महत्वाच्या बातम्या
-
कल्याणमध्ये मतदानानंतर तब्बल ३२३ ईव्हीएम २३ तासापासून गायब
कल्याण लोकसभा निवडणूक मतदार संघात सोमवारी मतदान कोणत्याही गालबोटाशिवाय पार पडलं. मात्र, मतदानानंतर या लोकसभा मतदार संघातील तब्बल ३२३ ईव्हीएम मशीन २३ तास बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर येतेय. सोमवारी रात्री उशिरा ही गोष्ट लक्षात आली. या भागात झालेले मतदानाचा हिशोब करताना तब्बल ३२३ ईव्हीएम मशीन गायब असल्याचं समोर आल्यानंतर एकच गोंधळ उडाला.
5 वर्षांपूर्वी -
बेरोजगारी व दुष्काळ या गंभीर विषयांकडे दुर्लक्ष करु नका: राज ठाकरे
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत दुष्काळ तसेच बेरोजगारी या दोन्ही महत्वाच्या गंभीर विषयांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले. हे दोन्ही विषय इतके गंभीर आहेत की तमाम मराठी जनांनी जनमताचा रेटा उभारायला हवा आणि यासाठी महाराष्ट्र दिन याशिवाय दुसरा उत्तम दिवस असूच शकत नाही, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. दुर्लक्ष करु नका, गाफील राहू नका अशी विनंतीही मी महाराष्ट्रातील जनतेला करतो, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजपचं बारामती जिंकण्याच्या दाव्यांचं रहस्य ईव्हीएम तर नाही ना? शरद पवार
बारामती लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने विजय मिळवल्यास लोकांचा निवडणुकीवरील विश्वास उडेल, असं एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं बारामतीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. यंदा बारामती जिंकणारच असा विश्वास भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी अनेकदा व्यक्त केला. याबद्दल भाष्य करताना ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी ईव्हीएमविषयी अनेक शंका उपस्थित केल्या.
5 वर्षांपूर्वी -
श्रीलंकेत बुरखाबंदी; राज्यात निवडणूक संपताच छोट्या भावाची पुन्हा मोठ्या भावावर टीका
महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुका संपताच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा मोदी सरकारवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा प्रचारादरम्यान मोदींच्या नावाने मतांचा जोगवा मागून, सभेच्या ठिकाणी केवळ मोदींचा सार्वजनिक ठिकाणी बुरखा किंवा नकाब परिधान करणे गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य ठरेल, असे जाहीर करुन श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाल यांनी साहस आणि धैर्याचे दर्शन घडवले असून रावणाच्या लंकेत जे घडले ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार?, असा थेट सवाल उपस्थित करतानाच भारतात देखील बुरखाबंदी करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
पनवेल: प्राणघातक हल्ला झालेल्या महाराष्ट्र सैनिकाची बाळा नांदगावकरांकडून विचारपूस
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवरील रागातून भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकाने महाराष्ट्र सैनिकावर मध्यरात्री जीवघेणा हल्ला केला आहे. जवळपास ८ ते १० गुंड कार्यकर्ते सोबत घेऊन पनवेल महानगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक विजय चिपळेकर यांनी मनसैनिक प्रशांत जाधव यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात प्रशांत जाधव गंभीर जखमी झाले आहेत. मनसैनिकावरील हा संपूर्ण हल्ला सीसीटीव्हीत कैद झाल्याने भाजप नगरसेवकाचं क्रूरकृत्य उघड झालं आहे.
5 वर्षांपूर्वी -
लोकसभेत बिथरलेल्या भाजप नगरसेवक व ८-१० छपरी कार्यकर्त्यांचा मनसैनिकावर हल्ला, सर्वजण फरार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवरील रागातून भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकाने महाराष्ट्र सैनिकावर मध्यरात्री जीवघेणा हल्ला केला आहे. जवळपास ८ ते १० गुंड कार्यकर्ते सोबत घेऊन पनवेल महानगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक विजय चिपळेकर यांनी मनसैनिक प्रशांत जाधव यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात प्रशांत जाधव गंभीर जखमी झाले आहेत. मनसैनिकावरील हा संपूर्ण हल्ला सीसीटीव्हीत कैद झाल्याने भाजप नगरसेवकाचं क्रूरकृत्य उघड झालं आहे.
5 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीचे माळशिरसचे आमदार हनुमंतराव डोळस यांचं दीर्घ आजाराने निधन
माळशिरस विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार हनुमंतराव डोळस यांचे दीर्घ आजाराने निधन झालं. ते ५७ वर्षांचे होते. मागील ३-४ दिवसांपासून त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक होती. त्यांच्यावर मुंबईतील सैफी इस्पितळात उपचार सुरु होते. परंतु उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. काल रात्रीपासून त्यांच्या निधनाची अफवा पसरली होती.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात दुपारी तीन वाजेपर्यंत ४२ टक्के मतदान
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात देशभरातील एकूण ७१ जागांसाठी सोमवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाली. महाराष्ट्रातील हा शेवटचा टप्पा असून यात मुंबई आणि ठाण्यासह एकूण १७ मतदारसंघांतील तब्बल ३२३ उमेदवारांचे राजकीय भवितव्य सुमारे ३ कोटी ११ लाख मतदार ठरवणार आहेत. दुपारी एक वाजेपर्यंत ३१.७४ टक्के मतदान झाले आहे.
