महत्वाच्या बातम्या
-
जलयुक्त शिवार योजनेचे ७,५०० कोटी कुठं गेले ? अजित पवार
महाराष्ट्रावर सध्या दुष्काळाच भयंकर संकट ओढवलं असून त्याला अनुसरून आज एनसीपी पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. दरम्यान, जर आज राज्यावर दुष्काळ ओढवला असेल तर जलयुक्त शिवार योजनेचे ७,५०० कोटी नेमके गेले कुठं? असा प्रश्न पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
शिवस्मारक पायाभरणी; मृत्यू झालेल्या सीए सिद्धेश पवारचं वर्षभरापूर्वीच लग्न झालेलं, कुटुंबावर शोककळा
शिवस्मारक पायाभरणीच्या शुभारंभासाठी समुद्रात गेलेली स्पीड बोट उलटून झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेला ३३ वर्षीय सिद्धेश पवारच वर्षभरापूर्वीच लग्न झालेलं. सिद्धेश मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील गुणदे या गावातील असल्याची माहिती आहे. त्यांच्या बोटीला अपघात झाला तेव्हा, सिद्धेश पवार याचे मामा विक्रांत आंबरे सुद्धा त्याच्यासोबत बोटीवर उपस्थित होते, ते सुद्धा जखमी झाले आहेत. सिद्धेशच्या मामांवर मुंबईतील सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार सुरु आहेत.
6 वर्षांपूर्वी -
भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामींचे गंभीर आरोप, आमचं सरकार भ्रष्टाचाऱ्यांना वाचवतंय
भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामींनी भाजप सरकारवर सीबीआयमधील घटनांवरून गंभीर आरोप केले आहेत. माझं भाजप सरकार भ्रष्टाचाऱ्यांना पाठिशी घालत असून, CBI नंतर पुढची कारवाई ईडी’च्या अधिकाऱ्यांवर होईल, असं भाजप खासदार स्वामी यांनी मत व्यक्त केल्याने भाजप तोंडघशी पडली आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदींनी सीबीआय व रॉ प्रमुखांना स्वतःच्या निवासस्थानी का पाचारण केलं: काँग्रेसला शंका
सीबीआय या देशातील सर्वात मोठ्या तपास यंत्रणेतील सध्याच्या अवस्थेला पंतप्रधान नरेंद्र मोदीच जवाबदार आहेत आणि काही दिवसांपासूनची सीबीआय मधील घडामोडी या संशयास्पद आहेत, अशी प्रतिक्रिया काँग्रेसने दिली आहे. दरम्यान, मोदींनी CBI आणि RAW च्या प्रमुखांना आपल्या निवासस्थानी का बोलावले होते? संबंधित चौकशीवर प्रभाव टाकण्याचा हा प्रयत्न नव्हता का? मोदींनी त्यांना नेमक्या काय सूचना केल्या? असंवैधानिक पद्धतीने तपासात दखल देण्याचा हा प्रकार नव्हे का, असे एक ना अनेक प्रश्न काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी भर पत्रकार परिषदेत केली आहेत.
6 वर्षांपूर्वी -
मोदी सरकार सत्तेत....पण हे काय? सीबीआयकडून सीबीआयच्या मुख्यालयावर छापेमारी?
मोदी सरकार सत्तेत….पण हे काय? सीबीआयकडून सीबीआयच्या मुख्यालयावर छापेमारी?
6 वर्षांपूर्वी -
सीबीआय संचालक मोदी सरकार विरोधात सर्वोच्च न्यायालयात
सक्तीच्या रजेवर पाठवण्याच्या निर्णयाविरोधात CBI चे संचालक आलोक वर्मा यांनी मोदी सरकारविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याने केंद्राच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. याचिकेत त्यांनी केंद्र सरकारने आपल्याला पदावरून दूर करताना सर्व नियम आणि कायद्यांना पायदळी तुडवल्याचे म्हटले असून थेट मोदी सरकारला न्यायालयात आवाहन दिले आहे. दरम्यान, त्यांची याचिका न्यायालयाने दाखल करून घेतली आहे.
6 वर्षांपूर्वी -
राफेल'डील भ्रष्टाचाराची सीबीआय चौकशी पूर्ण होऊ नये, म्हणून CBI मध्ये हालचाली? प्रशांत भूषण
राफेल लढाऊ विमानांच्या डीलमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी CBI कडे यापूर्वीच करण्यात आली होती. दरम्यान, नेमकी तीच चौकशी पूर्ण होऊ नये, म्हणूनच CBI मध्ये सध्या जोरदार हालचाली घडवल्या जात आहेत असा गंभीर आरोप ज्येष्ठ विधी तज्ज्ञ प्रशांत भूषण यांनी केला आहे. तसेच महत्वाचं म्हणजे CBI संचालक आलोक वर्मा यांना त्यांच्या पदावरुन हटवण्याची कारवाई म्हणजे याच हालचालींचा मुख्य भाग असल्याचा दावा सुद्धा प्रशांत भूषण यांनी केंद्र सरकारवर केला आहे. दरम्यान, वादग्रस्त अधिकारी राकेश अस्थाना यांना वाचवण्यासाठी मोदी सरकारचा सर्व खटाटोप सुरू आहे, असं थेट विधान सुद्धा त्यांनी केल्याने एकच खळबळ माजली आहे.
6 वर्षांपूर्वी -
शिवस्मारक बांधकाम सुरु होण्याआधीच चौकशीच्या फेऱ्यात? विनायक मेटेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी फडणवीसांकडे शिवस्मारकाच्या बांधकामातील अनियमिततेची चौकशी करण्याची लेखी मागणी केल्याचे वृत्त आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनाच अंधारात ठेवून संबंधित कंत्राटदार आणि शिवस्मारकाच्या सल्लागारांनी स्मारकाच्या मूळ रचनेत हवेतसे बदल केले आहेत, असा गंभीर आरोप मेटेंनी लेखी पत्रातून केला आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरोधात थेट हक्कभंग आणण्याचा इशारा मेटेंनी दिला आहे.
6 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे यांनी घेतली शहीद जवान सुनील ढोपे यांच्या कुटुंबीयांची भेट
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर असून पक्ष विस्तारासोबत ते अनेक समाजसेवी संस्था तसेच स्थानिक नागरिकांच्या समस्या समजून घेण्यावर सुद्धा भर देत आहेत. दरम्यान, काल त्यांनी शहीद जवान सुनील विठ्ठलराव ढोपे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच ढोपे कुटुंबियांच्या व्यथा जाणून घेतल्या.
6 वर्षांपूर्वी -
आज महाराष्ट्र सरकारकडून ‘दुष्काळसदृश’ परिस्थितीची घोषणा झाली - जाहिरातबाज २०१४
आज महाराष्ट्र सरकारकडून ‘दुष्काळसदृश’ परिस्थितीची घोषणा झाली. वास्तविक सर्वच ग्रामीण महाराष्ट्र भयानक दुष्काळाला सामोरे जाईल अशी परिस्थिती आहे. परंतु याच काँग्रेस – राष्ट्रवादीचे वाभाडे कडून सत्तेत आलेल्या भाजप आणि शिवसेनेने सामान्यांना अशी जाहिरातबाजीने आश्वासन दिली होती.
6 वर्षांपूर्वी -
पुणे - राममंदिर लवकर व्हावे, यासाठी सरसंघचालकांचा पुण्याच्या दगडूशेठ गणपती मंदिरात संकल्प
पुणे – राममंदिर लवकर व्हावे, यासाठी सरसंघचालकांचा पुण्याच्या दगडूशेठ गणपती मंदिरात संकल्प
6 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र सरकारकडून ‘दुष्काळसदृश’ परिस्थितीची घोषणा
महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील तब्बल १८० तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती असल्याची प्राथमिक घोषणा करण्यात आली आहे. राज्य मंत्रीमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळाबाबत अधिकृत घोषणा केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदींची पंतप्रधान पदाची खुर्ची २०१९ मध्ये जाणार
राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी २०१९ मधील निवडणुकीचे भाकीत केलं आहे. २००४ मधील लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जशा प्रकारे कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं, तशीच परिस्थिती २०१९ मधील लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्भवणार आहे असं ते म्हणाले. त्यावेळी निवडणुकीच्या निकालानंतर देशभरातील सर्व पक्ष मनमोहन सिंग यांच्या समर्थनार्थ एकवटले होते आणि ते देशाचे पंतप्रधान झाले होते. त्याप्रमाणे २००४ मध्ये जशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली होती, अगदी त्याप्रमाणेच परिस्थिती २०१९ मध्ये सुद्धा येणार आहे असं पवार म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
युतीचा निर्णय लवकर कळवा नाहीतर विधानसभा आणि लोकसभा एकत्र सामोरे जा
शिवसेनेच्या एकाला चलोरेच्या भूमिकेमुळे भाजपने आता सेनेवर युतीबाबत दबाव टाकण्यास सुरुवात केल्याचे वृत्त आहे. तसेच लवकरात लवकर युतीबाबत कळवलं नाही तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना एकत्रच सामोरे जाण्यास तयार रहा असा अप्रत्यक्ष सज्जड दमच शिवसेना देण्यात आल्याचे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
स्वतःच्याच सरकारला जुमलेबाज बोलणारा शिवसेना पक्ष हाच मोठा "जुमला" आहे
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिर्डीतील भाषणानंतर विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर तुफान टीका केली आहे. उद्धव ठाकरे गोंधळलेला माणूस असून त्यांना या वर्षीचा “मोस्ट कन्फ्यूज्ड पॉलिटिशयन अवॉर्ड” देण्यात यावा अशी बोचरी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव घेऊन केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
बाळासाहेबांचे स्मारक उभारता अाले नाही, पहिल्यांदा अापल्या वडीलांचं स्मारक बांधावं
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर राम मंदिरावरून बोचरी टीका केली आहे. मुंबईची सत्ता शिवसेनेच्या हातात असताना अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांचे स्मारक उभारता अाले नाही. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुखांनी पहिल्यांदा अापल्या जन्मदात्या वडीलांचं स्मारक बांधावं. त्यानंतर जनतेला त्यांच्याबद्दल खात्री पटेल. लाेकांना राम मंदिराच्या नावाने भावनिक आवाहन करून राजकरण करण्याचा खेळ सुरु आहे असं अजित पवार म्हणाले. शिवसेना पक्ष प्रमुखांमध्ये जर धमक असेल तर त्यांनी अयाेध्येला राम मंदिर बांधण्याची तारीख जाहीर करावी, असे खुलं अाव्हानच अजित पवारांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
6 वर्षांपूर्वी -
सावधान! २००९ च्या निवडणुकीत राम मंदिर महत्वाचा मुद्दा नव्हता. महागाई वाढली व विकास फसल्याने पुन्हा राम मंदिर?
सावधान! २००९ च्या निवडणुकीत राम मंदिर महत्वाचा मुद्दा नव्हता. महागाई वाढली व विकास फसल्याने पुन्हा राम मंदिर?
6 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंच्या स्वागताला वणी मतदारसंघात कार्यकर्त्यांची तुफान गर्दी
आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून १० दिवसांच्या पश्चिम विदर्भ दौ-यावर आहेत. राज ठाकरे यांनी शहरी भागांसोबतच ग्रामीण महाराष्ट्राकडे सुद्धा लक्ष केंद्रित केले असून पक्षविस्तार तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची फळी उभी करणे हे त्यांच्या दौऱ्यामागील मूळ उद्देश असल्याचे समजते.
6 वर्षांपूर्वी -
पोलखोल व्हिडिओ; २००९ मध्ये राम मंदिर मुद्दा महत्वाचा नव्हता, पण सत्तेत आल्यावर विकास फसताच राम मंदीर?
सध्या देशात भाजप आणि शिवसेनेच्या राजवटीत महागाईने शिखर गाठलं असताना शेतकरी आत्महत्या, जलयुक्त शिवार आणि शिवजल योजनांचं ग्रामीण भागाला मृगजळ दाखवून पुन्हा तीव्र दुष्काळ जाहीर करण्याची आलेली वेळ, पेट्रोल-डिझेलचे वाढणारे भाव, डॉलरच्या तुलनेत कोसळणारी रुपयाची किंमत या सर्व विषयांपासून सामान्य लोकांना विचलित करण्यासाठी सगळं ठरवून सुरु आहे अशी परिस्थिती आहे.
6 वर्षांपूर्वी -
खोटे बोलण्यात ते पटाईत; उद्धव ठाकरेंचा मोदींवर घणाघात
काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिर्डी येथे पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. दरम्यान, उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी भाजप आणि नरेंद्र मोदींवर घणाघात केला. माझ्या रक्तातच लाचारी नाही आणि मी सत्तालोलूप सुद्धा नाही, पण तुम्ही तर चक्क खोटे बोलून सत्ता मिळविली ना? खोटे बोलून सत्ता मिळविणे हा औढा देशद्रोहच आहे, अशा तिखट शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर प्रहार केले.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल
- Bank Account Alert | महाराष्ट्रातील या बँकेत तुमचं खातं आहे? आता पैसे काढू शकणार नाही, RBI ने बंदी घातली
- Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Penny Stocks | गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे 10 पेनी शेअर्स, अप्पर सर्किट हीट गतीने पैसा वाढतोय
- Mastek Share Price | 40 रुपयाच्या शेअरची कमाल! तब्बल 4000 टक्के परतावा दिला, आता एका दिवसात 20% वाढला
- Amara Raja Share Price | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर खरेदी करा, अवघ्या 5 दिवसात दिला 33 टक्के परतावा
- Bonus Shares | फ्री शेअर्स मिळवा! मल्टिबॅगर शेअरवर मिळतील फ्री बोनस शेअर्स, 1 वर्षात 462 टक्के परतावा दिला
- Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती?
- Bank FD Interest Rates | सुरक्षित भरघोस कमाई! 1 वर्षापर्यंतच्या FD वर मिळेल 8.5 टक्के परतावा, पाहा बँकांची यादी
- Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल