महत्वाच्या बातम्या
-
प. बंगालमधील निकालापर्यंत थांबा असं म्हणणाऱ्या राज्यातील भाजप नेत्यांना आता ४ वर्ष थांबावं लागणार
पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठा विजय मिळण्याची अपेक्षा होती. परंतु, निवडणुकांचे जवळपास सर्व कल हाती आल्यावर भाजपच्या पदरात मोठी निराशा पडल्याचे पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत तृणमूलने २०७ जागांवर आघाडी घेत मोदी, शहा आणि संपूर्ण भाजपाला धक्का दिला आहे. बंगालमध्ये सत्ता हस्तगत केल्यानंतर महाराष्ट्रात सत्तांतर घडवण्याचा भाजपचा प्लॅन होता. मात्र, बंगालमध्ये पतन झाल्याने भाजपचं मिशन महाराष्ट्र बारगळण्याची चिन्हे दिसत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
१६ व्या फेरीअखेर भाजपचे समाधान आवताडेंची अत्यंत कमी फरकाने आघाडी
राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपानेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या या पोटनिवडणुकांच्या निकालातील पहिल्या फेरीत पोस्टल मतदानाची मोजणी करण्यात आली. त्यामध्ये, महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालकेंनी आघाडी घेतली होती. मात्र, नवव्या फेरीअखेर भाजपाच्या समाधान अवताडेंनी भगिरथ भालकेंना मागे टाकले आहे.
3 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात कोरोना स्थिती चांगल्याप्रकारे हाताळण्यावरून भाजप खासदाराची ठाकरे सरकारला शाबासकी
राज्यातील प्रचंड आव्हानात्मक कोरोनास्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ठाकरे सरकार करत असलेल्या प्रयत्नांचे भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी कौतुक केलं आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी काल (१ मे) थोड्याच वेळापूर्वी याबाबतचे ट्विट केले आहे. “राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या स्थिरावल्याबद्दल ठाकरे सरकारला शाबासकीची थाप मिळायला हवी. मला मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात हॉस्पिटलही आता सज्ज झालेली आहेत.
3 वर्षांपूर्वी -
गिरीशभाऊंनी आवश्यक तेवढी लस महाराष्ट्रासाठी मिळवून दिला, तर मी भर चौकात त्यांचा सत्कार करीन - गुलाबराव पाटील
नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षाचे आमदार गिरीश महाजन यांच्यावर तिखट शब्दांत टीका केली होती. तसेच, त्यांच्या एका व्हायरल ऑडिओ क्लिपवरून दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच जुंपलेली पाहायला मिळाली होती. आता पुन्हा एकदा गिरीश महाजन यांच्यावर महाविकासआघाडीतल्या एका नेत्यानं निशाणा साधला आहे. शिवसेना नेते आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्यातल्या लसीकरणावरून गिरीश महाजन यांना सुनावलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
अनेक नगारिक कोविन अॅप वर केवळ रजिस्ट्रेशन करत आहेत, पण मेसेज आला नसतानाही लसीकरण केंद्रावर
भारतामध्ये आजपासून तिसर्या आणि सर्वात मोठ्या लसीकरण टप्प्याला सुरूवात झाली आहे. यामध्ये आता 18 वर्षांवरील सार्यांचं लसीकरण सुरू झालं आहे. पण लसीकरणासाठी नोंदणीच्या तुलनेत लसींचा साठा कमी पडत असल्याने अनेक ठिकाणी गोंधळ होत आहे. प्रशासन आणि नागरिक यांच्यामध्ये वाद होणं, नागरिकांना उन्हा तान्हात ताटकळत उभं राहणं आणि अनेकदा प्रतिक्षा करूनही लस न मिळाल्याने निराश होऊन परत जाणं अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आज मुंबई च्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी नागरिकांना लसीकरणासाठी घाई, गोंधळ, गडबड न करण्याचं आवाहन केले आहे.
3 वर्षांपूर्वी -
मोदीजी कोरोनाविरोधात ज्या निष्ठेने संघर्ष करत आहेत, तेवढ्याच निष्ठेने RSS स्वातंत्र्य लढ्यात इंग्रजांशी लढलेला - काँग्रेस
देशात कोरोनाची दुसरी लाट दिवसेंदिवस भयंकर होत असताना दिसत आहे. शुक्रवारी येथे विक्रमी 4 लाख 1 हजार 911 नवीन संक्रमित आढळले. हे जगातील कोणत्याही देशामधून एका दिवसात मिळालेल्या संक्रमितांचा सर्वात मोठा आकडा आहे. एवढेच नाही तर हा आकडा सर्वात जास्त संक्रमित अमेरिकेमध्ये मिळालेल्या नवीन रुग्णांपेक्षा सात पटींनी जास्त आहे. येथे शुक्रवारी 58,700 केस समोर आल्या. संपूर्ण जगात 8.66 लाख नवीन रुग्णांची ओळख झाली आहे. यामधून जवळपास अर्धे (46%) भारतातच आढळले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
लसीचा तुटवडा, पण 18 ते ४४ वयोगटातील लसीकरणाला सुरुवात | मुंबईत 'या' ठिकाणी मिळणार लस
देशात कोरोनाची दुसरी लाट दिवसेंदिवस भयंकर होत असताना दिसत आहे. शुक्रवारी येथे विक्रमी 4 लाख 1 हजार 911 नवीन संक्रमित आढळले. हे जगातील कोणत्याही देशामधून एका दिवसात मिळालेल्या संक्रमितांचा सर्वात मोठा आकडा आहे. एवढेच नाही तर हा आकडा सर्वात जास्त संक्रमित अमेरिकेमध्ये मिळालेल्या नवीन रुग्णांपेक्षा सात पटींनी जास्त आहे. येथे शुक्रवारी 58,700 केस समोर आल्या. संपूर्ण जगात 8.66 लाख नवीन रुग्णांची ओळख झाली आहे. यामधून जवळपास अर्धे (46%) भारतातच आढळले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
केंद्राने सुरुवातीला भारतातील कोरोना लस परदेशात पाठवली, त्यामुळे भारतात तुटवडा निर्माण झाला - उपमुख्यमंत्री
सुरुवातीच्या काळात भारतात तयार होणारी कोरोनाची लस केंद्र सरकारने परदेशात न पाठवता आपल्याच नागरिकांसाठी वापरली असती तर आज कोरोना लसींची कमतरता जाणवली नसती, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. महाराष्ट्राने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी 12 कोटी लसींचे डोस मागितले आहेत. मात्र, आतापर्यंत आपल्याला फक्त 3 लाख डोस मिळाले आहेत. त्यामुळे सुरुवातीपासूनच वेगाने लसीकरण करण्याचा मनसुबा राज्य सरकारला अंमलात आणता येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले.
3 वर्षांपूर्वी -
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा!... सर्व वाचकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61 व्या वर्धापन दिन निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हुतात्मा स्मारक येथे पुष्प चक्र अर्पण करणार आहेत. या कार्यक्रमात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मुख्य सचिव सीताराम कुंटे, महापालिका आयुक्त इकबाल चहाल उपस्थित आहेत. करोनाची पार्श्वभूमीवर या कार्यक्रमात मोजक्याच लोकांना प्रवेश देण्यात आला.
3 वर्षांपूर्वी -
फडणवीस म्हणाले केंद्राने अतिशय तर्कशुद्ध व्यवस्था उभी केली | कोर्ट म्हणालं होतं बुद्धीचा जराही वापर केला नाही
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (शुक्रवारी) नाशिक येथील सिव्हिल रूग्णालयास भेट देऊन, नाशिकमधील परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरं दिली. माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, “माझ्यापरीने होईल ते मी राज्यासाठी करतच असतो, केंद्र सरकारने रेमडेसिविरचा सर्वाधिक साठा हा राज्याला दिला. ऑक्सिजनचा सर्वात मोठा साठा महाराष्ट्राला दिला.
