महत्वाच्या बातम्या
-
पत्र मिळालं, आपणास शुभेच्छा; असं एका ओळीत उत्तर देत अण्णांची मोदींकडून हेटाळणी
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मागील ५ वर्षांत तब्बल ३८ वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविल्यावर अखेर त्यांनी प्रथमच अण्णांच्या पत्राला केवळ एका ओळीत उत्तर देत त्यांची अप्रत्यक्ष हेटाळणीच केल्याचे म्हटले जात आहे. त्यात अण्णांना उत्तर देताना म्हटलं आहे की, ‘तुमचे १ जानेवारीचे पत्र मिळाले. आपणास शुभेच्छा’ केवळ एवढाच एका ओळीचा उल्लेख संबंधित पत्रात करण्यात आला आहे. परंतु, अण्णांनी विचारलेल्या शेतकऱ्यांच्या, लोकपाल नियुक्ती तसेच प्रत्येक राज्यात लोकायुक्त कायदा याबाबत उत्तर देण्याचे नरेंद्र मोदींनी स्पष्ट टाळले आहे.
5 वर्षांपूर्वी -
ते ४८ तास सावधान! या नियमाच्या आड कोणीही विजयी उमेदवारावर आधीच ट्रॅप लावू शकतो? सविस्तर
नगरसेवक पदाच्या निवडणुकीत आरक्षणामुळे अनेक विजयी उमेदवार खोटे शिक्षणाचे दाखले, जातीचे दाखले तसेच संपत्तीबद्दलची खोटी माहिती निवडणूक आयोगाला दिल्यामुळे, त्यांचं नगरसेवक पद रद्द होण्यापर्यंत विषय जाऊन पोहोचतो. परंतु, लोकसभा, विधानसभा निवडणुकीत याचा त्रास नसला तरी भविष्यात या नव्या नियमामुळे अनेक विजयी उमेदवार भविष्यात निवडणूक आयोगाच्या कचाट्यात अडकून स्वतःची खासदारकी किंवा आमदारकी गमावून बसू शकतात. विशेष म्हणजे कोणीही राजकीय विरोधक प्रतिस्पर्धीना मतदानाच्या ४८ तास आधी शिस्तबद्ध अडकवू शकतात.
5 वर्षांपूर्वी -
भाजपा स्वतःच्या फायद्यासाठी देशात दंगली घडवू शकतं: युपी मंत्री ओमप्रकाश राजभर
भारतीय जनता पक्षाचे योगी आदित्यनाथांच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री तसेच मित्रपक्ष सुहेलदेव बहुजन समाज पक्षाचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांच्या एका वक्तव्याने खळबळ माजली आहे. दरम्यान त्यांनी केलेल्या दाव्यामुळे भारतीय जनता पक्ष अडचणीत आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
अण्णांचे वजन उपोषणाच्या चौथ्या दिवशी साडे तीन किलोने घटले
आज अण्णांच्या उपोषणाचा चौथा दिवस असून त्याच्या वजनात तब्बल साडेतीन किलोची घट झाली आहे. अण्णांच्या वयाचा विचार करता ते त्यांच्या प्रकृतीसाठी चांगलं नाही असं डाक्टरांनी सांगितलं आहे. दरम्यान, मोदी सरकार अण्णांच्या उपोषणाची जराही दखल घेत नसल्याची खंत स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली असून, आता तीव्र आंदोलन उभारण्याचा निर्णय ग्रामस्थांनी ग्रामसभेत घेतल्याचे कळते.
5 वर्षांपूर्वी -
प्रती दिवशी १७ रूपये देऊन मोदी सरकारने शेतकऱ्यांचा अपमान केला - राहुल गांधी
प्रती दिवशी १७ रूपये देऊन मोदी सरकारने शेतकऱ्यांचा अपमान केला – राहुल गांधी
5 वर्षांपूर्वी -
मोदींचा #आखरी-जुमला-बजेट, समाज माध्यमांवर ट्रेंडिंग
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी आज लोकसभेत २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकरी, नोकरदार, मध्यमवर्गीय, यांना मोठा दिलासा देण्यात आल्याचं मोदींनी म्हटलं आहे. परंतु, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारचे हे #AakhriJumlaBudget असल्याची टीका विरोधकांसह नेटीझन्सनी केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
#बजेट-२०१९: ५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर आता कोणताही कर नाही
केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी आज संसदेत अंतरिम अर्थसंकल्प मांडला. त्यात शेतकरी, कामगार आणि मध्यमवर्गीय जनतेला दिलासा देण्याचा पूर्ण प्रयत्न त्यांनी केला. दरम्यान, आता ५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर आकारला जाणार नाही, अशी घोषणा त्यांनी केली.
5 वर्षांपूर्वी -
कांदा-टोमॅटो रस्त्यावर फेकण्याची वेळ, अर्थमंत्री म्हणतात शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होणार?