5 वर्षांपूर्वी -
सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.८२ टक्के मतदान
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान सुरुवात झाली आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, जम्मू, ओडिसा, पश्चिम बंगाल येथेही आज सकाळी मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी सुमारे ९६ लाख मुंबईकर आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
'त्या' मुलाखतीत राज ठाकरेंनी उपस्थित केलेल्या मूळ प्रश्नांना मोदींकडून बगल
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एकही जागा लढवत नसलेल्या राज ठाकरे यांना आपल्या आगळ्यावेगळ्या प्रचारशैलीद्वारे भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना अक्षरशः हैराण करून सोडल्याचे दिसले. त्याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे राज्यातील संपूर्ण भाजप पक्ष आणि मंत्री काँग्रेस – राष्ट्रवादीला विसरून एकट्या राज ठाकरेंवर केंद्रित झाल्याचे पाहायला मिळाले.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात उष्णतेची लाट; सलग मेपर्यंत कायम राहणार
महाराष्ट्रातसुद्धा सूर्य आग ओकत आहे. विदर्भात पुन्हा एकदा उष्णतेची लाट आली असून ही उष्णतेची लाट पुढील तीन दिवस कायम राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली. शनिवारी नागपूरचा पारा ४५.२ अंशांवर पोहोचला असून धुळे, परभणी, चंद्रपूर, अकोल्यातही तापमान चांगले वाढले आहे. गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील पारा ४६ अंशांच्या पुढे पोहोचल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
चंद्राबाबू, ममता किंवा मायावती पंतप्रधानपदासाठी प्रबळ दावेदार: शरद पवार
देशभरात लोकसभा निवडणुकीच्या ३ टप्प्यांतील मतदान झाले असून उद्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान पदाचे प्रमुख दावेदार कोण असतील याबाबत शक्यता वर्तविली आहे. ते म्हणाले, जर नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात एनडीए स्पष्ट बहुमत सिद्ध करण्यात अयशस्वी राहिलं तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू, उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती हे पंतप्रधानपदासाठी प्रबळ दावेदार असतील. तसेच यात चौथ्या क्रमांकावर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचे नावही त्यांनी घेतले. शनिवारी एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. दरम्यान मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, असे राहुल गांधींनीच अनेकदा सांगितले आहे. त्यामुळे या मुद्द्यावर कोणतीही चर्चा निरर्थक ठरते असेही पवार यांनी यावेळी सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
मनसेकडून भाजपच्या अजून एका खोट्या जाहिरातीची पोलखोल!
‘बोलव रे त्यांना’ करत मनसेकडून भारतीय जनता पक्षाच्या खोट्या जाहिरातीची पुन्हा पोलखोल करण्यात आली आहे. कौशल्य इंडियाच्या माध्यमातून भाजप सरकारने रेखा वाहटूळे नावाच्या महिलेला भाजप योजनांचे लाभार्थी दर्शवणारी जाहिरात केली. मात्र आपण भाजप योजनांचे लाभार्थी नसल्याचा दावा करणारया या महिलेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शनिवारी मनसेद्वारे राजगड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलावले आणि भाजपच्या खोट्या जाहिरातीची चिरफाड केली.
5 वर्षांपूर्वी -
शिवाजी पार्कातली काय, इथे कृष्णकुंज'च्या आतली झाडं पण जपली आहेत: शेलारांना नेटिझन्सच उत्तर
राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दत्तक गावावर टीका केली होती. यावर भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी नरेंद्र मोदींनी दत्तक घेतलेल्या गावाचा व्हिडीओ दाखवून सत्य मांडण्याचा प्रयत्न केला. तसेच यावेळी तुम्ही करताय तो विपर्यास, आमचे खासदार करतात तो प्रयास, अशी बोचरी टीका देखील केली. पुढे बोलताना आशिष शेलार म्हणाले की, ज्या माणसाने शिवाजी पार्कवरचं एक झाड देखील दत्तक घेतलं नाही ते गाव काय दत्तक घेणार, असा उपरोधिक सवालही त्यांनी उपस्थित केला.
5 वर्षांपूर्वी -
शेलारांना माहीत नसावं, भाजपचे प्रवक्ते वेरिफाइड अकाऊंटवरून असे फेक व्हिडिओ शेअर करतात
मुंबई : आज मुंबईमध्ये आशिष शेलार यांनी राज ठाकरेंच्या व्हीडीओ आरोपांना प्रतिउत्तर देण्यासाठी जे काही दाखवलं त्यातील अनेक गोष्टी या हास्यास्पद होत्या. मुळात वेरिफाइड अकाउंट कोणाला मिळत याचे फेसबुक व ट्विटरने काही नियम आखले आहेत आणि अकाउंट वेरिफाइड करण्यासाठी संबंधिताला पुरावे देखील द्यावे लागतात. मुळात सामान्य वापरकर्त्याला फेसबुक किंवा ट्विटर अकाउंट वेरीफाईड करता येत नाही. अगदी अनेक पत्रकार, समाज सेवक आणि सामाजिक संस्था देखील आज अन वेरिफाइड अकाउंट वापरतात. त्यात मागील वर्षभरापासून फेसबुक व ट्विटरने भारतात अकाउंट वेरीफाईड करण्याची प्रक्रिया तात्पुरती स्थगित केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
ठाण्यात अनेक सामाजिक संघटनांचा शिवसेनेवर आरोप करत राष्ट्रवादीला पाठिंबा
देशात २०१४ साली बहुमताने भारतीय जनता पक्षाचे सरकार आले. त्यांच्याकडून सगळ्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. परंतु, मागील ५ वर्षांत भाजप सरकार फेल ठरले. जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर कधी बोलले गेले नाही. त्यातही युतीचे उमेदवार राजन विचारे यांचा आताचा वचननामा पाहून तर भ्रमनिरास झाला. सलग पंचवीस वर्षे सत्तेवर असतानाही शिवसेनेने ठाण्याची वाट लावली, त्यामुळे या निवडणुकीत आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय ठाण्यातील विविध सामाजिक संस्था, संघटनांनी घेतला आहे.
5 वर्षांपूर्वी -
लोकशाही विरुद्ध हुकूमशाही; पदाधिकाऱ्यांकडून राज यांना भारताच्या संविधानाची प्रत भेट
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संपूर्ण राज्यभर सभांचा धडाका लावून भाजपला आणि विशेष करून मोदींना जेरीस आणलं आहे. प्रचारादरम्यान ते व्हिडिओ पुराव्यानिशी मोदींना तोंडघशी पाडत आहेत. दरम्यान, यावेळी सभेत उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी ही लढाई भारतात लोकशाही टिकणार की हुकूमशाही येणार हे निश्चित करणारी असेल असं वक्तव्य त्यांनी केलं.
5 वर्षांपूर्वी -
तावडेंनी हे का लपवलं? स्वतःवरील घोटाळ्याच्या आरोपासंबंधित बातम्या त्या पाकिस्तानी वेबसाईटवर आहेत
भारतीय जनता पक्ष समर्थकांनी एका फेसबूक पेजवर चिले कुटुंबियांचा फोटो त्यांना न विचारताच वापरत मोदी सरकारचे लाभार्थी म्हणून झळकवले असल्याची पोलखोल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. मात्र या सगळ्याबाबत प्रतिक्रीया देताना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मनसे, चिले कुटुंबियांचा पाकिस्तानशी थेट संबंधच जोडला.
5 वर्षांपूर्वी -
पालघर लोकसभा: बहुजन विकास आघाडीच्या जाहिरातीत विकासाच्या मुद्यांवर भर
पालघर लोकसभा मतदारसंघात सध्या प्रचाराचे केवळ २ दिवस शिल्लक राहिले आहेत. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वात मोठा फटका बहुजन विकास आघाडीला बसला तो आयत्यावेळी विरोधकांनी पक्ष चिन्हावरून केलेलं राजकारण असंच म्हणावं लागेल. मात्र संपूर्ण पट्ट्यात कार्यकर्त्यांचं उत्तम जाळं असल्याने त्याचा फारसा परिणाम होणार नाही असं प्रथम दर्शनी दिसत आहे.
5 वर्षांपूर्वी -
आज राज ठाकरेंची तोफ नाशकात धडाडणार, दत्तक नाशिकची पोलखोल होणार?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज नाशिक शहरात जाहीर सभा होत आहे. शहरातील अनंत कान्हेरे मैदानावर सभा होणार असून राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करतात याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे यांच्या सभेनंतर दुसर्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची सभा होत असल्याने राज ठाकरे जहरी शब्दात टीका करतात की, नरमाईची भूमिका घेतात याविषयीची उलट-सुलट चर्चा शहरात सुरू आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स शेअर्समध्ये घसरण वाढतेय, स्टॉक Hold करावा की Sell?
- Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल
- Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर मजबूत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हलसहित टार्गेट प्राईस जाहीर
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे टॉप 5 शेअर्स मालामाल करणार, अल्पावधीत तगडा परतावा मिळेल
- RVNL Share Price | PSU स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सुसाट धावणार
- Numerology Horoscope | 10 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Infosys Share Price | हलक्यात घेऊ नका! Infosys, TCS, Wipro सहित हे 7 शेअर्स मालामाल करणार, हाय ट्रेडिंग व्हॉल्यूम
- HAL Share Vs BEL Share Price | PSU HAL आणि BEL शेअर्स दणादण परतावा देणार, अल्पावधीत 30% कमाई करा
- Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल
- Tata Power Share Price | चिंता वाढली! टाटा पॉवर शेअर्स 45 टक्क्याने घसरणार? स्टॉक Hold करावा की Sell?