महत्वाच्या बातम्या
-
२०१४ मध्ये गंभीरने जेटलींचा प्रचार केला आणि ते पराभूत झाले, आता तो भाजपचा प्रचार करणार
भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीर याने अधिकृतपणे भाजपात प्रवेश केला आहे. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, रवीशंकर प्रसाद यांची प्रमुख उपस्थिती होती. गौतम गंभीरने भाजपात प्रवेश केल्याने आमच्या पक्षाला नक्कीच फायदा होईल असा विश्वास अरुण जेटली यांनी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
5 वर्षांपूर्वी -
अडवाणींनंतर कोण? त्यांच्या योजना काँग्रेस आणि भाजपातील वरिष्ठांविरुद्ध देखील?
कालच भाजपने त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आणि त्यात पक्षाचे वरिष्ठ नेते आणि खासदार लालकृष्ण अडवाणी यांना गांधीनगर लोकसभेतून उमेदवारी न देता थेट अमित शहांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात येत असून अडवाणी नंतर कोणाचे नंबर असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यासाठी मोदी आणि अमित शहा जोडीचे जुने फोटो देखील व्हायरल केले जात आहेत.
5 वर्षांपूर्वी -
पहिली यादी जाहीर; मोदींच्या राजकीय गुरूंचा पत्ता कट? अमित शहांना गांधीनगरमधून उमेदवारी
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत १८२ उमेदवारांचा समावेश आहे. दरम्यान भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा बालेकिल्ला असणाऱ्या गांधीनगर मतदारसंघातू भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक लालकृष्ण अडवाणी यांना पक्षाकडून डावललं जाणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
सोशल मीडिया स्ट्रॅटेजिसाठी काँग्रेसकडून देशातील ३ मोठ्या एजन्सीची नेमणूक
लोकसभा निवडणुका घोषित झाल्यावर सर्वच पक्ष प्रचार योजना आणि उमेदवारांच्या निवडीत दंग झाले आहेत. या लोकसभा निवडणुकीत समाज माध्यमांचा प्रभावी, नियोजनबद्ध तसेच भाजपाला तगडं आव्हान देण्यासाठी देशातील ३ मोठ्या एजन्सींना नेमले आहे. त्यामध्ये डिझाईनबाक्सड, निकसन आणि सिल्वरपुष या बड्या नावांचा समावेश आहे.
5 वर्षांपूर्वी -
पाकड्यांकडून पुन्हा शस्त्रसंधीच उल्लंघन, एक भारतीय जवान शहीद
संपूर्ण देशभरात आज होळी मोठ्या उत्साहात साजरी होत असताना दुसरीकडे सीमेवर भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव कायम आहे. होळीच्या दिवशी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या सैन्याकडून जोरदार गोळीबारी करण्यात येत आहे.
5 वर्षांपूर्वी -
या दोन नेत्यांनी घेतला लोकसभा न लढविण्याचा निर्णय, पण ही आहे योजना? सविस्तर
महाराष्ट्रात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आणि राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. परंतु, लोकसभा निवडणूक न लढविण्याची चर्चा मनसेवर केंद्रित असली तरी तसाच प्रकार तामिळनाडूच्या राजकारणात देखील झाला आणि त्यानंतर अनेकांनी आश्चर्य देखील व्यक्त केलं आहे. मात्र सध्या तामिळनाडूतील लोकसभा निवडणुकीचे निकाल काय लागतील याच चित्रं अनेक सर्व्हेमध्ये समोर येत आहे आणि त्यात भाजपाला एआयडीएमके’सोबत युती करून देखील काहीच उपयोग होणार नसल्याचं चित्र समोर येत आहे.
