महत्वाच्या बातम्या
-
राम मंदिराचं भूमिपूजन थोडं थांबून धूमधडाक्यात होणं गरजेचं होतं - राज ठाकरे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाच ऑगस्ट रोजी अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. हा भूमिपूजनाचा सोहळा पार पडल्यानंतर त्याच दिवशी पंतप्रधानांच्या हस्ते राम मंदिराची प्रातिनिधिक चित्र असणारे आणि रामायणावर आधारित पोस्टाचे तिकीट प्रकाशित केले जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे कोरोना आपत्तीच्या काळात होणाऱ्या याच भूमिपूजनावरून देशभर चर्चा रंगली आहे. यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ई-भूमिपूजनाचं वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर हिंदुत्ववादी संघटना आणि समर्थकांनी जोरदार टीका केली होती.
4 वर्षांपूर्वी -
अयोध्येत बौद्ध मंदिर व्हावं यासाठी फार आधीपासून माझ्या हालचाली सुरु आहेत - आठवले
अयोध्येत सध्या राम मंदिर भुमिपुजनाची तयारी सुरु आहे. या कार्यक्रमाला देशभरातू कोणाला निमंत्रण दिलंय ? कोण जाणारेय ? यावरुन सध्या राजकारण सुरु आहे. अशात आता अयोध्येत बुद्धविहार उभारण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलीय.
4 वर्षांपूर्वी -
सुशांतच्या केसमध्ये कुठेतरी आदित्य ठाकरेंचं नाव असल्याने राज्य सरकार CBI कडे वळवणार नाही
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये असलेल्या घरणेशाहीवरून वाद चांगलाचं पेटताना दिसत आहे. मुख्य म्हणजे या वादाच्या भोवऱ्यात अभिनेत्री कंगना रानौतने आता राज्याचे पर्यावरण मंत्री व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना देखील ओढले होतं. दिग्दर्शक करण जोहर आणि आदित्य ठाकरे एकमेकांचे चांगले मित्र असल्यामुळे अद्याप करणची चौकशी झाली नसल्याचा आरोप कंगनाने केला होता.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई पोलीस सुशांतसिंग राजपूतच्या कुटूंबावर दबाव आणत असल्याचा वडिलांचा आरोप
रियावर एफआयआर दाखल झाल्याचं कळताच बिहार पोलिसांनीही कारवाईसाठी पुढील पावलं उचलत मुंबई गाठली. या सर्व घडामोडी पाहता आता रिया चक्रवर्ती हिनं अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठीचे प्रयत्न सुरु केल्याचं कळत आहे. रियानं सुशांतची फसवणूक केल्याच्या संशलयायवरुन आणि त्याचा मानसिक छळ केल्याचा आरोप करत तिच्याविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली. सुशांतच्या वडिलांनी ही तक्रार दाखल केली असून, यामध्ये तिनं सुशांतला त्याच्या कुटुंबापासून दुरावल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
रियाची अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी धावपळ, अंकिताचं सूचक ट्विट
अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानं महिन्याभरापूर्वी मुंबईतील त्याच्या राहच्या घरी आत्महत्या केली. सुशांतनं आत्महत्या केल्यानंतर अनेक अनुत्तरित प्रश्नांनी डोकं वर काढलं. ज्याअंतर्गत मुंबई पोलिसांनी काही मोठ्या सेलिब्रिटींची चौकशीही केली. त्यातच आता सुशांतच्या कुटुंबीयांनी थेट पोलिसांत धाव घेत सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिच्याविरोधात एफआरयार दाखल केली आहे. ज्यामुळं तिच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईकरांमध्ये स्वतःहून हर्ड इम्युनिटी तयार झाली..श्रेय घेतोय बेबी पेंग्विन आणि बीएमसी
मागील काही दिवसांपासून मुंबईत करोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याची दिलासादायक माहिती समोर आहे. पुढील काही दिवसांमध्ये ती आणखी काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जर अशीच संख्या कमी होत राहिली तर नक्कीच करोनावर आपण नियंत्रण मिळवल्याचं म्हणता येईल. मुंबईची सद्यस्थिती पाहता हर्ड इम्युनिटीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका सर्वेक्षणात तब्बल ५७ टक्के लोकांमध्ये अँटीबॉडी तयार झाल्याचं समोर आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेण्यास सरकारने नकार दिल्याने विनायक मेटेंचा संताप
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आले असून, आता अधिवेशन ०७ सप्टेंबर २०२० रोजी बोलाविण्यात येईल, असा निर्णय आज विधान भवन मुंबई येथे झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. गेल्या काही दिवसांपूर्वी राजभवनमधील २४ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. त्याच पार्श्वभूमीवर महापालिकेनं तातडीनं उपाययोजना राबवल्या आहेत. येत्या ३ ऑगस्टपासून सुरू होणार्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलले गेले आहे. तत्पूर्वी विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून रोजी होणार होते. मात्र कोरोनामुळे ते पुढे ढकलून ३ ऑगस्ट रोजी घेण्याचे ठरले होते.
