महत्वाच्या बातम्या
-
कौतुकास्पद! प्रकाश आंबेडकरांनी दत्तक घेतलं सांगलीतील 'ब्रह्मनाळ' गाव
कोल्हापूर आणि सांगलीच्या भीषण पूरस्थितीचा सामना करण्यासाठी राज्यभारातून अनेक हात पुढे येत आहेत. या जिल्ह्यांतील अनेक गावे उध्वस्त झाली आहेत. सांगली जिल्ह्याच्या पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळ हे पूरग्रस्त गाव वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दत्तक घेतलं आहे. ब्रम्हनाळ गावात पुराचे पाणी घुसलेले असताना बचावकार्यादरम्यान बोट पाण्यात उलटुन १४ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला त्यामुळे या गावावर मोठी शोककळा पसरली आहे. ३५०० लोकसंख्या असलेल्या या गावाचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे.
5 वर्षांपूर्वी -
पूरग्रस्त व रूग्णांच्या भेटी घेताना गिरीश महाजन पुरग्रस्तांच्या अंथरुणावर शूज घालून
दोन दिवसांपूर्वी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करण्याआधी जात असलेल्या बोटीतून हसत सेल्फी व्हिडीओ काढल्याने अनेकांनी त्यांच्यावर टीका केली होती. पुराचं कोणतंही गांभीर्य मंत्र्यांना नाही अशी टीका झाल्यानंतर गिरीश महाजन यांनी सांगलीत पाण्यात उतरुन पुन्हा मार्केटिंग केलं. मात्र बोलण्याच्या ओघात ट्विटमध्ये संबंधित गावातील लोकांना ४ दिवस कोणतीही शासकीय मदत मिळाली नव्हती अशी माहिती देताना अप्रत्यक्षपणे सरकार ४ दिवस झोपल्याचे सिद्ध केले होते. त्यात कोल्हापूरमधील शोबाजीवरून विरोधकांनी आणि नेटकऱ्यांनी चांगलेच फैलावर घेतल्याने त्यांना सांगलीत उपरती आली असेच दिसले.
5 वर्षांपूर्वी -
संवेदनशील नाना पूरग्रस्तांना ५०० घरं बांधून देणार
सांगली आणि कोल्हापूरातील भीषण पूरस्थितीचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र पुढे सरसावला आहे. त्यामध्ये, स्थानिक कोल्हापूर आणि सांगलीतील नेते, सामाजिक संघटना, समाजसेवक यांसह अनेकांनी मदतीसाठी स्वत:ला झोकून देऊन काम केले. कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीला संवेदनशील अभिनेता नाना पाटेकरही धावला आहे. नाना आज कोल्हापुरातील 5 गावांना भेटी देणार असून तेथे मदतकार्य करत आहे.
5 वर्षांपूर्वी -
संकटकाळात निवडणुकांची चर्चा कशाला म्हणणाऱ्यांकडून महापौर-उपमहापौरांच्या निवडणुकीला मुदतवाढ
सध्या राज्यावर पुराचे संकट असताना निवडणुकांची चर्चा कशाला असा सवाल करत पूरग्रस्तांना मदत पोहोचवण्याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. त्यावेळी त्यांच्या अप्रत्यक्ष रोख हा राज ठाकरे यांचावर होता.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीसांनी उंटावरून शेळ्या राखणे बंद करावं: रुपाली चाकणकर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पूरस्थितीपेक्षा महाजनादेश यात्रेची काळजी आहे, मागील पाच वर्षात जनतेच्या हिताचे निर्णय घेतले असते तर आज यात्रा काढण्याची गरज पडली नसती. सरकार पूरस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले असून मुख्यमंत्र्यांनी उंटावरून शेळ्या राखणे बंद करावे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मनसे नवी मुंबई-पालघर शाखांकडून जीवनावश्यक वस्तूंचे ट्रक सांगली-कोल्हापूरच्या दिशेने रवाना
कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. त्यात सांगलीतील बचावकार्यात तब्बल १६ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुःखद घटना देखील घडली. लाखो लोकांचे घरदार आणि संपूर्ण संसाराचं उध्वस्त झाले आहेत. दरम्यान, मदतीचा ओघ संपूर्ण राज्यातून सुरु झाला आहे तर दुसऱ्याबाजूला उशिरा का होईना, पण प्रशासनाकडून बचाव कार्य देखील युद्धपातळीवर सुरु असून, त्यात अनेक स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक तरुणांचा सहभाग लक्षणीय आहे.
