महत्वाच्या बातम्या
-
काँग्रेस व एनसीपी'ची आघाडी होणार, आठवड्याभरात जागावाटप ठरणार: शरद पवार
आघाडी संदर्भात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सोबत आपल्या ३ बैठका पूर्ण झाल्या असल्याचा खुलासा राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी ‘द हिंदू’ ला दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे. त्यामुळे शरद पवार हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी जोमाने कामाला लागले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
6 वर्षांपूर्वी -
विदर्भ बंदच्या हाकेला तुरळक प्रतिसाद, पोलिसांकडून ५० कार्यकर्त्यांना अटक
नागपूरमध्ये पावसाळी अधिवेशन भरल्याने विदर्भवादी संघटनांनी विदर्भ बंदी हाक दिली खरी, परंतु त्याला तुरळक प्रतिसाद लाभला असल्याचे चित्र पाहायला मिळाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा बंद पुकारण्यात आला असल्याने चोख पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेनेने आता शिवबंधनासारखे जाहीरपणे भाजपाचे मंगळसूत्र बांधावे: विखे पाटील
सध्याची शिवसेनेची अवस्था ही वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला फेऱ्या मारणा-या सौभाग्यवतीसारखी झाली आहे. केवळ सत्तेतला संसार टिकविण्यासाठी शिवसेना सर्व अपमान गिळत आहे. भाजपचा प्राण याच शिवसेनारूपी सावित्रीमुळे टिकून आहे. त्यामुळे शिवसेनेने आता शिवबंधनासारखे जाहीरपणे भाजपाचे मंगळसूत्र बांधावे अशी बोचरी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेना भाजपच्या युती सरकारवर केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
सिडको भूखंड घोटाळ्यावरुन शिवसेनेकडून मुख्यमंत्री लक्ष
सामना मुखपत्रात सिडको भूखंड घोटाळ्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष करण्यात आल आहे. सामना अग्रलेखात देवेन्द्र फडणवीसांना फाजील ‘लाड’ भोवल्याचे कागदोपत्री दिसून येत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. स्वच्छ पारदर्शक कारभाराचे धडे देत एकनाथ खडसे यांना भूखंड घोटाळ्यावरुन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीसांनी घरी बसवलं होत याची आठवण सुद्धा करून देण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
अंधेरी पूल दुर्घटना: बेजवाबदार! दिल्ली ते गल्ली एकत्र सत्तेत असल्याचा शिवसेना व भाजपला विसर?
एल्फिन्स्टन ब्रिज सारख्या दुर्घटना घडून सुद्धा सरकारने काहीच बोध घेतलेला नाही. अंधेरी पूल दुर्घटनेवरून जवाबदारी झटकण्याचा केविलवाणा प्रयत्न सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेकडून होताना दिसत आहे. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी अंधेरी पूल दुर्घटनेबाबत जवाबदारी झटकत त्या पुलाच्या देखभालीची जवाबदारी रेल्वे प्रशासनावर म्हणजे रेल्वे खात सांभाळणाऱ्या भाजपवर ढकलली आहे. तर भाजपचे खासदार किरीट सोमैया यांनी मला महापौर काय बोलले यात जायचे नाही, पण समस्यांचं निराकरण करण्यात जास्त रस आहे असं मत व्यक्त केलं आणि सेनेला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO VIRAL: उद्धव ठाकरेंच्या २०१३ मधील 'त्या' गुजरात दौऱ्याच राजकीय कारण काय होत? सविस्तर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा २०११ मधील गुजरात दौरा राजकीय चर्चेचा विषय बनला होता. तसा राज ठाकरेंचा दौरा हा गुजरात सरकारच्या खास निमंत्रणावरून ठरला होता आणि तो दौरा सर्वांसाठी सार्वजनिक विषय होता. परंतु प्रसारमाध्यांपासून लांब राहून आणि ठीक २०१४ मधील लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, सुभाष देसाई आणि मिलिंद नार्वेकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींची गुजरातमध्ये जाऊन भेट घेतली होती, त्या भेटीमागचं मूळ राजकीय कारण प्रसारमाध्यांच्या नजरेतून का सुटलं होत?
6 वर्षांपूर्वी -
अंधेरीदरम्यान पुलाचा काही भाग कोसळताच संधीसाधू रिक्षावाले मस्त!
