1 May 2024 2:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Birlasoft Share Price | मालामाल होण्याची संधी! 633% परतावा देणारा शेअर चर्चेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट आली Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत तज्ज्ञांकडून महत्वाचा अपडेट, स्टॉक Hold करावा की Sell करावा? RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत सरकारात्मक अपडेट आली, शेअर सुसाट तेजीत धावणार, पुन्हा मल्टिबॅगर? Tata Motors Share Price | 1 वर्षात पैसे दुप्पट झाले, आता टाटा मोटर्स कंपनीबाबत अपडेट आली, शेअरला किती फायदा? Nippon India Mutual Fund | महिना SIP बचतीतून करोडमध्ये परतावा देत आहेत 'या' 8 योजना, पैशाने पैसा वाढवा Penny Stocks | गरीब सुद्धा खरेदी करू शकतील हे 2 रुपये ते 9 रुपये किमतीचे 10 पेनी शेअर्स, अल्पावधीत मोठा परतावा JP Power Share Price | शेअर प्राईस 19 रुपये! जयप्रकाश पॉवर शेअर पुन्हा 'पॉवर' दाखवणार, स्टॉक खरेदीला गर्दी
x

अजब उत्तर! मुंबईत पाणी तुंबलं नाही तर साचलं: महापौर विश्वनाथ महाडेश्वर

Shivsena, Mumbai Rain, Uddhav Thackeray

मुंबई : पावसाळ्यापूर्वी १०० टक्के नालेसफाई झाली असल्याचं स्पष्ट करणाऱ्या शिवसेनाप्रणित मुंबई महागरपालिकेची पावसाळा सुरु होताच पोलखोल झाली आहे. मुंबईमध्ये पावसाला सुरुवात होऊन २-३ दिवस झाले नसताना देखील काल रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मूंबईतील अनेक भाग पूर्णपणे जलमय झाल्याचं वृत्त आहे आणि त्यासंबंधित व्हिडिओ देखील स्वतः सामान्य नागरिकच समाज माध्यमांवर शेअर करून संतप्त भावना व्यक्त करत आहेत.

दरम्यान, आज मुंबईत प्रवासादरम्यान प्रसार माध्यमांनी मुंबई महानगरपालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना याविषयी प्रश्न विचारले असता त्यांनी हा दावा पूर्णपणे व कॅमेरा अमान्य केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यांनी थेट तुंबलं आणि साचलं यातील फरक स्पष्ट करण्याचा पाढाच वाचण्यास सुरुवात केली. त्यांच्या म्हणण्यानुसार मुंबईत सर्वकाही सुरळीत असून वाहतूक सेवा देखील उत्तम असून, सामान्य मुंबईकरांचे दैनंदिन व्यवहार देखील रोजच्या प्रमाणे सुरु असल्याचं म्हटलं आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी संपूर्ण नालेसफाई झाल्याने कोणत्याही समस्या उद्भवणार नसल्याचा दावा यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना केला.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक फलदायी ठरू शकतील अशा विषयांवर पत्रकार परिषदा आयोजित करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या या विषयावर समोर आलेले नाहीत. कदाचित पाऊस पूर्णपणे थांबल्यावर आणि परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर ते कॅमेरासमोर येतील जसं ते प्रत्येक पावसाळ्यात करतात. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी मुंबई शहरातील नालेसफाईची कामं १००% टक्के झाल्याचं सामनातून भाष्य करणाऱ्या उद्धव ठाकरेंची पोलखोल झाली आहे असंच नागरिकांचं मत आहे.

पावसाळ्यापूर्वी नालेसफाईवरून सामनातून नेमकी कोणती बातमी आली होती?

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x