2 May 2024 10:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ICICI Mutual Fund | लहान मुलांसाठी वरदान आहे ही म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 1.90 कोटी परतावा Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या
x

सर्वपक्षीय शिष्टमंडळ बेळगावला पाठवा | अन्यथा असंख्य मराठी माणसे तेथे धडकतील - संजय राऊत

Shivsena MP Sanjay Raut, Karnataka Maharashtra border, Belgaum dispute

मुंबई, १३ मार्च: बेळगावात कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावाद पुन्हा पेटला असताना शिवसेना खासदार संजय राउत यांनी कर्नाटक सरकारला आपल्याच थेट इशारा दिला आहे. बेळगावात मराठी माणसांवर अत्याचार होत आहेत. या अत्याचारांची कुणी दखल घेत नसेल तर मग महाराष्ट्र सरकारला पूर्ण ताकदीने बेळगावात उतरावे लागेल. डोकी फुटली तर दिल्लीला रडत जाऊ नका. कर्नाटकमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीला केंद्र सरकारच जबाबदार आहे असा हल्लाबोल संजय राउत यांनी केला. (Shivsena MP Sanjay Raut warn Karnataka government over Karnataka Maharashtra border dispute)

राउत पुढे बोलताना म्हणाले, बेळगावात मराठी माणसांसह शिवसेनेच्या कार्यलयांवर सुद्धा हल्ले होत आहेत. त्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या परिस्थितीला केंद्रातील भारतीय जनता पक्षाचं सरकार जबाबदार आहे. पश्चिम बंगालमध्ये हल्ले झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी चिंता व्यक्त करतात. पण, जेव्हा बेळगावात मराठी माणसांवर हल्ले होतात, तेव्हा मात्र पंतप्रधान आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा काहीच बोलत नाहीत.

बेळगावात मराठी माणसांवर होणारे हल्ले हा एखाद्या राजकीय पक्षाचा किंवा केवळ सरकारचा विषय नाही. यात केंद्र सरकारचा दोष दिसून येत आहे. एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ तत्काळ बेळगावला पाठवायला हवे. असे नाही केल्यास सांगली आणि कोल्हापूरातील असंख्य नागरिकच बेळगावात शिरणार. बेळगाव हा देशातला भाग आहे की नाही? आम्ही मराठी माणसे जेव्हा तिकडे जायचे बोलतो तेव्हा आम्हाला बंदूका दाखवल्या जातात. मी बेळगावला जाऊ शकतो. आमच्याकडे सुद्धा बंदूका आहेत असा इशारा देखील राउत यांनी दिला आहे.

 

News English Summary: Shiv Sena MP Sanjay Raut has given his own direct warning to the Karnataka government as the Karnataka-Maharashtra border dispute flares up again in Belgaum. Marathi people are being tortured in Belgaum. If no one pays attention to these atrocities, then the Maharashtra government will have to come to Belgaum with full force. Don’t go to Delhi crying if your head hurts. The central government is responsible for the situation in Karnataka, said Sanjay Raut.

News English Title: Shivsena MP Sanjay Raut warn Karnataka government over Karnataka Maharashtra border dispute news updates.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x