5 वर्षांपूर्वी -
शर्मिला राज ठाकरे आज सांगली-कोल्हापूर पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर
सतत पडणाऱ्या पावसामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांना पूर आल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. तसेच नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. तसेच या पूरग्रस्तांसाठी सरकार सर्वतोपरी मदत करताना दिसत आहे. तसेच पूरग्रस्त भागाच्या विकासासाठी विविध सामाजिक संस्थांनीही पुढाकार घेतलेला दिसत आहे.
5 वर्षांपूर्वी -
कल्याण शहर घोषणेचे ६५०० कोटी ५ वर्ष वेटिंगवर; आता पूरग्रस्तांसाठी ६,८०० कोटींची घोषणा
पूरग्रस्त भागांसाठी केंद्र सरकारने ६ हजार कोटींची मदत द्यावी अशी मागणी राज्य सरकारने केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस यांनी दिली आहे. मुंबईतल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. कोल्हापूर, सांगली आणि सातारा अशा एका भागाला एक भाग असेल. तर दुसरा भाग कोकण, नाशिक आणि उर्वरित महाराष्ट्राचा दुसरा भाग असेल. कोल्हापूर, सांगली, सातारा यासाठी ४७०० कोटी तर उर्वरित भागांसाठी २१०० कोटींची मदत मागितली आहे असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
5 वर्षांपूर्वी -
वंचित आघाडीचं निवडणूक चिन्ह 'गॅस सिलेंडर'; विधानसभेत तरी शेगडी पेटणार का?
लोकसभा निवडणुकीत कपबशी या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या वंचित बहुजन आघाडीची कपबशी औरंगाबाद वगळता सर्वच मतदार संघात फुटली होती. मात्र त्यानंतर देखील प्रकाश आंबेडकरांनी त्याच निवडणूक चिन्हासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. त्याच अनुषंगाने त्यांनी प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांना देखील विनंती केली होती. मात्र नवं चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवणे अत्यंत कठीण काम असल्याने तो संवाद पूर्णत्वास जाऊ शकला नव्हता.
5 वर्षांपूर्वी -
पूरग्रस्त संकटातून बाहेर आले नसताना फडणवीसांच्या 'महा इव्हेन्ट' यात्रा सुरु होणार
कोल्हापूर, सांगलीतील पूर आता ओसरू लागला असला, तरी तेथील जनजीवन अजून पूर्ववत झालेले नाही. पुराच्या पाण्यासोबत शेकडो संसार वाहून गेले आहेत. अन्नधान्य, भांडीकुंडी, कपडे, शैक्षणिक साहित्य यांची वाताहत झाली आहे. प्रसारमाध्यमांतून दाखवले जाणारे भीषण वास्तव पाहून मुंबईकरही हेलावला आहे. म्हणूनच मुंबईच्या विविध भागांतून गणेश मंडळे, सार्वजनिक संस्था, समूह, विद्यार्थी संघटना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
नाशिकच्या रस्त्यावर धावणार 'पिंक ऑटो'
शहरातील महिलांना स्वयंपूर्णतेकडे नेण्यासह त्यांना प्रवासात सुरक्षेची हमी देणाऱ्या पिंक रिक्षा नवी दिल्ली, मुंबई, पुण्यानंतर आता नाशिक शहरातील रस्त्यावरही धावणार आहेत. स्थायी समितीच्या माजी सभापती हिमगौरी आहेर-आडके यांच्या महत्वाकांक्षी योजनेला मूर्त स्वरूप आले असून, महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून शहरातील महिलांना रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण व परवाने दिले जाणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
सांगली-कोल्हापूर: सरकारी नोकरीच्या परीक्षा जवळ आल्या अन अभ्यासाची पुस्तकंच वाहून गेली
अलमट्टी धरणामधून साडेचार लाख क्युसेक विसर्ग सुरू झाल्याने कोल्हापुरात दोन फूट पाणी पातळी कमी झाल्याने पूरग्रस्तांना किंचीत दिलासा मिळाला आहे. पूरग्रस्तांसाठी ६० हून अधिक स्वयंसेवी संस्था कार्यरत असून मदतीचा प्रचंड ओघ सुरू झाला आहे. तशीच सांगलीमध्ये परिस्थिती आहे. मदतकार्याचा धडाका सुरू असला तरी, पूरस्थिती अद्यापही आटोक्यात येण्यास वेळ लागणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
सांगली-कोल्हापूर: पुरग्रस्तांचे संसार, महत्वाची कागदपत्रं आणि मुलांची पुस्तकं सगळंच गेलं
अलमट्टी धरणामधून साडेचार लाख क्युसेक विसर्ग सुरू झाल्याने कोल्हापुरात दोन फूट पाणी पातळी कमी झाल्याने पूरग्रस्तांना किंचीत दिलासा मिळाला आहे. पूरग्रस्तांसाठी ६० हून अधिक स्वयंसेवी संस्था कार्यरत असून मदतीचा प्रचंड ओघ सुरू झाला आहे. तशीच सांगलीमध्ये परिस्थिती आहे. मदतकार्याचा धडाका सुरू असला तरी, पूरस्थिती अद्यापही आटोक्यात येण्यास वेळ लागणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
मनसेकडून जीवनावश्यक वस्तूंचे ६ ट्रक सांगली-कोल्हापूरच्या दिशेने रवाना
कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. त्यात सांगलीतील बचावकार्यात तब्बल १६ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुःखद घटना देखील घडली. लाखो लोकांचे घरदार आणि संपूर्ण संसाराचं उध्वस्त झाले आहेत. दरम्यान, मदतीचा ओघ संपूर्ण राज्यातून सुरु झाला आहे तर दुसऱ्याबाजूला उशिरा का होईना, पण प्रशासनाकडून बचाव कार्य देखील युद्धपातळीवर सुरु असून, त्यात अनेक स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक तरुणांचा सहभाग लक्षणीय आहे.
5 वर्षांपूर्वी -
शिवसेना आदित्य ठाकरे मुख्यमंत्री कसे होणार हे सांगण्यात व्यस्त; पूरग्रस्तांशी देणं-घेणं नाही
राज्यातील पूरपरिस्थितीवरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. त्यांनी शिवसेना पक्ष आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री कसे होणार हे सांगण्यात गुंतला आहे. त्यांना पूरग्रस्तांचं काहीही देणं-घेणं नाहीये अशा शब्दात आदित्य ठाकरेंना लक्ष केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोल्हापूर-सांगलीकरांना सावरायला ६ महिने जातील; त्यांच्यासाठी अधिक वेळ घ्या; निवडणूक पुढे ढकला
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सांगली आणि कोल्हापूरमधील पूर परिस्थितीला अनुसरून प्रसार माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. महत्वाचं म्हणजे त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक पुढे ढकलण्यासाठी थेट निवडणूक आयोगाशी पत्र व्यवहार करणार असल्याची माहिती यावेळी दिली.
5 वर्षांपूर्वी -
भाजप नेत्यांना किती जागा निवडून येणार त्याचा अंदाज अचूक येतो; पण पुराचा नाही ? राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सांगली आणि कोल्हापूरमधील पूर परिस्थितीला अनुसरून प्रसार माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. महत्वाचं म्हणजे त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक पुढे ढकलण्यासाठी थेट निवडणूक आयोगाशी पत्र व्यवहार करणार असल्याची माहिती यावेळी दिली.
5 वर्षांपूर्वी -
म 'मदतीचा' नाही तर म 'मार्केटिंगचा; पुर परीस्थितीत सुद्धा भाजपकडून जाहिरातबाजी
भारतीय जनता पक्ष कोणत्या विषयावर मार्केटिंग आणि जाहिरातबाजी करेल याचा नेम नाही. सांगली आणि कोल्हापूरमधील पूरग्रस्त लोकांच्या मदतीला अनेकजण धावून येत असले तरी सर्वांचं लक्ष हे मदत लवकरात लवकर कशी पोहोचेल यावर आहे. मात्र भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधी सरकारी निधीतील मदतीच्या वस्तूंवर देखील स्वतःचे मार्केटिंग करण्यासाठी खास लेबल छापून ते पाकिटांवर लावण्यावर आधी भर देत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO: घरी होणार नाही अशी चांगली व्यवस्था उपलब्ध करुन देत आहोत: चंद्रकांत पाटील
पावसाने थोडी विश्रांती घेतल्याने कोल्हापूरचा महापूर ओसरण्यास शुक्रवारी सकाळी सुरुवात झाली आहे. जवळपास तीन फूट पाण्याची पातळी कमी झाली आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणीपातळी ५२.११ फूट असून आलमट्टी धरणातूनसुद्धा विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे पूर ओसरायला सुरुवात झाली आहे; परंतु कोल्हापूर, साता-यासह पुण्यात पावसाचा ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. अलमट्टी धरणामधून साडेचार लाख क्युसेक विसर्ग सुरू झाल्याने कोल्हापुरात दोन फूट पाणी पातळी कमी झाल्याने पूरग्रस्तांना किंचीत दिलासा मिळाला आहे. पूरग्रस्तांसाठी ६० हून अधिक स्वयंसेवी संस्था कार्यरत असून मदतीचा प्रचंड ओघ सुरू झाला आहे. याउलट सांगलीमध्ये परिस्थिती आहे. मदतकार्याचा धडाका सुरू असला तरी, पूरस्थिती अद्यापही आटोक्यात येण्याची चिन्हे नाहीत.
5 वर्षांपूर्वी -
कोल्हापूरकरांना दिलासा; मात्र सांगलीत अजूनही भीती कायम
अलमट्टी धरणामधून साडेचार लाख क्युसेक विसर्ग सुरू झाल्याने कोल्हापुरात दोन फूट पाणी पातळी कमी झाल्याने पूरग्रस्तांना किंचीत दिलासा मिळाला आहे. पूरग्रस्तांसाठी ६० हून अधिक स्वयंसेवी संस्था कार्यरत असून मदतीचा प्रचंड ओघ सुरू झाला आहे. याउलट सांगलीमध्ये परिस्थिती आहे. मदतकार्याचा धडाका सुरू असला तरी, पूरस्थिती अद्यापही आटोक्यात येण्याची चिन्हे नाहीत.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स शेअर्समध्ये घसरण वाढतेय, स्टॉक Hold करावा की Sell?
- Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल
- Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर मजबूत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हलसहित टार्गेट प्राईस जाहीर
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे टॉप 5 शेअर्स मालामाल करणार, अल्पावधीत तगडा परतावा मिळेल
- RVNL Share Price | PSU स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सुसाट धावणार
- Numerology Horoscope | 10 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Infosys Share Price | हलक्यात घेऊ नका! Infosys, TCS, Wipro सहित हे 7 शेअर्स मालामाल करणार, हाय ट्रेडिंग व्हॉल्यूम
- HAL Share Vs BEL Share Price | PSU HAL आणि BEL शेअर्स दणादण परतावा देणार, अल्पावधीत 30% कमाई करा
- Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल
- Tata Power Share Price | चिंता वाढली! टाटा पॉवर शेअर्स 45 टक्क्याने घसरणार? स्टॉक Hold करावा की Sell?