महत्वाच्या बातम्या
-
दूध महागलं! निवडणुकीत 'चाय पे चर्चा' संपताच सरकारने प्रति लिटर 3 रू अनुदान बंद केले
लोकसभा निवडणूक संपताच आणि केंद्रात बहुमताने मोदी सरकार पुन्हा विराजमान होताच, महागाईत आता पुन्हा एकदा ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार आहे. खाजगी आणि सहकारी दूध महासंघाची महत्वाची बैठक आज पुण्यात पार पडली. या बैठकीत गायीच्या दुधाच्या दरात २ रूपयांची वाढ करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दुधाचे नवे दर ८ जूनपासून लागू करण्यात येणार आहे. सध्या गायीच्या दुधाचा दर ४२ रूपये प्रति लिटर असून तो आता ४४ रूपये प्रति लिटर होणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदी है तो मुमकिन है! लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून २७ हजार कोटी खर्च: CMS अहवाल
यंदाची लोकसभा निवडणूक आतापर्यंतची सर्वात महागडी ठरली आहे आणि त्यात भाजपने विश्वविक्रम केला आहे. या लोकसभा निवडणुकीत तब्बल ६०,००० कोटीं खर्च करण्यात आले आहेत. मात्र यापैकी तब्बल ४५ टक्के म्हणजेच २७,००० कोटींची रक्कम ही एकट्या भारतीय जनता पक्षाने खर्च केली आहे. सेंटर फॉर मिडीया स्टडीजने सोमवारी जाहीर केलेल्या अधिकृत अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदी है तो मुमकिन है! सर्वसामान्यांचं जगणं डोईजड, तूरडाळ १०० रुपये किलो
लोकसभा निवडणूक जाहीर होताच प्रत्येक विषय हा ‘मोदी है तो मुमकिन है’ अशा अविर्भावात झाली. मात्र बहुमताने सत्तेत येऊन देखील सरकार महागाई रोखण्यात आणि सर्व सामान्यांना दिलासा देण्यात अपयशी होताना दिसत आहेत. कारण लोकसभा निवडणुका संपताच पुन्हा एकदा महागाईने डोकं वर काढलं आहे. या आठवड्यात तूरडाळीनं तब्बल शंभरी गाठलीय. तूरडाळ प्रति किलो १०० रुपये झाली आहे. विशेष म्हणजे गेल्यो २ महिन्यांमध्ये डाळीच्या दरात ३५ रुपयांनी वाढ झालीय. तूरडाळीबरोबर मूग, मटकी, मसुर यांच्या किमतीही वाढल्यात. त्याचबरोबर शेंगदाणा, वरी यांच्या किमतीही चढ्या होतायत.
5 वर्षांपूर्वी -
अवजड अपमानानंतर उद्धव ठाकरे संतापले; बेरोजगारीवरून मोदी सरकारला सुनावले
जुन्या वादाला विसरून भारतीय जनता पक्ष – शिवसनेने युती करत लोकसभा निवडणुकीत यश घवघवीत मिळवले. ४ दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाला राम मंदिराची आठवण करून देणाऱ्या शिवसनेने आज पुन्हा सामनाच्या अग्रलेखातून महागाई आणि वाढत्या बेरोजगारी या मुद्यांवरुन मोदी सरकारचे कान टोचले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मागच्या ५ वर्षात दहा कोटी रोजगाराचे लक्ष्य पार करायला हवे होते, परंतु तसे अजिबात झाले नाही. केवळ भाषणात शब्दभ्रमाचे खेळ करून बेरोजगारी हटणार नाही. देशाची अर्थव्यवस्था सध्या मोठ्या संकटात आहे. नवीन अर्थमंत्री यांनी मार्ग काढावे अशी मागणी शिवसेनचा मुखपत्र असलेल्या सामनामधील अग्रलेखातून करण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल यांना ईडीची नोटीस
हवाई वाहतूक उद्योगातील करारातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी एनसीपीचे नेते आणि शरद पवारांचे अत्यंत विश्वासू प्रफुल्ल पटेल यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले आहे. ईडीने प्रफुल्ल पटेल यांना ६ जून रोजी सकाळी साडे अकरा वाजता ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावले आहे.
