महत्वाच्या बातम्या
-
मनसेच्या व्यासपीठावर वीर सावरकरांची प्रतिमा; राज ठाकरे हिंदुत्वाची भूमिका मांडणार?
राज ठाकरे यांच्या मनसेचं पहिलंच महाअधिवेशन २३ जानेवारीला म्हणजे आज बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मदिनी होत आहे. मागील अनेक दिवसांपासून या महाअधिवेशनाची तयारी सुरु होती. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मनसैनिक मुंबईत येत आहेत. मुंबईतील गोरेगाव इथल्या एग्जिबिशन सेंटर इथे सकाळी ९ वाजता या अधिवेशनाला सुरुवात होईल. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा आणि अजेंडा बदलण्याच्या तयारीत असल्याचीही जोरदार चर्चा आहे.
4 वर्षांपूर्वी -
मनसेच्या झेंड्यासोबतच कार्यकर्त्यांच्या गळ्यातील मफलर'मध्ये सुद्धा भगवा जोश
राज ठाकरे यांच्या मनसेचं पहिलंच महाअधिवेशन २३ जानेवारीला बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मदिनी होत आहे. मागील अनेक दिवसांपासून या महाअधिवेशनाची तयारी सुरु आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मनसैनिक मुंबईत येत आहेत. मुंबईतील गोरेगाव इथल्या एग्जिबिशन सेंटर इथे सकाळी ९ वाजता या अधिवेशनाला सुरुवात होईल. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा आणि अजेंडा बदलण्याच्या तयारीत असल्याचीही जोरदार चर्चा आहे.
4 वर्षांपूर्वी -
ही नाइटलाइफ नसून किलिंग लाइफ आहे; आशिष शेलारांनी कमला मिलचं उदाहरण दिलं
मुंबईत नाईट लाईफला राज्य सरकारकडून तत्वत: मंजुरी देण्यात आली आहे. कॅबिनेट बैठकीनंतर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. ‘पब आणि बारसाठी नवे नियम करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पब आणि बार हे आधीप्रमाणेच रात्री दीड वाजेपर्यंतच सुरू राहतील,’ अशी माहितीही आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. ‘मुंबईचा महसूल वाढण्यासाठी आम्ही २०१३ मध्ये ही नाईट लाईफची संकल्पना मांडली होती. आता सात वर्षानंतर ही संकल्पना प्रत्यक्षात राबवण्यात येत आहे. यामुळे रोजगारात वाढ होणार आहे. २७ जानेवारीपासून नाईट लाईफबाबतचा नियम लागू होईल,’ अशी माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर २७ जानेवारीपासून मुंबईत ‘नाइट लाइफ’ सुरु
मुंबईत नाईट लाईफला राज्य सरकारकडून तत्वत: मंजुरी देण्यात आली आहे. कॅबिनेट बैठकीनंतर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. ‘पब आणि बारसाठी नवे नियम करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पब आणि बार हे आधीप्रमाणेच रात्री दीड वाजेपर्यंतच सुरू राहतील,’ अशी माहितीही आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. ‘मुंबईचा महसूल वाढण्यासाठी आम्ही २०१३ मध्ये ही नाईट लाईफची संकल्पना मांडली होती. आता सात वर्षानंतर ही संकल्पना प्रत्यक्षात राबवण्यात येत आहे. यामुळे रोजगारात वाढ होणार आहे. २७ जानेवारीपासून नाईट लाईफबाबतचा नियम लागू होईल,’ अशी माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपच्या चेहऱ्यावरचे मुखवटे संपता संपत नाही; शिवसेनेची टीका
भारतीय जनता पक्षाच्या चेहऱ्यावरचे मुखवटे संपता संपत नाहीत, असं म्हणत शिवसेनेनं पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. शिवसेनेचा खरा चेहरा कोणता यावर महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाने संशोधन सुरू केले आहे. संशोधन म्हणण्यापेक्षा पुरातत्व विभागाचे उत्खनन म्हणणे सोयीचे ठरेल, असं म्हणत शिवसेनेनं भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला. २०१४ मध्ये सत्तास्थापनेसाठी शिवसेनेने काँग्रेसशी संपर्क साधला होता, असा दावा काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने शिवसेनेवर निशाणा साधला होता.