4 वर्षांपूर्वी -
पवार साहेबांचं वय वाढतंय तसा हिंदू धर्मावरील त्यांचा राग सुद्धा वाढतो आहे - निलेश राणे
अयोध्येतील प्रभू राम मंदिराच्या भूमीपूजनावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीत भिन्न मते आहेत, राम मंदिराच्या भूमिपूजनाबाबत शरद पवारांनी विधान केले होते. कोरोनाविरुद्ध कसं लढता येईल, यावर आम्ही विचार करतोय. पण, काही लोकांना वाटतंय की मंदिर उभारल्यानं कोरोना जाईल. त्यामागे काही कारण असू शकतं. मात्र, सध्या कोरोनावर लक्ष द्यायला हवं असं शरद पवार म्हणाले होते, या विधानावरुन अनेक वादंग झाला होता.
4 वर्षांपूर्वी -
कुर्बानीनं कोरोना जाणार म्हणजे...प्रविण दरेकरांचा पवारांना टोला
सोलापूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपुजनावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला टोला लगावला होता. काही लोकांना असं वाटतंय की, राम मंदिर बांधून देशातून कोरोना दूर होईल, अशा शब्दात पवारांनी नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता निशाणा साधला होता.
4 वर्षांपूर्वी -
वटवृक्ष वाचवण्यासाठी पुढाकार आणि मुंबईत १२८२ झाडांची कत्तल करण्याचे प्रस्ताव मंजूर
भोसे (जि. सांगली) येथील राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या आड येणारा सुमारे ४०० वर्षे पुरातन वटवृक्ष वाचविण्याबाबत राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून विनंती केली होती. या पत्रास मान ठेवून महामार्गाचा नकाशा बदलला आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली.
4 वर्षांपूर्वी -
राज्यातील दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. मंडळाकडून पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण अशा नऊ विभागात मार्च २०२० मध्ये १० वीची परीक्षा घेण्यात आली होती.
4 वर्षांपूर्वी -
मनसे कार्यकर्ते वीज कंपन्यांविरोधात हात सोडण्याच्या आधीच मंत्रालयात तातडीची बैठक
राज्यात काही दिवसांपासून वीजबिलांचा मुद्दा प्रकर्षानं समोर येताना दिसतोय. मुंबईसह राज्यभरातून याविषयी ओरड होत असून, याच मुद्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे भडकले आहेत. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासंदर्भात पत्र दिलं आहे. “राज्य सरकारनं महावितरण आणि बेस्ट सारख्या सरकारी आस्थापनांना तात्काळ आदेश द्यावेत आणि खाजगी वीज कंपन्यांना देखील कडक शब्दांत समज द्यायला हवी, अन्यथा या खाजगी वीज कंपन्यांना आम्हाला झटका द्यावा लागेल,” असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
अवास्तव वीज बील आकारणीवरून राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, अन्यथा वीज कंपन्यांना झटका देणार
राज्यात काही दिवसांपासून वीजबिलांचा मुद्दा प्रकर्षानं समोर येताना दिसतोय. मुंबईसह राज्यभरातून याविषयी ओरड होत असून, याच मुद्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे भडकले आहेत. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासंदर्भात पत्र दिलं आहे. “राज्य सरकारनं महावितरण आणि बेस्ट सारख्या सरकारी आस्थापनांना तात्काळ आदेश द्यावेत आणि खाजगी वीज कंपन्यांना देखील कडक शब्दांत समज द्यायला हवी, अन्यथा या खाजगी वीज कंपन्यांना आम्हाला झटका द्यावा लागेल,” असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोणी टरबुज्या, चंपा म्हटल्यास जोरदार प्रतिउत्तर देण्याचे पदाधिकाऱ्यांना आदेश
काल झालेल्या महाराष्ट्र भाजपच्या नव्या कार्यकारिणीच्या बैठकीवेळी उपस्थितांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी एकेकाळचे युतीमधील सहकारी असलेल्या उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तसेच आई भवानी उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य देवो अशी शुभकामना व्यक्त केली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला हे सरकार पाडण्यात स्वारस्य नाही. मात्र सत्ताधाऱ्यांनी हे सरकार किमान चालवून दाखवावे, तुम्ही एकमेकांचे हातपाय मोडायला सक्षम आहात. तसेचे हे काही जनतेने निवडून दिलेले सरकार नाही, तर धोक्याने सत्तेवर आलेले सरकार आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला होता. तसेच सामनामधील मुलाखतीत म्हटल्याप्रमाणे या सरकारचं स्टिअरिंग उद्धव ठाकरेंकडेच आहे. मात्र त्यामधून कुठे जायचं हे मात्र मागे बसलेले ठरवतात, अशी टीका केली होती.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई पोलीस तुमच्यासाठी प्लाझ्माचे दान सुद्धा करत आहेत, तुम्ही सुद्धा पुढे या
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या लवकरच ४ लाखांचा टप्पा ओलांडणार असे दिसत आहे. सोमवारी दिवसभरात राज्यात कोरोनाच्या ७ हजार ९२४ नव्या रुग्णांची भर पडली, यासह राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख ८३ हजार ७२३ वर पोहोचली आहे. यापैकी १ लाख ४७ हजार ५९२ रुग्णांवर सध्या उपचार सुरू असून २ लाख २१ हजार ९४४ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर १३ हजार ८८३ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.
