26 April 2024 11:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | होय! या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, फायद्याचा मोठा व्याज दर SBI Mutual Fund | तज्ज्ञांनी सुचवल्या 5 व्हॅल्यू फंड योजना, SBI सहित मालामाल करणाऱ्या टॉप SIP योजना सेव्ह करा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचं टेन्शन वाढवणारी अपडेट, थेट महागाई भत्ता आणि HRA होणार परिणाम Old Vs New Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीतून नव्या टॅक्स प्रणालीकडे कोणी जावे? डिक्लेरेशन पूर्वीच समजून घ्या Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

बलात्काराच्या घटना दुप्पट, सरकारला महिलांच्या 'मन की बात' कधी कळणार ?

मुंबई : किती ही सरकार बदलली तरी स्त्रियांवरील बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. विशेष म्हणजे पहिल्या पेक्षा बलात्काराच्या घटनांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. तर छेदछाडीच्या घटनेत तब्बल १६५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही आकडेवारी दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर खुद्द मुंबई पोलिसांनीच दिली आहे.

‘प्रजा’ या एनजीओने हे माहिती अधिकारात उघड केलं आहे. त्यामुळे स्त्रियांसाठी आणि मुलींसाठी परिस्थिती दिवसेंदिवस भयानक होत चालली आहे असेच चित्र आहे. एकट्या मुंबई शहरात २०१२-१३ मध्ये बलात्काराच्या २९३ आणि छेडछाड-विनयभंगाच्या ७९३ घटना घडल्या होत्या. परंतु ५ वर्षात अशा घटनांमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे आकडेवारी सांगत आहेत. २०१६-१७ या कालखंडात मुबईसारख्या शहरात ५७६ बलात्कार तर २१०३ विनयभंगाच्या घटना घडल्याची धक्कदायक माहिती उजेडात आली आहे. बलात्काराच्या बळी ठरलेल्या एकूण आकडेवारी पैकी ७२ टक्के पीडित मुली ह्या अल्पवयीन आहेत.

मुंबईत गेल्या वर्षीच्या तुलनेत घट झाली असली तरी गेल्या ५ वर्षांमधील आकडेवारीचा विचार करता बलात्काराच्या घटनांमध्ये दुपटीने वाढ झाल्याचे समजते. मिळालेल्या आकडेवारीनुसार २०१२-२०१३ मध्ये बलात्काराच्या एकूण २९४ घटना घडल्या होत्या, तर २०१५-१६ मध्ये हे प्रमाण ७२८ पर्यंत पोहोचलं आहे. परंतु २०१६-१७ मध्ये त्यात घट होऊन ते ५७६ पर्यंत येऊन ठेपले आहे. विशेष म्हणजे बलात्काराच्या बळी ठरलेल्या एकूण आकडेवारी पैकी ७२ टक्के पीडित मुली ह्या अल्पवयीन म्हणजे १२ ते १६ या वयोगटातील आहेत.

एकूणच ही आकडेवारी पाहता सरकार आणि समाज हा स्त्रियांच्या सुरक्षेसंबंधात किती उदासीन आहे हेच या आकडेवारीतून दिसत आहे. पालकांनी त्यांच्या अल्प आणि किशोरवयीन मुलींना घराबाहेर पाठवायचे की नाही हेच पालकांच्या समजण्यापलीकडे गेलं आहे.

बुलेट ट्रेन आणि पुतळ्याचं राजकारण करण्यात व्यस्त असलेल्या सरकारला ‘जिवंत स्त्रियांचं’ दुःख कळणार तरी कधी असा प्रश्न विचारला जात आहे. किंबहुना स्त्री सुरक्षेचा प्रश्न गांभीर्याने बघणारा असा नेता आहे का कुणी राज्यात असा प्रश्न अनेक स्त्रिया करत आहेत.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x