29 April 2024 1:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत PSU Stocks | हा PSU शेअर बंपर तेजीत वाढणार, 2 महिन्यात होईल मोठी कमाई, काय म्हटलं तज्ज्ञांनी? IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर्स 30 दिवसात मोठी परतावा देणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर IREDA Share Price | IREDA शेअर्स खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडले, कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, फायदा घेणार? Smart Investment | स्मार्ट इन्व्हेस्टमेंट! दर महिन्याला 5-10-15 हजार रुपये गुंतवून तुम्ही 1 कोटी रुपये मिळवू शकता HDFC Mutual Fund | सुवर्ण संधी! HDFC म्युच्युअल फंडाची नवी योजना लाँच, 100 रुपयांपासून करा गुंतवणूक
x

काल जे घडले ते राज्याच्या परंपरेला लाजिरवाणी घटना होती | आरडाओरड करणे ही लोकशाही नाही

CM Uddhav Thackeray

मुंबई, ०६ जुलै | विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली. आज अधिवेशनाचा अखेरचा दिवस होता. दरम्यान पहिल्याच दिवशी अधिवेशनाच प्रचंड गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विधी मंडळात अभुतपूर्वी गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. सत्ताधारी आणि विरोधीपक्षाचे आमदार हे समोरासमोर आल्याचे पाहायला मिळाले. तसेच अध्यक्षांच्या दालनात पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांना शिवीगाळ आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपच्या 12 आमदारांना एका वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. तर याचा परीणाम म्हणून दुसऱ्या दिवशी निषेध व्यक्त करत भाजपने सभागृहा बाहेर प्रतिविधानसभा भरवली. या सर्व घडामोडींवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत भाष्य केले आहे.

काल जे घडले तेर लाजिरवाणे:
मुख्यमंत्री म्हणाले की, ‘काल जे काही घडले आहे, हे कितीही कुणी काही म्हटले तरी महाराष्ट्राच्या परंपरेला लाजिरवाणी घटना होती. आपली ही संस्कृती नाही, ही आपली परंपरा नाही. सध्या जे काही सुरू आहे. ते बघितल्यांतर एकूण कामकाजाचा दर्जा हा उंचावण्याकडे आपला कल आहे, की खालवण्याकडे आहे? असा प्रश्न पडत आहे? पण मी नक्कीच म्हणेन की दर्जा खालावत चाललेला आहे’

आरडाओरडा करणे ही लोकशाही नाही
भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनावरुन मुख्यमंत्री म्हणाले की, आमच्या 12 आमदारांची नियुक्ती केली नाही. म्हणून त्यांच्या 12 आमदारांना निलंबित केले असे बोलले जात आहे. मात्र असे नाही आम्ही हे ठरवून केलेले नाही. तसेच आम्ही त्यांना टोचले नव्हते त्यांनीच ते केले. आरडाओरड करणे ही लोकशाही नाही. आरडाओरड करणे हे आरोग्यदायी लोकशाहीचे लक्षण नाही.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Chief Minister Uddhav Thackeray criticizes Leader of Opposition Devendra Fadnavis news updates.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x