26 April 2024 6:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

गुजरातमधील शेतकऱ्यांचा सुद्धा बुलेट-ट्रेनला विरोध

अहमदाबाद : मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनला ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण सरकारकडून जमिन अधिग्रहण सुरु होताच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबरोबरच गुजरात राज्यातील शेतकऱ्यांनी सुद्धा जमिन अधिग्रहणाला तीव्र विरोध दर्शविल्याने नरेन्द्र मोदींचा हा महत्वकांक्षी प्रकल्प वादात अडकण्याची चिन्हं आहेत.

गुजरात मधील शेतकऱ्यांनी सरकारकडून देण्यात येणारे नुकसानभरपाईचे पॅकेज मान्य नसल्याचे सांगत, आमचा जमीन या प्रकल्पासाठी जमिनी द्यायलाच विरोध आहे असं स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्रा बरोबर आता मोदींच्या गुजरातमधून सुद्धा तीव्र विरोध होऊ लागल्याने त्याचे परिणाम २०१९ मधील निवडणुकीत भोगावे लागू शकतात. तसेच दोन्ही राज्यातील वाढत्या विरोधामुळे आणखी काही विलंब लागला तर हा बुलेट ट्रेन प्रकल्प ठरलेल्या मुदतीत म्हणजे २०२३ पर्यंत कार्यान्वित होऊ शकणार नाही असे जपान सरकारच्या प्रतिनिधींनी सांगितले आहे. या प्रतिनिधींनी अहमदाबाद येथे पर्यटन महोत्सवाच्या कार्यक्रमात हजेरी लावली असत त्यांनी ही माहिती पत्रकारांना दिली.

सरकारच्या योजनेनुसार मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प २०२३ च्या अखेरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. परंतु दोन्ही राज्यातून जमीन अधिग्रहणाला वाढता विरोध पाहता प्रकल्प लांबण्याची चिन्हं निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी मनसेच्या मदतीने विरोध आधीच तीव्र केला असताना त्यात गुजरातच्या शेतकऱ्यांची भर पडल्याने सरकारची जमीन अधिग्रहणाची डोकेदुखी वाढणार आहे.

जमीन अधिग्रहणाचा तिढा लवकरच सुटणे गरजेचे असून, भारत व जपान दोन्ही देश ही हायस्पीड ट्रेन चालू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे नोडा यांनी पत्रकारांना सांगितले.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x