महत्वाच्या बातम्या
-
२०२०-२१ मध्ये देशाचा जीडीपी थेट शून्याखाली जाण्याचा अंदाज - आरबीआय
कोरोनाच्या संकटाचा परिणाम जगभरातील आर्थिक घडामोडींवर झाला आहे. कोरोनामुळे जगभरातील अर्थव्यस्थेचं मोठं नुकसान झालं आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात तसंच रिव्हर्स रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. रेपो दरात ४० बेसिस पॉईंट्सची कपात करण्यात आल्याची माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी दिली.
4 वर्षांपूर्वी -
कोविड १९ डॅशबोर्ड मान्यतेसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, गृहमंत्र्यांना महाराष्ट्रनामाची विनंती
केवळ महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण जगभरात कोरोना आपत्तीने थैमान घातलं आहे. देशाचा विचार करता सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णसंख्या असून त्यात दिवसेंदिवस वाढ होतं आहे. मात्र सध्याच्या घडीला सर्वात मोठी अडचण म्हणजे सामान्य माणसाला राज्यभरात किती आयसोलेशन सेंटर्स आहेत, बेड्सची संख्या किती, किती बेड्स व्यापलेले आणि किती शिल्लक, कोरोना केअर सेंटरचा पत्ता, फॅसिलिटी कोड कोणता, ऑक्सिजन आणि वेल्टीलिटर उपलब्धता, कोरोना टेस्ट लॅब, संबंधित लॅब मध्ये कोणत्या प्रकारची टेस्ट ICMR ने मान्य केली आहे, याबाबद्दल एका क्लिकवर कोणतीही माहिती सामान्य लोकांना आज प्राप्त होतं नाही.
4 वर्षांपूर्वी -
माणूस म्हणून कोणालाही हिणवण्याचा अधिकार नाही, तृतीयपंथी सुद्धा माणूसच - प्रकाश आंबेडकर
गुंडगिरी प्रवृत्तीची माणसं जेव्हा राजकारणात येतात तेव्हा त्यांना सामाजिक भान राहत नाही, असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी निलेश राणे यांना खडे बोल सुनावले आहेत. माणूस म्हणून कोणालाही हिणवण्याचा अधिकार नाही. तृतीयपंथी हे देखील माणूसच आहेत, त्यांचाही स्वीकार केला गेला पाहिजे. राजकीय नेतेमंडळींना तरी किमान याचं भान असावं अशा शब्दांत आंबेडकर यांनी निलेश राणे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर त्यांचा खरपूस समाचार घेतला.
4 वर्षांपूर्वी -
जिथे नातेवाईक मृतदेहाजवळ जातं नाहीत, तिथे तिने ६ मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले
महाराष्ट्रात अक्षरश: थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे एकाच दिवशी तीन पोलिस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. मृत पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये एक पुणे येथील तर दोन मुंबईतील आहेत.
4 वर्षांपूर्वी -
दुःखद बातमी! कोरोनामुळे एकाच दिवशी पोलिस दलातील ३ अधिकाऱ्यांचा मृत्यू
सध्या महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. देशभरात राज्याचा कोरोनाच्या रुग्णसंख्येत पहिला क्रमांक आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राज्यापेक्षा महाराष्ट्रात तिप्पट रुग्ण आहेत. तरीही रुग्ण बरं होण्याचं प्रमाण वाढत आहे, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणता येईल. बुधवारी संध्याकाळी राज्याच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीत राज्यात दिवसभरात ६५ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं.
4 वर्षांपूर्वी -
लॉकडाउन: देशांतर्गत हवाई प्रवासाचे आत नवे नियम
कोरोनानं जगभरात थैमान घातलेलं असून, भारताला त्याचा फटका बसला आहे. कोरोनाच्या संकटापायी देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू असून, सर्वच उद्योगधंदे ठप्प आहेत. रेल्वे आणि विमानसेवाही बंद आहे. पण केंद्र सरकारनं आता २५ मेपासून देशांतर्गत उड्डाणे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व खबरदारी घेत विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) गुरुवारी प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
चिंता वाढली: ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाला कोरोना लस चाचणीत अपयश
जगभरात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ५० लाखांवर पोहोचली आहे. आता संपूर्ण जगात कोरोनाने ५० लाख ३८ लोकांना संक्रमित केलं आहे. ज्यामध्ये ३ लाख २८ हजार १७२ लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत आहेत. आतापर्यंत येथे १५.५ लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
देशात कोरोना रुग्णांचा आकडा १.१२ लाखाच्या वर, तर ५,६०९ नवे रुग्ण
जगभरात कोव्हिड १९ मुळे कोट्यवधी लोकांच्या मृत्यूनंतरही कोरोना विषाणूचा नाश होण्याची चिन्ह नाहीत. भारतातही कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी आता लॉकडाउनचे चार टप्पे लागू करण्यात आले आहेत, परंतु तरीदेखील रुग्णांची संख्या वाढतच आहे. देशातील कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या एक लाखांच्या पुढे गेली असून जगभरात ती ११ व्या स्थानावर आहे.
4 वर्षांपूर्वी -
प्रसिद्ध लोककलावंत आणि ‘नवरी नटली’ फेम छगन चौगुले यांचं कोरोनामुळे निधन
प्रसिद्ध लोककलावंत आणि नवरी नटली फेम छगन चौगुले यांचं गुरुवारी निधन झालं. कोरोनाची लागण झाल्याने त्यांना मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. उपचार सुरू असतांनाच छगन चौगुले यांनी अखेरचा श्वास घेतला.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात आज २२५० नवे रुग्ण; कोरोना रुग्णांचा आकडा ३९,२९७ वर
सध्या महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. देशभरात राज्याचा कोरोनाच्या रुग्णसंख्येत पहिला क्रमांक आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राज्यापेक्षा महाराष्ट्रात तिप्पट रुग्ण आहेत. तरीही रुग्ण बरं होण्याचं प्रमाण वाढत आहे, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणता येईल. बुधवारी संध्याकाळी राज्याच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीत राज्यात दिवसभरात ६५ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं.
4 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांकडून आयसोलेशन केंद्राला भेटी; तरी चंद्रकांतदादा म्हणतात त्यांनी स्वतःला घरी क्वारंटाइन केलंय
कोरोना संसर्गनिवारणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अपयशी ठरले आहेत. त्यांनी एक नव्हे दुहेरी पीपीई किट घालून संकटाशी मुकाबला करण्यासाठी बाहेर पडले पाहिजे. गेली दोन महिने त्यांनी स्वतःला ‘मातोश्री’मध्ये क्वारंटाइन करून घेतले आहे, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी येथे केली. दीर्घकाळ कोल्हापूर जिल्ह्यात आले नसल्याने टीका करणारे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरही चंद्रकांत पाटील यांनी टीका केली.
4 वर्षांपूर्वी -
रुग्णालयातील बेड्सची माहिती मिळत नसल्याने कोरोनाबाधित त्रस्त...सविस्तर
१९ मे रोजी वडाळ्यातल्या एका एसआरएच्या इमारतीत राहणारी व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आली. त्यानंतर त्या व्यक्तीला सोमय्या रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तिथे बेड उपलब्ध नव्हते. संबंधित रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात नेण्याऐवजी त्याला घरी सोडण्यात आलं. रुग्णाच्या शेजाऱ्यांनी क्वांरिटन करण्याच्या सूचनादेखील दिल्या गेल्या नाहीत. त्यांची कोणतीही चाचणी घेण्यात आली नाही. एखादी व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्यास किमान ती राहत असलेला मजला सील केला जावा, असं नियम सांगतो. मात्र पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी एकही नियम पाळला नाही.
4 वर्षांपूर्वी -
हवं तर बसवर भाजपाचा झेंडा लावा, पण मजुरांसाठी 'त्या' बसेस सोडा' - प्रियांका गांधी
उत्तर प्रदेशात सध्या स्थलांतरित मजुरांना गावी परतण्यासाठी सोडण्यात येणाऱ्या बसेसच्या मुद्द्यावरून प्रचंड राजकारण रंगले आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आणि योगी सरकारमध्ये ‘लेटरवॉर’ सुरु आहे. दोन्ही बाजूंनी परस्परांवर कुरघोडी करणारी पत्रे पाठवली जात आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशातील राजकारण चांगलेच तापले आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना रुग्णाच्या मृतदेहातील व्हायरस बद्दल ICMR' कडून महत्त्वाचा खुलासा
सध्या देशात करोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये करोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात नव्या ५ हजार ६११ रूग्णांची नोंद करण्यात आली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार करोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकू संख्या आता ३ हजार ३०३ वर पोहोचली आहे.
