महत्वाच्या बातम्या
-
अभिनंदन यांनी जी माहिती पाकिस्तानपासून लपवली, ती मोदींनी प्रचारात या राज्यातील फायद्यासाठी उघड केली
पाकिस्तानविरुद्ध कारवाई दरम्यान मिग २१ या लढाऊ विमानाचा अपघात होऊन भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान पॅराशूटच्या साहाय्याने पाकिस्तानच्या हद्दीत उतरल्याने त्यांना पाकिस्तानी लष्कराने ताब्यात घेतलं होतं. मात्र, बहाद्दूर अभिनंदन यांनी पाकिस्तानला स्वतःची किंवा देशाची कोणतीही गोपनीय माहिती दिली नव्हती.
5 वर्षांपूर्वी -
भयंकर! भाजपच्या झेंड्याखाली 'विंग कमांडर अभिनंदन' यांचा फोटोवापरून निवडणुकीचा प्रचार
भारतीय वायूदलाने २६ फेब्रुवारी मंगळवारी पहाटे पाकव्याप्त काश्मीरमधील जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर केलेल्या हल्ला करून दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले आहे. दरम्यान, पाकिस्तानी लढाऊ विमानांवर हल्ल्या करताना विंग कमांडर अभिनंदन यांनी महत्वाची जवाबदारी आणि बहाद्दुरी दाखवली होती. तसेच पाकिस्तानच्या प्रतिऊत्तरात त्याचे मिग २१ लढाऊ विमान कोसळेल, परंतु ते पॅराशूटच्या साहाय्याने खाली आले मात्र दुर्दैवाने पाकिस्तानच्या हद्दीत पडले आणि त्यांना पाकिस्तानी लष्कराने ताब्यात घेतलं.
5 वर्षांपूर्वी -
२६ फेब्रुवारीला ब्रेकिंगन्यूजमध्ये मारलेल्या मसूदच्या भावांचे आवाज ३ मार्चला कसे ऐकू येत आहेत?
भारतीय वायूदलाने २६ फेब्रुवारी मंगळवारी पहाटे पाकव्याप्त काश्मीरमधील जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर केलेल्या हल्ला करून दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले आहे. या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद संघटनेचा प्रशिक्षण तळ आणि शस्त्रास्त्रांचा अगणित साठा पूर्णपणे बेचिराख झाल्याच्या ब्रेकिंग न्यूज झळकताना दिसल्या. त्यानंतर काही वेळाने, एअर स्ट्राईकमध्ये जैश-ए-मोहम्मदचे प्रमुख नेते मारले गेले आहेत. त्यात अफगाणिस्तान व काश्मीरमधील कारवायांचा प्रमुख असलेला मौलाना अम्मर, मौलाना मसूद अजहरचा भाऊ मौलाना तल्हा सैफ, काश्मीरमधील कारवायांचा प्रमुख असलेला मुफ्ती अझर खान आणि आयसी-८१४ विमानाच्या अपहरणात सहभागी असलेला मसूद अजहरचा मोठा भाऊ इब्राहिम अजहर हे देखील मारले गेल्याच्या बातम्या झळकत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
शौर्य डोवल, पाकिस्तानी बिझनेस पार्टनर सय्यद अली अब्बास, ते RSS व भाजप कनेक्शन
‘द वायरने’ काही महिन्यांपूर्वी देशाचे पाचवे आणि विद्यमान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांचे पुत्र शौर्य डोवल यांच्या व्यवसायांविषयी भारतीयांना सविस्तर माहिती देणार वृत्त प्रसिद्ध केलं होतं. मात्र, देशातील पेड आणि सत्ताधारी धार्जिण्या प्रसार माध्यमांच्या वादळात ते हवेतच लुप्त झालं आणि भारतीय नागरिकांकडे ते पोहचू शकलं नाही किंवा पोहोचणार नाही याचीच दक्षता घेतली गेली असावी. देशाच्या राजकारणात अजित डोवाल हे पहिले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असावे ज्यांचा समाज माध्यमांवर अप्रत्यक्षपणे प्रचार सत्ताधाऱ्यांच्या समर्थकांनीच करून त्यांना भारताचे जेम्स बॉण्ड अशी पदवी देखील बहाल केली आणि वास्तविक ते एक निवृत्त आयपीएस अधिकारी आहेत. परंतु असं काय झालं की त्यांच्यासाठी भाजप सत्ताधाऱ्यांचा आयटी सेल नेहमीच कार्यरत असतो आणि समाज माध्यमांवरून त्यांच्याबद्दल बातम्या पेरण्याचं काम करत असतो.