4 वर्षांपूर्वी -
असा असेल मनसेचा नवा भगवा झेंडा? नवा प्रस्तावित झेंडा निवडणूक आयोगाकडे पाठवला
महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोठे बदल करण्याच्या तयारीत असून उद्या म्हणजेच २३ जानेवारीला होणाऱ्या महाअधिवेशनात पक्षाची पुढील वाटचाल ठरवली जाणार आहे. या महाअधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे काही मोठे बदल करणार असून पक्षाचा झेंडाही बदलणार असल्याचं बोललं जात आहे. पक्षाने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली तरी गेल्या काही दिवसांतील घडामोडीवरुन तसे संकेत मिळत आहे.
4 वर्षांपूर्वी -
कुठल्या काळात? मुंबई पोलिसांना गरज 'त्या' अत्याधुनिक घोड्यांची; सरकारने दिले 'हे' घोडे
आज मुंबई पोलिसांकडे उपलब्ध असलेल्या हत्यारांचा आढावा घेतल्यास गुन्हेगार, गँगस्टर आणि दहशतवाद्यांकडे देखील अत्याधुनिक हत्यारं असल्याचं समोर आलं आहे. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जर पोलिसांकडे अत्याधुनिक शस्त्र असती तर वेळीच दहशतवाद्यांना रोखता आलं असतं असा निष्कर्ष देखील समोर आला होता. आज पोलिसांच्या तुलनेत दहशतवादी आणि गुन्हेगार आधुनिक झाले आहेत हे सत्य आहे. राज्य सरकारने देखील पोलिस दलाच्या अत्याधुनिकीकरणासाठी भरीव निधी देण्याची गरज आहे. मात्र तसं होताना दिसत नाही.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक आश्विनी भिडेंची उचलबांगडी; पण का? सविस्तर वृत्त
मुंबई मेट्रो रेल्वेच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील झाडांची कत्तलीनंतर वादग्रस्त ठरलेल्या मुंबई मेट्रो रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालक आश्विनी भिडे यांची त्या पदावरून मंगळवारी उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या जागी रणजीत सिंह देओल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भिडे यांना मात्र अद्याप कोणतीही नवी नियुक्ती देण्यात आलेली नाही.
4 वर्षांपूर्वी -
व्हिडिओवरून भाजपाला जाब विचारणे अत्यंत चुकीचे आणि खोडसाळपणाचे: चंद्रकांत पाटील
तान्हाजी चित्रपटाच्या दृश्यांचा वापर केलेला एक व्हिडिओ कोणीतरी पोलिटिकल कीडा नावाच्या ट्वीटर हँडलवरून पोस्ट करण्यात आला असला तरी त्याच्याशी भारतीय जनता पक्षाचा काहीही संबंध नाही. भारतीय जनता पक्ष त्या व्हिडिओचा दिल्ली विधानसभा निवडणुकीत वापरही करत नाही. भारतीय जनता पक्ष या व्हिडिओचा निषेध करत आहे. या व्हिडिओवरून भारतीय जनता पक्षाला जाब विचारणे अत्यंत चुकीचे आणि खोडसाळपणाचे आहे.
4 वर्षांपूर्वी -
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रस्तावित स्मारकाच्या कामाची पवारांकडून पाहणी
५ टक्के काम झालंय अजून ७५ टक्के करायचे आहे. जर कंपनीने मनापासून ठरवलं आणि कोणत्या परवानग्या शिल्लक राहील्या नाहीत तर २ वर्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काम पूर्ण होईल. अस मत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केल आहे. इंदू मिल येथील जागेची पाहणी शरद पवार यांनी केली त्यानंतर ते बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
भाजपात अंतर्गत कुरघोडी सुरु; मंगलप्रभात लोढांचं पद पुन्हा आशिष शेलारांकडे?