बजेट २०१९ आज लोकसभेत अर्थमंत्री पियुष गोयल सादर करत आहेत. सकाळी ११ वाजता अरुण जेटली यांच्या अनुपस्थितीत हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल हे यंदाचा हंगामी अर्थसंकल्प सादर करत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
केवळ निवडणूकपूर्व घोषणांचा अर्थसंकल्प ठरण्याची शक्यता? अनेक अर्थतज्ज्ञांना शंका
बजेट २०१९ आज लोकसभेत अर्थमंत्री पियुष गोयल सादर करणार आहेत. नरेंद्र मोदी सरकारच्या वतीने आज ते संसदेत लोकसभा निवडणूकपूर्व अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सकाळी ११ वाजता अरुण जेटली यांच्या अनुपस्थितीत हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल हे यंदाचा हंगामी अर्थसंकल्प सादर करतील.
5 वर्षांपूर्वी -
भाजपने घोषणेतून 'मोदी सरकार' शब्द हटवले? नवी घोषणा ‘अबकी बार ४०० के पार’?
भाजप’ने २०१९ लोकसभा निवडणुकीसाठी २०१४ मधील घोषणेत बदल केल्याचे वृत्त आहे. २०१४ मधील ‘अबकी बार मोदी सरकार’ मधील ‘मोदी सरकार‘शब्द वगळून “अबकी बार ४०० के पार” अशी नवी घोषणा देण्याची योजना असल्याचे समजते. दरम्यान, भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ४०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा संकल्प केला आहे. तत्पूर्वी २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत एनडीएने तब्बल ३३६ जागांवर विजय प्राप्त केला होता. त्यावेळी एकट्या भाजपाने २८२ जागांवर विजय प्राप्त केला होता.
5 वर्षांपूर्वी -
राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्याला प्रतीकात्मक गोळ्या घालणाऱ्या महिलेचे भाजप मंत्र्यांसोबत फोटो
राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्याला गोळ्या घालणाऱ्या अखिल भारतीय हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सचिव पूजा शकुन पांडे यांचे भारतीय जनता पक्षाच्या मंत्री तसेच वरिष्ठ नेत्यांसोबतचे फोटो सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होतं आहेत. त्यामुळेच त्यांना अजून अटक झाली नसल्याचा आरोप सध्या करण्यात येतो आहे.
5 वर्षांपूर्वी -
इतिहास रचला! ४५ वर्षातील सर्वात भीषण बेरोजगारी मोदींच्या सत्ताकाळात: सरकारी अहवाल
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकार बेरोजगारीच्या वास्तवावरून तोंडघशी पडलं आहे. एवढंच नाही तरी मोदी सरकारने मागील ४५ वर्षातील बेरोजगारीचा विक्रम केल्याचे एका सरकारी अहवालातूनच सिद्ध झालं आहे. देशातील यंदाचा बेरोजगारीचा दर हा मागील ४५ वर्षातील सर्वाधिक असल्याचं राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. देशातील २०१७-१८ चा बेरोजगारीचा दर हा तब्बल ६.१ टक्के इतका आहे. दरम्यान, सदर अहवालानुसार १९७२-७३ पासूनच्या जेव्हा देशात भीषण दुष्काळ पडला होता, तेव्हा पासून बेरोजगारीचा हा दर सध्या सर्वाधिक असल्याचं म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
अमित शहांची लवकरच पुणे, बारामती, मावळ व शिरूर मतदारसंघासाठी आढावा बैठक
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा पुढील आठवड्यात पुणे दौ-यावर येत असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, ते पुणे, बारामती, मावळ व शिरूर लोकसभा मतदारसंघाचा संपूर्ण आढावा घेणार असल्याचे वृत्त आहे. तसेच संबंधित मतदारसंघातील बुथ प्रमुखांना ते मार्गदर्शन सुद्धा करणार असल्याचे समजते.
5 वर्षांपूर्वी -
आजपासून विश्व हिंदू परिषदेची २ दिवसीय धर्मसंसद, राम मंदिरावर चर्चा
विश्व हिंदू परिषदेच्या दोन दिवसीय धर्मसंसदेला आजपासून उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरुवात झाली आहे. अयोध्येतील बहुचर्चित राम मंदिराच्या उभारणीवर या धर्म संसदेत सखोल चर्चा होणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, आजच्या या बैठकीला सरसंघचालक मोहन भागवत, योगगुरू बाबा रामदेव, श्री श्री रविशंकर आणि स्वतः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हजेरी लावणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
NZ Vs IND न्यूझीलंडचा भारतावर दणदणीत विजय
हॅमिल्टन वन-डे क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडने भारताचा तब्बल ८ गडी राखून धुव्वा उडवला आहे. दरम्यान, पहिले तीन एकदिवसीय सामने गमावल्यानंतर किवींनी होम ग्राउंडवर पहिला विजय संपादित केला आहे. तसेच हॅमिल्टनच्या खेळपट्टीवर ट्रेंट बोल्ट आणि कॉलिन डी-ग्रँडहोमच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय क्रिकेट संघाच्या अक्षरशः चितड्या उडवल्या. भारताचा संपूर्ण संघ केवळ ९२ धावांमध्ये पॅव्हेलियनमध्ये परतला.
