महत्वाच्या बातम्या
-
धार्मिक टीकेसाठी सोशल मीडियावर १ वर्षापूर्वीचे फोटो व्हायरल | नेहमीप्रमाणे भातखळकर अग्रस्थानी
वरळीमध्ये एका मोठ्या हिरव्या रंगाच्या कटआऊटवर आदित्य ठाकरेंचा सफेद रंगाचा कुर्त्यामधला फोटो व्हायरल झाला आहे. फोटोच्या शेजारी ऊर्दू भाषेत ‘नमस्ते वरळी’ असा संदेश लिहिला आहे. आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य प्रीती शर्मा मेनन यांनी हा फोटो टि्वट करत ‘भगवा झाला हिरवा’ असा संदेश लिहिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
खर्च पेंग्विनला पोसण्यासाठी की पेंग्विन गँगसाठी? | मनसेचा युवासेनेला पोश्टरबाजीतून टोला
ठाकरे सरकार आणि त्यांचं पेंग्विनप्रेम सध्या चांगलंच चर्चेत आहे. पेंग्विनच्या देखभालीसाठी काढण्यात आलेल्या निविदेला मात्र महाविकास आघाडीतला मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसनेच आता आक्षेप घेतला आहे. या पेंग्विनसाठी लागणाऱ्या खर्चाच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही ठाकरे सरकारवर चांगलीच टीका करत मुंबईत पोस्टरबाजी केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
अमराठी लोंढ्यांना खुलं मैदान | पण कोकणातून मुंबईत परतणाऱ्या चाकरमान्यांची होणार RT-PCR टेस्ट
गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात लाखो चाकरमानी जातात. कोकणात कोरोना, डेल्टा प्लसचा या विषाणूचा प्रसार असल्याने मुंबईत परतत असताना चाकरमान्यांच्या आरटीपीसीआर टेस्ट केल्या जातील. तसेच कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांच्याही पहिल्याच दिवशी आरटीपीसीआर टेस्ट केल्या जातील, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
3 वर्षांपूर्वी -
भाजप खासदाराच्या कुटुंबाकडून सुनेचा छळ आणि मारहाण | मदतीच्या याचनेनंतरही चित्रा वाघ शांत?
वर्ध्याचे भारतीय जनता पक्षाचे खासदार रामदास तडस यांच्या सुनेने गंभीर आरोप केला आहे. रामदास तडस यांच्या सुनेने आपल्यावर कुटुंबाकडून अन्याय होत असल्याचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर त्यांना मारहाण होत असल्याचा दावा आहे. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी रडत रडत व्हिडीओ शूट करुन राष्ट्रवादीकडे मदत मागितली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याकडे त्यांनी मदतीची याचना केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
GANPATI BAPPA 2021 | लालबागच्या राजाचा प्रसाद घरपोच मिळणार | बुकिंग आजपासून सुरु
संकटामुळे मागील वर्षाप्रमाणेच यंदाही गणेशोत्सवावर अनेक निर्बंध आहेत. कोरोनाचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी राज्य सरकारने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना अनेक नियम आखून दिले आहेत. याच नियमानुसार आता मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा देखील विराजमान होणार आहे. पण यंदा लालबागच्या राजाचं दर्शन भाविकांना फक्त ऑनलाइनच घेता येणार आहे. पण असं असलं तरी भाविकांना लालबागच्या राजाचा प्रसाद हा घरपोच मिळणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा वाद पेटणार | राणे आणि शिवसेनेकडून पुन्हा इशारे सुरु
कोकणातील चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी याबाबत घोषणा केली आहे. 9 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.30 वाजता नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते विमानतळाचं उद्घाटन होणार असल्याची घोषणा राणे यांनी आज केलीय.
3 वर्षांपूर्वी -
मृत्यू झालेल्या माणसाच्या वारसांना नोकरी, मदत देण्यासाठी किशोर वाघ यांनी लाच घेतली, हे तुम्ही जनतेला सांगा
राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख आणि भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यातील शाब्दिक युद्ध आता सुरुच आहे. कालच्या संघर्षानंतर चित्रा वाघ यांनी आज पुन्हा ट्विट करुन महेबूब शेख यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्यांच्या टीकेला महेबूब शेख यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे. “असल्या 56 चित्रा वाघ आल्या तरी मला फरक पडत नाही आणि असल्या मांजरीला आणि बोक्यांना मी घाबरत नाही”, असा पलटवार महेबूब शेख यांनी केलाय.