5 वर्षांपूर्वी -
मोदी म्हणतात २६/११च्या हल्ल्यानंतर काय केलं? बहुतेक मोदींना नौदल, NSG कमांडो व मुंबई पोलिसांच्या शौर्याचा विसर?
भारतीय हवाई दलाने २६ फेब्रुवारी रोजी पहाटे पाक व्याप्त काश्मीरमध्ये एअरस्ट्राइक करून बालाकोट येथील जैश ए मोहम्मदचा तळ उद्ध्वस्त केले होते. दरम्यान, सदर कारवाईत भारतीय प्रसार माध्यमांनी संरक्षण, परराष्ट्र व्यवहार किंवा भारतीय लष्कराकडून कोणतीही अधिकृत माहिती प्रसिद्ध केली नसताना स्वतःच निरनिराळी आकडेवारी जाहीर करण्याची स्पर्धा लावली होती.
5 वर्षांपूर्वी -
लष्कराच्या जीवावर स्वतःचा प्रचार करणाऱ्या मोदींना भारताने पाकिस्तानविरुद्ध २ युद्ध जिंकल्याचा विसर?
भारतीय हवाई दलाने २६ फेब्रुवारी रोजी पहाटे पाक व्याप्त काश्मीरमध्ये एअरस्ट्राइक करून बालाकोट येथील जैश ए मोहम्मदचा तळ उद्ध्वस्त केले होते. दरम्यान, सदर कारवाईत भारतीय प्रसार माध्यमांनी संरक्षण, परराष्ट्र व्यवहार किंवा भारतीय लष्कराकडून कोणतीही अधिकृत माहिती प्रसिद्ध केली नसताना स्वतःच निरनिराळी आकडेवारी जाहीर करण्याची स्पर्धा लावली होती.
5 वर्षांपूर्वी -
अति-उत्साही न्युज-दलाने काय मिळवलं? सरकारी जाहिराती, व्हिडिओ गेम ते लष्कराप्रती संवेदना?
परराष्ट्र संबंध राबवणारे अधिकारी हे शब्दप्रभू असतात तेव्हा जास्त चांगले असते. त्यामुळेच भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी परवा जेव्हा “म्हणजे बिगर-लष्करी” आणि “प्रतिबंधात्मक कारवाई” हे शब्दप्रयोग केले, तेव्हा ते आश्चर्यकारक नव्हते. तरीही अनेकांनी त्याचे कौतुक केले. त्या शब्दवापरामध्ये खरोखरीच काही तरी उपयुक्त आणि अर्थवाही असं होतं. केवळ चलाख शब्दकलेच्या पलीकडे ते निवेदन आणि ज्या कारणाने ते केले गेले ते हवाई हल्ले, या दोन्ही दरम्यान एक दुहेरी दावा होता.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात फडणवीसांची अधिवेशन गुंडाळण्याची चर्चा, तर मोदींची पक्ष मजबूतीची चर्चा
भारतीय वायुदलाने पाकिस्तानमध्ये केलेल्या एअर स्ट्राईक’नंतर संपूर्ण वातावरण ढवळून निघाले आहे. पुलवामानंतरच्या घडामोडींना आणखी एक रुपेरी किनार होती. ‘मागच्या सरकारांबद्दल’ आणि त्यांच्या सुरक्षाविषयक अपयशांबद्दल ‘अधिकृत सूत्रांकडून’ आडून-आडून वार केले गेले तरी विरोधी पक्षांनी या कसोटीच्या काळात आपला प्रतिसाद संयत ठेवला.
5 वर्षांपूर्वी -
अमेरिका, फ्रान्सकडून मसूद अझहरला ब्लॅकलिस्ट करण्याचा प्रस्ताव
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण जगभरात पाकिस्तान विरोधात वातावरण निर्माण झाले आहे. संयुक्त राष्ट्रांनी बंदी घातलेली दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा नेता मसूद अझहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आला आहे. अमेरिका फ्रान्स, ब्रिटनकडून याबाबतचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीमध्ये मंजूर करण्यात आला.