3 वर्षांपूर्वी -
संकटकाळात राष्ट्रवादीचा महाराष्ट्रधर्म | लोकप्रतिनिधींचे 1 महिन्याचे वेतन आणि पक्षाच्या वतीने 1 कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला
महाराष्ट्र काँग्रेसने लसीकरणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीत मोठी मदत जाहीर केल्यानंतर, आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही पेटारा उघडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर, मुख्यमंत्री सहायत फंडात निधी देण्याबाबत पक्षाला सूचना केल्या. त्यानुसार राष्ट्रवादीने दोन कोटी रुपयांचा निधी सीएम फंडात दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
युतीत असताना बाळासाहेब ठाकरे तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते, आता ते फक्त उद्धवजींचे वडील? - रोहित पवार
महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आलेली असताना राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. चढला आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुळ भातखळकर यांना चांगलंच धारेवर धरलंय. “युतीत असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते, आता ते फक्त उद्धवजींचे वडील? अशी सोयीस्कर भूमिका बदलावी तर तुम्हीच,” असा टोला रोहित पवारांनी लगावला आहे.
3 वर्षांपूर्वी -
कोविडच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश
देशात कोरोनामुळे परिस्थिती बिघडत असताना दिसत आहे. गुरुवारी पहिल्यांदा एका दिवसात 3 लाख 86 हजार 854 नवीन रुग्ण आढळले. आतापर्यंत एका दिवसाच्या आत मिळालेल्या नवीन रुग्णांचा हा आकडा सर्वात जास्त आहे. यापूर्वी 28 एप्रिलला सर्वात जास्त 3.79 लाख रुग्णांची ओळख झाली.
3 वर्षांपूर्वी -
सुजय विखे पाटील यांनी रेमडेसिव्हीर कशी आणली माहिती सादर करा, कोर्टाचे आदेश | CCTV फुटेजहि मागवले
रेमडेसिव्हीरचे 300 इंजेक्शन थेट दिल्लीहून मागवल्यामुळे भाजप खासदार सुजय विखे यांच्या अडचण्याची शक्यता आहे. रेमडेसिव्हीर इंजेक्शनसाठी शिर्डी विमानतळ येथे उतरवण्यात आलेल्या खासगी विमानाची माहिती सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. ही माहिती गृह विभागाचे मुख्य सचिव सादर करतील. दिल्लीवरुन रेमडेसिव्हीर इंजेक्शन आणल्याप्रकरणी सुजय विखे पाटील यांच्याविरोधात औरंगाबाद हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. अरुण कडू आणि इतर तीन जणांनी ही याचिका दाखल केली आहे. याच याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने वरील आदेश दिले. या प्रकरणावर पुढील सुनावणी 3 मे रोजी होईल.
3 वर्षांपूर्वी -
पोलीस महासंचालकांना भेटले 19 एप्रिलला | गुन्हा दाखल होताच सिंग यांचे २९ एप्रिलला पुन्हा आरोप करत याचिका
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पुन्हा एकदा उच्च न्यायालयात धाव घेतली असून नव्याने याचिका केली आहे. परमबीर सिंग यांनी राज्य सरकारकडून करण्यात येत असलेल्या चौकशीला आव्हान दिलं आहे. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात लिहिलेलं पत्र मागे घेण्यासाठी दबाव असल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. तसंच राज्य सरकार एकापाठोपाठ एक गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती मिळाल्याचा दावाही यावेळी त्यांनी केला. उच्च न्यायालयात ४ मे रोजी याचिकेवर सुनावणी होणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | महाराष्ट्र टपाल विभागात २४२८ जागांसाठी भरती | शिक्षण १०'वी उत्तीर्ण
राज्यातील दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी चालून आली आहे. महाराष्ट्र टपाल विभागात (महाराष्ट्र डाक विभाग) ग्रामीण डाक सेवक (जीडीएस) या पदांसाठी २ हजार ४२८ उमेदवारांची भर्ती केली जाणार आहे. या संदर्भातील जाहिरात इंडिया पोस्टच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे. जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी त्वरीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
3 वर्षांपूर्वी -
कोविन अँपवर नोंदणी असेल तरच लस मिळणार हे कृपया समजून घ्या, दुसरा डोसवाल्यांना प्राधान्य - महापौर
मुंबईच्या गोरेगावमधील नेस्को कोरोना केंद्र आणि बीकेसी केंद्रावर लसीकरणासाठी नागरिकांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. लसींचा तुटवडा असल्याने आपल्यालाच लस मिळावी म्हणून नागरिकांनी पहाटे 7 वाजल्यापासून केंद्रावर गर्दी केल्याने दोन किलोमीटरपर्यंत ही रांग गेली आहे. त्यांची मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दखल घेतली आहे. नागरिकांनी केंद्रावर गर्दी करू नये. कोविन अॅपवर नोंदणी करणाऱ्यांनाच लस मिळणार आहे. तसेच ज्यांचा पहिला डोस झालेला आहे, त्यांनाच प्राधान्याने डोस दिला जाणार असल्याचं महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
राजीव सातव यांची प्रकृती स्थिर असून कुठलीही गंभीर लक्षणे नाहीत | पुण्यातच उपचार - कुटुंबीयांची माहिती
कॉंग्रेसचे खासदार राजीव सातव यांची प्रकृती स्थिर असून कुठलीही गंभीर लक्षणे नाहीत. मात्र केवळ पर्यवेक्षण व रुटीन तपासणीसाठी मुंबई येथील पथक येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी गुरुवारी दिव्य मराठीशी बोलताना दिली आहे. खासदार राजीव सातव मागील आठवड्यातच हिंगोली येथे आले होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील कोविड रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवा व रुग्णांची परिस्थिती याची सविस्तर चौकशी केली होती. जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढल्यास काय उपाययोजना कराव्या लागतील याची माहितीही त्यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची भेट घेऊन घेतली होती. त्यानुसार त्यांनी पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे हिंगोली जिल्ह्यातील सुविधांबाबत कळविले होते.
3 वर्षांपूर्वी -
पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण, घरीच क्वारंटाईन
भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर घरीच उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. नुकतंच पंकजा मुंडे यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांच्या भगिनी आणि बीडच्या भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनाही कोरोनासदृश लक्षण दिसत होती. त्यामुळे त्या घरीच विलगीकरणात उपचार घेत होत्या. त्यानंतर आता पंकजा मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.
3 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रातील लसीकरणाची गती मंदावल्यास कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते - तज्ज्ञांचा इशारा
देशात कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. संक्रमणामुळे बरे होणाऱ्यांचा आकडा 1.5 कोटींच्या पार गेला आहे. आतापर्यंत 1 कोटी 50 लाख 78 हजारांपेक्षा जास्त लोक बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांचा आकडा पाहिला तर विक्रमी 2.70 लाख लोक रिकव्हर झाले आहेत. आतापर्यंत एका दिवसात बरे झालेल्या रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी मंगळवारी 2.62 लोक रिकव्हर झाले होते. ओव्हरऑल रिकव्हरी रेटमध्येही 1.8% ची वाढ झाली आहे. हा आता 82.08% झाला आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Multani Mitti Face Pack | तुमचा 'हा' स्किन टाईप असल्यास कधीही मुलतानी मातीचा वापर करू नका, तज्ज्ञांचा सल्ला - Marathi News
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell? - Marathi News
- Bigg Boss Marathi | दोघींची मैत्री 4 दिवस सुद्धा नाही टिकली; आर्या आणि जानवीची पुन्हा एकदा खडाजंगी - Marathi News
- True Beauty | रेडियंट ग्लो मिळवण्यासाठी फॉलो करा अभिनेत्री शरवरी वाघच्या ब्युटी टिप्स, चेहऱ्यावर वेगळेच तेज येईल
- Business Idea | बेकरी व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी! या तरुणीने उभारला मोठ्या उद्योग, तुमची सुद्धा सुरु करा
- Bigg Boss Marathi | आर्याने फोडलं निक्कीचं थोबाड! रडत म्हणाली 'बिग बॉस हिला बाहेर काढा'; बिग बॉस काय निर्णय घेणार?
- Deepika Padukone | छोट्या बाहुलीचं वेलकम करण्यासाठी रणवीर सज्ज, कालच मिळाला दीपिकाला डिस्चार्ज - Marathi News
- Bigg Boss Marathi | संग्रामची अरबाजला ताकदीची धमकी; दोन बॉडी-बिल्डरची आपापसात झुंज, प्रोमो पाहिलात का?
- BEL Share Price | मल्टिबॅगर PSU BEL शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, फायद्याची अपडेट नोट करा - Marathi News
- Body Fat Percentage | नियमित डायट फॉलो करूनही पोटावरची चरबी कमी होत नाही? गंभीर कारण नोट करा - Marathi News