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी जे. पी. नड्डा यांची वर्णी लागल्यानंतर राज्य भारतीय जनता पक्षामध्ये देखील अंतर्गत कुरघोड्या सुरु झाल्याचं वृत्त आहे. त्यात शिवसेना काँग्रेस-राष्ट्र्वादीसोबत गेल्याने पक्षाला आक्रमक मुंबई प्रदेशाध्यक्षाची गरज असून नवा चेहरा मराठीच असावा असा आग्रह पुढे आला आहे. मंगलप्रभात लोढा हे मृदू भाषिक समजले जातात आणि आक्रमकपणा त्यांच्या स्वभावात नाही. त्यात गुजराती मतदार हा भारतीय जनता पक्षाकडे आहे आणि त्यात मुंबई अध्यक्ष गुजराती ठेऊन मराठी मतदार लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा आशिष शेलार यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
मी मुंबईकर ते नाईट लाईफ आणि त्यामागील राजकीय फायदे: सविस्तर वृत्त
२६ जानेवारीपासून मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर नाईट लाईफ सुरु होणार आहे. राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी २६ जानेवारीपासून नरिमन पॉइंट, काळा घोडा, वांद्रे-कुर्ला संकुल अशा तीन ठिकाणी याचा प्रयोग राबविणार असल्याची अधिकृत घोषणा शुक्रवारी केली. मुंबईत नाईटलाईफ असावं ही संकल्पना सगळ्यात आधी आदित्य ठाकरे यांनी मांडली होती. त्यानंतर लगेच पुण्यातही नाईट लाईफ संकल्पनेबाबत चर्चा सुरू झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मनसे अधिकृतने फेसबुक पेज'वरून झेंडा हटवला; हिंदवी स्वराज्याचा झेंडा फडकणार?
राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना लवकरच झेंडा बदलणार आणि हिंदुत्वाच्या अजेंड्यावर वाटचाल करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच आता मनसेच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन पक्षाचा जुना झेंडा गायब झाला आहे. यापूर्वी चार रंगाच्या झेंड्यावर रेल्वे इंजिनचे चिन्ह होते. परंतु, आता फक्त रेल्वे इंजिनच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मनसेच्या झेंडाबदलाच्या चर्चेने आणखीनच वेग पकडला आहे.
4 वर्षांपूर्वी -
पाथरीचा विकास साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून नव्हे तर तीर्थक्षेत्र म्हणून आश्वासन: उद्धव ठाकरे
साईबाबांच्या जन्मस्थळाच्या वादावर अखेर सामोपचाराने पडदा पडला आहे. पाथरीचा विकास साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून नव्हे तर तीर्थक्षेत्र म्हणून करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले व त्यास पाथरी व शिर्डीकरांनी संमती दिल्याने वादाला पूर्णविराम मिळाला आहे. शिर्डी ग्रामस्थांचं 30 जणांच्या शिष्टमंडळाने शिर्डी विरुद्ध पाथरी या साई जन्मस्थळ वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन बैठक घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारही बैठकीला उपस्थित होते.
4 वर्षांपूर्वी -
काँग्रेसच्या दाव्याने शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला आहे: देवेंद्र फडणवीस
“२०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी शिवसेनेने काँग्रेसला सत्ता स्थापनेचा प्रस्ताव दिला होता, मात्र तेव्हा काँग्रसने प्रस्ताव फेटाळला होता,” असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी हा दावा केला. तसंच राज्यातलं सध्याचं सरकार पूर्ण कार्यकाळ पूर्ण करणार का, याबाबत पूर्ण हमी कोणीच देऊ शकणार नाही, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून स्वातंत्र्यवीर सावरकर तसंच इंदिरा गांधी-करीम लाला यांच्या भेटीच्या मुद्द्यावरुन काँग्रेस आणि शिवसेनेत शाब्दिक युद्ध सुरु असतानाच पृथ्वीराज चव्हाणांचा हा गौप्यस्फोट खबळब माजवणारा आहे.
4 वर्षांपूर्वी -
नाईट लाईफ सोडा; इथे पोलिसांची 'लाईफ' घरातच असुरक्षित, स्लॅब कोसळत आहेत
सध्या नाईट लाईफच्या विषयावरून मुंबई शहरातील वातावरण तापलं आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या ड्रीम प्लांनिंग मधील नाईट लाईफ हा महत्वाचा प्रलंबित मुद्दा होता. त्यामुळे सरकारमध्ये विराजमान होऊन मंत्रीपद घेऊन त्यांनी प्रथम मुंबईतील नाईट लाईफला मार्गी लावलं आहे. विशेष म्हणजे या विषयावरून सर्वात मोठा ताण हा मुंबई पोलिसांवर पडणार असल्याने विरोधकांनी देखील त्याला विरोध केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
केवळ सत्तेसाठी उद्धव ठाकरे हिंदुत्वाला विसरले: आ. प्रसाद लाड
राज्यात ठाकरे सरकार स्थापन झाल्यापसून शिवसेना – भारतीय जनता पक्षामधील यांच्यातील वाद अधिकच विकोपाला गेला आहे. तर दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर विविध मुद्यावरून टीका करण्याची कोणतेही संधी सोडत नाही. दरम्यान भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेनेला पक्षप्रमुख आणि मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्ववादाच्या मुद्यावरून निशाणा साधला आहे.
4 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचा २०१४मध्येही काँग्रेससोबत आघाडीचा प्रस्ताव होता: पृथ्वीराज चव्हाण
“२०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी शिवसेनेने काँग्रेसला सत्ता स्थापनेचा प्रस्ताव दिला होता, मात्र तेव्हा काँग्रसने प्रस्ताव फेटाळला होता,” असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी हा दावा केला. तसंच राज्यातलं सध्याचं सरकार पूर्ण कार्यकाळ पूर्ण करणार का, याबाबत पूर्ण हमी कोणीच देऊ शकणार नाही, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून स्वातंत्र्यवीर सावरकर तसंच इंदिरा गांधी-करीम लाला यांच्या भेटीच्या मुद्द्यावरुन काँग्रेस आणि शिवसेनेत शाब्दिक युद्ध सुरु असतानाच पृथ्वीराज चव्हाणांचा हा गौप्यस्फोट खबळब माजवणारा आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपच्या आयात आणि निष्ठावंतांमध्ये तणाव वाढण्यापूर्वीच चंद्रकांत पाटलांचा यु-टर्न
मुंबई: मेगाभरतीमुळं भाजपची संस्कृती बिघडली असं विधान करणारे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी घूमजाव केलं आहे. लोकसभा आणि विधानसभेपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून आलेल्या नेत्यांमुळं भारतीय जनता पक्षाला फायदाच झाला असं स्पष्टीकरण आज चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे. पिंपरीतल्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मेगाभरतीसंदर्भात खंत व्यक्त करणारे सूर आळवले होते. त्यामुळं चंद्रकांत पाटील यांनी पक्षाला घरचा आहेर दिल्याची चर्चा सुरु झाली होती. त्यानंतर भाजपच्या आयात आणि निष्ठावंतांमध्ये तणाव वाढण्यापूर्वीच चंद्रकांत पाटलांचा पत्रकार परिषद घेऊन यु-टर्न घेतल्याचं म्हटलं जातं आहे. त्यांच्या विधानाने फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्या एकाधिकारशाहीकडे देखील अनेकांनी बोटं दाखवलं.
4 वर्षांपूर्वी -
या भांडणातून बाहेर पडा आणि देशाच्या विकासासाठी काम करा: आदित्य ठाकरे
राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सावरकरांना भारतरत्न देण्यावरुन सुरु असलेल्या वादावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. स्वातंत्र्यासाठी लढलेले सर्व स्वातंत्र्यसैनिक महान होते, ते आपली दैवतं आहेत. मात्र, किती दिवस इतिहासावर बोलत राहणार आहात. आता इतिहासाकडून शिकून, प्रेरण घेऊन आजचे प्रश्न साडवायला हवेत, असं मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mastek Share Price | 40 रुपयाच्या शेअरची कमाल! तब्बल 4000 टक्के परतावा दिला, आता एका दिवसात 20% वाढला
- Gold Rate Today | बापरे! लग्नासराईच्या दिवसातही सोनं खरेदी करणं परवडणार नाही, लवकरच 1 लाख रुपये तोळा होणार
- Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा
- Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Infosys Share Price | भरवशाचा इन्फोसिस शेअर उसळी घेणार, दिग्गज ब्रोकिंग तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर
- Numerology Horoscope | 17 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
- Stocks in Focus | मार्ग श्रीमंतीचा! हे टॉप 5 बँकिंग शेअर्स तुम्हाला अल्पावधीत 38 टक्केपर्यंत परतावा देतील, संधी सोडू नका
- Reliance Power Share Price | अवघ्या 4 वर्षात 2325 टक्के परतावा दिला, शेअर प्राईस 26 रुपये, पुढे तेजी येणार का?
- Reliance Infra Share Price | 2 दिवसात रिलायन्स इन्फ्रा शेअर 36 टक्के घसरला, पण स्टॉकला 'या' प्राईसवर सपोर्ट
- Numerology Horoscope | 16 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल