26 April 2024 1:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले? Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर RVNL Share Price | अल्पावधीत 1985 टक्के परतावा देणारा RVNL शेअर रॉकेट तेजीत धावणार, फायद्याची अपडेट आली Bonus Shares | खरेदी करा हा शेअर! फ्री बोनस शेअर्स सुद्धा मिळतील, शेअरने 6 महिन्यांत 210% परतावा दिला Post Office Interest Rate | होय! या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, फायद्याचा मोठा व्याज दर SBI Mutual Fund | तज्ज्ञांनी सुचवल्या 5 व्हॅल्यू फंड योजना, SBI सहित मालामाल करणाऱ्या टॉप SIP योजना सेव्ह करा
x

निसर्ग संपन्न केरळात जे शक्य झालं, ते कोकणात अनेक वर्ष का शक्य झालं नाही? राज ठाकरे

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कोकणातील पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचा मेळावा मुंबईमध्ये पार पडला. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी कोकणातील अनेक गंभीर विषयांना हात घातला. त्यावेळी त्यांनी कोकणच्या निसर्गाचा दाखला देताना केरळ राज्यातील पर्यटनाच उदाहरण समोर ठेवलं. जर तिथे इतक्या मोठ्या प्रमाणावर पर्यटन वाढीस लागलं, मग कोकणच्या निसर्गात अशी काय कमी होती, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

केरळ राज्य जितकं निसर्ग संपन्न आहे तेवढीच कोकण भूमी सुद्धा निसर्ग संपन्न असून इथे त्यांच्या इतके पर्यटन का वाढीस आलं नाही. कारण कोकणाबद्दल तसा विचारच करण्यात आला नाही आणि त्यामुळेच केरळात जे शक्य झालं ते कोकणात आजही शक्य झालं नाही. अॅमेझॉननंतर कोकणच्या सह्याद्री पर्वतरांगेत सर्वात मोठी जैवविविधता आहे. त्यामुळे त्याच महत्त्व सामाजिक संस्थांनाही कळू लागल्याने, त्यांनी या संदर्भात सखोल अभ्यास सुरु केला आहे. पण दुर्दैवाने सर्वच राजकीय पक्षांनी कोकणाकडे नेहमी दुर्लक्ष केले आहे असा घणाघात सुद्धा राज ठाकरे यांनी केला.

केवळ निसर्गाला विध्वसंक प्रकल्प कोकणात आणण्याचे विद्यमान सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. तुमच्या जमिनी बळकावण्याचे परप्रांतियांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, तुम्ही तुमच्या जमिनी कृपया देऊ नका, कारण तुमच्या जमिनी तुम्ही त्यांना विकल्या तर तुमची ओळखच कायमची पुसली जाईल. त्यामुळे कोकणी माणसाने सावध राहायला हवं, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

मनसे अध्यक्षांनी मेळाव्याचे भाषण सुरू करण्यापूर्वी आंबेनळी दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून आणि कोकणातील रस्त्यांच्या दुर्दशेवरून राज्य सरकारवर कडाडून टीका केली.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x