अंधेरीदरम्यान पुलाचा काही भाग कोसळतच मुंबई शहरातील रिक्षावाल्यांनी नेहमीप्रमाणे संधी साधली आहे. वेस्टर्न रेल्वे ठप्प झाल्याने चाकरमान्यांनी कसे ही करून ऑफिस गाठण्याची धावपळ केल्याने रिक्षावाल्यांनी सुद्धा हात धुवायला सुरुवात केल्याचे चित्र होते. प्रति प्रवाशामागे ऑटो रिक्षाने अंधेरी ते वांद्रा हे अंतर केवळ १५० रुपयात सहज गाठता येत, पण प्रवाशांची अडचण लक्षात येताच रिक्षावाल्यांनी शेअरिंग स्वरूपात प्रत्येक प्रवाशांकडून १०० रुपये घेतले. त्यामुळे जो प्रवास १५० रुपयांपर्यंत होतो त्याचसाठी आज रिक्षावाल्यांनी ३०० रुपयांची मागणी करत प्रवाशांची लूट केली.
6 वर्षांपूर्वी -
भाजप-शिवसेना सरकारकडून सामान्यांना लवकरच वीज दरवाढीचा झटका?
सर्वसामान्यांना महागाई आधीच डोईजड झाली असताना त्यात आता भाजप-शिवसेनेच्या सरकारकडे महानिर्मिती व महापारेषण या २ वीज कंपन्यांनी महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे वीज दरवाढ व वीजवहनासाठी २,५३२ कोटी रुपये इतकी प्रचंड दरवाढ मागितली आहे. लवकरच आयोगाच्या मंजुरीनंतर याबाबत अधिकृत निर्णय घेऊन अंमलबजावणी होईल. त्यामुळे भाजप शिवसेनेचं युती सरकार लवकरच तुम्हाला वीज दरवाढीचा झटका देणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
सामान्य मराठी गुंतवणूकदार फसले? शालिनी कॅब्स'चे मालक व 'ते' राजकीय हितचिंतक कोण?
मुंबई, ठाणे व पुण्यासारख्या शहरात खासगी कॅब सेवा पुरविण्यासाठी शालिनी कॅब्स या टॅक्सी सेवेची सुरुवात २०१५ मध्ये करण्यात आली होती. परिवहन खात्याकडून नवं ट्रान्सपोर्ट लायसन्स काढण्यात आलं होत, त्याचवेळी नेमक्या या हालचाली सुरु झाल्या होत्या असं समजतं. विशेष म्हणजे नेमकी त्याच वेळी ओला – उबेर सारख्या बड्या कंपन्यांविरोधात फास का आवळला जात होता हे गुंतवणूकदारांना आज २-३ वर्षानंतर समजतं आहे. यात अनेक छोट्या गरीब ड्रायव्हर्स आणि मराठी लोकांनी मोठ्या आशेने दहा हजार ते दीड लाख रुपये गुंतविले होते. सर्वात महत्वाचं म्हणजे ‘शालिनी कॅब्स’च्या टीम सोबत शिवसेनेच्या परिवहन मंत्र्यांपासून ते खासदार सुद्धा दिसत आहेत. शिवसेना प्रणित महाराष्ट्र फ्लीट टैक्सी चालक-मालक सेना संघटनेचे खजिनदार दत्तानन पालनकर हे शालिनी कॅब्स’चे संचालक असल्याचे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
फडणवीसांच्या कार्यक्रमात प्लास्टिकचे ग्लास, पर्यावरण मंत्री कारवाई करणार का?
महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी लागू झाली असताना सरकारच्या पर्यावरणविषयक कार्यक्रमात आणि मुख्यमंत्र्यांची उपस्थिती असताना सुद्धा या कार्यक्रमात सर्रास पणे प्लास्टिकचे ग्लास वापरण्यात आल्याचं समोर आल आहे. त्यामुळे सरकार प्लास्टिक बंदी आणि पर्यावरणाविषयी किती गंभीर आहे हे समजते.
6 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंनंतर आता 'मेट्रोमॅन' ई श्रीधरन यांची सुद्धा बुलेट-ट्रेन बाबत नकारात्मक टीका
देशात मुंबई अहमदाबाद बुलेट-ट्रेन’बद्दल मोठा आभास निर्माण केला जात असल्याचे चित्र असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली होती. तसेच मुंबई अहमदाबाद बुलेट-ट्रेन ही मुंबई’ला महाराष्ट्रापासून तोडण्याच्या दूरदृष्टिकोनातून लादली जात असून त्याचा प्रत्यक्ष मुंबई आणि महाराष्ट्राला काहीच फायदा होणार नसून, त्यासाठी घेतल्या जाणाऱ्या कर्जाचा बोजा मात्र महाराष्ट्रावर लादला जाणार आहे. विशेष म्हणजे अहमदाबाद बुलेट-ट्रेन ही केवळ श्रीमंतांसाठी असून त्याचा राज्यातील सामान्यांना काहीच फायदा होणार नसल्याचे त्यांनी अनेकदा अधोरेखित केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
ऐनवेळी राष्ट्रवादीने दगा दिल्यास स्वबळावर लढायच्या विचारामध्ये काँग्रेस?
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सध्याच्या एकूणच प्रतिक्रिया पाहिल्यास, ऐनवेळी राष्ट्रवादीने दगा दिल्यास काँग्रेस स्वबळावर लढणार असं सांगत महाराष्ट्र काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी मल्लिकार्जून खरगे यांनी राष्ट्रवादीच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. दिल्लीत भरलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अनेकांनी राष्ट्रवादीच्या भूमिकेविषयी शंका उपस्थित केली आणि जर राष्ट्रवादी महाराष्ट्रात सोबत आली नाही तर काय निर्णय घ्यायचा असा प्रश्न उपस्थित केला असता मल्लिकार्जून खरगे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
तुम्ही व तुमच्या पुढच्या पिढ्या वांद्रयातच राहणार हा माझा शब्द: राज ठाकरे
मुंबई : मुंबईमधील मराठी माणसाचं अस्तित्वच धोक्यात आल्याचं अधोरेखित करत, सरकार येथील जमिनी इंच इंच विकू याच उद्देशाने धोरण राबवत असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. मुंबईमधील वांद्रा येथील शासकीय वसाहतीला भेट देऊन त्यांनी इथल्या समस्या समजून घेतल्या तसेच नंतर स्थानिकांना संबोधित सुद्धा केले. पुनर्विकासाच्या नावाने वांद्रा येथील शासकीय वसाहतीमधील लोकांना विस्थापित करण्याचा घाट घातला जात असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. सरकारच्या एकूणच हालचाली या मुंबईमधून मराठी माणसाचं अस्तित्वच संपविण्यासाठी आहेत असा थेट आरोप सुद्धा राज ठाकरे यांनी केला. पुनर्विकासाच्या नावाखाली इथल्या स्थानिक लोकांना घरं खाली करायला सांगितली जात आहेत. परंतु इथल्या नागरिकांचा त्याला ठाम विरोध आहे. त्याच […]
6 वर्षांपूर्वी -
सत्तेच्या मलईपुढे स्वबळाची घोषणा फसवी? जळगाव महापालिका निवडणुकीसाठी सेना-भाजपची दोस्ती
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी स्वबळाची घोषणा करताना,’यापुढे भाजप सोबत कोणत्याही निवडणुकीत युती नाही म्हणजे नाही आणि आम्ही यापुढे केवळ स्वबळावर लढणार अशी घोषणा केली होती. परंतु ही घोषणा फुसकी असल्याचे समोर येत आहे. कारण आगामी जळगाव महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने भाजप सोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे.
6 वर्षांपूर्वी -
उधारीवर विडी-सिगारेट देण्यास नकार देताच शिवसैनिकाने पानटपरी पेटवली
नाशिक मोहाडी येथे ही घटना घडली असून रामभाऊ लोंढे या पानटपरी मालकाने सरपंच सुरेश गावित यांच्याकडे विडी, सिगारेटच्या आधीच्या शिल्लक उधारीचे पैसे मागितल्याचा रागाने सुरेश गावित यांनी त्यांच्या कुटुंबीयांसह पुन्हा टपरीवर जाऊन मुद्दाम कुरापती काढल्या आणि त्यानंतर सुरेश गावित यांनी रागाने पानटपरीला टपरीला आग लावली, अशी तक्रार रामभाऊ लोंढे यांनी केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
राज्यातील सुस्त काँग्रेस पक्षामुळे राष्ट्रवादीच्या अडचणी वाढण्याची चिन्ह? सविस्तर
आगामी निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागलेले असताना राज्यातील काँग्रेस मात्र अजून सुद्धा सुस्त असल्याचे स्पष्ट जाणवते. सध्या राज्यात काँग्रेस पक्षाला राज्य स्तरावरील चेहराच नसल्याने अडचणी वाढण्याची चिन्ह आहेत. काँग्रेसचे दोन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण हे दोन्ही नेते त्यांच्या मतदारसंघापुरतेच आवडते चेहरे आहेत. परंतु काँग्रेसमधला सुस्तपणा राष्ट्रवादीला आगामी निवडणुकीत अडचणीत टाकू शकतो.
