26 April 2024 11:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | होय! या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, फायद्याचा मोठा व्याज दर SBI Mutual Fund | तज्ज्ञांनी सुचवल्या 5 व्हॅल्यू फंड योजना, SBI सहित मालामाल करणाऱ्या टॉप SIP योजना सेव्ह करा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचं टेन्शन वाढवणारी अपडेट, थेट महागाई भत्ता आणि HRA होणार परिणाम Old Vs New Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीतून नव्या टॅक्स प्रणालीकडे कोणी जावे? डिक्लेरेशन पूर्वीच समजून घ्या Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

म्हाडाने करार केल्याशिवाय मुंबई 'बीडीडी चाळीं'च्या रहिवाशांनी घर सोडायचं नाही

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज बीडीडी चाळींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी विविध प्रश्नां संदर्भात कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली. मुंबईतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागला आहे, तरी रहिवाशांचे अनेक प्रश्न अनुत्तरित असल्याने अखेर रहिवाशांनी राज ठाकरेंकडे सर्व प्रश्न आज भेट घेऊन मांडले.

बीडीडी चाळीत राहणाऱ्या रहिवाशांच म्हणण ऐकून घेतल्यानंतर सर्वप्रथम म्हाडाने करार केल्याशिवाय घर न सोडायचं नाही असा सल्ला दिला आहे. मुंबईतील नायगाव, ना. म. जोशी मार्ग, वरळी आणि शिवडी येथे अनेक ब्रिटिशकालीन बीडीडी चाळी आहेत. या बीडीडी चाळींचा पुनर्विकास टाटा कंपनीकडून करण्याचा मार्ग उच्च न्यायालयाच्या निकालामुळे मोकळा झाला. त्यामुळे पुनर्विकासाला अडथळा नसला तरी अनेक प्रश्न आजही अनुत्तरित असल्याने रहिवासी संभ्रमात होते.

देशातील अनेक नामांकित बांधकाम व्यवसायिकांनी या निविदा जाहीर होताच त्यात रस दाखवला होता. ज्यामध्ये टाटा प्रोजेक्ट्स, कॅपॅसिट इन्फ्रास्ट्रक्चर सिटिक आणि अरेबियन कन्स्ट्रक्शन तसेच एसीसी इंडिया अशा दिग्गज कंपन्यांची नाव सामील होती. परंतु तब्बल ११,००० कोटीच्या या पुनर्विकास प्रकल्पाची जवाबदारी उच्च न्यायालयाने टाटा कंपनीकडे दिली.

मुंबईतील तीन ठिकाणच्या चाळी सुमारे ८७ एकर’वर पसरलेला हा भूखंड वरळी ५९.६९, ना. म. जोशी १३.९ तसेच नायगाव १३.३९ असा व्यापलेला आहे. या पुनर्वसन प्रकल्पासाठी म्हाडाची प्रकल्प सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x