4 वर्षांपूर्वी -
महाचक्रीवादळ अम्फनने रौद्र रूप धारण केले; पश्चिम बंगाल आणि ओडिशा सतर्क
महाचक्रीवादळ अम्फनने रौद्र रूप धारण केले असून मंगळवारी दुपारी ते पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनाऱ्याकडे सरकल्याने लाखो लोकांना धोक्याच्या ठिकाणांहून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
भारताला डब्ल्यूएचओ'मध्ये ३ वर्षांसाठी कार्यकारी अध्यक्षपद
कोरोनाच्या लढाईत भारताने केलेल्या कामाचं कौतुक जागतिक स्तरावर केलं जात आहे. भारतानं कोरोनाला रोखण्यासाठी उचलेल्या पावलामुळे जगालाही मदत झाली आहे. याचेच फलित म्हणून केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी जागतिक आरोग्य संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं आहे. हर्षवर्धन २२ मे रोजी पदभार स्वीकारणार असल्याची माहिती मिळते.
4 वर्षांपूर्वी -
बीडच्या कंटेन्मेंट झोनमध्ये भाजप आमदाराचा लोकांशी संवाद; गुन्हा दाखल
महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तर दुसरीकडे बीडमध्येही कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. शहरात तणावपूर्ण वातावरण असताना भाजपचे आमदार सुरेश धस यांनी कंटेन्मेंट झोनमध्ये प्रवेश केला होता. या प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्य सरकारकडून नवीन नियमावली; मॉल्स, दुकानं, मैदानं, रिक्षा-टॅक्सीबाबत हे नियम
देशातील कोरोनाबाधित रुग्णाने लाखाची संख्या ओलांडली आहे. आरोग्य मंत्र्यालयाने सकाळी दिलेल्या माहितीनुसार देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या एक लाख एक हजार १३९ झाली आहे. मागील २४ तासांत ४९७० नवीन करोनाग्रस्त आढळले तर १३४ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठ दिवसातील कोरोनाग्रस्त विदेशातून आलेले किंवा मुंबईसारख्या मोठ्या शहरातून गाव-खेड्यात पोहलले रूग्ण आहेत. स्थलांतरामुळे शहरातील कोरोना गाव खेड्यात पोहचल्याचे चित्र आहे.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रनामा इफेक्ट: मरोळ PTS'मध्ये मुंबई पोलिसांसाठी विशेष कोरोना उपचार केंद्र
राज्यात सोमवारी करोनाचे आणखी २,०३३ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील करोनाबाधितांची संख्या ३५,०५८ वर पोहोचली. राज्यात सोमवारी ५१ करोनाग्रस्तांचा मृत्यू झाला असून, मृतांची संख्या १,२४९ वर पोहोचली. राज्यभरात आतापर्यंत ८,४३७ रुग्ण बरे झाले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनाचा फैलाव रोखण्यात सरकार अपयशी; भाजपचं शिष्टमंडळ राज्यपालांकडे
कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊनची चौथ्या टप्प्यातील अंमलबजावणी सुरू झाली आहे. मात्र असे असले तरी राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा वेगाने वाढत आहे. सोमवारी रात्रीपर्यंत राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ३५ हजारांच्यावर पोहोचला आहे. दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर आज भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. यावेळी राज्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप या शिष्टमंडळाने केला.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mastek Share Price | 40 रुपयाच्या शेअरची कमाल! तब्बल 4000 टक्के परतावा दिला, आता एका दिवसात 20% वाढला
- Gold Rate Today | बापरे! लग्नासराईच्या दिवसातही सोनं खरेदी करणं परवडणार नाही, लवकरच 1 लाख रुपये तोळा होणार
- Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा
- Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Numerology Horoscope | 17 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
- Infosys Share Price | भरवशाचा इन्फोसिस शेअर उसळी घेणार, दिग्गज ब्रोकिंग तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर
- Stocks in Focus | मार्ग श्रीमंतीचा! हे टॉप 5 बँकिंग शेअर्स तुम्हाला अल्पावधीत 38 टक्केपर्यंत परतावा देतील, संधी सोडू नका
- Reliance Power Share Price | अवघ्या 4 वर्षात 2325 टक्के परतावा दिला, शेअर प्राईस 26 रुपये, पुढे तेजी येणार का?
- Numerology Horoscope | 16 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल
- KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल