महत्वाच्या बातम्या
-
तो जोरात पसरतोय; केरळने एका दिवसात महाराष्ट्राला मागे टाकले; तब्बल २८ पॉझिटिव्ह
कोरोना व्हायरसचं थैमान जगभरात सुरू आहे. जगभरात १३ हजारपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे महाराष्ट्रात २४ तासांत तब्बल १५ रुग्ण वाढले आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ८९ वर पोहोचली आहे. मागच्या दोन दिवसांमध्ये महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वेगान वाढ होत असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. भारतात आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला तर कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३९६ वर पोहोचली आहे. दरम्यान गेल्या २४ तासांत देशभरात ८० हून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. रविवारी कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जनता कर्फ्यू पाळण्यात आला होता.
4 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारला १२ फेब्रुवारीपासून राहुल गांधी गांभीर्य सांगत होते...पण ? सविस्तर वृत्त
जगभरात कोरोनाचा धोका वाढत आहे. १३ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मागच्या दोन दिवसांत भारतातही कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता ४०० च्या जवळपास पोहोचली आहे. तर महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण ८९ आहेत. त्यामुळे सर्व स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जवळपास देशभरातील २२ राज्य आणि ८० जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. इतकी गंभीरर परिस्थिती असतानाही लोकांनी याचं गांभीर्य ओळखायला हवं यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कठोर शब्दात आज सकाळी ट्विटरवर जनतेला पुन्हा एकदा आवाहन केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदींचं ट्विट! लोकं लॉकडाऊनला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत...नेटिझन्स म्हणाले तुमच्यामुळेच
जगभरात कोरोनाचा धोका वाढत आहे. १३ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मागच्या दोन दिवसांत भारतातही कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता ४०० च्या जवळपास पोहोचली आहे. तर महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण ८९ आहेत. त्यामुळे सर्व स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जवळपास देशभरातील २२ राज्य आणि ८० जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
छत्तीसगड: नक्षलवाद्यांंशी चकमक; १७ जवान शहीद
छत्तीसगडच्या सुकमामध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत १७ जवान शहीद झाले. शुक्रवारी रात्री एलमागुंडा जिल्ह्यात चिंतागुफामध्ये DRG, STF बुर्कापाल आणि कोबरा बटालियनची टीम रात्री दीड वाजता ऑपरेशनवर निघाली होती. ऑपरेशनवरून परतताना दुपारी दीड वाजता नक्षलवाद्यांची चकमक झाली. ही चकमक ३ तास चालली. या हल्लात काही बडे नक्षली म्होरके मारले गेल्याचीही माहिती मिळाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनाचा देशात आणखी एक बळी, गुजरातमध्ये रुग्णाचा मृत्यू
देशात दिवसेंदिवस कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आकडा वाढतो आहे. कोरोना व्हायरसच्या रुग्णांनी शंभरी पार केली आहे तर मृतांचा आकडा सातच्या वर पोहोचला आहे. नुकतेच हाती आलेल्या वृत्तानुसार कोरोना व्हायरसने गुजरात राज्यात पहिला बळी घेतला आहे. सुरत येथे एका ६७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.
4 वर्षांपूर्वी -
'जनता कर्फ्यू'त देशभरातून अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना सॅल्यूट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच संपूर्ण भारतातील जनतेला रविवारी जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलं. जनतेनेही अतिशय उत्स्फूर्तपणे या आवाहनाला पाठिंबा दिला. Corona कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रत्येक देशवासियाने आवश्यक असणारे सर्व प्रतिबंधात्मक उपाय योजावेत असंही आवाहन त्यांनी केलं. याचवेळी मोदींनी राष्ट्रातील सर्व जनतेकडे एक विनंतीही केली. ही विनंती होती, कृतज्ञता व्यक्त करण्याची.
4 वर्षांपूर्वी -
सत्ताकाळात पैसा पुतळे उभारण्यात; आज ३६,००० भारतीयांसाठी एक क्वारंटाईन बेडची वेळ
कोरोना व्हायरस देशभर पसरू नये, म्हणून केंद्र सरकारने वाहतूक व्यवस्था बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं दिसत आहे. मात्र कोरोनाने सध्या साऱ्या जगात धुमशान घातले आहे. भारतातही मोठ्या वेगाने हा विषाणू पसरत आहे. भारतात कोरोना दुसऱ्या टप्प्यात असला तरी, देशात ३०० पेक्षा अधिक रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. या सगळ्यात केंद्रीय आरोग्य विभागाचा एक धक्कादायक रिपोर्ट समोर आला आहे. यामध्ये सध्या रुग्णालयांमध्ये ८४,००० भारतीयांसाठी एक बेड, तर, ३६,००० भारतीयांसाठी एक क्वारंटाईन बेड आहे. कोरोनाव्हायरसने थैमान घातल्यानंतर सरकारच्या वतीने ही आकडेवारी गोळा करण्यात आली. काही राज्यांमध्ये तर ११,६०० भारतीयांसाठी एकच डॉक्टर असणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्तीवर योग्य निर्णय...मेल, एक्स्प्रेस, पॅसेंजर ट्रेन ३१ मार्चपर्यंत बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी मध्यरात्रीपासून मालवाहतूक वगळता सर्व प्रवासी वाहतूक तूर्त बंद राहणार आहे. ३१ मार्चपर्यंत लांब पल्ल्याची रेल्वे वाहतूक रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. रेल्वेने घेतलेला हा निर्णय देशाची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने होताना दिसते आहे. यापूर्वी कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे अनेक ट्रेन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, दिवसेंदिवस देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने मोठे पाऊल उचलत संपूर्ण रेल्वे सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती : इटलीतून २६३ भारतीय विद्यार्थी परतले
युरोपियन देश इटलीमध्ये करोनाचा हाहा:कार सुरू आहे. इटलीत एकाच दिवशी ७९३ जणांच्या मृत्यूने जग सुन्न झालं आहे. इटलीत आतापर्यंत ५३ हजार जणांना करोनाची लागण झाली आहे, तर ४८०० मृत्यू झाले आहेत. इटलीत २७ फेब्रुवारीला ५८८३ जणांना करोनाची लागण झाली होती, तर २३३ मृत्यू झाले होते. इटली सरकारने वारंवार जनतेला सूचना पाळण्याचं आवाहन केलं आणि त्याकडे दुर्लक्ष होत गेलं. यात सरकारलाही जबाबदार धरलं जातं. त्यामुळे आता इटलीवर लॉकडाऊनची वेळ तर आली आहेच, शिवाय उपचाराअभावी अनेकांचे डॉक्टरांच्या डोळ्यासमोर मृत्यू होत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
डोनाल्ड ट्रम्प'साठी १२० कोटी खर्च आणि कोरोना लढ्यासाठी फक्त टाळ्या आणि थाळी
कोरोनाविरूद्ध सुरू असलेल्या लढाईत भारत सरकारने आपली रणनीती बदलली आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा धोका वाढत चालला आहे. भारतात २७१ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे आता सरकारने सर्व रुग्णालयाच न्यूमोनियाच्या रुग्णांचीही तपासणी केली जाणार आहे. यासाठी सर्व राज्यांना आदेश देण्यात आले आहेत. आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी, न्यूमोनिया झालेल्या सर्व रुग्णांना एनसीडीसी किंवा आयडीएसपीला कळवावे, जेणेकरुन त्यांच्या COVID-19 ची तपासणी करता येईल, असे सर्व रुग्णालयांना सांगितले आहे.
4 वर्षांपूर्वी -
सावधान! कोरोनाच्या समूह संसर्गाला सुरुवात? हा रुग्ण परदेशात गेला नव्हता...सविस्तर
तामिळनाडूतील एका २० वर्षांच्या तरूणाला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. पण हा तरूण परदेशात गेला नव्हता. त्याला कोरोना विषाणूची लागण कशी काय झाली, याचा शोध आरोग्य विभागातील अधिकारी युद्ध पातळीवर घेत आहेत. हा तरूण काही दिवसांपूर्वी दिल्लीला गेला होता. तेथून तो रेल्वेने तामिळनाडूला परतला होता. या तरूणाला झालेला कोरोना विषाणूचा संसर्ग हे देशातील या आजाराचे समूह संसर्गाचे पहिले उदाहरण असल्याची शक्यताही वर्तविण्यात येऊ लागली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कमलनाथ यांचा राजीनामा, काँग्रेसचं सरकार कोसळलं
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. पत्रकारांनी त्यांनी ही माहिती दिली. राज्यपाल लालजी टंडन यांना भेटून त्यांच्याकडे राजीनामा देणार असल्याचे कमलनाथ यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजपने षडयंत्र रचून आमचे सरकार पाडल्याचा आरोप कमलनाथ यांनी केला. काँग्रेसच्या २३ आमदारांचे राजीनामे याआधीच मध्य प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष एन पी प्रजापती यांनी स्वीकारले आहेत. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याआधीच कमलनाथ यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
4 वर्षांपूर्वी -
ते ढसाढसा रडले, फाशी घरात लोटांगण घातले; अखेर न्याय झालाच
संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या बहुचर्चित निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही दोषींना शुक्रवारी सकाळी साडेपाच वाजता दिल्लीतील तिहार जेलमध्ये फाशी देण्यात आली. तब्बल सात वर्षांच्या दीर्घ न्यायालयीन संघर्षानंतर निर्भयाला आज न्याय मिळाला आहे, अशी भावना यावेळी निर्भयाच्या आईनं व्यक्त केली. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत फाशीची शिक्षा रोखण्यासाठी निर्भयाच्या चारही दोषींनी प्रयत्न केला. दिल्ली उच्च न्यायालयानं रात्री १२.०० वाजेच्या दरम्यान ही याचिका फेटाळून लावत फाशीची शिक्षा कायम ठेवली.
4 वर्षांपूर्वी -
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मध्य प्रदेशात आज बहुमत चाचणी
ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या बंडाळीमुळे अस्थिर झालेल्या कमलनाथ सरकारला आज बहुमत सिद्ध करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे आज शुक्रवारी मध्य प्रदेश विधानसभेत काँग्रेस सरकारला अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. यापूर्वी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मध्य प्रदेश विधानसभेत कमलनाथ सरकारकडून विश्वासदर्शक ठराव मांडला जाणे अपेक्षित होते. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ मार्चपर्यंत स्थगित केले होते. यानंतर भाजपने न्यायालयात धाव घेतली होती.
4 वर्षांपूर्वी -
#JantaCurfew: २२ तारखेला देशात 'जनता कर्फ्यु' पाळा - पंतप्रधान
चीनच्या वुहान शहरातून फैलावलेल्या करोना व्हायरसनं जगभर धुमाकूळ घातलाय. आत्तापर्यंत या व्हायरसमुळे जगभरात ९००० हून अधिक जणांनी आपले प्राण गमावलेत. भारतातही चार जणांना करोना व्हायरच्या संसर्गानं प्राण गमवावा लागलाय. पंजाब, दिल्ली, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांत प्रत्येकी एक बळी गेलाय. तर देशाभरात १७३ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यातील सर्वात जास्त अर्थात ४४ रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करत होते.
4 वर्षांपूर्वी -
प्रवासी विमानांना भारतात प्रवेश बंदी; तर देशातील वरिष्ठ नागरिकांसाठी महत्वाची सूचना
कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी भारत सरकारने कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. २२ मार्चपासून पुढच्या एक आठवड्यासाठी भारतात एकही प्रवासी विमान दाखल होणार नाही, असं पत्रसूचना कार्यालयातर्फे सांगण्यात आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
विरोधक लवकरच माझं स्वागत करतील: खासदार रंजन गोगोई
माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी गुरुवारी राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रंजन गोगोई यांची राज्यसभेवर नियुक्ती केली होती. रंजन गोगोई यांच्या नियुक्तीवरून काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. गुरुवारी याच विरोधाचा भाग म्हणून काँग्रेस आणि बहुजन समाज पक्षाच्या राज्यसभेतील खासदारांनी शपथविधीवेळी सभात्याग केला. कम्युनिस्ट पक्ष, डीएमके आणि एमडीएमकेनेही या नियुक्तीला विरोध केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
'५०% कर्मचारी वर्क फ्रॉम होम'...केंद्र सरकारची सूचना
जगभरात दहशत निर्माण केलेल्या कोरोना विषाणूने देशात कहर माजवला आहे. चीनमधून विविध देशात पसरलेल्या या जीवघेण्या विषाणूने भारतात ही एन्ट्री केली असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशवासियांची चिंता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सार्क ( ८ राष्ट्रांचा समावेश असणारी दक्षिण आशियायी प्रादेशिक सहकार्य संस्था) राष्ट्रांना कोरोना विषाणूविरोधात लढण्याचा मंत्र दिल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी देशवासियांना संबोधित करणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
आ. रोहित पवार यांचा राहुल गांधींना शहाणपणाचा सल्ला...काय म्हटलं?
देशात फैलावत चाललेल्या करोना विषाणूच्या संसर्गाची तुलना काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी सुनामीशी केली होती. तसेच येत्या काळात देशात येणाऱ्या आर्थिक विध्वंसाशी लढण्यासाठी तयार राहण्याचे आवाहनही त्यांनी केंद्र सरकारला केले होते.
4 वर्षांपूर्वी -
मध्य प्रदेशातील राजकारण तापलं; त्या आमदारांच्या भेटीला गेलेल्या दिग्विजय सिंहांना अटक
मध्य प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर आज पडदा पडेल का, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. बहुमत चाचणीवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होत असून दुसरीकडे राज्यपाल लालजी टंडन यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांना बहुमत चाचणीला आज सामोरे जाण्याचे आदेश दिले आहेत. तर बंडखोर आमदार बेंगळुरूला असताना बहुमत चाचणी घेणे हे घटनाविरोधी ठरेल असे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे म्हणणे आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल
- Mastek Share Price | 40 रुपयाच्या शेअरची कमाल! तब्बल 4000 टक्के परतावा दिला, आता एका दिवसात 20% वाढला
- Gold Rate Today | बापरे! लग्नासराईच्या दिवसातही सोनं खरेदी करणं परवडणार नाही, लवकरच 1 लाख रुपये तोळा होणार
- Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार?
- Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा
- Infosys Share Price | भरवशाचा इन्फोसिस शेअर उसळी घेणार, दिग्गज ब्रोकिंग तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर
- Numerology Horoscope | 17 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
- Stocks in Focus | मार्ग श्रीमंतीचा! हे टॉप 5 बँकिंग शेअर्स तुम्हाला अल्पावधीत 38 टक्केपर्यंत परतावा देतील, संधी सोडू नका
- Reliance Power Share Price | अवघ्या 4 वर्षात 2325 टक्के परतावा दिला, शेअर प्राईस 26 रुपये, पुढे तेजी येणार का?