महत्वाच्या बातम्या
-
ट्रम्प यांचा मोदी सरकारला झटका; 'व्यापार संधी' तोडली
अमेरिकेने भारत आणि तुर्कस्तानशी असलेली व्यापार संधी (GSP) तोडली असून विशेष व्यापारी सूट देण्याचा दर्जा काढून घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज सिनेटमध्ये ही अधिकृत माहिती दिली. ट्रम्प यांच्या या निर्णयाचा मोठा परिणाम भारतावर जाणवणार असून अधिसूचना जारी झाल्यानंतर २ महिन्यांनी हा बदल लागू होणार आहे. GSP अंतर्गत अमेरिकेमध्ये भारताला करासंदर्भात विशेष सूट दिली जात होती. ठराविक रकमेच्या आयात मालावर अमेरिका आयातकर आकारत नव्हती.
6 वर्षांपूर्वी -
अमोल कोल्हेंना शिरूर लोकसभेची आज उमेदवारी जाहीर होणार?
शिरूर लोकसभा मतदारसंघातील भोसरी येथे आज सायंकाळी एनसीपीच्या पक्षाचा मेळावा पार पडत आहे. या मेळाव्यात शिवसेनेतून राष्ट्रवादीतून आलेल्या अमोल कोल्हे यांची शिरूर लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीने शिरूर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रात पक्षाचे मेळावे घेऊन जोरदार वातावरण निर्मिती करण्याचे नियोजन केले आहे. दरम्यान, अमोल कोल्हे यांच्या संभाव्य उमेदवारीने पक्षातील आणखी एक इच्छुक विलास लांडे यांच्या समर्थकांत अस्वस्था पसरली आहे. त्यामुळे कोल्हे यांची उमेदवारी आजच जाहीर होणार की लांडे यांची समजूत काढून उमेदवारीवर शिक्कामोर्तब करणार हे आज स्पष्ट होईल.
6 वर्षांपूर्वी -
भाजप-शिवसेनेने टोप्या लावल्या...शिक्षक भरतीत मराठा समाजाला डावलले
लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी आणि निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू करण्याआधी हवा निर्मितीसाठी मोठा गाजावाजा करत शिक्षक भरतीची घोषणा केली. परंतु त्यात एक धक्कादायक बाब उघड झाली आहे आणि मराठा समाजासाठी म्हणजे ‘सामाजिक आणि आर्थिक मागास प्रवर्गासाठी’ संतापजनक बातमी आहे. कारण राज्यातील तब्बल १७ जिल्हा परिषदांमध्ये मराठा समाजाला एकही जागा राखीव नसल्याचे समोर आलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
राफेल काय साध्य करेल ते भविष्य, पण बोफोर्स तोफांनी कारगिल युद्धात काय साध्य केलं ते पहिलं मोदींनी समजून घ्यावं: नेटिझन्स
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण स्थितीच्या पार्श्वभूमीवर राफेल विमानखरेदीचे समर्थन करताना, ‘आज आपल्याकडे राफेल विमाने असतात, तर आणखी बरेच काही साध्य करता आले असते’, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी एका कार्यक्रमात केले. सातत्याने टीका होत असताना या राफेल लढाऊ विमानांच्या व्यवहाराचे समर्थन करत नरेंद्र मोदींनी त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
6 वर्षांपूर्वी -
लष्कर हे सत्ताधाऱ्यांच्या प्रचाराच साधन नाही, हे सांगण्यासाठी लोकांनीच मोर्चे काढण्याची वेळ आली आहे का?
एअर स्ट्राईकनंतर सत्ताधाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय लष्कर आणि वायुदलाच्या जवानांचे फोटो खुलेआम भाजपच्या झेंड्याखाली लावले जात आहेत. एकूणच भारताच्या इतिहासात लष्कराचा स्वतःच्या राजकारणासाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर उपयोग पहिल्यांदाच होत असावा. परंतु यात भाजपचे कार्यकर्ते ते पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सर्वच सामील असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान ते पाहून आता भाजपवरील लोकांचा संशय धृढ होताना दिसत आहे. त्यामुळे काही दिवसात लोकं रस्त्यावर उतरून भाजपाला समज देताना दिसले नाही तर नवल वाटायला नको.