6 वर्षांपूर्वी -
अमित ठाकरेंच्या प्रयत्नांना यश, राष्ट्रीय बॅडमिंटनपटू प्राजक्ता सावंतची नायब तहसीलदार पदी नियुक्ती
राष्ट्रीय बॅडमिंटनपटू प्राजक्ता सावंतचे मागील दोन वर्षांपासून खेळाडू कोट्यातून नायब तहसीलदार पदी नियुक्तीसाठी सरकार दरबारी प्रयत्नं सुरु होते. सरकार दरबारी हा विषय दीर्घ काळापासून प्रलंबित असल्याने तिने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्याकडे या विषयासंदर्भात पाठपुरावा करण्याची विनंती केली होती.
6 वर्षांपूर्वी -
वांद्रे शासकीय वसाहतील रहिवाशी 'हक्काच्या घरासाठी' राजसाहेब ठाकरेंच्या भेटीला
मुंबई वांद्रे येथील शासकीय वसाहतीतील रहिवाशांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची त्याच्या निवासस्थानी भेट घेतली. अनेक वर्षांपासून इथे राहणाऱ्या हजारो कुटुंबांना हक्काच्या घरांसाठी झगडावं लागत आहे. वांद्रे येथील शासकीय वसाहत ही मुंबई शहरातील मोक्याचे ठिकाणी असल्याने येथे अनेक राजकारणी डोळा ठेऊन आहेत आणि या रहिवाशांना त्याच ठिकाणी घर मिळतील की नाही याची हमी नाही.
6 वर्षांपूर्वी -
ते 'गुंड' की? कायदा पायदळी तुडविणाऱ्यांच्या मनमान्या सहन करणारे आपण षंड?
कालची पुण्यातील पीव्हीआर सिनेमात घडलेली घटना ही जर कायद्याच्याच नजरेतून बघायची तर तो ‘MRP’ कायदा पायदळी तुडवला गेला नसता तर अशी घटना आणि किव्हा आंदोलनं का होतील? अगदी दगदगलेल्या रोजच्या दैनंदिन आयष्यातून वेळ काढून अनेक कुटुंब किव्हा जोडपी या मल्टिप्लेक्स मध्ये सिनेमे बघण्यासाठी जात असतात. अगदी दोघे जण गेले असं जरी गृहीत धरलं तरी तिकीट असतं १००-२०० रुपये आणि पोपकोर्न २५० आणि समोसे – वडापाव १०० रुपये. बाहेरून खिशाला परवडतील असे खाण्याचे पदार्थ घेऊन जाण्याला बंदी असते.
6 वर्षांपूर्वी -
रामदास कदमांकडून शिवसैनिकांना प्रभावी भाषण करण्याचे प्रशिक्षण: जालना
जालन्यातील बीज शीतल सीडस्च्या सभागृहात मराठवाड्याच्या ५ जिल्ह्यांमधील शिवसैनिकांचा मेळावा आयोजीत करण्यात आला होता. त्यावेळी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. विशेष म्हणजे या मेळाव्यात शिवसैनिकांना प्रभावी भाषण कसे करायचे याचे प्रशिक्षण देण्यात आले.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स शेअर्समध्ये घसरण वाढतेय, स्टॉक Hold करावा की Sell?
- Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल
- Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर मजबूत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हलसहित टार्गेट प्राईस जाहीर
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे टॉप 5 शेअर्स मालामाल करणार, अल्पावधीत तगडा परतावा मिळेल
- RVNL Share Price | PSU स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सुसाट धावणार
- Numerology Horoscope | 10 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Infosys Share Price | हलक्यात घेऊ नका! Infosys, TCS, Wipro सहित हे 7 शेअर्स मालामाल करणार, हाय ट्रेडिंग व्हॉल्यूम
- HAL Share Vs BEL Share Price | PSU HAL आणि BEL शेअर्स दणादण परतावा देणार, अल्पावधीत 30% कमाई करा
- Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल
- Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर्समध्ये मजबूत तेजी येणार, नवीन अपडेट येताच शेअर्सची खरेदी वाढली