5 वर्षांपूर्वी -
एसबीआय'च्या लाखो ग्राहकांचा बँक खात्यासह महत्त्वाचा डेटा लीक
स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआय’च्या ग्राहकांची महत्त्वाची माहिती स्टोअर असणाऱ्या मुख्य सर्व्हरमधील हजारो ग्राहकांची अति महत्त्वाची माहिती लीक झाल्याचे वृत्त आहे. त्यात बँक बॅलेन्स, खाते क्रमांक अशा महत्वाच्या खासगी माहितीचा समावेश आहे. दरम्यान, सर्व्हरमधील डेटा हा कोणत्याही सुरक्षेविना असल्यामुळे हे घडल्याचे वृत्त आहे.
5 वर्षांपूर्वी -
राहुल हे अत्यंत साधे व्यक्ती असून त्यांची देशाला व गोव्याला गरज: भाजप गोवा विधानसभा उपसभापती
गोव्याच्या कौटुंबिक दौऱ्यावर असताना सुद्धा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी काल आजारीने त्रस्त असणारे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची स्वतः विधानसभेत जाऊन सदिच्छा भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली होती. दरम्यान, कालच्या या भेटीचे गोवा विधानसभेचे विद्यमान उपसभापती तसेच भाजप आमदार मायकल लोबो यांनी स्वागत केले. तसेच त्यांचे तोंडभरून कौतुक सुद्धा केल्याने भाजपाची राजकीय गोची झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
प्रियंका गांधी देशभरात दौरे करतील: गुलाम नबी आझाद
प्रियंका गांधी यांचा सक्रिय राजकारणात प्रवेश निश्चित झाल्यावर आता त्यांना लवकरच काँग्रेस कार्यकारिणीमध्ये सामावून घेतले जाण्याची शक्यता आहे. तसे अप्रत्यक्ष संकेतच काँग्रेसमधून देण्यात आले आहेत. तसेच त्यांना केवळ पूर्व उत्तर प्रदेशातील प्रचारापुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण भारतात काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी उतरविण्यात येईल असे संकेत सुद्धा देण्यात आले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
भाजपा कट्टरतेवर उतरल्यास लोकसभेपूर्वीच देशात दंगली होतील: अमेरिकन गुप्तचर यंत्रणा
देशात सध्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सर्वच पक्षांच्या बाजूने जोरदार सुरुवात झाली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीला काही दिवस उरले असताना अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने एक धक्कादायक अहवाल दिला आहे. त्यानुसार भारतीय जनता पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी कट्टरतेवर उतरल्यास भारतात दंगली उसळण्याची शक्यता या वर्तविण्यात आली आहे आणि हा दावा दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर जगातील सर्वात मोठी अमेरिकन गुप्तचर यंत्रणा सीआयएनं केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उपोषणवर, मोदी सरकारची डोकेदुखी वाढली
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज महात्मा गांधी पुण्यतिथीपासून पुन्हा मोदी सरकारच्या विरोधात पुन्हा उपोषणच्या मार्गाने एल्गार पुकारला आहे. दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन सुद्धा राळेगणसिद्धीच्या दौऱ्यावर जाणार होते. परंतु, तत्पूर्वीच गिरीश महाजन राळेगणसिद्धीला येऊन काहीच फरक पडणार नसून अण्णा तरीदेखील उपोषणाला बसणारच आहेत असे सांगून त्यांना भेटण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल
- Mastek Share Price | 40 रुपयाच्या शेअरची कमाल! तब्बल 4000 टक्के परतावा दिला, आता एका दिवसात 20% वाढला
- Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Gold Rate Today | बापरे! लग्नासराईच्या दिवसातही सोनं खरेदी करणं परवडणार नाही, लवकरच 1 लाख रुपये तोळा होणार
- Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा
- Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार?
- Numerology Horoscope | 17 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
- Infosys Share Price | भरवशाचा इन्फोसिस शेअर उसळी घेणार, दिग्गज ब्रोकिंग तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर
- Stocks in Focus | मार्ग श्रीमंतीचा! हे टॉप 5 बँकिंग शेअर्स तुम्हाला अल्पावधीत 38 टक्केपर्यंत परतावा देतील, संधी सोडू नका
- Reliance Power Share Price | अवघ्या 4 वर्षात 2325 टक्के परतावा दिला, शेअर प्राईस 26 रुपये, पुढे तेजी येणार का?