अंधेरी पूर्व पोटनिवणुकीत शिंदे गटाकडे उमेदवार नसल्याचं स्पष्ट होतंय, म्हणजे सेनेचं चिन्ह गोठवण्याचा घाट भाजपसाठी?
Andheri East By Poll Assembly Election | अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार ऋतुजा लटके असणार आहेत. त्या उद्या (शुक्रवारी) सकाळी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज भरणार आहेत. तर बाळासाहेबांची शिवसेना-भाजप युतीमध्ये या जागेवर भाजप उमेदवार मुरजी पटेल देणार हेही जवळपास निश्चित झालं आहे.
ऋतुजा लटके यांच्याविरोधात भाजप मुरजी पटेल यांना उमेदवारी देणार असल्याची आतापर्यंत चर्चा होती. मात्र भाजपच्या वतीने तशी अधिकृत घोषणा झालेली नाही. तर शिंदे गट ऋतुजा लटके यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत होता, असा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात येत आहे. त्यामुळेच ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यात अडथळे निर्माण करण्यात आले, असा आरोपही उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आला. मात्र हायकोर्टाने ठाकरे गटाला दिलासा दिल्यानंतर आता शिंदे गट नेमकं काय करणार याची उत्सुकता होती.
शिंदे गटाकडे उमेदवारचं नाही :
शिंदे गटाकडे उमेदवारचं नसल्यानं त्यांनी ही जागा भाजपला सोडली आहे. शिंदे गटाचे नेते ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र त्या अखेरपर्यंत ठाकरे गटाकडून निवडणूक लढण्यावर ठाम राहिल्या. त्यानंतर शिंदे गटातून मुरजी पटेल यांनाच उमेदवारी देता येते का? याचीही चाचपणी केली. मात्र त्यातही फारसी यश आलं नाही. त्यामुळे अखेर शिंदे गटाने अंधेरीची जागा भाजपला सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचीही माहिती आहे.
आमच्यासाठी मुख्यमंत्रीपद सोडलं :
यावर दीपक केसरकर म्हणाले, जो उमेदवार असेल तो महायुतीचा उमेदवार असणार आहे. पण ती जागा कोण लढवणार याबाबतचा निर्णय शिंदे – फडणवीस साहेब एकत्र बसून घेतील. उद्या सकाळी युतीच्या उमेदवाराचा अर्ज दाखल करु. आमच्यामध्ये कधीही भेदभाव राहिलेला नाही. आमच्यासाठी भाजपने मुख्यमंत्रीपद सोडलं, त्यामुळे उद्या कदाचित ती जागा भाजपला सोडली तर गेली तर खूप मोठं काही झालं असं सुद्धा उद्या विरोधकांची बोलण्याची तयारी असणार आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Andheri East By Poll Assembly Election Shinde Camp do not have candidate 13 October 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील 1 वर्षात दिला 1700 टक्के परतावा
- Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- IREDA Share Price | PSU IREDA शेअर्स श्रीमंत करू शकतात, अवघ्या 5 महिन्यात दिला 440% परतावा, खरेदी करणार?
- Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
- RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत सरकारात्मक अपडेट आली, शेअर सुसाट तेजीत धावणार, पुन्हा मल्टिबॅगर?
- IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या
- Numerology Horoscope | 01 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
- Vesuvius Share Price | अल्पावधीत 400% परतावा देणाऱ्या शेअरची एकदिवसात 15% उसळी, खरेदीला ऑनलाईन गर्दी
- Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल
- 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार?