महत्वाच्या बातम्या
-
आज सात राज्यांमधील प्रचाराच्या तोफा थंडावणार
लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज शनिवारी संध्याकाळी थंडावणार आहेत. ६ मे रोजी युपी, राजस्थान, जम्मू-काश्मीर, बिहार, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंड या ६ प्रमुख राज्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ७ राज्यांमधील ५१ मतदार संघांमध्ये मतदान होणार आहे. दरम्यान यामध्ये उत्तर प्रदेशातील महत्त्वाच्या अमेठी आणि रायबरेली मतदारसंघांचा समावेश आहे.
5 वर्षांपूर्वी -
सर्जिकल स्ट्राईक भारतीय लष्करानं केला, मोदींनी नव्हे: राहुल गांधी
वायुदलाने केलेला सर्जिकल स्टाईक, नोटाबंदी, राफेल घोटाळ्यावरुन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. नरेंद्र मोदींनी सर्जिकल स्ट्राईक केला नसून तो भारतीय लष्करानं केलं आहे. नरेंद्र मोदी सर्जिकल स्ट्राईक आपल्या सरकारनं केल्याचं सांगत लष्कराचा अपमान करत आहेत, असं राहुल गांधी यांनी सांगितलं.
5 वर्षांपूर्वी -
बेरोजगारीचा दर वाढून ८.४ टक्क्यांवर, देश भविष्यात बेरोजगारांची भूमी होतो कि काय?
एप्रिलमध्ये देशातील बेरोजगारीचा दर पूर्वीपेक्षा वाढून ८.४ टक्क्यांवर गेला आहे. ऑक्टोबर २०१६ नंतरचा हा सर्वोच्च बेरोजगारी दर ठरला आहे. मार्चमध्ये बरोजगारीचा दर ६.७ टक्के होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारची डोकेदुखी वाढली आहे.
5 वर्षांपूर्वी -
५० टक्के व्हीव्हीपॅटची मोजणी होणार? न्यायालयात लवकरच सुनावणी
लोकसभा निवडणुकीदरम्यान २१ विरोधी पक्षांनी ईव्हीएमसंदर्भात केलेल्या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे. ५० टक्के व्हीव्हीपॅट मशीनची मोजणी करण्यात यावी, अशी मागणी विरोधकांनी या याचिकाद्वारे केली आहे. लोकसभेच्या निवडणुकीचा तिसरा टप्पा सुरू असताना विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा ईव्हीएम मशिन्सबद्दल शंका उपस्थित केली. काही दिवसांपूर्वी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी थेट मुंबईत येऊन राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत जाहीर पत्रकार परिषद घेतली होती.
5 वर्षांपूर्वी -
तेलंगणा: मोदींविरोधात मैदानात उतरलेल्या २४ शेतकऱ्यांचा उमेदवारी अर्ज बाद
पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात वाराणसीमधून निवडणूक लढण्यासाठी मैदानात उतरलेल्या तेलंगणाच्या तब्बल २४ शेतकऱ्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाने रद्द केला आहे. निवडणूक आयोगाने एका शेतकऱ्याचा अर्ज स्विकारला आहे. आयोगाने ज्या एकमेव शेतकऱ्याचा अर्ज स्विकारला आहे त्यांचं नाव इस्तारी सुन्नम नरसईया असं आहे.
5 वर्षांपूर्वी -
‘फनी’ चक्रीवादळ ओडिशा किनाऱ्यावर थडकलं! लाखोंचे स्थलांतर
सर्वाधिक घातक असे ‘फनी’ चक्रीवादळ आज सकाळी नऊच्या सुमारास ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार ताशी १७५ किलोमीटरच्या वेगाने ‘फनी’ चक्रीवादळ ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकले असून अकरा नंतर फनीचा वेग कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ओडिशासह आंध्रप्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांना ‘फनी’चा फटका बसण्याचा अंदाज आहे. गृहमंत्रालयाकडून १९३८ हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे. पुरी आणि भुवनेश्वरमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणात बिहारच्या १९ जागांवर महागठबंधन आघाडीवर
लोकसभा निवडणुकीत भाजपचं भविष्य उत्तर भारतात मिळणाऱ्या यशावर अवलंबून असणार आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशसोबतच बिहार मधील यश भाजपसाठी अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. त्याअनुषंगाने भाजपने बिहारमध्ये जातीय समीकरणाच्या आधारे एक अंतर्गत सर्वेक्षण केलं असून, त्यानुसार भाजपापेक्षा महागठबंधंन जातीय समीकरणांच्या बाबतीत बिहारमधील तब्बल १९ जागांवर आघाडीवर दिसत असून महागठबंधनमधील प्रमुख घटक पक्ष जातीय निहाय मतं स्वतःकडे आकर्षित करताना दिसत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
अमरिकेचे परराष्ट्र सेक्रेटरी पॉम्पीओ यांच्या मसूद अझहर विषयक ट्विटने मोदी तोंडघशी
अमेरिकेचे विद्यमान परराष्ट्रमंत्री आणि अमेरिकन गुप्तचर यंत्रणा सीआयएचे माजी अध्यक्ष माईक पॉम्पीओ यांनी मसूद अझहर विषयक एक ट्विट केल्याने नरेंद्र मोदी तोंडघशी पडल्याची चर्चा रंगली आहे. भारतात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप आणि विशेष करून मोदी ‘जैश ए मोहम्मद’चा प्रमुख मसूद अझहर याला आमच्या प्रयत्नाने संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीने आंतरराष्ट्रीय दहशदवादी घोषित केल्याच्या बाता मारून, प्रचारात स्वतःची पाट थोपटून घेत असल्याचे काल पासून पाहायला मिळत आहे.
5 वर्षांपूर्वी -
आता बोलून टाका! उरी, पुलवामा व गडचिरोलीतील घटनेला पण नेहरू जबाबदार: नेटिझन्स
उत्तर प्रदेशमध्ये या वर्षी झालेल्या कुंभमेळ्याच्या उत्तम व्यवस्थापनाचे कौतुक करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९५४ मध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेला उजाळा देत त्याचे खापर तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर फोडले. मोदी प्रचारात मूळ मुद्दे सोडून प्रत्येक विषयात नेहरू आणि गांधी घराण्याला ओढत असल्याने आता नेटकरी देखील संतापल्याचे पाहायला मिळत आहे. देशातील कोणत्याही नकारात्मक गोष्टीला केवळ नेहरूच जवाबदार असतात, त्यामुळे देशात घडलेल्या उरी, पुलवामा आणि गडचिरोलीतील नक्षलवादी हल्ल्यामागे देखील नेहरूंचा हात असून तेच या गंभीर घटना जवाबदार असल्याची उपहासात्मक टीका सध्या समाज माध्यमांवरील नेटकरी करताना दिसत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
भारतीय लष्कराचा दावा नेपाळ सैन्यानं फेटाळला, ती पावलं हिममानवाची नव्हे, तर जंगली अस्वलाची
लोक कथांमधील ‘येती’ या रहस्यमय हिममानवाच्या पाऊलखुणा नेपाळमधील मकालु बेसकॅम्पच्या परिसरात आढळल्याचा दावा भारतीय लष्कराने केला, त्यानंतर आता नेपाळ सैन्याच्या प्रवक्त्यानं भारतीय लष्कराचा दावा स्पष्टपणे फेटाळून लावला आहे. तसेच ती पावलं येतीची नव्हे, तर जंगली अस्वलाची असल्याचा खुलासा नेपाळच्या सैन्यानं केला आहे. लष्कराच्या अतिरिक्त माहिती महासंचालकांनी सोमवारी रात्री हा दावा करणारे ट्विट केले आणि त्यासोबत बर्फात उमटलेल्या ‘येती’च्या पाऊलखुणांची काही छायाचित्रेही प्रसिद्ध केली.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO | मोदींनी दहशतवाद्यांचं समर्थन करत लष्कराला शिव्या दिल्या: भाजप नेते गिरीराज सिंह
भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी मुज्जफरपूर येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना एक धक्कादायक विधान केलं आहे. कारण त्यांनी यावेळी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यावेळी ते म्हणाले की, ‘मोदींनी दहशतवाद्यांचं समर्थन करत लष्कराला शिव्या देण्याचं काम केलं आहे’. त्यांच्या या विधानाने मोठी उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
संतापजनक: कर्जमाफीमुळे शेतकरी सुस्तावतात; भाजप हरियाणाचे मुख्यमंत्री
एखाद्याला मोफत देण्याची सवय लावली, की मग ती व्यक्ती आळशी होते, अशा शब्दांत त्यांनी कर्ममाफीवर भाष्य केलं. ‘हरियाणातल्या शेतकरी समुदायाला त्यांच्या पुढील आर्थिक संकटं संपवायची आहे. एकदा लोकांना फुकटात काही मिळायची सवय लागल्यावर ते सुस्तावतात. ते इथून तिथून कर्ज घेऊ लागतात. ते आर्थिक नियोजन करत नाहीत. या प्रकारची योजना अनेक राज्यांमध्ये यशस्वी होऊ शकते. कारण तिथली परिस्थिती तशी आहे. परंतु हरियाणात ही योजना यशस्वी होऊ शकत नाही,’ असं खट्टर म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
गोध्रा हत्याकांडाप्रमाणे पुलवामा दहशतवादी हल्ला हे भाजपाच षडयंत्र: गुजरातचे माजी मुख्यमंत्री
गुजरातमधील बहुचर्चित गोध्रा हत्याकांडाप्रमाणेच जम्मू काश्मीरमधील पुलवामातला सीआरपीएफच्या जवानांवरील भ्याड दहशतवादी हल्लादेखील भारतीय जनता पक्षाच्या कारस्थानाचा भाग असल्याचा खळबळजनक आरोप गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेलांनी केला आहे. पुलवामातल्या हल्ल्यासाठी वापरण्यात आलेल्या गाडीची नोंद गुजरातमध्ये करण्यात आली होती, असा दुसरा दावादेखील त्यांनी केला. गोध्रा हत्याकांडदेखील भारतीय जनता पक्षाच मोठं षडयंत्र होतं. लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी भाजपाकडून दहशतवादाचा आधार घेतला जातो, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला.
5 वर्षांपूर्वी -
भाजपानं २२०-२३० जागा जिंकल्यास मोदी पंतप्रधान होणार नाहीत: सुब्रमण्यम स्वामी
भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात एक मोठं भाकीत केलं आहे. भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीत २२०-२३० जागा जिंकल्यास नरेंद्र मोदी कदाचित पुढचे पंतप्रधान होणार नाहीत, असं सूचक विधान भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे. तसेच लोकसभा निवडणुकीनंतर सध्याचं भाजपच्या नैत्रुत्वतही बदल केले जातील, असा थेट दावाही स्वामींनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेकडून मसूद अझहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित
भारतातील अनेक महत्वाच्या हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या तसेच कुख्यात दहशदवादी मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्यात भारताच्या कुटनितीला यश आले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने (UNSC) बुधवारी (दि.१) मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले. भारताचा हा मोठा विजय मानला जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
वाराणसी: जवान तेज बहाद्दूर यांची उमेदवारीच नाट्यमय घडामोडीनंतर रद्द
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उभे राहिलेले बीएसएफ’चे बडतर्फ जवान तेज बहाद्दूर यांची उमेदवारीच नाट्यमय घडामोडीनंतर रद्द करण्यात आली आहे. यामुळे समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या गोटातही खळबळ उडाली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना लष्कराकडून प्रमाणपत्र देण्याची नोटीस बजावली होती. यावर तेज बहादूर यांनी दोन्ही नोटिसांना उत्तरे दिली, परंतु उमेदवारी दाखल केल्यापासून घाबरलेल्या पंतप्रधान मोदी यांनी अडचणी निर्माण केल्याचा आरोप तेज बहादूर यांनी केला.
5 वर्षांपूर्वी -
भाजपचं बारामती जिंकण्याच्या दाव्यांचं रहस्य ईव्हीएम तर नाही ना? शरद पवार
बारामती लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने विजय मिळवल्यास लोकांचा निवडणुकीवरील विश्वास उडेल, असं एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं बारामतीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. यंदा बारामती जिंकणारच असा विश्वास भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी अनेकदा व्यक्त केला. याबद्दल भाष्य करताना ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी ईव्हीएमविषयी अनेक शंका उपस्थित केल्या.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात निवडणूक संपताच भाजप-सेना सरकारकडून घरगुती गॅसच्या किमतीत मोठी वाढ
लोकसभा निवडणुकीदरम्यान सामान्य व्यक्तीला सरकारनं जोराचा धक्का दिला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी घरगुती गॅसच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. घरगुती एलपीजी सबसिडी असलेल्या सिलिंडर गॅसची किंमत ६ रुपयांनी वाढवण्यात आली आहे. तर सबसिडी नसलेल्या सिलिंडरच्या किमतीत २२.५ रुपयांची वाढ झाली आहे, असं वृत्त द हिंदू बिझनेस लाइननं प्रसिद्ध केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
श्रीलंकेत बुरखाबंदी; राज्यात निवडणूक संपताच छोट्या भावाची पुन्हा मोठ्या भावावर टीका
महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुका संपताच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा मोदी सरकारवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा प्रचारादरम्यान मोदींच्या नावाने मतांचा जोगवा मागून, सभेच्या ठिकाणी केवळ मोदींचा सार्वजनिक ठिकाणी बुरखा किंवा नकाब परिधान करणे गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य ठरेल, असे जाहीर करुन श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाल यांनी साहस आणि धैर्याचे दर्शन घडवले असून रावणाच्या लंकेत जे घडले ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार?, असा थेट सवाल उपस्थित करतानाच भारतात देखील बुरखाबंदी करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
निवडणुकांसाठी वाट्टेल ते? करकरे शहीदच पण पोलीस अधिकारी म्हणून चुकीचे: सुमित्रा महाजन
भारतीय जनता पक्षाच्या भोपाळमधील उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी केलेल्या विधानाने निर्माण झालेला वाद संपलेला नसताना आता भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी देखील शहीद हेमंत करकरेंविषयी धक्कादायक भाष्य केले आहे. २६/११ हेमंत करकरे शहीद झाले. मात्र महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख या पदावर काम करताना त्यांची भूमिका अत्यंत चुकीचीच होती, असे विधान त्यांनी केले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर स्वतःच्या पक्षाचा तिखट हिंदुत्वाचा अजेंडा रेटण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकते याचा पुन्हा प्रत्यय आला आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल
- Mastek Share Price | 40 रुपयाच्या शेअरची कमाल! तब्बल 4000 टक्के परतावा दिला, आता एका दिवसात 20% वाढला
- Gold Rate Today | बापरे! लग्नासराईच्या दिवसातही सोनं खरेदी करणं परवडणार नाही, लवकरच 1 लाख रुपये तोळा होणार
- Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा
- Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार?
- Numerology Horoscope | 17 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
- Infosys Share Price | भरवशाचा इन्फोसिस शेअर उसळी घेणार, दिग्गज ब्रोकिंग तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर
- Stocks in Focus | मार्ग श्रीमंतीचा! हे टॉप 5 बँकिंग शेअर्स तुम्हाला अल्पावधीत 38 टक्केपर्यंत परतावा देतील, संधी सोडू नका
- Reliance Power Share Price | अवघ्या 4 वर्षात 2325 टक्के परतावा दिला, शेअर प्राईस 26 रुपये, पुढे तेजी येणार का?