6 वर्षांपूर्वी -
गुजरातमधील सरदार पटेलांच्या पुतळ्याकरिता CSR निधीचा गैरवापर झाल्याचं उघड
सीएसआर आणि शाश्वत नियोजन या क्षेत्रात काम करणाऱ्या ‘गूडेराया’ कंपनीने प्राप्त केलेल्या तब्बल ९२ कंपन्यांच्या माहितीनुसार राष्ट्रीय वारसा संरक्षण या विषयासाठी २०१६ या आर्थिक वर्षात एकूण ४६.५१ कोटी रुपये खर्च करण्यात आलेले होते. दरम्यान, २०१७ या वर्षात या विषया अंतर्गत होणाऱ्या खर्चात अचानक मोठी वाढ होवून ती रक्कम १५५.७८ कोटी इतकी झालेली दिसते.
6 वर्षांपूर्वी -
अभिनंदन यांनी जी माहिती पाकिस्तानपासून लपवली, ती मोदींनी प्रचारात या राज्यातील फायद्यासाठी उघड केली
पाकिस्तानविरुद्ध कारवाई दरम्यान मिग २१ या लढाऊ विमानाचा अपघात होऊन भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान पॅराशूटच्या साहाय्याने पाकिस्तानच्या हद्दीत उतरल्याने त्यांना पाकिस्तानी लष्कराने ताब्यात घेतलं होतं. मात्र, बहाद्दूर अभिनंदन यांनी पाकिस्तानला स्वतःची किंवा देशाची कोणतीही गोपनीय माहिती दिली नव्हती.
6 वर्षांपूर्वी -
भयंकर! भाजपच्या झेंड्याखाली 'विंग कमांडर अभिनंदन' यांचा फोटोवापरून निवडणुकीचा प्रचार
भारतीय वायूदलाने २६ फेब्रुवारी मंगळवारी पहाटे पाकव्याप्त काश्मीरमधील जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर केलेल्या हल्ला करून दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले आहे. दरम्यान, पाकिस्तानी लढाऊ विमानांवर हल्ल्या करताना विंग कमांडर अभिनंदन यांनी महत्वाची जवाबदारी आणि बहाद्दुरी दाखवली होती. तसेच पाकिस्तानच्या प्रतिऊत्तरात त्याचे मिग २१ लढाऊ विमान कोसळेल, परंतु ते पॅराशूटच्या साहाय्याने खाली आले मात्र दुर्दैवाने पाकिस्तानच्या हद्दीत पडले आणि त्यांना पाकिस्तानी लष्कराने ताब्यात घेतलं.
6 वर्षांपूर्वी -
डिजिटल देशभक्तांचे राज ठाकरे ते वीर पत्नींच्या विरोधात विकृत अभियान: सविस्तर पुरावे
पुलवामामधील भ्याड हल्ल्यादरम्यान सीआरपीएफचे तब्बल ४४ जवान शहीद झाले . त्यानंतर भारतीय वायुदलाने दहशदवाद्यांच्या विरोधात केलेल्या एअर स्ट्राईकनंतर देशातील आणि आंतरराष्ट्रीय वातावरण ढवळून निघालं आहे. वायुदल, लष्कर किंवा नौदल असो त्यांच्या शौर्यावर कोणत्याही भारतीयाला शंका नाही. परंतु, विषय येतो आहे तो सत्ताधाऱ्यांच्या विकृत समर्थकांनी राबवलेल्या विकृत अभियानाचा आणि काही ठराविक लोकांविरोधात ठरवून आणि तयारीनिशी राबविलेल्या अभियानाचा.
6 वर्षांपूर्वी -
शौर्य डोवल, पाकिस्तानी बिझनेस पार्टनर सय्यद अली अब्बास, ते RSS व भाजप कनेक्शन
‘द वायरने’ काही महिन्यांपूर्वी देशाचे पाचवे आणि विद्यमान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांचे पुत्र शौर्य डोवल यांच्या व्यवसायांविषयी भारतीयांना सविस्तर माहिती देणार वृत्त प्रसिद्ध केलं होतं. मात्र, देशातील पेड आणि सत्ताधारी धार्जिण्या प्रसार माध्यमांच्या वादळात ते हवेतच लुप्त झालं आणि भारतीय नागरिकांकडे ते पोहचू शकलं नाही किंवा पोहोचणार नाही याचीच दक्षता घेतली गेली असावी. देशाच्या राजकारणात अजित डोवाल हे पहिले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असावे ज्यांचा समाज माध्यमांवर अप्रत्यक्षपणे प्रचार सत्ताधाऱ्यांच्या समर्थकांनीच करून त्यांना भारताचे जेम्स बॉण्ड अशी पदवी देखील बहाल केली आणि वास्तविक ते एक निवृत्त आयपीएस अधिकारी आहेत. परंतु असं काय झालं की त्यांच्यासाठी भाजप सत्ताधाऱ्यांचा आयटी सेल नेहमीच कार्यरत असतो आणि समाज माध्यमांवरून त्यांच्याबद्दल बातम्या पेरण्याचं काम करत असतो.
