महत्वाच्या बातम्या
-
नाणार प्रकल्प | गुलाबराव पाटील यांची खासदार नारायण राणे यांच्यावर बोचरी टीका
नारायण राणे म्हणजे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी झाले आहेत. त्यांच्याकडे सध्या कोणताही कामधंदा उरलेला नाही, अशी बोचरी टीका शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी केली. काही दिवसांपूर्वीच नारायण राणे यांनी कोकणातील नाणार प्रकल्पावरून शिवसेनेला लक्ष्य केले होते. नाणार प्रकल्पाला ८० टक्के स्थानिकांचा पाठिंबा असल्याचा दावा शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांकडून केला जातो. मात्र, यामागे शिवसेनेचा केवळ पैसे कमावण्याचा हेतू आहे, असे राणे यांनी म्हटले होते.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात भाजपचं सरकार आल्यावर आपला उदय झाला, तत्पूर्वीचे आपले महान कार्य राज्यापुढे नाही
गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सुशांत सिंग प्रकरणात मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केले जात आहेत. हे प्रकरण दडपण्यासाठी पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. अशातच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी या मुद्द्यावरुन मुंबई पोलिसांवर टीकास्त्र सोडलं होतं. मुंबईत राहणं असुरक्षित वाटत आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली होती.
5 वर्षांपूर्वी -
भाजपच्या पाठिंब्यावर उभ्या राहिलेल्या वृत्तवाहिनीतून सुशांत प्रकरणात आघाडी उघडली
सुशांतच्या बिहार सरकार आणि केंद्र सरकारकडून राजकारण होत आहे. मुंबई पोलीस याबाबत सत्य समोर आणण्याचा प्रयत्न करत आहे. काही लोकं रहस्य लपवण्यासाठी दबाव तंत्र वापरत आहेत. महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधण्यासाठी प्रयत्न होत आहेत. आज सामनातून यावर प्रकाश टाकला आहे. या प्रकरणाचा राजकीय फायद्यासाठी वापर होत आहे. मुंबई पोलिसांनी तपास पूर्ण केल्यानंतर मग मतं मांडावे आणि टीका करावी, देशात लोकशाही आहे. कोणाचे हात कुठेपर्यंत पोहोचले आहे हे आम्हाला माहित आहे. असं ही राऊतांनी म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
सुशांत प्रकरण | आदित्य ठाकरेंना वाचवण्यासाठी राऊत गुजरात दंगलीबद्दल बोलत आहेत - निलेश राणे
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप नेत्यांनी केलेल्या आरोपानंतर आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या तपासाबद्दल काही प्रश्न उपस्थितीत केले आहे. एवढंच ‘नाहीतर मुंबई पोलिसांमध्ये . बिहारप्रमाणे काही गुप्तेश्वर पांडे महाराष्ट्र पोलिसांत आहेत व त्यांच्यामुळे अडचणीत भर पडली’ असा संशयही राऊतांनी व्यक्त केला.
5 वर्षांपूर्वी -
सुशांतच्या वडिलांनी दुसरे लग्न केल्याने त्याचे वडिलांशी चांगले संबंध नव्हते - संजय राऊत
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप नेत्यांनी केलेल्या आरोपानंतर आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या तपासाबद्दल काही प्रश्न उपस्थितीत केले आहे. एवढंच ‘नाहीतर मुंबई पोलिसांमध्ये . बिहारप्रमाणे काही गुप्तेश्वर पांडे महाराष्ट्र पोलिसांत आहेत व त्यांच्यामुळे अडचणीत भर पडली’ असा संशयही राऊतांनी व्यक्त केला.
5 वर्षांपूर्वी -
अन्यथा सुशांतसिंह प्रकरणावरून राज्य सरकार बरखास्त होईल हे लक्षात ठेवा : आ. भातखळकर
सुशांत प्रकरणावरून भाजपने महाविकास आघाडीला कात्रीत पकडण्याची योजना आखल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपचा रोख महाविकास आघाडीवर त्यांचं मुख्य लक्ष हे शिवसेनेचे नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे हेच असल्याचं म्हटलं जातं आहे. त्यामुळे समाज माध्यमांवर देखील मागील दिवसांपासून आदित्य ठाकरे यांना मोठ्या प्रमाणावर लक्ष करण्यात आलं आहे. तसेच सुशांत प्रकरणात केंद्राने सीबीआय चौकशीला मान्यता दिल्यानंतर त्याचे संकेत देखील मिळत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने देखील सुप्रीम कोर्टात याच विषयावरून स्वतःची भूमिका आधीच मांडण्यास सुरुवात केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | मेटे धादांत खोटे बोलत असून ते फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिशाभूल करत आहेत
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. पण न्यायालयात महाविकास आघाडी सरकारकडून बाजू मांडली जाताना दिसत नाही. तर आरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे आहेत. मात्र त्यांनी आजवर कोणत्याही प्रकाराचे निर्णय घेतले नाही. त्यामुळे अशोक चव्हाण यांना या पदावरून हटवण्यात यावे, अशी मागणी मराठा आमदार विनायक मेटे यांनी केली. मराठा समन्वय समितीची बैठक आज पुण्यात पार पडली, या बैठकीनंतर ते बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
मराठा समन्वय समितीवरून अशोक चव्हाणांना हटवा | मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्याला विरोध
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. पण न्यायालयात महाविकास आघाडी सरकारकडून बाजू मांडली जाताना दिसत नाही. तर आरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे आहेत. मात्र त्यांनी आजवर कोणत्याही प्रकाराचे निर्णय घेतले नाही. त्यामुळे अशोक चव्हाण यांना या पदावरून हटवण्यात यावे, अशी मागणी मराठा आमदार विनायक मेटे यांनी केली. मराठा समन्वय समितीची बैठक आज पुण्यात पार पडली, या बैठकीनंतर ते बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
दिशावर बलात्कार झाल्याचा आरोप चुकीचा | आमचा मुंबई पोलिसांवर विश्वास - दिशाची आई
दिशावर बलात्कार करुन तिची हत्या केली आहे असा आरोप केला जात आहे. हे सर्व चुकीचं आहे. आम्ही दोनदा पोलिसांना जबाब दिला आहे. मालवणी पोलिसांकडे याचा रेकॉर्ड आहे. आम्ही पोस्टमोर्टम रिपोर्ट पाहिला आहे. मुंबई पोलीस योग्यरितीने काम करत आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांवर आमचा विश्वास आहे. आम्ही शांत आहोत पण मीडिया आमच्या मुलीची बदनामी करत आहे. आम्ही आता सहन करु शकत नाही. लोकांनी सत्य स्वीकारावं अशी विनंती दिशाच्या आई-वडिलांनी केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
सुशांतसिंग प्रकरण | राज्य सरकारचं सर्वोच्च न्यायालयात उत्तर, CBI चौकशीला विरोध
अभिनेता सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र सरकारने रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात उत्तर दिलं आहे. महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीला विरोध केला आहे. महाराष्ट्र सरकारने सील बंद लिफाफ्यात चौकशी कुठपर्यंत आली याबाबतची माहिती देण्यात आली. सुशांतसिंग प्रकरणी बिहार सरकारने नियमांविरुद्ध जाऊन काम केलं, असा आरोप महाराष्ट्र सरकारने केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
बाप्पा पावला महाराष्ट्र सैनिक मदतीला धावला | बसने कोकणात तर विशेष ट्रेनचा मार्ग मोकळा
कोकणातील गणेशभक्तांना गावाकडे जाण्यासाठी राज्य सरकार कोणतीही सुविधा उपलब्ध करून देत नसल्याचा आरोप करत बससेवा सुरू करण्याची घोषणा करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आपला शब्द पाळला आहे. चाकरमान्यांसाठी मनसेची गणपती स्पेशल बस सेवा आजपासून सुरू झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
CBI अधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांची परवानगी न घेतल्यास, क्वारंटाईन अटळ - महापौर
बिहारमधील पाटण्याचे एसपी विनय तिवार यांचे मुंबई महानगरपालिकेने क्वारंटाईन समाप्त केले आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येचा तपास करण्यासाठी आलेले विनय तिवारी यांना बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्वारंटाईन केले होते. ते बिहारहून मुंबईला आले होते.
5 वर्षांपूर्वी -
दिशा सालियनची आत्महत्या की खून झाला | मैत्रिणीने सांगितलं नेमकं काय घडलं त्यादिवशी
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येच्या चौकशीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावरुन भाजप नेते नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली होती. “सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या आत्महत्याची पोलिसांनी चौकशी का केली नाही, माझ्या माहितीनुसार तिने आत्महत्या केली नाही, तर तिची देखील हत्या केली आहे. तिच्यावर बलात्कार करुन तिला मारण्यात आलं आहे. तिच्या गुप्तांगावर जखमा आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्या दृष्टीने तपास करायला हवा,” असे नारायण राणे म्हणाले होते. “सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलीस कोणाला वाचवतंय,” असा प्रश्नही नारायण राणे यांनी यावेळी उपस्थित केला होता.
5 वर्षांपूर्वी -
टकटक गँग | अभिनेते भारत गणेशपुरे यांनी अनुभवला एक वाईट प्रसंग
तुमची गाडी सिग्नलवर उभी असेल, तर टकटक करून लक्ष वेधून घ्यायचे आणि तुमच्या किंमती वस्तू लंपास करायच्या, अशी शक्कल लढवण्यात टकटक गँग माहीर असते. मात्र आता तेवढ्यापुरते आपले हस्तकौशल्य न दाखवता थेट आयफोनची आंतरराष्ट्रीय सुरक्षा भेदून फोनमधला पूर्ण डाटाच डिलिट करण्यापर्यंत ही टोळी हायटेकही झाली आहे. काही दिवसांपूर्वी एका खासगी कंपनीत असोसिएट व्हाइस प्रेसिडेन्ट पदावर असलेल्या ३२ वर्षांच्या तरुणास ठाण्यातील मानपाडा पुलावर अशा फसवणुकीचा फटका बसला होता.