5 वर्षांपूर्वी -
भाजप नेत्यानो जबाबदारीनं वागा! 'एअर स्ट्राईक' सहभागातील महिला पायलट्सचे खोटे फोटो शेअर
भारतीय वायुदलाने केवळ बारा दिवसात जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील भ्याड हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानच्या हद्दीत घुसून त्यांना अद्दल घडवली. दरम्यान, या हल्ल्याचा भारतीय वायुदलाने केवळ १२ दिवसात बदला घेत दहशतवाद्यांचं तेरावं घातल्याच्या प्रतिक्रिया समाज माध्यमांवरून व्यक्त होत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
भारताचा पाकिस्तानामधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ला
जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये अत्यंत तणावाचे वातावरण आहे. अशातच पाकिस्तानकडून आगळीक सुरुच असून भारतीय हवाई दलाच्या विमानाने LoC ओलांडली. परंतु, आम्ही त्यांना हुसकावून लावल्याचा पोकळ दावा पाकने यावेळी केला आहे. भारतीय हवाई दलाने १००० किलो वजनाची स्फोटके टाकून हा बॉम्बहल्ला केल्याचेही पाकिस्तानने म्हटले आहे. भारताच्या मिराज जेट फायटरची १० विमान पाकिस्तानच्या हद्दीत घुसल्याचे सांगण्यात आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
पुलवामा भ्याड हल्ला; गेल्या ७ महिन्यात भारत-पाक व्यापारात ७ टक्के वाढ
पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारताने पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याचा जोरदार प्रयत्न केला गेला. दरम्यान, भारत व पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावाचे असताना दोन्ही देशांतील व्यापार गेल्या ७ महिन्यांत गतवर्षीच्या तुलनेत याच काळातील व्यापारापेक्षा ७ टक्क्यांनी वाढल्याची आकडेवारी समोर आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
पुरावे! पुलवामा हल्ल्याच्या दिवशी नरेंद्र मोदी संध्याकाळपर्यंत फोटोशूट करत होते?
पुलवामा येथे झालेल्या भ्याड आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे तब्बल ४० जवान शहीद झाले आहेत. अवंतीपुरा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून शहीद वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतरही ‘प्राइम टाइम मिनिस्टर’ ३ तास शूटिंगमध्ये व्यस्त होते अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी (२२ फेब्रुवारी) केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
UN सुरक्षा परिषदेत देखील पाकिस्तानची कोंडी, चीनचं भारताला समर्थन
पुलवामामधील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील भारताला मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत असल्याचं दिसत आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने अर्थात UNSCने देखील हा दहशतवादी हल्ला अत्यंत भयानक आणि भ्याड असल्याचं सांगत कडक शब्दांत निषेध नोंदवला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पंधरा देशांचा समावेश असून यामध्ये चीनचा देखील समावेश आहे. सुरक्षा परिषदेने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा उल्लेख करत अशा हल्ल्यांसाठी जबाबदार दोषींना कडक शिक्षा झाली पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे. दरम्यान, हा पाकिस्तानसाठी मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
उत्तर प्रदेशात अपना दल भाजपाची साथ सोडण्याच्या तयारीत
एकीकडे लोकसभा निवडणुकांपूर्वी मित्रपक्षांना जोडण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून प्रयत्न सुरू आहेत. परंतु, दुसरीकडे भाजपाचा एनडीएमधील एक साथीदार भारतीय जनता पक्षाची साथ सोडण्याच्या तयारीत आहे. युपी’मध्ये भाजपासोबत आघाडी असलेल्या अपना दलच्या नेत्या अनुप्रिया पटेल यांनी एनडीए सोडण्याचा इशारा दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
राफेल करार; पुनर्विचार याचिकेवर सुनावणीस सर्वोच्च न्यायालय तयार
राफेल कराराप्रकरणी नरेंद्र मोदी सरकारला क्लीन चिट देणाऱ्या निकालासंदर्भात दाखल झालेल्या पुर्नविचार याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने तयारी दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायालयात १४ डिसेंबर रोजी दिलेल्या निकालात राफेल करारात सरकारच्या निर्णय प्रक्रियेत त्रुटी आढळलेल्या नाही, असे स्पष्ट करतानाच या कराराच्या चौकशीची मागणी फेटाळली होती.