6 वर्षांपूर्वी -
नाणारवासियांच्या व विरोधकांच्या लढ्याला यश, रिफायनरी प्रकल्प अखेर रद्द
विरोधी पक्ष आणि स्थानिक नागरिकांसह संपूर्ण कोकणातून जोरदार विरोध होत असलेला नाणार रिफायनरी प्रकल्प अखेर रद्द करण्यात आला आहे. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणार प्रकल्प रद्द करण्याची आज अधिकृत घोषणा केली आहे. तसेच या प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या जमिनी शेतकऱ्यांना परत करण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदी म्हणतात २६/११च्या हल्ल्यानंतर काय केलं? बहुतेक मोदींना नौदल, NSG कमांडो व मुंबई पोलिसांच्या शौर्याचा विसर?
भारतीय हवाई दलाने २६ फेब्रुवारी रोजी पहाटे पाक व्याप्त काश्मीरमध्ये एअरस्ट्राइक करून बालाकोट येथील जैश ए मोहम्मदचा तळ उद्ध्वस्त केले होते. दरम्यान, सदर कारवाईत भारतीय प्रसार माध्यमांनी संरक्षण, परराष्ट्र व्यवहार किंवा भारतीय लष्कराकडून कोणतीही अधिकृत माहिती प्रसिद्ध केली नसताना स्वतःच निरनिराळी आकडेवारी जाहीर करण्याची स्पर्धा लावली होती.
6 वर्षांपूर्वी -
लष्कराच्या जीवावर स्वतःचा प्रचार करणाऱ्या मोदींना भारताने पाकिस्तानविरुद्ध २ युद्ध जिंकल्याचा विसर?
भारतीय हवाई दलाने २६ फेब्रुवारी रोजी पहाटे पाक व्याप्त काश्मीरमध्ये एअरस्ट्राइक करून बालाकोट येथील जैश ए मोहम्मदचा तळ उद्ध्वस्त केले होते. दरम्यान, सदर कारवाईत भारतीय प्रसार माध्यमांनी संरक्षण, परराष्ट्र व्यवहार किंवा भारतीय लष्कराकडून कोणतीही अधिकृत माहिती प्रसिद्ध केली नसताना स्वतःच निरनिराळी आकडेवारी जाहीर करण्याची स्पर्धा लावली होती.
6 वर्षांपूर्वी -
रावसाहेब दानवेंना पैशांची मस्ती आलीये, बच्चू कडू संतापले
रावसाहेब दानवेंना पैशांची मस्ती आली आहे आणि आपण काय बोलतो आहोत हे त्यांना कळत नाही, अशा कठोर शब्दात आमदार बच्चू कडू यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली आहे. दानवे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष कसे आहेत? तेच मला कळत नाही. त्यांना या निवडणुकीत आपण उत्तर जरूर देणार…, असं कडू म्हणाले. शेतकऱ्यांसाठी चुकीची भाषा वापरूनही त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. आपण काय बोलावं याचं भान असलं पाहिजे, असंही बच्चू कडू यावेळी म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे म्हणाले होते निवडणुकीआधी असं काहीतरी घडेल - शरद पवार
२४ फेब्रुवारी रोजी “महाहिट २४ मराठी” या नवीन वृत्तवाहिनीच्या उदघाटन समारंभाला राज ठाकरे उपस्थित होते. कोल्हापूर येथे झालेल्या या वाहिनीच्या उदघाटन समारंभात राज ठाकरेंनी उपस्थितांना संबोधित करताना सध्याचं सरकार काय गैरप्रकार करत आहे याची उजळणी करून दिली. आणि या बातमीचा दाखला देत पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले “राज ठाकरे म्हणाले होते निवडणुकीआधी असं काहीतरी घडेल” आणि आता तसंच काहीसं घडलं आहे म्हणून त्यांनी केलेलं भाकित गंभीरतेने घ्यायला हवं.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: तुलसी जोशींचा दणका; शिवसैनिकाचे पैसे बिल्डरने परत केले, शिवसैनिकाने मानले राज ठाकरेंचे आभार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पालघरचे कार्यकर्ते आणि राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक तुलसी जोशी हे शक्य असलेल्या मदतीसाठी सामान्य मराठी माणसाला कधीच नाही बोलप्रत्येक त नाहीत, याची अनेक उदाहरणं प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी पाहिली आहेत. परंतु विषय आर्थिक अडचणीत सापडलेल्या शिवसैनिक आणि त्यांच्या सामान्य कुटुंबियांशी संबंधित असल्याने विषयाला वेगळेच महत्व प्राप्त होते.
6 वर्षांपूर्वी -
पवारांच्या गाडीच्या मागे धावणारे आज पवारांच्या ताफ्यात सामील, शिवबंधन तोडले
“स्वराज्य रक्षक संभाजी महाराज” फेम आणि जुने “छत्रपती शिवाजी महाराज” म्हणून माहित असलेले अमोल कोल्हे राष्ट्रवादीत दाखल. आज त्यांनी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. २०१४ च्या निवडणुकीत ते शिवसेनेचे स्टार प्रचारक होते, आणि आता शिवसेनेच्या दुटप्पी धोरणांना कंटाळून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.
6 वर्षांपूर्वी -
जमली नाही गर्दी म्हणून सभा लवकर आटोपली... रावसाहेब दानवेंना कार्यकर्त्यांची पाठ
#ApnaBoothSabseMajboot भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत सांगलीमध्ये भाजपचा संवाद संघटन मेळावा होणार होता. मात्र अमित शहांच्या अनुपस्थितीमुळे नाराज झालेले भाजप कार्यकर्ते व बुथ प्रमुखांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित असतानादेखील मेळाव्याकडे पाठ फिरवली. खासदार, चार आमदार, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समित्या आदी असूनदेखील जाहीर केल्याप्रमाणे पाच हजार कार्यकर्तेदेखील भाजप नेत्यांना जमा करता आले नाहीत. मोकळ्या खुर्च्या पाहून प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी आपले भाषण आटोपते घेत काढता पाय घेतला.
6 वर्षांपूर्वी -
अफझल खान सरकारला अजून ५ वर्ष देऊन बघू - उद्धव ठाकरे एवढे का नरमले?
स्वतःला शिव-शंभूंचे अवतार मानून अफझल खानाचा कोथळा बाहेर काढण्याची भाषा करणारे पूर्वीचे उद्धव ठाकरे आणि सध्या भाजपच्या हातात हात घालून त्यांचे गोडवे गाणारे उद्धव ठाकरे हे मराठी माणसांना रुचण्यासारखं नक्कीच नाही. उद्धव ठाकरेंनी युतीची घोषणा करताच भाजप पुढे शड्डू ठोकून उभा असलेला सामान्य शिवसैनिक मात्र मातोश्री आदेशानंतर बुचकाळ्यात पडला आहे. सामान्य शिवसैनिकांना बाळासाहेबांची शपथ देऊन आणि वचन घेऊन उद्धव ठाकरेंनी स्वबळाचा शंख वाजवला खरा परंतु असे काय नेमके घडले कि त्यांना भाजप सोबत युती करावी लागली?
6 वर्षांपूर्वी -
शिवसेनेला धक्का, अमोल कोल्हे राष्ट्रवादीच्या वाटेवर, शिवाजीराव आढळराव पाटील यांचा मार्ग खडतर?
छत्रपती संभाजी राजेंची भूमिका साकारून घराघरात पोहचलेले अभिनेते अमोल कोल्हे हे शिवसेना सोडून एनसीपीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत अमोल कोल्हे यांचा आज पक्षप्रवेश होणार असल्याची वृत्त आहे. असं झाल्यास हा शिवसेनेसाठी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर एक मोठा धक्का आहे असंच मानलं जातं आहे. तसेच शिवसेनेचे शिरूरचे विद्यमान खासदार आढळराव पाटील यांचा मार्ग खडतर झाला आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN