25 April 2024 6:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

मोदी केंद्रीयमंत्री रामदास आठवलेंच्या विकास कामांचा हिशेब देशाला देतील का? नेटकरी

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नेटकऱ्यांनी अनेकांच्या कामाचा लेखाजोखा मांडण्यास आणि त्यांच्या कामाबाबत व्यक्त होण्यास सुरुवात केली आहे. त्यानुषंगाने ५ वर्ष मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळात विराजमान असलेले आरपीआय’चे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी संपूर्ण कार्यकाळात कोणती विकास कामं केली ते पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला सांगू शकतील का? असे सवाल नेटकरी वारंवार करताना दिसत आहे.

देशाची संसद ही सामान्यांचे विषय मांडण्यासाठी असते, परंतु कोणत्याही अधिवेशनात मिळालेला अमूल्य वेळ ते शेरोशायरी वरच व्यर्थ घालवताना दिसले. कॅबिनेट मंत्रिपद असोत किंवा केंद्रातील राज्यमंत्रीपद, त्याचा अधिकाधिक फायदा हा सामान्यांसंबंधित विकासाची कामं करण्यासाठी खर्ची घालायचा असतो. परंतु, लोकसभेच्या आत किंवा बाहेर ते केवळ शायऱ्या करतानाच सामान्यांना दिसले.

सामान्यांनी सुद्धा आठवलेंच्या शेरोशायऱ्या जबरदस्ती का होईना, त्या अत्यंत जड मनाने स्वीकारल्या आणि स्वतःची करमणूक करून घेतली. परंतु, त्यामुळे आठवलेंना अप्रत्यक्ष प्रोत्साहन मिळाले आणि त्यांच्यातला कवी अधिकच व्यक्त होऊ लागला. परिणामी, कोणत्याही महत्वाच्या आणि गंभीर विषयातील चर्चेत आठवलेंच्या शायऱ्या झेलण्याशिवाय दुसरा पर्याय आज प्रसार माध्यमांकडे आणि सामान्य माणसाकडे नाही, अशीच एकूण परिस्थिती आहे.

परंतु, आपण जनतेचे प्रतिनिधि असून, केंद्रीय मंत्रिमंडळात जवाबदार मंत्रीपदी आहोत. त्यामुळे ५ वर्षात तुम्ही कोणती विकासाची कामं केली, असे प्रश्न विचारण्याचा त्रास प्रसार माध्यमं सुद्धा करत आणि यातच त्या पदाच गांभीर्य कमी होतं. त्यामुळे आता निवडणुकीच्या तोंडावर अनेक ग्रुप्समध्ये नेटकरी आठवलेंकडे असे प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत. त्यामुळे उद्या जर प्रकाश आंबेडकरांना यश मिळाल्यास, रामदास आठवलेंच्या एकूणच राजकीय अस्तित्वाला धक्का बसल्यास नवल वाटायला नको.

हॅशटॅग्स

#Ramdas Athawale(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x