2 May 2025 1:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Suzlon Share Price | स्वस्त आणि मस्त शेअर, खरेदी करून होल्ड करून ठेवा, संयम आयुष्य बदलू शकतं - NSE: SUZLON Rattan Power Share Price | 10 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, मिळेल मजबूत अपसाईड परतावा - NSE: RTNPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा
x

ना भेट, ना शब्द, उद्धव ठाकरे किती असंवेदनशील आहेत ते आज मुंबईकरांनी पाहिलं

Shivsena, BJP Maharashtra, uddhav thackeray, aditya thackeray, vishwanath mahadeshwar, bmc, csmt, cst

मुंबई : मुंबई महापालिका ते दिल्लीत खुर्च्या उबवणाऱ्या शिवसेना नेत्यांची तसेच उद्धव ठाकरे यांची मुंबई शहर आणि मुंबईकरांप्रती असलेली असंवेदनशीलता आज अधोरेखित झाली आहे. मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनल येथील पादचारी पूल काल रात्री कोसळून अनेकजण मृत्युमुखी पडले आणि जखमी देखील झाले. परंतु, मुंबई महापालिकेत सत्तेत असून देखील उद्धव ठाकरे यांनी चकार शब्द देखील काढला नाही, ना जागेची पाहणी केली, ना मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली, ना जखमी झालेल्यांची विचारपूस केली.

मुंबईमध्ये राहणाऱ्या उद्धव ठाकरेंकडे त्यासाठी वेळ नसला तरी ते स्वबळावर अमरावतीला जाऊन भाजप-सेनेच्या एकत्र युती मेळाव्यात मोठं मोठी फुसकी भाषणबाजी करून आले. मुंबई महापालिकेत मलिदा मिळण्याचं साधन असलेल्या स्थायी समितीतील नियुक्त्यांच्या वेळी उद्धव ठाकरे जसे जागृत दिसतात, तसे कालच्या दुर्घटनेनंतर दिसले नाहीत. मुंबई शहरात वेगळ्याच गंभीर समस्या उद्भवलेल्या असताना उद्धव ठाकरे मात्र अमरावतीत तेच नेहमीचं हिंदू, भगवा आणि लोकांसाठी युती केल्याची फुसकी आणि कंटाळवाणी भाषणं ठोकत होते.

उद्धव ठाकरे सध्या लोकसभेच्या जागा आणि वाटण्या यामध्ये इतके बुडाले आहेत कि सध्या त्यांना काहीच दिसत नाही किंवा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रकरण सत्ताधारी शिवसेनेवर शेकू नये म्हणून आंधळे पानाचं नाटक करत आहेत, असंच म्हणावं लागेल. ५ वर्ष भाजप विरुद्ध रटाळ आणि फुसकी भाषणबाजी करणाऱ्या उद्धव ठाकरेंची सध्या लोकसभेच्या निमित्ताने आणि सत्तेच्या हव्यासापोटी भाजपसोबत सुरु झालेली साखर पेरणी त्यांची विश्वासाहर्ता संपुष्टात आणत आहे याच त्यांना अजिबात भान नसल्याचं सध्याचं वातावरण सांगत आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या