4 वर्षांपूर्वी -
सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी करण जोहरची याच आठवड्यात चौकशी होणार
सुशांतसिंग राजपूतने गेल्या १४ जूनला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मुंबई पोलीस तपास करत आहेत. आत्तापर्यंत मुंबई पोलिसांनी ३७ जणांची चौकशी करत त्यांचा जबाब नोंदवला आहे. आता कंगना रानौत , दिग्दशृक महेश भटयांनाही आपला जबाब नोंदवण्यासाठी समन्स पाठवण्यात आला आहे. तर करण जोहरच्या मॅनेजरलाही कॉल करण्यात आला आहे. गरज पडली तर करण जोहरलाही कॉल केला जाईल, असे काल अनिल देशमुख यांनी सांगितले होते.
4 वर्षांपूर्वी -
सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणी महेश भट्ट यांची मुंबई पोलिसांकडून चौकशी
सुशांतसिंग राजपूतने गेल्या १४ जूनला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मुंबई पोलीस तपास करत आहेत. आत्तापर्यंत मुंबई पोलिसांनी ३७ जणांची चौकशी करत त्यांचा जबाब नोंदवला आहे. आता कंगना रानौत , दिग्दशृक महेश भटयांनाही आपला जबाब नोंदवण्यासाठी समन्स पाठवण्यात आला आहे. तर करण जोहरच्या मॅनेजरलाही कॉल करण्यात आला आहे. गरज पडली तर करण जोहरलाही कॉल केला जाईल, असे काल अनिल देशमुख यांनी सांगितले होते.
4 वर्षांपूर्वी -
करण जोहर आणि आदित्य ठाकरे चांगले मित्र, त्यामुळे अजून चौकशी झाली नाही - कंगना रानौत
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये असलेल्या घरणेशाहीवरून वाद चांगलाचं पेटताना दिसत आहे. मुख्य म्हणजे या वादाच्या भोवऱ्यात अभिनेत्री कंगना रानौतने आता राज्याचे पर्यावरण मंत्री व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना देखील ओढले आहे. दिग्दर्शक करण जोहर आणि आदित्य ठाकरे एकमेकांचे चांगले मित्र असल्यामुळे अद्याप करणची चौकशी झाली नसल्याचा आरोप कंगनाने केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरे यांच्यात पंतप्रधान होण्याची धमकच नाही, आठवलेंची खोचक टीका
राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज साठावा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. संजय राऊत यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, आपण आमच्या आयुष्यात खास आहात. आपणास वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा. देशाचं नेतृत्त्व करण्याची क्षमता आपल्यात आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
4 वर्षांपूर्वी -
काय मुख्यमंत्री आहे, साखरेची MSP ठरवणाऱ्या GoM'चे प्रमुख अमित शहा आहेत हेच माहीत नाही
शिवसेना खासदार आणि दैनिक ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील मतभेद, भाजपचं ऑपरेशन लोटस यासह अनेक मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केलं होतं. तसंच सरकार जरी तीन पक्षांचं असलं तरीही स्टेअरिंग माझ्याच हातात आहे, असं म्हणत मित्रपक्षांना सूचक इशाराही दिला आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Numerology Horoscope | 10 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल
- Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर्समध्ये मजबूत तेजी येणार, नवीन अपडेट येताच शेअर्सची खरेदी वाढली
- Railtel Share Price | रेलटेल शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी सांगितली पुढची टार्गेट प्राईस
- Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार! झटपट पैसा दुप्पट करणारा शेअर खरेदी करा, संधी सोडू नका
- L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर स्वस्तात खरेदी करा, यापूर्वी 350% परतावा दिला, ऑर्डरबुक मजबूत झाली
- Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल
- Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार?
- Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा
- Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा