महत्वाच्या बातम्या
-
अनलॉकनंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ; भारताने इटलीला मागे टाकले
गेल्या २४ तासांमध्ये देशभरात कोरोनाचे ९,८८७ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा २,३६,६५७ इतका झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भारतात प्रत्येक दिवशी कोरोनाचे जवळपास १० हजार नवे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे इटलीला मागे टाकत सर्वाधिक कोरोना रुग्ण असणाऱ्या देशांच्या यादीत भारत सहाव्या क्रमांकावर आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनामुळे ईडी'चं कार्यालय सील; ५ अधिकाऱ्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह
सक्तवसुली संचालनालयातील (ईडी) पाच अधिकाऱ्यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. दिल्लीच्या खान मार्केट परिसरात असलेल्या ‘लोक नायक भवन’ या ईडीच्या मुख्यालयातील पाच अधिकाऱ्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाची लक्षणं असणाऱ्या रुग्णाची नायर रुग्णालयात बाथरूममध्ये आत्महत्या
मुंबईतील नायर रुग्णालयात कोरोनाची लक्षणे असलेल्या ४३ वर्षीय रुग्णाने बाथरूममध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या रुग्णाची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती पण त्याला कोरोनाची लक्षणे दिसत असल्याने त्याला या रुग्णालयात ठेवले होते.
5 वर्षांपूर्वी -
कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून एकदा तरी कार्यालयात हजर रहावं, अन्यथा पगार कपात
चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसचा भारतातही फटका बसला आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या २ लाखांच्या वर पोहचली आहे. यात सर्वाधिक कोरोनाग्रस्त महाराष्ट्रात आहे. कोविड १९ चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सरकारकडून लॉकडाऊन सुरु करण्यात आलं. गेल्या २ महिन्यापासून लॉकडाऊन असल्याने अनेक व्यवसाय ठप्प पडले, तसेच शासकीय कार्यालयही ओस पडले.
5 वर्षांपूर्वी -
ठाकरे सरकारला कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी कर्ज घ्यावे लागणार
लॉकडाऊनमुळे महसूल आटल्याने राज्य सरकारला कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी कर्ज घ्यावे लागणार आहे. सरकारने यापूर्वीच विकासकामांवरील खर्चात ६७ टक्के कपात करुन आर्थिक ताळमेळ साधण्याचा प्रयत्न केला होता. परंतु उत्पन्नाचे स्रोतच आटल्याने वेतन आणि निवृत्ती वेतन देण्यासाठी सरकारला जवळपास ९ हजार कोटींचे कर्ज घ्यावे लागणार आहे. मागच्या महिन्यातही सरकारने वेतन देण्यासाठी नऊ हजार कोटींचे कर्ज उचलले होते. दर महिन्याला कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी सरकारला १२ हजार कोटी रुपये खर्च करावे लागतात.
5 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर शिवसेना शाखेचे क्लिनिकमध्ये रूपांतर होण्यास सुरुवात
राज्यात आज १३५२ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत ३३ हजार ६८१ जण पूर्णपणे बरे झालेले आहेत. तसंच आज नव्या २९३३ रुग्णांची भर पडली व १२३ जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ७७ हजार ७९३ इतकी झाली आहे. तर सध्या ४१ हजार ३९३ एक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारच्या तिजोरीत खडखडाट; नव्या योजनांना १ वर्षासाठी स्थगिती
कोरोनाच्या संकटकाळात अर्थव्यस्थेला मोठा फटका बसला आहे. यासाठी अर्थव्यस्था पुन्हा स्थिरावण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुढील एक वर्षासाठी नव्या योजनांना स्थगिती देण्यात आली आहे. तसंच त्यावर होणाऱ्या खर्चावर देखील रोख लावण्यात आला आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आलेल्या नव्या योजना थेट ३१ मार्च २०२१ पर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
माझा वरचा नंबर येण्यापेक्षा महाराष्ट्र जगभरात पहिल्या क्रमांकाचे राज्य करणं हेच ध्येय
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या कित्येक वर्षांपासून सक्रिय असणाऱ्या आणि या राज्याचं मुख्यमंत्रीपद भुषवणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. शिवसेना या पक्षासोबतत आव्हानाच्या प्रसंगात राज्याची धुराही तितक्चाय संयमानं आणि जबाबदारीनं सांभाळणाऱ्या उद्धव ठाकरे यांना जनतेची साथ आणि अर्थातच जनतेचं प्रेमही मिळालं.
5 वर्षांपूर्वी -
वडिलांच्या अंत्यदर्शनासाठी डॉक्टरांनी मुलीला मोजून ३ मिनिटं दिली
देशात कोरोनामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण २.८२ टक्के आहे. कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मुलीला अंत्यदर्शनासाठी केवळ ३ मिनिटांचा अवधी देण्यात आला होता. यावेळी डॉक्टरांची नजर घडाळ्यावर होती. तिसरा मिनिट पूर्ण होताच मुलीला घेऊन जाण्यात आलं. ही धक्कादायक घटना मणिपूर इथे घडली आहे.
5 वर्षांपूर्वी -
इस्त्राईलला प्रयोग अंगलट; शाळेतील २६१ मुलांना कोरोना, ६८०० मुलं क्वारंटाईन
इस्त्राईलने कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवलं आहे. त्यामुळेच मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा निर्णय देशाला महागात पडला आहे. शाळेतील तब्बल २६१ मुलं आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर जवळपास ६८०० मुलांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
अनलॉक १.० : हॉटेल, रेस्टॉरंटसाठी केंद्र सरकारची नियमावली जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं लॉकडाउनचा निर्णय घेतला होता. तब्बल दोन महिन्यांनंतर लॉकडाउन शिथिल करण्यास सुरूवात झाली आहे. केंद्र सरकारनं धार्मिक स्थळं, मॉल, हॉटेल खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी काही नियम व अटी सरकारकडून घालण्यात आल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
अनलॉक १.०: मंदिर आणि धार्मिक स्थळांसाठी केंद्राची नवी नियमावली
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं लॉकडाउनचा निर्णय घेतला होता. तब्बल दोन महिन्यांनंतर लॉकडाउन शिथिल करण्यास सुरूवात झाली आहे. केंद्र सरकारनं धार्मिक स्थळं, मॉल, हॉटेल खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी काही नियम व अटी सरकारकडून घालण्यात आल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
अनलॉक सहज घेऊ नका, आज देशात ९ हजारांपेक्षा जास्त नवे कोरोनाबाधित
लॉकडाउनचा पाचवा टप्पा आणखी शिथिल केला जात असतानाच सलग दुसऱ्या दिवशी नऊ हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण जाले आहे. गुरूवारी देशभरात ९,३०४ नव्या रुग्णांची भर पडली होती. तर गेल्या चोवीस तासांमध्ये ९,८५१ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २ लाख २६ हजार ७७० इतकी झाली आहे. सर्वाधिक कोरोना रुग्णांच्या संख्या क्रमांकात भारत जगातील सातव्या क्रमांकाचा देश आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात २९३३ नवे कोरोना रुग्ण, तर १२३ रुग्णांचा मृत्यू
राज्यात आज १३५२ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत ३३ हजार ६८१ जण पूर्णपणे बरे झालेले आहेत. तसंच आज नव्या २९३३ रुग्णांची भर पडली व १२३ जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ७७ हजार ७९३ इतकी झाली आहे. तर सध्या ४१ हजार ३९३ एक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
तबलिगी जमातच्या २५५० परदेशी सदस्यांना १० वर्षांसाठी भारत प्रवेशास बंदी
दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी जमातच्या २५५० परदेशी सदस्यांना काळ्या यादीत टाकण्यात आलं आहे. या सर्वांवर १० वर्षांसाठी भारतात प्रवेश करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. याआधीदेखील तबलिगी मर्कझमधील धार्मिक कार्यक्रमांत मार्च महिन्यात सहभागी झालेल्या परदेशी नागरिकांनी व्हिसा शर्तीचे उल्लंघन केल्याने त्यांना काळ्या यादीत टाकण्यात आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
प्रतिदिन १०,००० कोरोना चाचण्यांची क्षमता, मग फक्त ३५००-४००० चाचण्या का? फडणवीस
कोरोनाच्या चाचण्या मुंबईत कमी होत असून त्या वाढल्या पाहिजेत. राज्यात मृत्यूसंख्येत सातत्याने होत असलेली वाढ तसेच मृत्यू प्रमाणपत्रात नैसर्गिक अथवा अन्य कारण नमूद करून अंत्यविधीसाठी मृतदेह दिले जात असल्याने धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे चाचण्यांचा वेगवाढवला तरच आपली कोरोनाच्या वादळापासून सुटका होईल, असे पत्र माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.
5 वर्षांपूर्वी -
होय कोरोना वाढतोय, 'हि' तयारी करावी लागणार; मोदी सरकारची सुप्रीम कोर्टात कबुली
केंद्र सरकारने गुरुवारी कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टात शपथपत्र सादर केले. यात, ‘देशातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत देशात मोठ्या प्रमाणावर मेकशिफ्ट हॉस्पिटल्स तयार करावे लागतील,’ अशी कबूली केंद्र सरकारने दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
खासगी कार्यालयं सुरु करण्यास परवानगी, येथे पासशिवाय प्रवास करता येणार - सविस्तर
कोरोना लॉकडाऊनमध्ये पुनश्च हरीओम म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारच्या ‘मिशन बिगीन अगेन’ची घोषणा केली. या मिशन बिगीन अगेनबाबत जारी केलेल्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. मुंबई महानगर प्रदेश म्हणजे मुंबई शहर आणि आजुबाजूच्या महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये प्रवासासाठी लॉकडाऊनमध्ये घातलेले निर्बंध सरकारने उठवले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाबाधित रुग्णाला एकच दिवस क्वारंटाइन ठेवलं; जमावाची मुख्याधिकाऱ्यावर चप्पलफेक
मुरगूड शहरात काल बुधवारी सापडलेला पहिला कोरोना बाधित २० वर्षीय रुग्ण हा प्रशासनाने कागदोपत्री संस्थात्मक क्वारंटाईन दाखवला आहे. पण प्रत्यक्षात हा रुग्ण केवळ एकच दिवस कन्या विद्यामंदिर या शाळेमध्ये क्वारंटाईन असल्याचे पुरावे देत नागरिकांनी आज नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना पालिकेत जाऊन घेराव घातला.
5 वर्षांपूर्वी -
बीकेसीतील कोविड केअर सेंटरच्या दूरवस्थेवरून मुंबई पालिकेचा खुलासा
निसर्ग चक्रीवदाळासोबतच काल अफवांचंही वादळ उठलं होतं. काल दिवसभरात अनेक अफवा पसरल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे अफवांचं वादळ शमवता आलं. त्याचप्रमाणे बीकेसी येथे बांधण्यात आलेल्या कोविड केअर्स सेंटर रुग्णालयाचे नुकसान झाल्याची माहिती सोशल मीडियातून पसरली होती. मात्र ही माहिती खोटी असल्याचा खुलासा मुंबई महापालिकेने ट्विटरद्वारे केला आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर रेल्वे स्टॉक मालामाल करणार, शॉर्ट टर्म अपसाईड टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC