महत्वाच्या बातम्या
-
अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक जाहीर, शिवसेनेचं चिन्हं तात्पुरतं गोठवलं जाण्याच्या शक्यतेने शिंदे पराभवाला घाबरून भाजपसाठी जागा सोडणार?
Mumbai Andheri East Assembly By Poll Election | मुंबईतील शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा जागेवरील पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. इथे 3 नोव्हेंबरला मतदान आणि 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर जाहीर झालेली ही पहिलीच चिन्हावरील निवडणूक आहे. त्यामुळे ठाकरे विरुद्ध शिंदे लढाईत आता शिवसेनेच्या चिन्हाचे काय होणार याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.
2 वर्षांपूर्वी -
शिंदे समर्थक अपक्ष आमदार फडणवीसांसोबत भाजपच्या मेळाव्यात उपस्थित, शिंदे गटाचं राजकीय भवितव्य दिसू लागलंय?
CM Eknath Shinde | शिंदे गटात सामील व्हा, अन्यथा तडीपार करून तुमचा एन्काऊंटर करू, अशी धमकी परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी नगरसेवक एम. के. मढवी केला आहे. तसेच आपल्याकडे 10 लाख रुपयांची मागणी करण्यात आली असल्याचा आरोपही त्यांनी केला. वाशीतील शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये मढवी बोलत होते. ठाण्याचे शिवसेना खासदार राजन विचारे आणि जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे हेही यावेळी उपस्थित होते. एकाबाजूला उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले पदाधिकारी स्वतःकडे खेचण्यासाठी सर्वशक्ती पणाला लावली जातं असताना दुसरीकडे शिंदे गटातील आमदार भाजप गळाला लावतंय अशी चर्चा सुरु झाली आहे. कारण आता शिंदे गटातीलच आमदाराने भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. त्यामुळे शिंदे गटातील आमदार भाजपमध्ये दाखल होणार का, अशी चर्चा रंगली आहे.
2 वर्षांपूर्वी -
50 Khoke Ekdam Ok | शिंदे आपल्या समर्थक आमदारांना कानात 50 खोके घेतले आहेत ना, मग कशाला हवं मंत्रीपद? असं सांगतात
CM Eknath Shinde | शिवसेनेतले आमदार फुटले. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली बंडखोर आमदार गुवाहाटीला गेले. त्यानंतर सत्ता स्थापन झाली आणि बंडखोर आमदारांना शिवसेनेकडून गद्दार संबोधलं गेलं. इतकंच नाही, तर ५० खोके घेतल्याचा आरोपही शिंदे गटातल्या आमदारांवर सातत्यानं होतोय.
2 वर्षांपूर्वी -
दसरा मेळाव्यापूर्वी शिंदे गटाचे स्क्रिप्टेड 'राजकीय वरळी इव्हेन्ट' जोमात?, विषय होता काय आणि माध्यमांकडे मांडला कसा? - सविस्तर वृत्त
CM Eknath Shinde | मुंबईतील वरळी हा आदित्य ठाकरे यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघातून विजयी झाले होते. मात्र त्यांना याच मतदारसंघात मोठा धक्का बसल्याचा बातम्या पेरल्या जातं असल्या तरी संपूर्ण वास्तव वेगळं आहे. २-३- दिवसांवर आलेल्या दसरा मेळाव्यापूर्वी ब्रेकिंग न्यूज पेरण्याची शिंदे गटाने योजना आखली आहे आणि त्यासाठी प्रथम आदित्य ठाकरेंना केंद्रस्थानी ठेवण्यात आलं आहे. ‘५० खोके एकदम ओके’ ही टॅगलाईन राज्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंनी उचलून धरली आणि ती टॅगलाईन घराघरात पोहोचली आहे. तसेच काल २ दिवसांपूर्वी शिंदे गटातील नेत्यांनी स्वतःच्या मुलांची वर्णी लावून ‘युवा सेना’ पदाधिकाऱ्यांची नेमणूका जाहीर केल्या आहेत. काही क्षणातच ती ‘चिरंजीव सेना’ असल्याच्या बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या होत्या. आता राज्यातील युवासेनेवर ‘मानसिक राजकीय दबाव’ वाढवण्यासाठी वरळी मतदारसंघाच्या नावाने राजकीय पेरण्या सुरु केल्या आहेत.
2 वर्षांपूर्वी -
'५० खोके एकदम ओके' घराघरात प्रसिद्ध झाल्यानंतर शिंदे गटातील नेते बावचळले?, बेछूट आरोपांना सुरुवात, तथ्य काय समजून घ्या
CM Eknath Shinde | १०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणामध्ये जून महिन्यात सीबीआयने अनिल देशमुख यांच्याबरोबरच त्यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे, संदीप पलांडे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं. मात्र सरकारी कर्मचारी किंवा कोणत्याही मंत्र्याविरुद्ध न्यायालयीन खटला चालवण्यासाठी राज्यामध्ये सत्तेत असणाऱ्या सरकारकडून सॅन्क्शन ऑफ प्रॉसिक्युशनची आवश्यकता असते. महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर शिंदे सरकारने सॅन्क्शन ऑफ प्रॉसिक्युशनची परवानगी दिली होती.
2 वर्षांपूर्वी -
गौप्यस्फोट! गृहमंत्रीपदासह उपमुख्यमंत्रीपद द्यावं म्हणून एकनाथ शिंदे दिल्लीत काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांना भेटले होते
CM Eknath Shinde | ‘काँग्रेस-राष्ट्रवादीवर शिंदे आज टीका करतात, पण महाराष्ट्रात पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना शिंदे यांनी दिल्लीत काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांच्याशी संधान बांधले होते. 15 ते 20 आमदारांसह ‘येतो’, गृहमंत्रिपदासह उपमुख्यमंत्रिपद द्या ही चर्चा त्यांनी सुरू केली होती’ असा गौप्यस्फोट शिवसेनेनं केला आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे. याच मुद्यावरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.
2 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंनी तो निर्णय का घेतला? शिंदे गटातील नेत्याने केली होती फडणवीसांची पोलखोल, गुलाबराव पाटलांनी थेट मोदींकडे तक्रार केली होती
Gulabrao Patil Video | यावर्षी शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन दसरा मेळावे पार पडत आहेत. शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचा मेळावा पार पडणार आहे. तर बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मेळावा पार पडणार आहे. आपलाच दसरा मेळावा कसा बरोबर आहे हे सांगण्यासाठी दोन्ही गट प्रयत्न करत आहेत. आता शिंदे गटाने उद्धव ठाकरेंना त्यांच्याच काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधी वक्तव्यांची आठवण करून देत विसर न व्हावा कँपेन सुरू केलं आहे.
2 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंवर आरोप, पण शिंदे गटाच्या युवा सेनेत घराणेशाही, कार्यकारिणीत आमदार-मंत्र्यांच्या मुलांमुळे शिंदे गट 'प्रायव्हेट लिमिटेड' झाला
CM Eknath Shinde | एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेना चांगलीच अडचणीत सापडली आहे. शिवसेना पक्षावर दावा केल्यानंतर आता शिंदे गटाचं पुढचं लक्ष्य आदित्य ठाकरे यांची युवा सेना आहे. याचाच भाग म्हणून एकनाथ शिंदे गटाने युवासेनेच्या कार्यकारिणीची घोषणा केली आहे. मुख्य म्हणजे आदित्य ठाकरेंसोबत काम करणाऱ्यांनाच शिंदेंच्या युवासेनेच्या कार्यकारिणीमध्ये जबाबदारी देण्यात आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
रमेश वाळूंज यांची पत्नी कल्पना वाळूंज यांनी आशिष शेलार आणि भाजपची पोलखोल केली, भाजपने मुंबईकरांना खोटी माहिती दिली
MLA Ashish Shelar | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत झालेल्या शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवरही जोरदार निशाणा साधला होता. मुंबईवर जेव्हा संकटं येतात तेव्हा शिवसैनिक रस्त्यावर असतो, पण भाजपवाले कुठे असतात? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला होता. 26 जुलैचा पूर असो किंवा 26/11 चा हल्ला संकटाच्या काळात शिवसैनिक रस्त्यावर येतो आणि मुंबईकरांची मदत करतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला आता भाजपने प्रत्युत्तर दिलं होतं. भाजप नेते आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता.
2 वर्षांपूर्वी -
शिंदे गटाला धक्का, पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांचा शिवसेनेत प्रवेश, राज्यात बंजारा समाजाचा 2 कोटी मतदार
Shivsena Uddhav Thackeray | पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी हाती शिवबंधन बांधलं आहे. उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानी जात त्यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे शेकडो समर्थक उपस्थित होते. या समर्थकांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिंदेगटाचे आमदार आणि मंत्री संजय राठोड हे बंजारा समाजातून येतात. या समाजाचा राठोड यांना पाठिंबा आहे. पण आता पोहरादेवीच्या महंतांनीच शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे संजय राठोड यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत.
2 वर्षांपूर्वी -
VIDEO | दसरा मेळावा, मुंबईतील शिवतीर्थावर स्व. बाळासाहेबांच्या निष्ठावंत शिवसैनिकांचा सागर उसळणार, शिवसेनेचा टीझर व्हायरल
Shivsena Uddhav Thackeray | मुंबई शिवाजीपार्क येथील शिवसेना दसरा मेळाव्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करण्याचाही शिवसेनेचा मानस आहे. यासाठी राज्याच्या विविध भागांमधून कार्यकर्ते आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खाजगी चार चाकी गाड्यांचे बुकिंग केले जात आहे. याशिवाय खाजगी बसेसचही हजारोंच्या संख्येने आरक्षण करण्यात आले आहे.
2 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादी शिवसेना संपवतेय असा आरोप, पण मुख्यमंत्री शिंदे भाजपाच्या सांगण्यावर शिवसेना संपवत आहेत?, ओवळा-माजीवडा सुद्धा भाजपकडे?
MLA Pratap Sarnaik | शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या जागेसाठी लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. यासाठी आम्हीच खरी शिवसेना म्हणणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने दावा सांगितला होता, मात्र भाजपने ही जागा हिसकावत शिंदे गटाला धोबीपछाड दिली आहे. विशेष म्हणजे भाजपसमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं चालत नसल्याचं वृत्त आहे. अंधेरी पूर्वेची ही जागा भाजपकडून विवादित माजी नगरसेवक मुरजी पटेल यांना जाहीर करण्यात आली असून तशी पोश्टरबाजी मतदारसंघात सुरु झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
शिंदे गटाची पोलखोल गुजरात निवडणुक प्रचारात, महाराष्ट्रात भाजपने आमदार विकत घेतल्याचा केजरीवाल यांचा थेट प्रचार सभांमधून आरोप
CM Arvind Kejrival | सध्या राज्यात ‘५० खोके एकदम ओके’ ही घोषणा सर्वत्र गाजत आहे. राज्यातील सत्तांतरा नंतर ‘गद्दार’ हा शब्द खूपच चर्चेत आला. त्यानंतर झालेल्या राज्याचा पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी ’50 खोके एकदम ओके’ची घोषणाबाजी करत सरकारला डिवचलं. त्यानतंर हे दोन शब्द महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलेच गाजले. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी गावो गावी आपल्या भाषणात शिंदे गटातल्या आमदारांचा ‘गद्दार’ असा उल्लेख करताच उपस्थित जनसमुदाय ’50 खोके एकदम ओके’ची घोषणाबाजी करू लागतो.
2 वर्षांपूर्वी -
गौप्यस्फोट! त्यावेळी एकनाथ शिंदे 10-15 शिवसेना आमदारांना घेऊन काँग्रेसकडे गेले होते, आ. संजय शिरसाट यांनीचं दिली होती माहिती
MLA Sanjay Sirsat | महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी बुधवारी दावा केला की, सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा समावेश असलेले शिवसेनेचे शिष्टमंडळ भाजप -सेनेचे सरकार असताना युती करण्याचा प्रस्ताव घेऊन त्यांना त्यांच्या मुंबई कार्यालयात भेटायला आले होते.
2 वर्षांपूर्वी -
फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी एकनाथ शिंदेंच काँग्रेसकडे आले होते, अशोक चव्हाण यांनी शिंदेंची राजकीय हवाच काढली
Ashok Chavan | महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेची कोंडी होत आहे. शिवसेनेला निधी मिळत नाही, असा आरोप करीत शिंदे गटाने बंड केले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. मात्र, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी होण्याची शक्याता आहे.
2 वर्षांपूर्वी -
केंद्रीय निवडणूक आयोगाकडे बोगस स्वाक्षऱ्यांचे कागदपत्रं सुद्धा दिली जाऊ शकतात, माजी मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली माहिती
Maharashtra Shivsena Crisis | शिवसेनेच्या 40 आमदारांना सोबत घेत एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं. परंतु, आता शिवसेनाही त्यांच्या ताब्यात येणार का? या प्रश्नाचं उत्तर अजून बाकी आहे. हा निर्णय आता निवडणूक आयोगच देणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाला यापूर्वीच पत्र पाठवले आहे. आपल्या गटालाच शिवसेना पक्ष म्हणून मान्यता देण्यात यावी, अशी मागणी शिंदे गटाकडून जूनमध्ये करण्यात आली होती. शिवसेना कोणाची?’ याबाबतची लढाई आधी सर्वोच्च न्यायालयात होती. ही लढाई आता निवडणूक आयोगाच्या दारात जाऊन पोहोचली आहे. दरम्यान, शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी यापूर्वीच निवडणूक आयोगाकडे कॅव्हेट दाखल केले होते. मात्र या निर्णयाला खूप वेळ लागणार असला तरी दुसऱ्या बाजूला इतर इतर याचिकांवर घटनापीठाकडे दावे-प्रतिदावे होऊन केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयापूर्वीच सुप्रीम कोर्टातून मोठा निर्णय येऊ शकतो असं तज्ज्ञ सांगत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
शिंदे सरकारला सुप्रीम कोर्टाचा धक्का, राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत कुठलाही निर्णय न घेण्याचे आदेश
Maharashtra Political Crisis | मंगळवारी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबतची सुनावणी करण्यास मंजुरी दिली. शिंदे गटाने शिवसेना पक्ष आमचाच असल्याचा दावा करत निवडणूक आयोगात धाव घेतली. तर, दुसऱ्या बाजूला शिंदे गटातील आमदारांची अपात्रता आणि इतर मुद्यांवर सु्नावणी पूर्ण झाल्याशिवाय निवडणूक आयोगाने सुनावणी घेऊ नये अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. मंगळवारी सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने याचिकेवर सुनावणी करताना निवडणूक आयोगास सुनावणी घेण्यास मुभा देण्यात आली. या सुनावणीत शिंदे गट आणि निवडणूक आयोगाच्या वकिलांनी बाजू मांडताना निवडणूक आयोग घटनात्मकदृष्ट्या स्वतंत्र संस्था असल्याचा मुद्दा अधोरेखित केला होता.
2 वर्षांपूर्वी -
बंडखोर आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुनावणी सुरूच राहणार, घटनापीठाच्या नक्की मनात तरी काय?, अनेक अंदाज व्यक्त
Shivsena Crisis in Supreme Court | सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठासमोर आज शिवसेनेच्या चिन्हाबद्दलच्या याचिकांवरील सुनावणी झाली. आधीच्या सुनावणी वेळी सर्वोच्च न्यायालयाने निकाल येईपर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवण्यास सांगितलं होतं. त्यानंतर आज न्यायालयाने प्रक्रिया पुढे नेण्यास संमती दिली.
2 वर्षांपूर्वी -
मुख्य निवडणूक आयोगाला पक्ष चिन्हांबाबतची प्रक्रिया सुरु करण्याला परवानगी, सुप्रीम कोर्ट त्यात हस्तक्षेप करणार नाही
Shivsena Crisis in Supreme Court | सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरेंची याचिका फेटाळली असून शिंदे गटाला मोठा दिलासा दिला आहे. कोर्टाने निवडणूक आयोगाच्या कामकाजात मध्यस्थी करण्यास नकार दिला आहे. यामुळे पक्षचिन्हाबाबत निर्णय घेण्यासाठी निवडणूक आयोगाचा मार्ग मोकळा झाला आहे. आपणच खरी शिवसेना असल्याचा शिंदे गटाचा दावा असून, निवडणूक आयोगाला यासंबंधी निर्णय घेण्यापासून रोखलं जावं अशी उद्दव ठाकरेंच्या वतीने मागणी करण्यात आली होती, ती मागणी सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे.
2 वर्षांपूर्वी -
शिंदे गटाला ठाण्यात धक्का, दोन माजी नगरसेवक शिवसेनेत पुन्हा परतले, शिंदेंच्या कार्यशैलीवर नाराज
Shivsena | उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत आता हळूहळू माजी नगरसेवक परतत असल्याचं दिसून येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कॅम्पमध्ये दाखल झालेले ठाण्यातील दोन माजी नगरसेवक- अंकिता पाटील आणि नरेश मणेरा नुकतेच परतले आहेत. बंडाळीनंतर ठाकरे यांच्या गटाला मुख्यमंत्री शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे येथून प्रथमच पाठिंबा मिळाला आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागून मिळेल 151% परतावा, संधी सोडू नका
- Mobile Recharge Hike | बापरे! कोट्यवधी मोबाइल युजर्सना झटका लागणार! मोबाईल रिचार्ज खर्च 25% वाढणार
- Numerology Horoscope | 14 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक येणार तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस प्राईस
- Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स शेअर्समध्ये घसरण वाढतेय, स्टॉक Hold करावा की Sell?
- NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा
- RVNL Share Price | PSU RVNL शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, किती फायदा?
- Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल
- Bisil Plast Share Price | शेअर प्राईस 3 रुपये! 2 दिवसात 20% परतावा, पैशाचा पाऊस पाडतोय हा स्टॉक
- RVNL Share Price | PSU स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सुसाट धावणार