5 वर्षांपूर्वी -
पुलावामा हल्ला: देश दुःखात बुडाला, पण मोदी कॉर्बेट पार्कात शूटिंग करत होते: काँग्रेसने पुरावे दिले
पुलवामा जिल्ह्यात दहशदवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्यात १० जवान शहीद झाले. त्यानंतर संपूर्ण देश दुःखात बुडाला असताना नरेंद्र मोदी नेमके काय करत होते याचे पुरावे सादर करण्यात आले आहे. जवान शहीद झाल्यानंतर देशात सर्वांनी एकत्र येण्याची हाक सत्ताधाऱ्यांनी विरोधकांनी दिली होती. त्यानंतर विरोधकांनी देखील सामंज्याची भूमिका घेत सरकारला सहकार्य देखील केलं. वातावरण भावनिक असल्याने विरोधकांनी कोणतेही प्रश्न उपस्थित केले असते तर मोदींनी त्याच राजकारण केलं असतं हे विरोधकांना चांगलेच ठाऊक होतं. कारण, स्वतः भाजपचे नेते म्हणजे नरेंद्र मोदी, अमित शहा आणि योगी आदित्यनाथ हे सर्वच प्रमुख नेते प्रचारात व्यस्त होते. त्यात हद्द म्हणजे, दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावून स्वतः नरेंद्र मोदी यवतमाळमध्ये प्रचारासाठी गेले आणि तेथे सुद्धा लष्कराच्या नावाने स्वतःचा आणि पक्षाचा प्रचार केल्याचे पाहायला मिळाले.
5 वर्षांपूर्वी -
गुप्तचर यंत्रणांचा इशारा! जैश-ए-मोहम्मद मोठा हल्ला करण्याच्या तयारीत
पुलवामा दहशतवादी हल्ल्यात यश मिळाल्याने जैश-ए-मोहम्मदने आधीपेक्षा देखील भयानक आत्मघाती हल्ला करण्याची मोठी योजना आखल्याची खात्रीलायक माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. त्यानुसार १६ ते १७ फेब्रुवारीदरम्यान जैश-ए-मोहम्मदच्या प्रमुखांची आणि काश्मीरमधील दहशतवाद्यांमध्ये संभाषण झालं असून त्याआधारेच गुप्तचर यंत्रणांनी सदर इशारा दिला आहे. १४ फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे तब्बल ४० जवान शहीद झाले.
5 वर्षांपूर्वी -
उद्धव यांनी भाषणात 'चौकीदार चोर हैं' म्हटलं होतं, आता 'चौकीदार थोर आहेत' बोलण्याची शक्यता?
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्या अनुषंगाने सर्वच पक्ष झपाटून कामाला लागले आहेत आणि त्याचाच परिपाक म्हणजे सत्तेत राहून तब्बल साडेचार वर्ष मोदींवर आणि भाजपवर वारंवार टीका करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वबळाच्या नाऱ्यावरून पलटले आहेत. अगदी विरोधकांच्या सुरात सुर मिळवून राफेल लढाऊ विमानांच्या कारणावरून देखील मोदींवर टीकास्त्र सोडण्यात आलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
अनिल अंबानींना कोर्टाचा दणका; ४ आठवड्यात ४५३ कोटी द्या, अन्यथा ३ महिन्यांचा तुरुंगवास
रिलायन्स कम्युनिकेशन्स विरोधातील एरिक्सन इंडियाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज निर्णय दिला आहे. अनिल अंबानी यांनी ४ आठवड्यामध्ये थकवलेले ४५३ कोटी रुपये भरावे, अन्यथा ३ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगण्यास तयार रहावे, असे निर्णयाअंती बजावले आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स शेअर्समध्ये घसरण वाढतेय, स्टॉक Hold करावा की Sell?
- Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल
- Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर मजबूत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हलसहित टार्गेट प्राईस जाहीर
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे टॉप 5 शेअर्स मालामाल करणार, अल्पावधीत तगडा परतावा मिळेल
- RVNL Share Price | PSU स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सुसाट धावणार
- Numerology Horoscope | 10 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Infosys Share Price | हलक्यात घेऊ नका! Infosys, TCS, Wipro सहित हे 7 शेअर्स मालामाल करणार, हाय ट्रेडिंग व्हॉल्यूम
- HAL Share Vs BEL Share Price | PSU HAL आणि BEL शेअर्स दणादण परतावा देणार, अल्पावधीत 30% कमाई करा
- Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल
- Tata Power Share Price | चिंता वाढली! टाटा पॉवर शेअर्स 45 टक्क्याने घसरणार? स्टॉक Hold करावा की Sell?