3 वर्षांपूर्वी -
पुनर्विवाहानंतरही विधवा पत्नीचा पहिल्या पतीच्या संपत्तीवर अधिकार | हायकोर्टाचा महत्वपूर्ण निकाल
पतीच्या निधनानंतर विवाह केलेल्या पत्नीचा पुनर्विवाहानंतरही पहिल्या पतीच्या संपत्तीवर अधिकार असल्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.हिंदू वारसा कायद्याच्या कलम १० अंतर्गत विधवा पत्नी आणि आई दोन्ही पतीच्या निधनानंतर प्रथम वारसदारांमध्ये येतात.त्यामुळे आईचाही अधिकार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
3 वर्षांपूर्वी -
चांदीवाल आयोगाने परमबीर सिंग यांच्याविरोधात जारी केले वॉरंट | डीजीपींना दिले पोहोचवण्याचे आदेश
चांदीवाल आयोगाने महाराष्ट्राचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. आयोगाने 50,000 रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. तसेच आयोगाने महाराष्ट्राच्या डीजीपींना हे वॉरंट देण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
IAS-IPS अधिकारी आधी फडणवीसांची भेट घेतात | त्यानंतर मंत्र्यांवर आरोप केले जातात
भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून सातत्याने महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर बेछूट आरोप केले जात आहेत. हे आरोप करण्याआधी काही आयपीएस आणि आयएएस अधिकारी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतात. त्यानंतर मंत्र्यांवर आरोप केले जातात आणि कारवाई देखील सुरू होते असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
गैव्यवहारांविरोधात देशात कमिशन आहेत | ईडीच्या कारवायांचा मुद्दा संसदेत मांडणार - शरद पवार
मागील दोन-तीन वर्षांत देशात नवीन यंत्रणा लोकांना माहिती झाली आहे. त्या यंत्रणेचं नाव आहे ईडी. ही ईडी कुणाच्या मागे कशी लागेल काही सांगता येत नाही. कालच अकोल्यातून भावना गवळी नावाच्या शिवसेनेच्या खासदार आल्या होत्या. त्यांच्या ३-४ संस्था आहेत. ३ शिक्षणसंस्था आणि एक दुसरी छोटी संस्था आहे. त्याचा व्यवहारही २०-२५ कोटींच्या आत आहे.
3 वर्षांपूर्वी -
कोकणात मी एकटाच भाजपचा आमदार असूनही ट्रेन सोडू शकतो | तर कोकणी जनतेने विचार करावा - नितेश राणे
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मी एकटाच आमदार आहे. बाकी सेनेचे आहेत. एक भाजपचा आमदार करू शकतो ते शिवसेनेच्या आमदाराला जमलं नाही याचा मला अभिमान आहे. पुढच्या येणाऱ्या निवडणुकीत कोकणातील जनतेने विचार करावा. भाजपला मतदान दिल्यावर एक आमदार ट्रेन सोडू शकतो तर बाकीचे आमदार भाजपचे आमदार असते तर किती ट्रेन सुटल्या असत्या त्याचा कोकणवासियांनी विचार करावा, असं आवाहन राणे यांनी केलं.
3 वर्षांपूर्वी -
भाजपा आमदार जय कुमार गोरे आणि खासदार रणजितसिंह निंबाळकर ईडी कार्यालयात
भाजपा आमदार जय कुमार गोरे आणि खासदार रणजितसिंह निंबाळकर ईडी कार्यालयात दाखल झाले आहे. मात्र काही वेळातच ईडी कार्यालयात कागदपत्र देऊन गोरे आणि निंबाळकर हे बाहेर पडले आहे. बाहेर पडताना त्यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला आहे. नेमकं कोणत्या कारणासाठी ते ईडी कार्यालयात आले होते, याची अद्यापही माहिती मिळू शकली नाही.
3 वर्षांपूर्वी -
अनिल परबांच्या अडचणींमध्ये वाढ | निकटवर्तीय बजरंग खरमाटे यांना ईडीची नोटीस
महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सध्या ईडीकडून चौकशांचे सत्र सुरू आहे. अनिल देशमुख, प्रताप सरनाईक यांच्यानंतर अनिल परबांच्या मागे देखील ईडीची पिडा लागली आहे. दरम्यान अनिल परब यांचे निगटवर्तीय मानले जाणार बजरंग खरमाटे यांच्या देखील ईडीकडून नोटीस बजावण्यता आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
फोन टॅपिंग प्रकरण | रश्मी शुक्ला आरोपी नाहीत - राज्य सरकार
फोन टॅपिंग प्रकरण आणि पोलीस बदल्यांशी निगडीत दस्ताऐवज लिक करण्याच्या प्रकरणात सीनियर आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला आरोपी नाहीत. त्यामुळे त्या एफआयआर रद्द करण्याची याचिका करू शकत नाहीत’, असा युक्तिवाद राज्य सरकारकडून मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला.
3 वर्षांपूर्वी -
वाघ आडनावाने कोणी वाघ होत नाही | डायलॅाग बाजी सोडा, नवऱ्यावर कार्यवाही झाली तेव्हा कुणाच सरकार होत ते सांगा
राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर काल नगरमध्ये बोचरी टीका केली होती. ‘लाचखोर नवऱ्याची बायको’, असा चित्रा वाघ यांचा उल्लेख आपल्या भाषणात शेख यांनी केला होता. याच टीकेला आता चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “मी वाघ आहे वाघ…, माझ्यावर कोल्हे कुत्रे भुंकत आहेत. पण मी कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही”, अशा शब्दात त्यांनी महेबूब शेख यांच्यावर पलटवार केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
संघाची तालिबानशी तुलना, जाहीर चर्चा करा नाही तर माफी मागा | नितेश राणेंचं जावेद अख्तरांना पत्रं
प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केली होती. त्यावरून वादंग निर्माण झालं आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी अख्तर यांना पत्रं लिहून या मुद्द्यावर जाहीर चर्चा करा नाही तर जाहिररित्या माफी मागा, असं आव्हानच दिलं आहे. त्यामुळे जावेद अख्तर त्याला काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.नितेश राणे यांनी जावेद अख्तर यांना दोन पानी पत्रं पाठवलं आहे. त्यात त्यांनी अख्तर यांच्या संघाच्या तालिबानशी युती करण्याच्या मुद्द्याला आक्षेप घेतला आहे.
3 वर्षांपूर्वी -
राजू शेट्टी यांच्या आंदोलनाची सरकारकडून दखल | मुख्यमंत्र्यांकडून राजू शेट्टींना बैठकीचे निमंत्रण
राजू शेट्टींच्या आंदोलनाची राज्य सरकारने दखल घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजू शेट्टी यांना उद्या बैठकीचे निमंत्रण दिले आहे. राजू शेट्टी नृसिं यांना नृसिंहवाडीत प्रांताधिकाऱ्यांनी प्रस्तावाचं पत्र दिले आहे. दरम्यान, या वारंवार येणाऱ्या पुरावर कायमस्वरुपी उपाययोजना करने गरजेची असल्याचं मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
Alert | येत्या चार दिवसांत महाराष्ट्राच्या अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या चार-पाच दिवसांत राज्यात अनेक भागांत विजांच्या गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
3 वर्षांपूर्वी -
लसीकरणात मुंबई अव्वल | 1 कोटींहून अधिक लोकांचं लसीकरण करणारा मुंबई देशातील पहिला जिल्हा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) प्रयत्नांनंतर, मुंबई देशातील पहिला जिल्हा ठरला आहे, जिथे एक कोटीहून अधिक लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. CoWIN पोर्टलवर अपलोड केलेल्या आकडेवारीनुसार, शुक्रवारपर्यंत येथे 1 कोटी 63 हजार 497 लोकांना कोरोनाची लस मिळाली आहे. यापैकी 72 लाख 75 हजार 134 असे लोक आहेत ज्यांना पहिला डोस मिळाला आहे आणि 27 लाख 88 हजार 363 असे लोक आहेत ज्यांनी दोन्ही डोस घेतले आहेत.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Numerology Horoscope | 10 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- RVNL Share Price | PSU स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सुसाट धावणार
- HAL Share Vs BEL Share Price | PSU HAL आणि BEL शेअर्स दणादण परतावा देणार, अल्पावधीत 30% कमाई करा
- Tata Power Share Price | चिंता वाढली! टाटा पॉवर शेअर्स 45 टक्क्याने घसरणार? स्टॉक Hold करावा की Sell?
- Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल
- Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर्समध्ये मजबूत तेजी येणार, नवीन अपडेट येताच शेअर्सची खरेदी वाढली
- Railtel Share Price | रेलटेल शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी सांगितली पुढची टार्गेट प्राईस
- Numerology Horoscope | 11 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल
- Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार! झटपट पैसा दुप्पट करणारा शेअर खरेदी करा, संधी सोडू नका
- L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर स्वस्तात खरेदी करा, यापूर्वी 350% परतावा दिला, ऑर्डरबुक मजबूत झाली