'मोदीमुक्त भारत', प्रचंड सभेत राज ठाकरेंची तोफ धडाडली
मुंबई : भारताला १९४७ साली पाहिलं स्वातंत्र मिळालं आणि दुसरं १९७७ साली. परंतु आता भारताला मोदींच्या हुकूमशाहीतून मुक्त होण्यासाठी २०१९ ला तिसऱ्या स्वातंत्र्याची गरज आहे. त्यामुळे संपूर्ण देशाला प्रलोभन दाखवून फसवणाऱ्या मोदींना २०१९ मध्ये सत्तेतून खाली खेचण्यासाठी ‘मोदीमुक्त भारत’ झालाच पाहिजे असे आव्हाहन त्यांनी संपूर्ण देशाला आणि महाराष्ट्राला केलं.
मोदीमुक्त भारत करण्यासाठी आणि भारताला मोदींच्या हुकूमशाहीतून मुक्त करण्यासाठी २०१९ ला सर्व पक्षांना एकत्र येण्याचे आव्हाहन सुद्धा राज ठाकरेंनी शिवतीर्थावरील प्रचंड सभेत केलं. शिवतीर्थवरील प्रचंड सभेला संबोधित करताना त्यांनी केंद्र आणि राज्य सरकार वर तूफान टीका केली. मोदींनी देशातील जनतेला मोठं मोठी प्रलोभन दाखवून फसवलं आहे आणि दिलेलं एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रातील सर्व प्रश्न संपले असल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री गाणी गात आहेत अशी टीका त्यांनी रिव्हर थीम साँग मधील मुख्यमंत्र्यांच्या आणि अर्थमंत्र्यांच्या अभिनयाचा उल्लेख करून केली. तर मुनगंटीवार यांच्या अभिनयाची त्यांनी थेट शाळेतील सांबा अशीच केली, तर मुख्यमंत्री म्हणजे हे केवळ वर्गातील मॉनिटर आहेत जे शिक्षकांचे आवडते पण विद्यार्थ्यांचे नावडते आहेत.
पीएनबी महाघोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी प्रकरणावरून जनतेचं लक्ष हटाव म्हणून जाणीवपूर्वक श्रीदेवीच्या मृत्यूच्या बातम्या दाखवण्यात आल्या. देशासाठी श्रीदेवीने असं काय केलं होत म्हणून तिचा मृतदेह राष्ट्रध्वजामध्ये गुंडाळण्यात आला होता असा खडा सवाल ही त्यांनी सरकारला केला.
मोदी सरकार सत्तेत आल्यापासून सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट वृत्तपत्र आणि न्यूज चॅनेल्सच स्वातंत्र्य पूर्णपणे हिरावून घेण्यात आलं आहे. लोकशाहीत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या माध्यमांच्या काम करण्याच्या पद्धतीवर सुद्धा राज ठाकरे यांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केलं. माध्यमांमध्ये सरकारविराधी बातम्याच येत नाही आणि आल्याचं तर काही फुटकळ बातम्या दाखवल्या जातात जेणेकरून संशय येऊ नये म्हणून अशी टीका सुद्धा राज ठाकरे यांनी केली.
मोदी सरकार देशात आल्यानंतर मोदी-शहा यांच्या सांगण्यावरूनच अनेक संपादकांना, पत्रकारांना त्यांच्या नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे असा गंभीर आरोप सुद्धा राज ठाकरे यांनी प्रचंड जनसमुदायासमोर केला. श्रीदेवीच्या मृत्यूच्या ज्या बातम्या माध्यमांवर झळकत होत्या त्यात त्याच्या मृत्यू मागे दारू हे सुद्धा एक कारण होतं आणि महत्वाचं म्हणजे माध्यमांना श्रीदेवीच्या मृत्यूच्या बातम्या दाखविण्यासाठी साठी वेळ आहे, परंतु न्यायाधीश लोया यांच्या मृत्यूची बातमी दाखवायला वेळ नाही असं सांगून माध्यमांच्या मानसिकतेवर सुद्धा अचूक बोट ठेवलं.
बॉलीवूड कलाकार अक्षय कुमार हा भारतीय नसून तो कॅनेडियन नागरिक आहे आणि त्याने नुकतेच प्रदर्शित केलेले सिनेमे हे सरकार पुरस्कृत होते असा गंभीर आरोप सुद्धा त्यांनी केला. अक्षय कुमार हा कलाकार म्हणून चांगला आहे पण तो सध्या सरकार पुरस्कृत सिनेमांमध्येच काम करतोय असं ही राज ठाकरे म्हणाले. पुढे नोटबंदी संबधी बोलताना त्यांनी मोदी सरकार वर सडकून टीका केली की, नोटबंदी हा १९४७ नंतरचा देशातील सर्वात मोठा घोटाळा आहे आणि मोदी सरकार जर पुन्हा सत्तेत आले तर देशातील परिस्थिती अजून बिघडेल असा घाणाघातही मनसे प्रमुखांनी केला.
राम मंदिराबाबत बोलताना रोज ठाकरे असं म्हणाले की अयोध्येत राम मंदिर हे झालाच पाहिजे, परंतु विकासाची स्वप्न देशवासियांना दाखवून सत्तेत आलेलं मोदी सरकार हे विकास, बेरोजगारी या विषयांवर अक्षरशा नापास झालं आहे म्हणून अखेर निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन राम मंदिराच्या नावाने देशात पुन्हा हिंदू मुसलमान दंगली घडविण्याच्या योजना मोदीसरकार करत असल्याच्या गंभीर आरोप राज ठाकरे यांनीं केला. राम मंदिर हे झालंच पाहिजे परंतु ते निवडणूका झाल्या आणि राम मंदिर हे भाजपने स्वतःच्या राजकारणासाठी वापरू नये असं ही राज ठाकरे म्हणाले.
एकूणच सभेला असलेली प्रचंड गर्दी आणि देशातील सर्व माध्यमाचे सभेवर स्थिरावलेले कॅमेरे पाहता राज ठाकरे यांनी शिवतीर्थ गाजवलं असच म्हणावं लागेल. परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे संपूर्ण देशात मोदी आणि अमित शहांबद्दल बोलण्याची हिम्मत कोणी ही करू शकत नाहीत ते राज ठाकरे प्रचंड सभेत अगदी छाती ठोक पने आणि पुरावे देऊन करत आहेत.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Gold Rate Today | बापरे! लग्नासराईच्या दिवसातही सोनं खरेदी करणं परवडणार नाही, लवकरच 1 लाख रुपये तोळा होणार
- Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Numerology Horoscope | 17 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
- Stocks in Focus | मार्ग श्रीमंतीचा! हे टॉप 5 बँकिंग शेअर्स तुम्हाला अल्पावधीत 38 टक्केपर्यंत परतावा देतील, संधी सोडू नका
- Reliance Power Share Price | अवघ्या 4 वर्षात 2325 टक्के परतावा दिला, शेअर प्राईस 26 रुपये, पुढे तेजी येणार का?
- Reliance Infra Share Price | 2 दिवसात रिलायन्स इन्फ्रा शेअर 36 टक्के घसरला, पण स्टॉकला 'या' प्राईसवर सपोर्ट
- Numerology Horoscope | 18 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल
- Infosys Share Price | भरवशाच्या इन्फोसिस शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांनी किती दिली टार्गेट प्राईस?
- Varun Beverages Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरने अल्पावधीत दिला 50% परतावा, स्टॉक पुढे किती फायद्याचा?
- Tinna Rubber Share Price | श्रीमंत करतोय हा शेअर! 3 वर्षात 1 लाख रुपयाच्या गुंवतवणुकीवर दिला 4.42 कोटी परतावा