5 वर्षांपूर्वी -
ट्रम्प यांचा मोदी सरकारला दणका; भारताचा जिएसपी दर्जा हटवणार; निर्यातदार धास्तावले
अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने भारतातील मोदी सरकारला चांगलाच दणका दिला आहे. त्यामुळे आधीच आर्थिक विषयांना अनुसरून चिंतेत असलेली भारतीय अर्थव्यवस्था अजून खाली जाऊ शकते असं म्हटलं जात आहे. कारण अमेरिकेने भारतातील व्यापाराला प्रोत्साहन म्हणून दिलेला जीएसपी (जनरलाईज सिस्टीम ऑफ प्रेफरन्स) दर्जा येत्या ५ जून पासून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे.
5 वर्षांपूर्वी -
सामान्यांचा खिसा खाली होणार! अनुदानित व विनाअनुदानित सिलिंडर महागले
सामान्य जनतेसाठी अत्यंत त्रासदायक बातमी म्हणजे जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी स्वयंपकाच्या गॅस सिलिंडरची किंमत वाढली आहे. विनाअनुदानित एलपीजी सिलिंडर तर तब्बल २५ रूपयांनी महागलं आहे तर अनुदानित सिलिंडरच्या किंमतीत १ रूपया २३ पैशांची वाढ झाली आहे. दिल्लीत १ जून म्हणजेच आजपासून अनुदानित सिलिंडरचा एकूण दर ४९७ रुपये ३७ पैसे इतका झाला आहे. तर मुंबईतल्या अनुदानित सिलिंडरची किंमत ४९५ रुपये ९ पैसे इतकी झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदींच्या मंत्रिमंडळातील ८ मंत्री १०वी - १२वी शिकलेले; आता IAS-IPS अधिकारी सलाम ठोकणार
देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतली. गुरुवारी मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडल्यानंतर काल लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खात्यांचे वाटप केले. त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा देशाचे नवे गृहमंत्री झाले आहेत. तर नितीन गडकरी यांचं रस्ते आणि वाहतूक मंत्रीपदच कायम ठेवण्यात आले आहे. मोदींच्या कॅबिनेटमधील एकूण ५६ मंत्र्यांपैकी ५१ मंत्री हे करोडपती आहे. त्यापैकी एकूण २२ जणांवर गुन्हे दाखल असल्याची माहिती आता समोर आली आहे. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने याबाबत माहिती दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
हम तो फकीर आदमी है म्हणणाऱ्या मोदींच्या मंत्रिमंडळात ९१ टक्के मंत्री करोडपती
देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतली. गुरुवारी मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडल्यानंतर काल लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खात्यांचे वाटप केले. त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा देशाचे नवे गृहमंत्री झाले आहेत. तर नितीन गडकरी यांचं रस्ते आणि वाहतूक मंत्रीपदच कायम ठेवण्यात आले आहे. मोदींच्या कॅबिनेटमधील एकूण ५६ मंत्र्यांपैकी ५१ मंत्री हे करोडपती आहे. त्यापैकी एकूण २२ जणांवर गुन्हे दाखल असल्याची माहिती आता समोर आली आहे. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने याबाबत माहिती दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
उद्योगपतींना मोठ्या सवलती देणाऱ्या मोदी सरकाकडून शहीदांच्या मुलांच्या शिष्यवृत्तीत फक्त रु.५०० ने वाढ
मोदी सरकार उद्योगपतींची जेवढे धडाडीचे निर्णय घेताना दिसते तसे निर्णय इतर विषयात खुल्या हाताने घेताना दिसत नाही. मात्र जेव्हा विषय शेतकरी आणि इतर राबणाऱ्या हातांचा येतो तेव्हा तुटपुंज्या वाढ करून स्वतःची पाठ थोपटून घेतली जाते. तसाच प्रकार पुन्हा घडला आहे आणि अगदी त्या निर्णयावर सही करताना स्वतःचा व्हिडिओ टाकायला देखील मोदी विसरले नाहीत.
5 वर्षांपूर्वी -
मोदी है तो मुमकिन है! भारताचा GDP ७.२ टक्क्यांवरून घसरून ६.८ टक्क्यांवर
भारताच्या जीडीपी वाढीच्या दरात मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा घसरण झाल्याचे समोर आलं आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षात ७.२ टक्क्यांवर असणारा जीडीपी दर २०१८ -२०१९ या आर्थिक वर्षात ६.८ टक्क्यांवर घसरला आहे. शेती आणि निर्मिती क्षेत्रातील खराब प्रदर्शनाचा जीडीपाला फटका बसला असल्याची अधिकृत माहिती शुक्रवारी देण्यात आली आहे. दरम्यान २०१८-१९ च्या जानेवारी-मार्चच्या पहिल्या तिमाहीत तर जीडीपी दर ६ टक्क्यांपर्यंत खाली होता. जो की मागिल वर्षात याच तिमाहीत ८.१ टक्क्यांवर होता. या वर्षात वाढीचा दर ५.८ टक्क्यांपर्यंत आला असल्याचे केंद्राने दिलेल्या आकडेवारीत दिसून आल्याचे सांगण्यात आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
अवजड मालिका! सेनेच्या वाट्याला पुन्हा सामान्यांशी काहीच संबंध नसलेलं अवजड उद्योग खातं
काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि नव्या मंत्रिमंडळाने शपथ घेतल्यानंतर आज मंत्रिमंडळाची पहिली बैठक होणार आहे. या पार्श्वभुमीवर मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले असून भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा देशाचे नवे गृहमंत्री झाले आहेत. तर नितीन गडकरी यांना पुन्हा रस्ते आणि वाहतूक मंत्रीपदच बहाल करण्यात आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
पंतप्रधान पदानंतरचं गृह खातं अमित शहांकडे; तर राजनाथ सिंह संरक्षण मंत्री
काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि नव्या मंत्रिमंडळाने शपथ घेतल्यानंतर आज मंत्रिमंडळाची पहिली बैठक होणार आहे. या पार्श्वभुमीवर मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले असून भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा देशाचे नवे गृहमंत्री झाले आहेत. तर नितीन गडकरी यांना पुन्हा रस्ते आणि वाहतूक मंत्रीपदच बहाल करण्यात आले आहे. शिवसेनेच्या वाट्याला नेहमीप्रमाणेच अवजड उद्योग खात्याचे मंत्रिपद आले असून रावसाहेब दानवे यांना ग्राहक संरक्षण खात्याचे राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
शपथविधी दिवशीच दिल्ली भाजपाची वेबसाईट हॅक, बीफ डिशची पोस्ट
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या बहुमतानंतर मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी सलग दुसऱ्यांदा शपथ घेतली. त्यात एकूण २४ कॅबिनेट मंत्री, ९ स्वतंत्र कारभार सांभाळणारे राज्यमंत्री आणि २४ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. दरम्यान एकीकडे राष्ट्रपती भवनात शपथविधीचा शाही कार्यक्रम सुरु असताना दुसऱ्याबाजूला दिल्ली भारतीय जनता पक्षाची वेबसाईट हॅक करण्यात आली होती. यावेळी हॅकर्सनी वेबसाईटच्या होमपेजवर गोमांस म्हणजेच बीफ रेसिपी पोस्ट केली. या रेसिपीसोबत Hacked by ‘Shadow_V1P3R’ असा मेसेजही लिहिण्यात आला होता.
5 वर्षांपूर्वी -
कोचिंग क्लासेसचे मालक व विनोद तावडेंमध्ये मोठी आर्थिक देवाणघेवाण: राष्ट्रवादीचा आरोप
खाजगी कोचिंग क्लासेसचे मालक आणि राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यामध्ये मोठया प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाल्याने खाजगी शिकवणीबाबतचा मसुदा तयार असून देखील तो मंत्रालयात केवळ धूळखात पडून असल्याचा थेट आरोप एनसीपीचे नेते व माजी मंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर पत्रकार परिषदेत केला आहे. तसेस याकडे शिक्षणमंत्री विनोद तावडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असून यामध्ये मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून खाजगी शिकवणी मसुद्याला तात्काळ मंजुरी द्यावी, अशी मागणी देखील अनिल देशमुख यांनी केली.
5 वर्षांपूर्वी -
मोदींचा चमत्कारी विजय ही भारतीय लोकशाहीसाठी अत्यंत चिंतेची बाब: द वॉशिंग्टन पोस्ट
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशात मोदी लाट नसताना देखील प्रत्यक्षात मोदी त्सुनामी आली आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. मोदींच्या या यशानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं तसेच लोकांमध्ये सुद्धा आता २-३ दिवसानंतर वेगळीच चर्चा चौकाचौकात रंगल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान अमेरिकेतील प्रसिद्ध वृत्तपत्र ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने या संदर्भात एक लेख प्रसिद्ध केला आहे. भारतासारख्या विशाल लोकशाहीत मोदींचा आश्चर्यकारक विजय अत्यंत गंभीर आणि चिंतेची बाब आहे.
5 वर्षांपूर्वी -
भारताने पुरवलेल्या ‘EVM’वर बोत्स्वाना देशात संशय; थेट निवडणूक आयोगाला कोर्टात हजेरीचे आदेश होते
देशभरातील लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि देशभरात मोदी त्सुनामी आल्याचे दिसले. त्यात अनेकांनी या निकालावर आश्चर्य व्यक्त करत वेगळीच शंका व्यक्त केली होती. दरम्यान अनेकांनी देशात मोदी लाट नक्कीच नव्हती असं जाहीर पणे म्हटलं आणि अनेक भाजप नेत्यांनी देखील ते पडद्याआड मान्य केलं. विशेष म्हणजे मुस्लिम बहुबल भागात देखील भाजपच्या उमेदवारांना भरभरून मतं पडल्याने त्यात शंका अधिक दुणावल्याचे पाहायला मिळाले.
5 वर्षांपूर्वी -
'PM नरेंद्र मोदी' सिनेमाकडे भक्तांसहित प्रेक्षकांची पाठ; कार्टून सिनेमाची कमाई पण अधिक
भारताच्या राजकीय इतिहासात बहुमताने निवडून येणारे मोदींना त्याच्या जीवनपटावर आधारित सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक अल्पमतात देखील हजेरी लावताना दिसत नाही. देशाची सत्ता पुन्हा एकदा मिळवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील चित्रपटाकडं सिनेरसिकांनी अक्षरशः पाठ फिरवल्याचे चित्र आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटानं केवळ २.२५ ते २.५० कोटींची कमाई केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
जीएसटी'मुळे मलेशिया, कॅनडा, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये सरकार पराभूत, तर भारतात?
जगात जीएसटी म्हणजे ‘वस्तू आणि सेवा कर’ लागू करणाऱ्या सरकारचे दारुण पराभव झाले आहेत. मात्र आपल्या देशात नेमकं त्याच्या विरुद्ध होताना दिसत आहे. स्वतः उद्योगधंदे करणाऱ्या राज्याच्या जनतेचे म्हणजे गुजरातचे मुख्यमंत्री असताना सुरुवातील नरेंद्र मोदी यांनी जीएसटी’ला प्रचंड विरोध केला होता आणि तेव्हा केंद्रात काँग्रेसचे सरकार होते. मात्र सत्तेत येताच विरोध करणाऱ्या नरेंद्र मोदींनी भारतात जीएसटी लागू केल्याचे सर्वश्रुत आहे.
5 वर्षांपूर्वी -
मतदान झालं राष्ट्रवाद व धर्मावर; आता बेरोजगारी व महागाईवर तरुणांचा व सामान्यांचा वाली कोणीच नसेल?
काळाच्या लोकसभा निवडणुकीच्या निकाल राष्ट्रवाद आणि धर्म हेच आपल्या देशातील मुख्य आणि महत्वाचे प्रश्न असल्याचं अधोरेखित केलं आहे. त्यामुळे यापुढे सामान्यांशी आणि प्रत्येक घराशी निगडित असणारे महागाई आणि रोजगार सारखे अत्यंत महत्वाचे प्रश्न आता निडणूकीचे विषय राहिले नाहीत हे सत्य आहे. कारण मागील ५ वर्ष महागाईने होरपळणाऱ्या सामान्यांनी आणि बेरोजगारांनी स्वतः सरकारला भासगोस मतदान करून, सरकारला आम्ही बेरोजगार आणि महागाईने होरपळून मेलो तरी चालेल, परंतु धर्म आणि राष्ट्रवाद महत्वाचा आहे संदेश दिला आहे. त्यामुळे आता त्याच विषयावर आधारित खाद्य सामान्यांना सरकार देत राहील.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार! झटपट पैसा दुप्पट करणारा शेअर खरेदी करा, संधी सोडू नका
- Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार?
- Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल
- Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा
- Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा
- Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्स घसरले, स्टॉक घसरणीचे नेमकं कारण काय? स्टॉक Hold करावा की Sell?
- BHEL Share Price | भरवशाचा PSU शेअर! अल्पावधित दिला 258% परतावा, कंपनीबाबत अजून एक सकारात्मक अपडेट
- 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8'वा वेतन आयोग केव्हा स्थापन होणार? बेसिक पगार किती वाढणार?
- Tata Technologies Share Price | मल्टिबॅगर शेअर उच्चांकापासून 25% घसरला, स्वस्तात खरेदीची संधी? तज्ज्ञांचे BUY रेटिंग
- Penny Stocks | गरीब सुद्धा खरेदी करू शकतात हे 1 ते 9 रुपये किंमतीचे 10 पेनी शेअर्स, अल्पावधीत मोठा परतावा