15 May 2024 9:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 16 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांकडून टाटा पॉवर शेअर्ससाठी 'बाय' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस केली जाहीर
x

Tomato Price Hike | देशाच्या अर्थमंत्री टोमॅटो खातात का? टोमॅटोच्या वाढत्या किमतीला उत्तर देऊ शकाल का? - प्रियांका चतुर्वेदी

Tomato Price Hike

Tomato Price Hike | टोमॅटोच्या वाढत्या किमतींमुळे विरोधी पक्षनेत्यांनी अर्थमंत्र्यांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी टोमॅटोच्या किमतीवरून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रियांका चतुर्वेदी यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले की, ‘या देशाचे अर्थमंत्री टोमॅटो खातात का? टोमॅटोच्या वाढत्या किमतीला त्या उत्तर देऊ शकतील का?

संसदेत केलं होते हे विधान
खरं तर शिवसेना नेत्याचे हे ट्विट म्हणजे निर्मला सीतारामन यांना लगावलेला टोला हा आधीच्या घटनेशी संबंधित आणि उपहासात्मक आहे. झालं असं की, २०१९ मध्ये सभागृहाच्या हिवाळी अधिवेशनात कांद्याच्या वाढत्या किमतीवरून गदारोळ झाला होता. याबाबत विरोधकांनी अर्थमंत्र्यांना प्रश्न विचारला असता त्या म्हणालय होत्या की, त्या अशा कुटुंबातून येतात जिथे कांदा-लसूण फारसे खाल्ले जात नाही. त्या म्हणालय होत्या की, माझ्या कुटुंबात कांदा-लसूण फारसा वापरला जात नाही. त्यामुळे माझी काळजी करू नका. त्याच विषयाला अनुसरून खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी निर्मला सीतारामन यांच्यावर निशाणा साधला आहे की, त्यांनी कांदा खाल्ला नाही, त्यामुळे त्यांनी त्यावर उत्तर दिले नाही. आता टोमॅटोचे भाव वाढत आहेत, आता टोमॅटो खाता की नाही?

देशात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून महागाईने इतिहास रचला असून सामान्य लोकांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या भाज्या खरेदी करताना सुद्धा दमछाक होतं असून त्यासाठी प्रचंड पैसा खर्च करावा लागतोय. महिना १०-२० हजार रुपये पगार असणाऱ्यांना तर जगणं नकोसं झालं आहे. भारतातील बहुतांश बाजारपेठांमध्ये पूर्वी १० ते २० रुपये किलो दराने मिळणाऱ्या टोमॅटोचे दर आता १०० रुपयांच्या पुढे गेले आहेत. दुसरीकडे घाऊक बाजारात टोमॅटो ६५ ते ७० रुपये किलोने विकला जात होता, तर आठवडाभरापूर्वी ३० ते ३५ रुपये किलोने विकला जात होता. त्याचप्रमाणे किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर ४० ते ५० रुपये किलोच्या आसपास होते. म्हणजे टोमॅटोचे दर दुप्पट झाले आहेत.

टोमॅटोचे दर वाढले!
दिल्लीत टोमॅटो ७० ते १०० रुपये किलो, तर मध्य प्रदेशच्या बाजारात टोमॅटो ८० ते १०० रुपये किलोने विकला जात आहे. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशात टोमॅटो ८० ते १०० रुपये, राजस्थानमध्ये ९० ते ११० रुपये आणि पंजाबमध्ये ६० ते ८० रुपये दराने विकला जात आहे.

News Title : Tomato Price Hike MP Priyanka Chaturwvedi check details on 27 June 2023.

हॅशटॅग्स

#Tomato Price Hike(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x