महत्वाच्या बातम्या
-
देशातील सर्वांना हिंदू म्हणणे योग्य नाही; आठवले आरएसएस'शी असहमत
देशातील १३० कोटी लोकांना संघ हिंदूच मानतो, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. सरसंघचालकांनी हिंदुत्वावरून केलेल्या वक्तव्यावर केंद्रीयमंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
केजरीवाल सरकार मोदी सरकारच्या विकास कामांचं क्रेडिट स्वतःकडे घेत आहे: अमित शहा
राजधानी दिल्लीत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोपांच्या फेरी झडण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारी दिल्ली विकास प्राधिकरणद्वारा आयोजित एका कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर कडाडून टीका केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
स्वखर्चातून १ लाख २० हजारात मोदींचं मंदिर; अन घरी गॅस जोडणी व शौचालय सरकारी योजनेतून
तामिळनाडूच्या त्रिचीमधील भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असणाऱ्या पी. शंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील प्रेमापोटी आपण हे मंदिर बांधल्याचे म्हटलं आहे. येथील इराकुडी गावामध्ये हे छोट्या आकाराचे मंदिर बांधण्यात आलं आहे. हे मंदिर आता पंचक्रोषीमध्ये ‘नमो मंदिर’ नावाने लोकप्रिय झालं आहे. आजूबाजूच्या गावांमधून अनेकजण या मंदिरामध्ये असणाऱ्या मोदींच्या मुर्तीचे दर्शन घेण्यासाठी येऊ लागले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
मोदी खोटं बोलत आहेत; आसाममध्ये स्थानबद्धता छावणी (डिटेंशन सेंटर) उभारणी: राहुल गांधी
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी डिटेंशन सेंटरबाबत खोटे बोलले असल्याचा आरोप केला आहे. डिटेक्शन सेंटरबाबत काँग्रेस वाईट हेतूने लोकांमध्ये खोटे पसरवत आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीतील रामलीला मैदानावरील सभेत बोलताना म्हटले होते. पंतप्रधानांच्या याच विधानाला उत्तर देताना राहुल गांधी यांनी ट्विट करत पंतप्रधान मोदी खोटे बोलत असल्याचे म्हटले आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदी-शहांवरील अतिआत्मविश्वास भाजपाला नडतो आहे? सविस्तर वृत्त
झारखंड विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाने हिंदी भाषिक पट्ट्यातील अजून एक महत्वाचं राज्य गमावलं आहे. यावर सध्या भारतीय जनता पक्षामध्ये पक्षांतर्गत खलबतं सुरु असून मुख्य कारणं शोधण्याची प्रक्रिया पार पडत असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर प्राथमिक स्तरावर अनेक धक्कादायक विषय समोर येत असून तीच प्राथमिक स्तरावर पराभवाची कारणं असल्याची खात्री वरिष्ठांना आहे.
4 वर्षांपूर्वी -
झारखंड: मतदाराने मोदी-शहा जोडीसहित भाजपला नाकारलं; काँग्रेस-झामुमोची मुसंडी
झारखंड विधानसभेच्या ८१ जागांवरील मतमोजणी आज सुरु झाली. या निवडणूकीत मुख्यमंत्री रघुवीर दास यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर रघुवीर दास यांचे पुन्हा मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न धुळीस मिळवण्याची तयारी हेमंत सोरेन यांनी केलेली दिसतेय. पहिला कल ९ वाजता येणार होता, ज्यामध्ये एकूण ६७ मतदारसंघ नक्षलग्रस्त भागात येतात. त्यामुळे पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आला होता. एकूण २४ केंद्रावर मतमोजणी होणार आहे. १ हजार २१५ उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
तरुणानों, मोदी-शाह यांनी तुमचं भविष्य उद्ध्वस्त केलं - राहुल गांधी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सडकून टीका केली आहे. मोदी आणि अमित शहा देशाचं विभाजन करत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. शिवाय या दोघांनी भारताचं भविष्य नष्ट केलं, असा घणाघातही केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदी म्हणाले काँग्रेसने समाज माध्यमांवर फेक व्हिडिओ पसरवले; अन भाजप नेत्यांनी? सविस्तर वृत्त
देशातील तरुणांना आवाहन करतो की त्यांनी एकदा सुधारित नागरिकत्व कायदा वाचावा आणि समजून घ्यावा. राष्ट्रीय नागरिक नोंदणी आणि सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत शिकले सवरलेले अर्बन नक्षलवादी अफवा पसरवण्याचे काम करत आहेत. काँग्रेस आणि अर्बन नक्षलवाद्यांकडून पसरवण्यात आलेली डिटेन्शन कॅम्पची अफवा खोटी आहे. बदनामी करणारी आहे. देशाला उद्ध्वस्त करण्यासाठी अशा अफवा पसरवल्या जात आहेत, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
काँग्रेस व सुशिक्षित अर्बन नक्षलवादी अफवा पसरवण्याचे काम करत आहेत: नरेंद्र मोदी
देशातील तरुणांना आवाहन करतो की त्यांनी एकदा सुधारित नागरिकत्व कायदा वाचावा आणि समजून घ्यावा. राष्ट्रीय नागरिक नोंदणी आणि सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत शिकले सवरलेले अर्बन नक्षलवादी अफवा पसरवण्याचे काम करत आहेत. काँग्रेस आणि अर्बन नक्षलवाद्यांकडून पसरवण्यात आलेली डिटेन्शन कॅम्पची अफवा खोटी आहे. बदनामी करणारी आहे. देशाला उद्ध्वस्त करण्यासाठी अशा अफवा पसरवल्या जात आहेत, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
EXIT POLL: महाराष्ट्रानंतर झारखंडमध्ये भाजपाची सत्ता जाणार; मोदी-शहांना झटका
झारखंड विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ डिसेंबर रोजी लागणार आहे. त्यापूर्वीच एक्झिट पोलचा अंदाज जाहीर झाला आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार झारखंडमधून भारतीय जनता पक्षाला सत्तेतून पायउतार व्हावं लागणार आहे. तर राज्यात जेएमएम-काँग्रेस आघाडीचं सरकार येण्याची चिन्हे असून भारतीय जनता पक्षासाठी हे निकाल धक्कादायक असल्याचं मानलं जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
कर्नाटकमधील भाजपच्या मंत्र्याची थेट ‘गोध्रा’सारख्या परिस्थितीची धमकी
कर्नाटकातील काँग्रेस नेते यु. टी. खादेर यांनी म्हटलं होतं की, “जर सुधारित नागरिकत्व कायदा राज्यात लागू झाला तर कर्नाटक जळेल.” खादेर यांच्या या विधानावर प्रत्युत्तर देताना मंत्री रावी यांनी म्हटलं, “जर बहुसंख्याकांचा संयम सुटला तर गोध्रा सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते”.
4 वर्षांपूर्वी -
५-६ वर्षांपूर्वी देशाची अर्थव्यवस्था भयानक स्थितीत होती; आम्ही स्थिर केली: नरेंद्र मोदी
देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत गदारोळ सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी दिल्लीत एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मोदी म्हणाले की, देशासाठी काम करताना मोठ्या प्रमाणावर लोकांचा राग सहन करावा लागतो, तसेच बर्याच लोकांना असंतोष देखील सहन करावा लागतो आहे, याशिवाय अनेक आरोपांनाही तोंड द्यावं लागतं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ASSOCHAM कार्यक्रमात अर्थव्यवस्था, जीएसटी आणि ‘इज ऑफ डोईंगच्या’ रँकिंगबद्दल मत व्यक्त केले.
4 वर्षांपूर्वी -
CAA: अहमदाबादमध्ये उपद्रव्यांकडून थेट पोलिसांवर दगडफेक
नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून देशभरात उद्रेक झालेला असताना अनेक ठिकाणी पोलीस देखील हिंसाचाराचे लक्ष होतं आहेत. ईशान्य भारतानंतर उत्तर भारतात देखील हिंसक आंदोलनांनी उचल घेतल्यानंतर तीच धग आता पश्चिम भारतात देखील त्याचं लोन पसरल्याचं पाहायला मिळत आहे.
4 वर्षांपूर्वी -
सुप्रीम कोर्टाकडून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला स्थागिती नाही; पण केंद्राला नोटीस
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला आव्हान देण्यात आलेल्या याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात एकूण ५९ याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाल्या आहेत. या सर्व याचिकांवर सरन्यायाधीश शरद बोबडे, न्यायमूर्ती बी आर गवई आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांचं घटनापीठ सुनावणी करणार होते. याचिकाकर्त्यांमध्ये काँग्रेस नेते जयराम रमेश, एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी, तृणमूल काँग्रेसचे नेते महुआ मोईत्रा, राजदचे मनोज झा, जमीयत उलेमा ए हिंद, इंडियन मुस्लीम लीग यांचा समावेश आहे.
4 वर्षांपूर्वी -
पवारांनी शिवसेनेसमोर मुख्यमंत्रिपदाचे दाणे टाकले आणि त्यांनी ते टिपले: अमित शहा
एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमित शहा यांनी अनेक मुद्यांना हात घातला आहे. तुम्ही नवे पंतप्रधानपदाचे दावेदार असू शकतात का? नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधानपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाची धुरा सांभाळण्यासाठी तुम्हाला तयार केलं जात आहे का? असे सवाल अमित शाह यांना करण्यात आले. यावर बोलताना आपल्यापेक्षाही दिग्गज नेते पक्षात असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
4 वर्षांपूर्वी -
त्यांच्याकडे आधीच पाकिस्तानच नागरिकत्व असताना पुन्हा भारताचं नागरिकत्व कशासाठी? पी. चिदंबरम
नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात राजधानी दिल्लीसह देशभरात अनेक ठिकाणी सुरू असलेले आंदोलन मंगळवारीही सुरूच राहिले. अनेक ठिकाणी विद्यार्थी, कार्यकर्ते, विरोधी पक्षांचे नेते रस्त्यांवर उतरले. आसामसह केरळ, तेलंगण, तमिळनाडू, पश्चिम बंगालसह अन्य ठिकाणी नव्याने निदर्शने करण्यात आली.
4 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरे व सेनेच्या बदनामीसाठी खोटा व्हिडिओ प्रचार; फडणवीस सुद्धा सामील - सविस्तर
नागरिकत्व दुरुस्ती कायद्या संसदेत मजूर झाल्यानंतर देशभर मोदी सरकारविरोधात संताप व्यक्त करण्यात येतो आहे. विद्यार्थीच रस्त्यावर ईशान्य भारतात उग्र स्वरूप आलेलं असताना दिल्लीत विद्यापीठात देखील प्रसार माध्यमांच्या केंद्रस्थानी आहे. मात्र, याच अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटीच्या (एएमयू) विद्यार्थ्यांच्या संबंधित आंदोलन आणि घोषबाजीवरून १-२ व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल करण्यात येत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
‘मेक इन इंडिया’ म्हणजे काम कमी, बडबड जास्त: भारताचे हवाई दल प्रमुख
भारताचे हवाई दल प्रमुख राकेश कुमार सिंह भदौरिया यांनी ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमावरुन मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत स्वदेशी बनावटीच्या शस्त्रास्त्रांची निर्मितीचा उद्देश आहे. पण सध्या काम कमी आणि फक्त चर्चा सुरु आहेत. मेक इन इंडियाचा उद्देश खूप चांगला आहे. पण प्रत्यक्षात काम खूप धीम्या गतीने सुरु आहे असे भदौरिया म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
मोदींनी 'मन की बात'साठी नेटिझन्सकडून सूचना मागविल्या; सूचना वाचून फक्त हसाल
मन की बात अंतर्गत मोदी दार महिन्याला नेटिझन्ससोबत संवाद साधत असतात. त्यासाठी ते नेटिझन्सकडून ऑनलाईन सूचना आणि काही नव्या कल्पना देखील मागवत असतात. मात्र मागील काही दिवसांपासून प्रचंड वाढलेले बेरोजगारी, महागाई, ढासळती अर्थव्यवस्था आणि तरुणांशी संबधित न वाढणारे रोजगार आणि इतर कृषीविषयक निरनिराळ्या समस्या पाहता, मोदींनी दाखवलेल्या खोट्या स्वप्नांवरून लोकं संतापल्याच पाहायला मिळत आहे.
4 वर्षांपूर्वी -
भारतात पॉर्न साईट्सवर बंदी घाला; नितीश कुमार यांची पंतप्रधानांकडे मागणी
संयुक्त जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं आहे. त्यांनी या पत्रात इंटरनेटवरील पॉर्न साईट्स आणि अश्लिल मजकुरावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. बलात्कारासारख्या घटनांसाठी पॉर्न साईट्सच जबाबदार असतात, असं वक्तव्य यापूर्वी त्यांनी केलं होतं.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल
- Mastek Share Price | 40 रुपयाच्या शेअरची कमाल! तब्बल 4000 टक्के परतावा दिला, आता एका दिवसात 20% वाढला
- Numerology Horoscope | 22 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल
- Gold Rate Today | बापरे! लग्नासराईच्या दिवसातही सोनं खरेदी करणं परवडणार नाही, लवकरच 1 लाख रुपये तोळा होणार
- Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा
- Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार?
- Numerology Horoscope | 17 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
- Infosys Share Price | भरवशाचा इन्फोसिस शेअर उसळी घेणार, दिग्गज ब्रोकिंग तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर
- Stocks in Focus | मार्ग श्रीमंतीचा! हे टॉप 5 बँकिंग शेअर्स तुम्हाला अल्पावधीत 38 टक्केपर्यंत परतावा देतील, संधी सोडू नका