5 वर्षांपूर्वी -
शोविक चक्रवर्तीच्या बँक खात्यात सुशांतच्या खात्यातून पैसे ट्रान्सफर झाल्याचा ईडीला संशय - सविस्तर वृत्त
सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाने एक नवं वळण घेतलं आहे. सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती तपासाच्या दुहेरी कचाट्यात सापडली आहे. सीबीयाकडून रिया चक्रवर्तीसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आली असून ईडीकडूनही रियाची चौकशी आज करण्यात येणार आहे. रिया चक्रवर्ती या चौकशीसाठी उपस्थित राहणार की, नाही? यावरुन अनेक शंका-कुशंका उपस्थित करण्यात येत होत्या. अशातच रिया चक्रवर्तीने चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजेरी लावली आहे. दरम्यान, ईडीने समन्स बजावल्यानंतर कोरोना होण्याच्या भितीमुळे रिया चौकशीसाठी उपस्थित राहणार नसल्याचं बोललं जात होतं.
5 वर्षांपूर्वी -
सुशांत प्रकरण | त्यांनी मला क्वारंटाईन नाही तर चौकशीच क्वारंटाईन केली
सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबईत आलेले बिहारचे पोलीस अधिकारी पटण्यासाठी रवाना झाले आहेत. मला क्वारंटाईन केल्यामुळे चौकशीत अडथळा आल्याचा आरोप विनय तिवारी यांनी केला आहे. पटण्याला परतत असताना विनय तिवारी यांनी माध्यमांशी संवाद साधला.
5 वर्षांपूर्वी -
सुशांत प्रकरण | बिहार निवडणुकीसाठी मुंबई पोलिसांची बदनामी हा भाजपचा महाराष्ट्र द्रोह
महाराष्ट्र भाजपाकडून झालेल्या टीकेला काँग्रेसनं उत्तर दिलं आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करून भाजपावर निशाणा साधला. “बिहार निवडणूकीसाठी राजकारण करण्याकरिता बिहार पोलिसांचे गुणगान करुन मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महाराष्ट्र भाजपाच्या नेत्यांचा महाराष्ट्र द्रोह हा उठून दिसत आहे. ही मंडळी अत्यंत खालच्या पातळीवर उतरू शकतात. भाजपा महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला लागलेला कलंक आहे,” असा हल्लाबोल सावंत यांनी केला.
5 वर्षांपूर्वी -
सुशांत प्रकरण | रियाची ईडी कार्यालयात संध्याकाळपर्यंत चौकशी होण्याची शक्यता
सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाने एक नवं वळण घेतलं आहे. सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती तपासाच्या दुहेरी कचाट्यात सापडली आहे. सीबीयाकडून रिया चक्रवर्तीसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आली असून ईडीकडूनही रियाची चौकशी आज करण्यात येणार आहे. रिया चक्रवर्ती या चौकशीसाठी उपस्थित राहणार की, नाही? यावरुन अनेक शंका-कुशंका उपस्थित करण्यात येत होत्या. अशातच रिया चक्रवर्तीने चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजेरी लावली आहे. दरम्यान, ईडीने समन्स बजावल्यानंतर कोरोना होण्याच्या भितीमुळे रिया चौकशीसाठी उपस्थित राहणार नसल्याचं बोललं जात होतं.
5 वर्षांपूर्वी -
सुशांतसिंह प्रकरण | बिहार पोलीस अधिकारी विनय तिवारींची क्वारंटाईनमधून मुक्तता
बिहारमधील पाटण्याचे एसपी विनय तिवार यांचे मुंबई महानगरपालिकेने क्वारंटाईन समाप्त केले आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येचा तपास करण्यासाठी आलेले विनय तिवारी यांना बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्वारंटाईन केले होते. ते बिहारहून मुंबईला आले होते.
5 वर्षांपूर्वी -
BREAKING | सीबीआयकडून SSR आत्महत्या प्रकरणी रिया चक्रवर्तीविरोधात FIR
अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानं आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं. ज्यानंतर त्याच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास विविध अंगांनी करण्यात आला. सध्याच्या घडीला मिळालेल्या माहितीनुसार आता हे संपूर्ण प्रकरण CBI च्या हाती गेलं असून, सुशांतची प्रेयसी आणि त्याच्यासमवेत एकेकाळी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या अभनेत्री रिया चक्रवर्ती हिच्याविरोधात एफआयआर दाखल केली आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, आज 6.26% वाढला, फायदा घ्या - NSE: ADANIPOWER
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरेदी करून ठेवा हा मल्टिबॅगर शेअर, भविष्यातील आर्थिक चिंता मिटेल - NSE: VEDL
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, झटपट मिळेल 24% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL
-
Suzlon Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्तात खरेदी करून ठेवा, पैसा वाढवा - NSE: SUZLON
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये आज 2.51% तेजी; जोरदार खरेदी, नेमकं कारण काय? - NSE: TATATECH