15 May 2024 8:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 16 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांकडून टाटा पॉवर शेअर्ससाठी 'बाय' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस केली जाहीर
x

मोदींच्या आर्थिक सल्लागार आशिमा गोयल यांच्याकडून आत्मनिर्भर पॅकेजवर प्रश्नचिन्ह

Atmanirbhar Bharat, Ashima Goyal

नवी दिल्ली, १४ जून: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वावलंबी भारत अभियानाची घोषणा करताना त्यासाठी २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी संवाद साधत या पॅकेजची घोषणा केली होती. नरेंद्र मोदींनी सांगितलं होते की, “हे पॅकेज स्वावलंबी भारत अभियानाचा महत्त्वाचा भाग आहे. आतापर्यंत जाहीर करण्यात आलेली आर्थिक मदत आणि हे पॅकेज एकत्र मिळून २० लाख कोटींचं आहे. २०२० मध्ये जाहीर करण्यात आलेलं हे २० कोटींचं पॅकेज स्वावलंबी योजनेला नवी गती देईल”. हे पॅकेज जीडीपीच्या १० टक्के असल्याचंही नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं होतं.

भारत जेव्हा स्वावलंबी होण्याची गोष्ट करतो, तेव्हा त्याची वकीली करत नाही. जी संस्कृती जगाचा विकास करू इच्छिते. जगाला घर मानते. भारताच्या कामाचा प्रभाव जगाच्या कल्याणावर पडतो. टीबी असेल, हागणदारी मुक्ती असेल जगावर त्याचा परिणाम झाला आहे. तणावातून मुक्ती देण्यासाठी भारताकडून जगाला भेट मिळाली आहे. जगाला विश्वास वाटू लागला आहे, भारत काही चांगले करू शकतो. पण प्रश्न आहे कसा? यावर उत्तर आहे १३५ कोटी लोकांनी केलेला स्वावलंबीपणाचा संकल्प यावर उत्तर आहे, असे मोदी म्हणाले होते.

या पॅकेजबाबतची विस्तृत माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण दिली होती. मात्र, या पॅकेजवर विविध स्तरांतून टीका होत आहे. यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार परिषद सदस्य आशिमा गोयल यांनीही या आत्मनिर्भर पॅकेजवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. तसेच, या पॅकेजमध्ये आणखी सुधारणा केली जाऊ शकते, असे त्यांनी म्हटले आहे.

‘पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’च्या एका व्हर्च्युअल बैठकीत आशिमा गोयल बोलत होत्या. यावेळी अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने मागणीला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे सांगितले. ‘आर्थिक पॅकेज परिपूर्ण नाही. पॅकेजमध्ये अनेक त्रुटी आहेत. त्या दूर करून या पॅकेजमध्ये आणखी सुधारणा करता येऊ शकते’, असे आशिमा गोयल यांनी म्हटले आहे.

 

News English Summary: The Atmanirbhar Bharat package is being criticized from various levels. Ashima Goyal, now a member of Prime Minister Narendra Modi’s Economic Advisory Council, has also questioned the self-reliance package. Also, further improvements can be made to this package, he said.

News English Title: Ashima Goyal a member of Prime Minister Narendra Modi Economic Advisory Council has also questioned the Atmanirbhar Bharat package News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x