5 वर्षांपूर्वी -
चौकीदारने नाही! लंडनमधील मेट्रो बँकेच्या सतर्क कर्मचाऱ्याने स्कॉटलँड यार्ड पोलिसांना कळवले
भारतातील बहुचर्चित पंजाब नॅशनल बँकेतील महाघोटाळ्याचा प्रमुख सूत्रधार हिरे व्यापारी नीरव मोदी याला इंग्लंडमधील स्कॉटलँड यार्डने अटक केली आहे. विशेष म्हणजे भारतातील चौकीदार सतर्क असल्याच्या भारतीय प्रसार माध्यमांमध्ये बातम्या झळकत असल्या तरी त्यामागील वास्तव वेगळंच आहे. कारण लंडनमध्ये वास्तव्यास असलेला नीरव मोदी मेट्रो बँकेत खाते उघडण्यासाठी गेला होता आणि त्यावेळी त्याच बँकेतील सतर्क कर्मचाऱ्याने लंडनमध्ये झळकलेल्या वृत्तानुसार त्याला अचूक ओळखले आणि त्याला बेसावध ठेवून पोलिसांना कळवले आणि अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला, अशी माहिती समोर आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
पीएनबी बँक घोटाळा: नीरव मोदीला लंडनमध्ये अटक
पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा चुना लावून पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याला लंडन येथून अटक करण्यात आली आहे. त्याला लंडन येथील कोर्टात हजर केले जाणार आहे. भारतात घोटाळा करुन फरार झालेल्या या उद्योगपतीविरोधात लंडनमधील वेस्ट मिनिस्टर न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले होते. भारतात प्रत्यार्पण करण्याच्या प्रकरणाची आता सुनावणी न्यायालयात केली जाणार आहे. याचदरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंमलबजावणी संचालनालयाकडून नीरव मोदीची संपत्ती विकली जाऊ शकते.
5 वर्षांपूर्वी -
मोदीजी लोकांना मूर्ख समजणे बंद करा: प्रियंका गांधी
काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पलटवार केला आहे. आम्ही कोणाला घाबरत नाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला मूर्ख समजणे बंद करावे, मागील ५ वर्षांमध्ये मोदी सरकारने भारतातील घटनात्मक संस्थांवर हल्ला केला, असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.
5 वर्षांपूर्वी -
काँग्रेसच्या तिसऱ्या यादीत महाराष्ट्रातील ७ उमेदवार जाहीर
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवारांची यादी मंगळवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली. या यादीत यात महाराष्ट्रातील एकूण ७ उमेदवारांचा समावेश आहे. दक्षिण मध्य मुंबईत एकनाथ गायकवाड तर यवतमाळमधून माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंना संधी देण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
'चाय संपली' आता 'चौकीदार से चर्चा', मोदी साधणार २५ लाख चौकीदारांशी संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील तब्बल पंचवीस लाख चौकीदारांशी चर्चा म्हणजे संवाद साधणार आहेत. संध्याकाळी ४:३० वाजता मोदी ऑडिओच्या माध्यमातून चौकीदारांशी संवाद साधतील. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींनी ‘मैं भी चौकीदार’ कॅम्पेन सुरू केलं आहे. होळीच्या पूर्वसंध्येला मोदी चौकीदारांशी साधत असलेला संवाद याच कॅम्पेनचा भाग असेल, अशी माहिती भारतीय जनता पक्षाकडून देण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजपाला अरुणाचल प्रदेशात जोरदार धक्का, ८ आमदारांचा पक्षाला रामराम
लोकसभा निवडणुकीपूर्वी अरुणाचल प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाला हादरा बसला असून पक्षातील तब्बल आठ आमदारांनी नॅशनल पीपल्स पार्टीत प्रवेश केला आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र होणार असून भाजपाला सोडचिठ्ठी देण्याऱ्यांमध्ये दोन मंत्र्यांचा देखील समावेश आहे. भाजपाने उमेदवारी न दिल्याने त्यांनी पक्षाला रामराम केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाऊ आला धावून; ४६२ कोटींचे कर्ज फेडल्यामुळे अनिल अंबानींची तुरुंगवारी वाचली
रिलायन्स इंडस्ट्रिजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी आपल्या लहान भावाला मोठ्या संकटातून वाचवले आहे. एरिक्सन या कंपनीला देण्यासाठी पैसे नसल्याने अनिल अंबानी यांना तुरुंगवास भोगावा लागणार होता. मात्र मुकेश अंबानी यांनी अनिल यांच्यावरील ४६२ कोटींचे कर्ज फेडल्यामुळे त्यांच्यावरील अटकेचे संकट आता टळले आहे. या कठीण प्रसंगात साथ दिल्याने अनिल अंबानी यांनी भाऊ मुकेश अंबानी आणि वाहिनी नीता अंबानी यांचे आभार मानले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
पेड सर्व्हे? लोकसंख्या १३० कोटी आणि १६,९३१ लोकांनी देशाचा ओपिनियन पोल ठरवला?
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हवानिर्मितीसाठी पुन्हा पेड सव्हेने तोंडावर वर काढल्याचे दिसत आहे. बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकनंतर मोदी सरकारला खरंच फायदा होणार आहे का? असे मथळे छापून आणि प्रश्न विचारून सत्ताधाऱ्यांसाठीच हे केलं जात आहे केलं जात आहे का असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
5 वर्षांपूर्वी -
प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली
मित्रपक्षांच्या नेत्यांसोबत झालेली राजकीय खलबतं, दीर्घ चर्चा आणि वाटाघाटींनंतर अखेर भारतीय जनता पक्षाचे नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. काल रात्री १ वाजून ४५ मिनिटांनी प्रमोद सावंत यांचा शपथविधी संपन्न झाला. राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी सावंत यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. दरम्यान, प्रमोद सावंत यांच्यासोबतच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सुदीन ढवळीकर आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली. तसेच मनोहर आजगावकर, रोहन खंवटे, गोविंद गावडे, विनोद पालयेकर, जयेश साळगांवकर, माविन गुदिन्हो, विश्वजित राणे, मिलिंद नाईक, निलेश काब्राल यांना देखील मंत्रिपदाची शपथ देण्यात आली.
5 वर्षांपूर्वी -
राजौरीमध्ये पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन
राजौरीमध्ये पाक सैन्याकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. राजौरीमध्ये आज पुन्हा एकदा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. भारतीय लष्कराच्या जवानांनी पाकिस्तानी सैनिकांना चोख प्रत्युत्तर देत गोळीबार केला. दरम्यान, दोन्ही बाजूंचा गोळीबार थांबला असल्याचे समजते.
5 वर्षांपूर्वी -
प्रयागराज येथे प्रियांका गांधींकडून हनुमान मंदिरात पूजन, गंगा यात्रेला सुरुवात
लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. दरम्यान, कुंभ मेळ्यात भाजपचच्या देशभरातील नेत्यांनी आणि स्वतः मोदींनी गंगा स्नान केले होते. त्यानंतर उत्तर प्रदेशात महत्वाची जवाबदारी देण्यात आलेल्या प्रियांका गांधी यांनी देखील आज गंगा दर्शनाला आल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
पर्रिकर यांना मुखअग्नी मिळण्यापूर्वीच भाजपच्या रात्रभर नितीन गडकरींच्या उपस्थितीत बैठका
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारसमोर पुन्हा एकदा राज्यातील सत्ता टिकवून ठेवण्याचं राजकीय संकट उभं राहिलं आहे. पर्रिकरांच्या जागेवर नवीन नेता निवडण्याचं आव्हान भाजसमोर निर्माण झालं आहे. कारण काँग्रेस पक्षानं राज्यपालांना पत्राद्वारे सत्ता स्थापन करण्याचा दावा केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मनोहर पर्रिकरांच्या निधनानंतर गोव्यात जोरदार राजकीय हालचाली
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्यातील राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. मनोहर पर्रिकर यांचे रविवारी संध्याकाळी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर गोव्यात राजकीय संकट निर्माण झाले आहे. एकीकडे काँग्रेसने सत्तास्थापनेसाठी दावा करण्याची तयारी सुरु केली असतानाच भाजपानेही मुख्यमंत्रीपदासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. शनिवारपासूनच त्यांच्या तब्येतीवरुन दिवसभर राज्यात आणि राज्याबाहेरही प्रचंड अफवा पसरल्या होत्या. परंरतु, ही अफवा आता खरी ठरली आहे. आज पर्रीकर यांनी घरीच अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, सकाळी मनोहर पर्रीकर यांची तब्येत स्थिर असून ते फक्त डोळे उघडतात, असे सांगण्यात आले होते.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स शेअर्समध्ये घसरण वाढतेय, स्टॉक Hold करावा की Sell?
- Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल
- Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर मजबूत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हलसहित टार्गेट प्राईस जाहीर
- RVNL Share Price | PSU स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सुसाट धावणार
- Numerology Horoscope | 10 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Numerology Horoscope | 13 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे टॉप 5 शेअर्स मालामाल करणार, अल्पावधीत तगडा परतावा मिळेल
- Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल
- Infosys Share Price | हलक्यात घेऊ नका! Infosys, TCS, Wipro सहित हे 7 शेअर्स मालामाल करणार, हाय ट्रेडिंग व्हॉल्यूम
- HAL Share Vs BEL Share Price | PSU HAL आणि BEL शेअर्स दणादण परतावा देणार, अल्पावधीत 30% कमाई करा