रेसचे म्हणणे आहे. आघाडीतील पक्षांच्या साथीने तब्बल ४०० जागा लढवण्याच काँग्रेसच ध्येय असल्याचे आहे.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x